Tuesday, March 6, 2018

छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान


राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनू इच्चीनार्या व तशी क्षमता असलेल्या तरुण वर्गाला आर्थिक सहाय्य पुरविण्याच्या दृष्टीने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान अंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ तर्फे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गटप्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना या तीन योजना राबविल्या जात आहेत. 


 वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना


लाभार्थी
पात्रता
कृषि संलग्न व पारंपारिक उपक्रमांसाठी 
लघु व मध्यम उद्योगांसाठी 
उत्पादन, सेवा व व्यापार क्षेत्रांसाठी 
  महाराष्ट्राचा रहिवासी असावा
 आधार लिंक असणारा मोबाईल क्रमांक 
 वय - १८ ते ४५ वर्षे 
 वार्षिक कौटुंबिक उत्पन्न - ८ लाख पर्यंत 
 दिव्यांग उमेदवारासाठी सक्षम यंत्रणेचा पुरावा

इतर अटी व शर्ती - 
  1. यापुर्वी लाभ घेतलेला नसावा. 
  2. कर्ज प्रकरण CIBIL धारक बँकेतून करणे आवश्यक आहे. 
  3. एका कुटुंबासाठी एकदाच एका व्यक्तीला लाभ दिला जातो.
गटप्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना
लाभार्थी
पात्रता
कृषि संलग्न व पारंपारिक उपक्रमांसाठी 
लघु व मध्यम उद्योगांसाठी 
उत्पादन, सेवा व व्यापार क्षेत्रांसाठी 
  महाराष्ट्राचा रहिवासी असावा
 आधार लिंक असणारा मोबाईल क्रमांक 
 वय - १८ ते ४५ वर्षे 
 वार्षिक कौटुंबिक उत्पन्न - ८ लाख पर्यंत 
 दिव्यांग उमेदवारासाठी सक्षम यंत्रणेचा पुरावा

इतर अटी व शर्ती - 
  1. शासनमान्य बचत गट, भागीदारी संस्था, निबंधक भागीदारी संस्था मुंबई यांनी प्राधिकृत केलेले सहकारी संस्था, कंपनी, LLP, सोसायटी व इतर नोंदणीकृत संस्था 
  2. यापुर्वी लाभ घेतलेला नसावा. 
  3. चालू उद्योग विस्तारासाठी व नवीन उद्योगासाठी 
  4. कर्ज प्रकरण CIBIL धारक बँकेतून करणे आवश्यक आहे. 
  5. एका कुटुंबासाठी एकदाच एका व्यक्तीला लाभ दिला जातो.
नोंदणी व अंमलबजावणी 
वैयक्तिक योजनेच्या उमेदवारांनी व गट योजनेच्या सदस्यांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावे. प्रस्ताव सादर केल्यावर उमेदवारास संगणकीकृत सशर्त पात्रता प्रमाणपत्र प्राप्त होईल. हे LOI बँकेकडे देऊन कर्ज मंजुर करून घ्यावे. बँकेच्या परतावा नियमानुसार वेळेत हप्ते भरल्यास व्याजाचा परतावा हा महामंडळाकडून त्यांच्या कर्ज खात्यास जमा होईल. 

गट प्रकल्प कर्ज योजना 
महामंडळातर्फे सदर योजनेंतर्गत पात्र शेतकरी उत्पादक गटांना १० लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज रक्कम शेती उद्योगाकरिता देण्यात येईल. 
 लाभार्थी - 

  1. कृषि संलग्न व पारंपारिक उपक्रमांसाठी 
  2. लघु व मध्यम उद्योगांसाठी 
  3. उत्पादन, सेवा व व्यापार क्षेत्रांसाठी 
  4. गटातील किमान एक सदस्य शैक्षणिक अर्हता १० वी पास असावी.
पात्रता - 
  1. महाराष्ट्राचा रहिवासी असावा
  2. आधार लिंक असणारा मोबाईल क्रमांक 
  3. वय - १८ ते ४५ वर्षे 
  4. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न - ८ लाख पर्यंत 
  5. दिव्यांग उमेदवारासाठी सक्षम यंत्रणेचा पुरावा 
इतर अटी व शर्ती - 
  1. शासनमान्य बचत गट, भागीदारी संस्था, निबंधक भागीदारी संस्था मुंबई यांनी प्राधिकृत केलेले सहकारी संस्था, कंपनी, LLP, सोसायटी व इतर नोंदणीकृत संस्था 
  2. यापुर्वी लाभ घेतलेला नसावा. 
  3. चालू उद्योग विस्तारासाठी व नवीन उद्योगासाठी 
  4. कर्ज प्रकरण CIBIL धारक बँकेतून करणे आवश्यक आहे. 
  5. एका कुटुंबासाठी एकदाच एका व्यक्तीला लाभ दिला जातो.
नोंदणी व अंमलबजावणी 
  1. सदरचे कर्ज मुदत कर्ज असेल 
  2. गट पात्र ठरलेनंतर ऑनलाईन मंजुरी पत्र दिले जाईल. 
  3. वैधानिक कागदपत्रे तारण पत्रे पुर्ण केल्यावर कर्ज रक्कम गट कर्ज खात्यावर जमा होईल. 
  4. बिनव्याजी कर्ज रक्कम परतावा वितरणाच्या खात्यात ७ व्या महिन्यापासुन ८४ व्या महिन्यापर्यंत (७ वर्षे) समान हप्ता देणे अनिवार्य आहे. 

No comments:

Post a Comment