Thursday, August 25, 2016

प्रतिबंधात्मक उपायांनी रोखा जनावरांतील सांसर्गिक गर्भपात

माझीशेती : 160825
*प्रतिबंधात्मक उपायांनी रोखा जनावरांतील सांसर्गिक गर्भपात*
- डॉ. प्रफुल्लकुमार पाटील

*सांसर्गिक गर्भपात (ब्रुसेलॉसिस)* हा आजार ब्रुसेला जीवाणुमूळे प्राण्यांपासून मानवाला व मानवापासून प्राण्यांना होणारा आजार आहे.

*प्रसाराचे मार्ग*
* जननेंद्रियांतून पडणारा स्राव, झार यांच्या संपर्कात आलेला चारा व पाणी याद्वारे.
* हवेतून श्‍वसनाद्वारे
* नैसर्गिक रेतनामधून
* डोळे व कातडीच्या जखमांतून

*लक्षणे*
* गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात (7व्या ते 8व्या महिन्यापासून)गर्भपात होणे
* झार किंवा वार न पडणे, जनावर वारंवार उलटणे.
* जननेंद्रियातून पू-सारखा स्राव येणे.
* वळूमध्ये अंडाशयाला सूज येणे, सांधे सुजणे.
* ताप कमी जास्त होणे, अशी लक्षणे आढळतात.
*उपचार*
जनावर खरेदी केल्यानंतर त्यांना एक महिना वेगळे ठेवून त्यांच्या रक्ताची तपासणी करावी.
विकत घेतलेल्या जनावराचे, वासरांचे लसीकरण, जंतनिर्मूलन करावे
पृष्ठभाग पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा.
वर्षातून १ ते २ वेळा रक्ताची तपासणी करावे
रेतन वळू आणि गाईंची वर्षातुन दोन वेळा रक्त तपासणी करावी.

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान :
चळवळ - नाविन्यपुर्ण शेतीची
-----------------------------------
*आमच्या शेतीविषयक सेवांसाठी www.mazisheti.org/p/loading.html या संकेतस्थळावर भेट द्या.
------------------------------------------
www.mazisheti.org 
www.agriindia.club
www.fb.com/agriindia 
Whatsapp -9975740444

Wednesday, August 17, 2016

कपाशी कृषि विषयक सल्ला (160817)

*कृषि विषयक सल्ला*

_★ *जूनी पाने काढणे*

कपाशीचे पीक ६० दिवसांचे असतांना झाडांना ११ ते १३ फांद्या आलेल्या असतात.
यावेळी शेंड्याकडील तीन फांद्या सोडून झाडांवरील इतर फांद्यांखालील जूने मोठे पान काढावे.
 जास्तीत जास्त ७ ते १० पाने एका झाडाची निघतात.
पाने शेतातच पडू द्यावीत.
या पद्धतीमुळे उत्पादनात निव्वळ २०% पर्यंत वाढ होते.
संपूर्ण झाड मोकळे होत असल्यामुळे जून्या पानांखाली लपून बसणा-या कीडींपासून व रोगांपासून संरक्षण तर होतेच त्याच बरोबर संपूर्ण खोड व फांद्या सूर्यप्रकाशात आल्यामुळे बोंडे लागण्याचे प्रमाण वाढते._

_★ *कपाशीमध्ये संजीवकांचा वापर: संजीवकांचा वापर हा लागवड अंतराशी निगडीत आहे*.

