Monday, April 8, 2013

MaziSheti Karip Visheshank 2013

MaziSheti Kharip Visheshank 2013

This Magazine contents lots of information in agriculture sector. this is a mile stone for Farmers. this magazine includes that subjects which are directly effects on farms. as per our knowledge this is a complete information resources for farmers.
This magazine covers following subjects-
1. Agriculture crop advisory
2. Vegetables
3. Fruits
4. Biotechnology
5. Weather forecast for kharip season 2013
6. Gaurav Maticha - salute to those farmers who innovate agriculture with his efforts
7. Care at field - what to do & what don't
8. Veterinary Guidance
9. Rural Gossips - what is the real facts behind indian culture, occasions
10. Cartoons
11. Recipe - rural recipe

all the above subjects covered in single magazine "MAZISHETI KHARIP VISHESHANK 2013" & the price Rs. 90/- is the negligible for the magazine as compared to information covered.

you can buy it directly from us on 25% discounted price. for more details contact us at 9975740444 or 9665223385

Thursday, July 12, 2012

स्त्री.... काल, आज आणि उद्या

स्त्री
काल, आज आणि उद्या



            मी स्त्री आहे हे वास्तव जगाने स्वीकारायला हवे. साहजिकच एक स्त्री म्हणुन मी सुंदर असणे स्वाभाविक आहे परंतु सुंदर असण्यापेक्षा मला पुरुषांना आकर्षित करण्यासाठी मला अधिक गरम किंवा मादक असायलाच हवे आणि हा मला लोकशाहीने दिलेल्या मुलभूत हक्कापैकी एक हक्क आहे.’ हो, काय चुकीच आहे, एकेकाळी सांगलीच्या (नागठाणेच्या) बाळगंधर्वांनी स्वतः स्त्रीचा अभिनय करून स्त्रीला माणसात आणले. आणखी थोडस पाठीमागे गेलो आणि काळाचा पडदा किलकिला करून पाहिलं तर सदासर्वदा इतकंच जाणलं की स्त्रीला परमपुज्य रामांनी देखील एक मर्यादेतच ठेवले होते. कारण काहीही असो पण स्त्री आणि मर्यादा हे एक समीकरणच होते. परंतु एकदमच पाठीमागे भुतकाळात ज्यावेळी समाज किंवा कोणतीही रुढी – परंपरा नव्हती तेंव्हा कोणालाही कसल्याही मर्यादा नव्हत्या हेही ध्यानांत घ्यायला हवं.
                ज्यावेळी समाज वेगवेगळ्याप्रकारे वेगवेगळ्या थरात स्वतःला आकार देत गेला त्यावेळी प्रत्येक घरातील आजी, आई, बायको, बहिण, मुलगी या वेगवेगळ्या रुपात स्त्री ही त्या संस्कारित घराची लक्ष्मी म्हणुन उदयाला येत गेली. पण समाज रचनेच्या अगोदर मानव प्राणी कसा होता. मी मुद्दाम प्राणी असा उल्लेख केला कारण त्यावेळची परिस्थिती अगदी तशीच होती जशी आजच्या घडीला जंगलामध्ये जनावरांचे कळप राहतात. प्रत्येक नराला त्याच्या कुवतीनुसार कळपाचे नेतृत्व मिळायचे, मग त्या नराने कळपातील प्रत्येक सदस्याचे संरक्षण करायचे, कळपाला योग्य दिशा दयायची, चारा-पाण्याचा प्रश्न सोडवायचा, प्रजननक्षम माद्यांमार्फत कळपाची संख्या वाढवायची यांसारखी प्रामुख्याने कळपाच्या नराची कामे असत. काही काळ गेल्यानंतर पुन्हा स्वयंवर. नवीन तयार झालेल्या नरांबरोबर स्पर्धा आणि जिंकलेल्या नराला कळपाचे प्रतिनिधीत्व. हे असे चक्र होते.
म्हणजेच तत्कालीन स्त्रीचा विचार केल्यास शून्य असेच चित्र पहावयाला मिळेल. काळ बदलत गेला तसा मानव प्राणी समाजप्रिय होत गेला. मानव प्राण्यामध्ये लज्जेची जान आली आणि रूप पालटले मानव प्राण्यामधुन मनुष्य जन्माला आला. समाज आकार घेऊ लागला. मनुष्य वस्ती करु लागला. मनुष्याने कमरेभोवती झाडाचा पाला लपेटुन घेतला. छातीवरही झाडपाला आला. पुढे मनुष्याला वाणी मिळाली. मनुष्य संवाद करू लागला. आणि आणि मनुष्याच्या आयुष्यात प्रगती आली. तिने सर्व चित्रच बदलुन टाकले. बाळगंधर्वांच्या चित्रपट सृष्टीला आताच्या पिढीतल्या बिबत्स नायिका गालबोट लावुन थांबल्या नाहीत तर अधिक उन्मत्त आणि मादक दिसण्यासाठीच या ललनांचा जन्म झालाय हे सांगायलाही ह्या तरुण पिढीच्या नायिका विसरल्या नाहीत. जेंव्हा अजुन कापडाचा शोध लागलेला नव्हता तेंव्हापासुन स्त्रीचा युगानुयुगे चाललेला प्रवास कोणी विसरले नाही आणि विसरनारही नाही असाच आहे.
पूर्वीचा सती सावित्रीचा काळ मधला झाशीची राणी लक्ष्मीबाईचा काळ आणि आजचा पुनम पांडेचा काळ !!!! कुठे चाललाय हा समाज... आज प्रत्येकजण स्त्री मुक्तीचा पाढा वाचतोय,,, पण स्त्रीला कोणापासून मुक्ती दयायची.... स्त्री मुक्तीच्या भोवऱ्यात सापडून आजची स्त्री स्वतःच्या मीला विसरू लागलीय. स्त्रीला पाहून मान झुकविणारा समाजातील वर्ग हा याच स्त्रीच्या वर्तनामुळे स्त्रीला अंगाखाली पाहू लागला आहे. कोण जबाबदार आहे या परिस्थितीला??? स्त्रींयांवर झालेला हा वैचारिक अत्याचार हा शारीरिक अत्याचारापेक्षा कितीतरी पटीने अधिक भयानक आहे. चंगळवादी आणि अश्लीलपणामुळे तारुण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या मुली नागड्या देहाचे प्रदर्शन करताना पाहून आदराने झुकणाऱ्या माना शरमेने झुकू लागल्या आहेत. स्त्रीचे शील, तिचे सौंदर्य याचा आज मितीला बाजार भरला आहे.