 लागवड अंतर ५ X १ फूट किंवा यापेक्षा जास्त असल्यास लिहोसीनची फवारणी लागवडीपासून ६० दिवसांनी १० लिटर पाण्यात २ मिली या प्रमाणात करावी.
यानंतर पीक ९० दिवसांचे असतांना जीए १० पीपीएम व १% युरीयाची फवारणी करावी.
लागवड अंतर कमी असल्यास व जोड ओळ पद्धतीमद्धे या फवारण्या १० दिवस अगोदर (म्हणजेच ५० दिवसांनी व ८० दिवसांनी) करणे गरजेचे आहे.
लागवडीपासून १०० दिवसांनी पोटॅशियम हायड्रोजन ऑर्थोफॉस्फेट ५० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे._

_★ *कपाशी मधे गुलाबी बोंड अळी: गेल्यावर्षी बीटी कपाशीचे ७० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान गुलाबी बोंडअळीमुळे झाले होते*

.शेतकरी बांधवांनो यावर्षी या अळीचा प्रादुर्भाव पूर्वहंमामी कपाशीमध्ये मोठ्या प्रमाणावर एक ऑगष्टपासूनच दिसू लागला आहे.
यापुढेही अळी मोठ्या प्रमाणावर कापूस पिकाचे नुकसान करू शकते. वेळीच या कीडींवर नियंत्रण न मिळवल्यास आलेले पीक हातेच जावू शकते.

_यासाठी दररोज दुपारी तीन नंतर कपाशी पिकांमध्ये निरिक्षणे घ्यावीत. निरिक्षण करतांना जर एखादे फुल पिवळे दिसले तर तात्काळ ते तोडावे. अशा फुलाचे तोंड एकदम घट्ट चिकटलेले दिसेल.
यालाच डोमकळी असेही म्हणतात. अशावेळी या फुलाच्या पाकळ्या वेगळ्या केल्यास अशा फुलांमध्ये एक ते दोन गुलाबी बोंडअळ्या आपणास पहावयास मिळतील._
_तोडलेली फुले तात्काळ नष्ट करावीत. फवारणी करतांना क्लोरोपायरीफॉस ५०% + सायपरमथ्रीन ५% एकत्र असलेले किंवा प्रोफेनोफॉस ४०% + सायपरमेथ्रिन ४% मिश्रण २ मिली अधिक युरिया १० ग्राम प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. एकरी तीन ते पाच डेल्टास्टिकी ट्रॅप लावावेत.
हे सापळे कृषी विक्रेते यांचेकडे उपलब्ध असतात.
 या कामगंध सापळ्यांमध्ये येणा-या कीडींवर सतत निरिक्षण ठेवावे._

*कृषि विभाग*
*वसमत*

Saturday, August 13, 2016

माझीशेती : हुमणी किडींचा प्रार्दुभाव व व्यवस्थापन

माझीशेती : हुमणी किडींचा प्रार्दुभाव व व्यवस्थापन (160813)
- मनोज लोखंडे, हिंगोली
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पांतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधासाठी www.mazisheti.org/p/project-service.html येथे क्लिक करा.


*हुमणीमुळे होणारे नुकसान-*
हुमणी पिकाची तंतुमुळे, सेंद्रिय पदार्थ खातात. नंतर मुख्य मुळे खाण्यास सुरू करतात. परिणामी झाड वाळते. एका झाडाचे मूळ कुरतडून खाल्ल्यानंतर हुमणी दुसऱ्या झाडाकडे वळते. शेतात एका ओळीत झाडे वाळल्याचे दिसून येते.

*रासायनिक नियंत्रणासाठी-*
-ठिबकद्वारा पाण्यामध्ये  क्‍लोरपायरीफॉस  (20 टक्के ईसी)  किवा नुवान 2 लिटर + 500  gm कापर आक्सीक्लोराइड  प्रति एकर सोडावे.

- cartrap hydrochloride 4%  (biostat-Dartriz 4g, caldan 4%)  or  fertera  dupont  3kg प्रतीएकर soil application द्वारे देणे

*जैविक नियंत्रण*
जैविक नियंत्रणात *मेटारेजीयम ॲनिसोफिली* या बुरशीमुळे आणि *हेटरोरेब्डीटीस सूत्र कृमी (निमेटोड)* द्वारे नियंत्रण होते.