काय होती स्त्री?? या स्त्री वादाकडे निरखुन पाहिल्यास समजुन येईल की प्राणी म्हणुन झाडाझुडपांच्या जंगलात विवस्त्र वावरणाऱ्या स्त्रीने घोशा पहिला, बुरखा पहिला आता या जीवनाचा कंटाळा आलेमुळे स्त्री पुन्हा जंगलाकडे वळण्याच्या प्रयत्नात आहे. स्त्रीचा प्रवासही अगदी तसाच आहे विवस्त्र असणारी स्त्रीने लज्जा रक्षणासाठी झाडापाल्याचा आधार घेतला नंतर जसजशी प्रगती माणसाबरोबर आली तसतशी स्त्रीने भारतीय पोशाख नऊवारी साडी पाहिली आणि आता वर एक आणि खाली एक अशी दोन फडक्यांच्या सहाय्याने लज्जा रक्षणाचा आव आणला जात आहे. आजच्या स्त्रीच्या या वागण्यामुळे स्त्री भोगाची वस्तु म्हणुन वापरली जात आहे.

Saturday, June 2, 2012

स्वातंत्र्य आले रे आले ......

             तस पाहिले तर फक्त शेतकऱ्यांना पावसाची अपेक्षा आहे, असे नाही. शेतकऱ्यांना लुबाडणारे व्यापारी, दुकानदार, कंपन्या, शाळेतील मुले, आजी-आजोबा, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड हे तर वाट बघतातच... पण फरक एवढाच आहे कि, शेतकरी मायबाप डोळ्यात पाणी आणून वाट बघतात तर बाकीचे इतर लोक डोळ्यात पाणी आणायला लावुन वाट बघायला लावतात. त्यांचे आणि पावसाचे काही देणेघेणे नाही विशेषतः पांढरे बोके मलई तोंडात घालत - घालत पावसाचे भांडवल करतात. मी स्वतः दुष्काळी पट्टयात राहणारा आहे, त्यामुळे पांढरे बोके वावरताना मी पाहिलेले आहे. किती मलई खायची, कुठे खायची, कधी खायची याचा काही नेम नाही. तुम्ही सर्वांनी ती जुनी दोन मांजरांची / बोक्यांची गोष्ट वाचली किंवा ऐकली असेलच. त्यावेळी शिक्षणाची म्हणावी अशी प्रगती नव्हती आणि जसा काळ बदलला तसे बोक्यांच्यात पण Generation Gap आलाच कि हो... तर आताचे बोके थोडे अडवान्स पद्धतीचे आहेत. आता तुम्ही म्हणाल ते कसे काय ?? बघा, भारत स्वतंत्र होऊन ६० वर्षे होऊन गेली तेंव्हापासून आजअखेर नाही... नाही... मुघलांच्यावेळी त्रास झाला म्हणुन छत्रपती शिवाजीराजे यांनी बंड केले आणि स्वराज्य स्थापन केले तेंव्हा माझे पूर्वज खुशीत होते राव... मी वाचले होते आणि आमचे आबासाहेब देखील सांगत होते, त्यांचे पूर्वज खुशीत होते. त्यानंतर ब्रिटीश आले आणि आमच्या शेतकरी बांधवांसह, स्थानिक व्यापारी, संस्थानिक, उच्चवर्गीय सारेच ब्रिटिशांच्या ग्रहणात अडकले असे म्हणतात.

          यावेळी सर्वांना लढायीचा अनुभव आलेला होता. आणि साक्षात छत्रपती शिवाजीराजे यांनीच गनिमीकावा शिकविला होता. हां शिकवला होतो पण काळाच्या ओघात 'गनिमीकावा' जिंकण्यासाठी वापरायचा असतो  हेच तेवढे लक्षात राहिले पण केंव्हा, कुठे, कसा आणि महत्वाचे म्हणजे कोणाविरोधात वापरायचा हे मात्र सर्वजण विसरलो. या सर्वांच्यामध्ये माझे भोळेभाबडे शेतकरी बांधव एकच शिकले, 'माझ्या राजाच राज्य हाय, राजा माझा हाय.. माझ्यावर संकट येऊ देणार नाय... माझी पोर-बाळ सुखानं खाणार.... तेंव्हा अश्या कितीतरी आशा एकट्या महाराजान पुऱ्या केल्या होत्या ....

          अगदी तेंव्हापासुन शेतकरी राजा विसरुनच गेला आहे. राजे गेले,, गोरे साहेब आले पण या बापड्यांना काही काळ जाणविलेच नाही, माझ्या महाराजाची सत्ता गेली आहे. (त्यावेळी प्रामाणिक नेते होते आणि आताही आहेत यात वादच नाही, पण कोणाशी प्रामाणिक रहायचे याचे त्यांना भानच राहिले नाही एवढाच फरक आहे) या नेत्यांनी नंतर ओळखले होते; जसे छत्रपती शिवाजीराजेनी बारा मावळातील मावळ्यांच्या मदतीने मोघलांची सत्ता घालवुन स्वराज्याची स्थापना केली आणि त्या आणि त्याच पद्धतीने पुन्हा एकदा शेतकरी आणि कामगारांना जागे केले  पाहिजे तर आणि तरचं स्वातंत्र्य मिळणार आहे आणि हो हो हे घडलही अगदी असेच जवळपास दीडशे वर्षांची सत्ता घालवली फक्त आणि फक्त या शेतकरी आणि कामगारांच्या जीवावर ... हो हो अगदी खरंय हे. 
   
          जोपर्यंत शेतकरी आणि कामगार जागे होत नाहीत तोपर्यंत ब्रिटीशच काय पण एखादयाने काळा दगड जरी आणून ठेवला आणि सांगितलं कि हा तुमचा राजा तर भारतीय मान्य करतील. हो, इतकी साधी, सरळ आणि भोळी आहेत माझी माणस. पण कुणीतरी जाग करायची वाट बघत्यात...




पण लक्षात ठेवा, इतिहास आजही ठाम आहे, पुनरावृत्ती होऊ देवू नका. कोणी शिवाजी येणार नाही की महात्मा येणार नाही. शिवाय आजकाल एक म्हण प्रचलित आहे, "शिवाजी जन्माला येऊ दे, पण तो शेजारच्या घरात" ती खरी अथवा वास्तवात उतरू देवू नका. शिवाजीराजे जन्माला येऊ द्या पण एकाच ठिकाणी नको,,,,,, प्रत्येकाच्या घरात जन्माला येऊ द्या. प्रत्येक स्त्रीने जिजामाता बनण्याची गरज आहे आणि प्रत्येक पुरुषाने "प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।" रु शिवधोरणाचा स्वीकार करून मार्गक्रमण केले पाहिजे. क्रांतीने होरपळलेल्या जनतेला सुराज्य पाहिजे. स्वातंत्र्य मिळुन अजुन एक पिढीही गेली नाही तोपर्यंत पुन्हा क्रांतीची वाट पाहू नये....

- B. Mahesh, INDIA

Thursday, May 17, 2012

मुग व उडीद लागणीपासुन काढणी पर्यंत सर्व माहिती


मुग व उडीद लागणीपासुन काढणी पर्यंत सर्व माहिती
(शेतकऱ्यांनी या माहितीचा उपयोग संदर्भाकरिता करावा, प्रत्यक्षात वस्तुस्थितीनुसार स्वतःच्या निर्णयानुसार अंमलबजावणी करावी)

खरीप हंगामामध्ये तुरीच्या खालोखाल मुग व उडीद ही महत्त्वाची पिके आहेत. दुबार तसेच एकत्र पिकासाठी ही महत्त्वाची पिके आहेत.
जमीन – या कडधान्यासाठी मध्यम ते भारी चांगली निचरा होणारी जमीन लागते.
पूर्वमशागत – उन्हाळा सुरु होण्यापूर्वी जमीन चांगली नांगरणी करून घ्यावी. जमीन चांगली तापल्यावर पावसाळा सुरु झाल्यावर कुळवून घ्यावी. याच बरोबर हेक्टरी ५ पाच टन चांगले कुजलेले शेणखत घालावे.
बियाणे –
सुधारित वाण –
मुग >> वैभव, BMR 145 विशेषता – रोगप्रतिकारक व अधिक उत्पन्न देणारे वाण.
उडीद >> TPU-4, TAU-01 विशेषता – पक्वतेचा काळ २ ते २.५ महिने
पेरणीची वेळ – मान्सूनचा पहिला पाऊस झालेनंतर जुनच्या २रया आठवड्यापासुन जुनअखेर पेरणी करावी. पेरणीस होणारा वेळ उत्पादनात घट होते.
बीजप्रक्रिया – पेरणीपुर्वी ०१ किलो बियाण्यास ५ ग्राम ट्रायकोडर्मा + २५ ग्राम रायझोबियम + २५ ग्राम PSB ही जीवाणूची पावडर गुळाच्या पाण्यात मिसळुन लावावी. ट्रायकोडर्मामुळे बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण होते. रायझोबियममुळे मुळाच्या गाठी वाढून नत्राचे प्रमाण वाढते. PSBमुळे जमीनीतील स्फुरद्युक्त होऊन विकास होतो.
पेरणी – पेरणीसाठी दोन ओळीमधील अंतर ३० सेमी आणि दोन रोपांमधील अंतर १० सेमी असावे. या पिकांमध्ये तुरीचे पिक घ्यावयाचे झालेस २ ते ४ ओळीनंतर १ ओळ तुरीची पेरणी करावी.
खतमात्रा – या दोन्ही कडधान्यांना हेक्टरी २० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद द्यावे लागते.
आंतरमशागत – ही कडधान्ये ४५ दिवसांपर्यंत तणविरहित ठेवावी. यासाठी दोन वेळा कोळपणी आणि एक वेळ खुरपणी करून घ्यावी.
पाणी व्यवस्थापन – कोरडवाहु पिके असल्यामुळे शक्यतो पाणी लागत नाही परंतु फुलोरा आणि शेंगा भरावयाच्या वेळी पाऊस नसेल आणि ओलाव्याची कमतरता भासल्यास हलके पाणी द्या.
कीड नियंत्रण –
मुग – रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव – मोनोक्रोटोफॉस ५५० पाण्यात मिसळुन प्रति हेक्टरी फवारावे.
भुरी, पिवळा विषाणू – नियंत्रणासाठी पानात मिसळणारे गंधक १२५० ग्राम किंवा कार्बेन्डॅझिम २५० ग्राम + ३०% प्रवाही मोनोक्रोटोफॉस ५५० पाण्यात मिसळुन प्रति हेक्टरी फवारावे. गरज भासल्यास ८ ते १० दिवसांनी दुबार फवारणी घ्या.
उडीद – केसाल आळी – नियंत्रणासाठी प्रादुर्भाव झालेली रोपे उपटुन सर्व आळ्या नष्ट करा.
भुरी, पिवळा विषाणू – नियंत्रणासाठी पानात मिसळणारे गंधक १२५० ग्राम किंवा कार्बेन्डॅझिम २५० ग्राम + ३०% प्रवाही मोनोक्रोटोफॉस ५५० पाण्यात मिसळुन प्रति हेक्टरी फवारावे. गरज भासल्यास ८ ते १० दिवसांनी दुबार फवारणी घ्या.
साठवण – साठवणीपुर्वी मुग व उडीद धान्य ४-५ दिवस चांगले उन्हात वाळवून कडुनिंबाची पाने मिसळुन पोत्यात किंवा टाकीत साठवावे.
सरासरी उत्पादन – मुग – १२ ते १५ क्विंटल  उडीद – १० ते १२ क्विंटल 