सुत्रकृमीने बाधित एकरी दोन हजार अळ्या जमिनीत सोडल्यास ते सर्व हुमणी नष्ट करतात. हुमणी मेल्यानंतर तिच्या शरीरातून दीड पावणेदोन लाख सुत्रकृमी बाहेर पडतात. हुमणीचे वास्तव्य असेल तेथे जाऊन हुमणीच्या शरीरात या सुत्रकृमी घुसून तिला नष्ट करतात.

Wednesday, August 10, 2016

पिकांचे नुकसान टाळा कामगंध सापळ्याच्या सहाय्याने....

माझीशेती: कृषिवार्ता - कामगंध सापळ्याविषयी माहिती (१६०७२६)

कीड - हिरवी बोंड आळी
सापळा - फनेल ट्रॅप
पिक - कापूस, हरभरा, टोमॅटो, तूर, मका, ढबू, वाटाणा, द्राक्षे
संख्या - ५ ते ७ एकरी
घ्यावयाची काळजी - २१ दिवसांनी गोळी बदलणे.

कीड - पाने खाणारी आळी
सापळा - फनेल ट्रॅप
पिक - सोयाबीन,कापूस, गुलाब, भुईमूग, द्राक्षे, कोबी, फ्लॉवर,मिरची, तंबाखु, सुर्यफुल
संख्या - ५ ते ७ एकरी
काळजी - २१ दिवसांनी गोळी बदलणे

कीड - गुलाबी बोंड आळी
सापळा - डेल्टा स्टीकी ट्रॅप
पिक - कापूस
संख्या - ५ एकरी
काळजी - २१ दिवसांनी गोळी बदलणे

कीड - ठिपक्यांची बोंड आळी
सापळा - फनेल ट्रॅप
पिक - कापूस, भेंडी
संख्या - ५ ते ७ एकरी
काळजी - २१ दिवसांनी गोळी बदलणे

कीड - काटेरी बोंड आळी
सापळा - फनेल ट्रॅप
पिक - कापूस
संख्या - ५ ते ७ एकरी
काळजी - २१ दिवसांनी गोळी बदलणे

कीड - वेलवर्गीय फळमाशी
सापळा - फ्लायटी ट्रॅप
पिक - काकडी, दोडका, पडवळ, ढेमसे, कोहळा, कलिंगड, खरबुज, दुधी भोपळा
संख्या - ४ एकरी
काळजी - ६० दिवसांनी गोळी बदलणे

Friday, August 5, 2016

शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर कीटकनाशके

*माझीशेती कृषिवार्ता : शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर कीटकनाशके*(20160805)
- संतोष तनपुरे

खरीप पिके वाढीच्या अवस्थेत रोग व किडीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी *५० टक्के अनुदानावर कीटकनाशकांचे वाटप* करण्यात येणार आहे.
*कडधान्य* पिकांसह दुय्यम पिकांच्या पीक संरक्षणासाठी *राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून* हा कार्यक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे. तर विदर्भातील पाच जिल्हे, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांत भात पिकांच्या संरक्षणासाठी कीटकनाशके देण्यात येणार आहे.
*राष्ट्रीय गळीत धान्य अभियानातून* भुईमूग, सोयाबीन, करडई, जवस, तीळ या पिकांच्या संरक्षणासाठी रासायनिक व जैविक कीटकनाशकांसाठी 50% अनुदान देण्याची तरतूद केली आहे.
*क्रॉपसॅप* अंतर्गत कापूस, सोयाबीन, भात, तूर या पिकांना सर्व कीटकनाशके ५० टक्के अनुदानावर दिली जाणार आहे.

*लाभार्थी निवड*
अभियानांतर्गत निवडलेल्या पिकांच्या प्रकल्पाच्या *शेतकरी गट, शेतकरी कंपन्यातील शेतकऱ्यांना या कीटकनाशकांचा लाभ मिळणार* आहे. त्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.