Friday, February 24, 2012

"FARMER"

** FARMER **

>> Farmers are the most important person among the visitors of this sight.

>> Farmers are not depend upon us but whole world depend on Farmers.

>> Farmers are not any obstacle in our work but he is soul of our work.

>> In our work farmer is not a apart but he is one of the part of our work.

>> By giving us opportunity of such a service, farmers doing a favor on us.

- submitted with warm regards to FARMERS by team MaziSheti.(www.mahaagri.net)

** शेतकरी **

>> आमच्या साईटला भेट देणार्या व्यक्तींमध्ये सर्वात महत्वपूर्ण व्यक्ति म्हणजे "शेतकरी" आहे.

>> शेतकरी आमचेवर अवलंबून नाहीत तर सर्व जगास अन्न-धान्य पुरवुन तो या विश्वाचा पोषणकर्ता ठरतो.

>> आमच्या सेवेमध्ये शेतकरी अडथला नसून शेतकरी आमच्या सेवेचे आत्मा आहेत.

>> आमच्या सेवेत शेतकरी त्रयस्थ नसुन शेतकरी आमच्या सेवेचा भाग आहे.

>> आम्हाला सेवा करनेची संधी देवुन शेतकरी आमचेवर उपकार करतो.

-जगातील सर्व शेतकर्यांना अर्पण..

Monday, January 23, 2012

शेतीमधील संवाद क्रांतीचे जनक माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान, सांगली - एक नजर


श्री.पांडुरंग मारुती मोरे, सावळज
'माझीशेतीच्या' माध्यमातून आधुनिक 
शेती करतात..
(सदर फोटो दर्शक आहेत)
जगातील पहिला प्रकल्प, कोणत्याही मोबदल्याशिवाय भारतीय शेतकर्यांना मोबाईल सेवेमार्फत मार्गदर्शन.... प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात प्रारंभ केलेली ही सेवा सध्या प्रचंड प्रमाणात विस्तारली आहे. ही सेवा सर्व शेतकर्यांच्या मोबाईलवर चालु करता येते. यामध्ये शेतकर्यांच्या मोबाईल क्रमांक संदर्भात प्रचंड गोपनीयता बाळगली जाते. याशिवाय शेतकर्यांना त्यांचे मोबाईलवर मोफत स्थानिक हवामान देनेचीही सोय करनेत आली आहे. त्याकरिता शेतकर्यांना त्यांची माहिती माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या
'माझीशेती' शेतकरी संवाद मंडळ, सावळज
९९७, दसरा चौक, सावळज
सांगली, महाराष्ट्र - ४१६३११
या पत्त्यावर कळवावी लागते. सन २००९ पासुन अविरतपणे ही सेवा चालु आहे. कोणत्याही प्रकारचे पाठबळ नसताना ग्रामीण भागातील तरुणांनी केलेला प्रयोग आज संपुर्ण महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कोणत्याही प्रचार -प्रसिद्धी शिवाय चालु आहे.

श्री. अंबिका महिला बचत गट, वज्रचौन्डे
यांचा  'माझीशेती'च्या माध्यमातून
कडधान्ये व्यवसाय ...
(सदर फोटो दर्शक आहेत)

शासकीय योजनांचा सुकाळ, शेतकर्यांची जात्याच संशोधक वृत्ती, वेगवेगली कृषि विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रियन शेतकरी आपल्या शेतातुन उत्पादन काढीत आहेत पण ब्रिटिश कालापासून व्यापारी अणि शेतकरी जनता यांचेत समन्वय नसल्यामुले आजही शेतकर्यांचे नुकसान होत आहे. या करिता माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या शेतकर्यांना त्यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव आणि व्यापारी, करखानदारयांना चांगल्या प्रतिचे, उच्च दर्जाचे शेतमाल देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. याशिवाय शेतकर्यांना वेगवेगळ्या बाजारपेठेतील अद्यावत माहिती उदा. आवक, प्रति क्विंटल दर इ. ही सेवा मोबाईलवर उपलब्ध करुन दिलेली आहे. 



कृषितद्न्य श्री. शंकरराव निंबालकर
यांचे बागेतिल भाजीपाला...
(सदर फोटो दर्शक आहेत)
  
जागतिक बाजारपेठेत पाश्चात्य देशांनी पिकवलेल्या भाजीपाल्याला जास्त मागणी आहे. भारतातील आणि पाश्चात्य देशातील उत्पादनात काहीही फरक नाही. जो फरक आहे तो उत्पादनासाठी अमलात आनल्या जाणार्या पद्धतिमध्ये. भारतीय शेतिला सेवा पुरवठा करणारे बाहेरच्या देशातुन सेंद्रिय खते, औषधे मागवतात आणि त्यामध्ये पूर्वापर चालत आलेल्या सवयींनुसार प्रमाण वाढवुन आकर्षक आवरण वापरून बाजारात विक्रिला पाठवतात, यामध्ये नुकसान फक्त शेतकर्यांचे होते. यावर उपाय म्हणजे शेतकर्यांनी एकत्र येवून शेतीला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या पडतालुन खात्री करुन मगच वापराव्यात. तसेच बाहेरच्या देशातुन काही जैविके मागवायाची झाल्यास स्वत:  मागवावित. याही बाबतीत माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतकर्यांना मदत मार्गदर्शन केले जाते. एकंदरित सर्व शेतकर्यांनी त्यांची वार्षिक मागणीनुसार आणि गरजेनुसार सर्व एकत्र खरेदी करुन त्याचे वाटप केले जाते. यामध्ये मोठ्याप्रमाणात खरेदी झालेमुले बरीच बचत होते आणि शेतकर्यांचा फायदा होतो.

शेतकरी संघटन आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने गेले पाच वर्षांत संस्था महाराष्ट्र राज्यातील तळागाळात पोहचुन भारतीय कृषि व्यवस्थापन क्षेञामध्ये खारीचा वाटा उचलत आहे यात शंका नाही. 

Monday, December 19, 2011




VISAKHAPATNAM/HYDERABAD: South coastal Andhra faces the threat of a cyclonic storm hitting the coast in the next 2-3 days what with the well-marked depression over southeast Bay of Bengal concentrating into a deep depression on Monday.

Ports at Krishnapatnam, Nizampatnam and Machilipatnam hoisted the cautionary signal number one, as the deep depression is all set to turn into a cyclonic storm in the next 24 hours. The depression lay centered about 850 km southeast of Chennai and 550 km southwest of Port Blair. Weather officials said the system would move northwestwards and cross north Tamil Nadu-south Andhra coasts between Cuddalore and Nellore in the early hours of December 29.

Under its influence, isolated heavy rainfall is likely to commence over north coastal Tamil Nadu and south coastal Andhra Pradesh from Wednesday morning. "There are chances of the system intensifying into a severe cyclonic storm if conditions favour in another 24 hours," a Met official said.

Squally winds at 45-55 kmph are likely to hit the coast along Tamil Nadu, Puducherry and south coastal Andhra during the period. Officials said the condition of the sea would be rough to very rough and urged fishermen not to venture into the sea.

Meanwhile, mercury has dipped at several places in Vizag in the last two days with Chintapalli and G K Veedhi mandals recording 3 degree Celsius. Lambasingi village in G K Veedhi recorded a low of 0 degree Celsius on Sunday, while several interior villages are reeling under intense cold spell in the last couple of days.

While temperatures in Hyderabad dropped to 12 degree Celsius on Sunday, making Christmas the coldest day of the season so far, Met officials said the cold conditions are not likely to stay for long. On the contrary, mercury levels in Hyderabad are set to shoot up by at least a few degrees over the next two days, they said. "There might be a slight drop of another one degree on Tuesday, but there on the temperatures will only rise," said R V Subba Rao, assistant metrologist, explaining that the rise is due to the cyclonic storm.

He said the storm would also result in an increase in rainfall and dusty winds over Rayalaseema and coastal Andhra. He pointed out that the season this year has relatively been warmer than previous years. "Considering that the minimum temperature last year had dropped to 9.8 degree Celsius on December 21, this temperature is much higher," Rao added. The minimum temperature recorded on Monday was 12 degree Celsius.

--Times of India

पावसाचा अचूक अंदाज >>

आपल्याकडे पावसावर अनेक गणिते अवलंबुन असतात. पिण्याचे पाणी तसेच शेती क्षेत्रातील प्रगतीबरोबर अन्य अनेक बाबींसाठी पावसाचे पाणी गरजेचे ठरते. साहजिकच पावसाच्या अचूक अंदाजाला महत्व प्राप्त झाले आहे. जगातील एकूण पर्जन्यमन समजून नेमेके स्वरूप कळावे याकरिता अमेरिका आणि जपान संयुक्तरीत्या अत्यंत संवेदनक्षम उपग्रह प्रक्षेपित करणार आहेत. जागतिक पर्जन्य चक्राचा वातावरणावर होणारा परिणाम आणि हवामान अंदाज अचूक मिळण्यासाठी हा प्रकल्प राबविला जाणार आहे. जवळपास ६३कोटी ६०लख पौंड इतका प्रचंड खर्च करून पाठविलेला उपग्रह दर तीन तासानी पृथ्वीवर पडणाऱ्या पावसाची नोंद घेऊन ती आकडेवारी शास्त्रज्ञांना पुरवेल. वातावरणातील घडामोडींचा विज्ञानाच्या सहाय्याने विश्लेषण करून या माहितीचा वापर शेतकरी, उद्योजक, व्यापारी यांचेसाठी करता येईल असे या मोहिमेबद्दल सांगताना श्री.ऑर्थर यांनी सांगितले. सदरचा उपग्रह रडार आणि मायक्रोव्हेव रेडिओ मीटर अशा उपकरणांनी सुसज्ज असेल. या मोहिमेकरिता जवळपास ८ उपग्रहांची मदत घेतली जाणार आहे. हे सर्व उपग्रह परस्परांशी जोडले असलेने संपुर्ण जगात केंव्हाही, कोठेही, कितीही पाऊस पडला तर त्याची माहिती एकसंधपणे उपलब्ध होईल. ही एक जागतिक हवामानातील क्रांतीच ठरणार आहे.