Monday, February 8, 2016
मधमाशी / मधुमक्षिका पालन
Saturday, February 6, 2016
लाळ्या खुरकुत - उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला
लाळ्या खुरकुत - उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला
लाळ्या खुरकुत रोगाची लागण झाल्यानंतर ती नियंत्रणात येण्यास बराच उशीर लागतो. या काळात बाधित जनावर चारा खाऊ शकत नाही, लंगडत चालते, दुधाळ जनावराचे दुध घटते. गंभीर परिस्थितीत जनावर दगावण्याची शक्यता असते.
त्यामुळे नुकसान होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक लस टोचावी.
* प्रतिबंधात्मक उपाय आणि घ्यावयाची काळजी -
- थंडी ओसरताना फेब्रुवारी महिन्यात आपल्याकडील गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या अशा सर्व दोन खुरी जनावरांना लाळ्या खुरकुत या रोगासाठी प्रतिबंधक लस टोचून घ्यावी.
- सहा महिनेपेक्षा मोठ्या वासरांनाही लस टोचावी.
- गाभण गाईंना डॉक्टरच्या सल्याने लस टोचावी.
- या कला बाधित जनावर स्वतंत्र दूर बांधावे, पाणी स्वंतंत्र पाजावे. खुरातील जखम पोटाशियामच्या पाण्याने किंवा त्रिफळा चुर्णच्या पाण्याने धुवून काढावी.
- गावात साथ आली असल्यास सार्वजनिक ठिकाणी जनावरांना पाणी पाजू नये.
- लस स्वत: आणली किंवा घरी ठेवली तर २ ते ८ सेल्सियस तापमानात ठेवावी वाहतूकही या तापमानात करावी. शक्यतो गावातील सर्व जनावरांना लस द्यावी.
(जास्तीत जास्त शेतकरी या चळवळीत सामावून घ्या. त्यांच्या मोबाईल वरुन खालील प्रमाणे whats app मेसेज करायला सांगा)
* माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान *
**********************
www.mazisheti.org
www.facebook.com/agriindia
**********************
व्हाट्स अप मेसेजसाठी खालीलप्रमाणे माहिती 9975740444 वर फक्त व्हाट्स अप मेसेज द्वारा पाठवा.
नाव -
संपुर्ण पत्ता -
जमीन क्षेत्र (एकर)-
प्रमुख पिक व त्याचे क्षेत्र -
Thursday, February 4, 2016
शेवगा लागवड
- जमीन
- लागणीची पद्धत
- पाणी व ख़त व्यवस्थापन
- रोग नियंत्रण
- किड नियंत्रण
- महत्वाची घ्यावयाची काळजी
- काढणी आणि उत्पादन
Friday, January 29, 2016
कारले लागवड
कारले लागवड
* हवामान
जास्त थंडी झाल्यास बुरशीजन्य रोगांचे प्रादुर्भाव होवून नुकसान होते, उबदार वातावरण योग्य.
* जमीन
मध्यम भारी ,पोयट्याची ते रेताड चालते. ६.५ ते ७.५ पीएच योग्य.
* लागणपूर्व मशागत
- चांगल्या वाढीसाठी १५ टन शेणखत किंवा एरंड पेंड १५ किलो प्रती एकर जमीन तयार करताना द्या. खोल नांगरट व सपाट करा.१.५ ते २ मी. अंतराच्या ओळी तयार करा.
- ट्राइकोडर्मा विरडी २५० ग्रॅम प्रति १० किलो शेणखतासोबत पिकाच्या सुरवातीच्या काळात ओळींमध्ये टाकल्याने मातीतून येणाऱ्या रोगांचे व तसेच बुरशीजन्य रोगांमुळे येणाऱ्या मर रोगापासून पिकाचे रक्षण होवू शकते.
- दोन बाय दोन फुटाचे खड्डे किंवा रेज्ड बेड करून हेच वरील अंतरावर लागवड करावी. मांडव उभारणी करणे आवश्यक आहे.
* लागण
वरीलप्रमाणे एका खड्यात एका ठिकाणी पाच बिया लावा, पंधरा दिवसांनी त्यातील दोन सशक्त रोपे ठेवावी.
* वाण
- फुले ग्रीन गोल्ड, हिरकणी,कोईमतूर लॉंग, अर्का हरित, पुसा मोसमी, पुसा विशेष इत्यादिचे बियाणे एकरी दोन किलो वापरावे.
- बियाणे प्रक्रिया साठी ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम किंवा कार्बनडेझिम १० ग्रॅम एका किलोस चोळावे.
* खत व्यवस्थापन
चांगल्या उत्पादनासाठी व वाढीसाठी २० किलो नत्र (४३ किलो युरिया)+२० किलो फॉस्फरस (१२५ किलो एसएसपी) + २० किलो पोटॅशियम (३३ किलो एमओपी) प्रती एकर लागवडीच्यावेळी द्या.
त्यानंतर ३२ दिवसांनी २० किलो नत्र (४३ किलो युरिया किंवा ९७ किलो अमोनियम सल्फेट) प्रती एकर द्या.
* पाणी व्यवस्थापन
तापमानानुसार दर ३ ते १० दिवसांनी पाणी पाळी द्यावी जेने करुण ५०%आर्द्रता राहील.
* पीक काळजी, कीड व रोग नियंत्रण -
* फुलगळ
फुलगळ रोखण्यासाठी, उत्पादनात १०% वाढ होण्यासाठी व चांगला आर्थिक परतावा मिळण्यासाठी पिक फुलोरा अवस्थेत असताना हुमिक एसिड ३ मिली + १२:६१:०० ५ ग्रॅम प्रति लीटर पाण्यातून फवारा.
*फुले,फळे येण्याच्या व पक्व होण्याच्या काळात,सॅलिसीलिक ऍसिड ३५० मी.ग्रॅ. च्या,४-५ गोळ्या १५ लीटर पाण्यातून १-२ वेळा फवारा. तसेच चांगली फुलधारणा मिळण्यासाठी ०:५२:३४ची १५० ग्रॅम प्रति १० पाण्यातून फुलोरा अवस्थेत व फळे तयार होताना फवारा .
* गुणवत्ता मिळण्यासाठी १३:०:४५ हे १० ग्रॅम +हाइ बोरॉन १ मिली प्रती लीटर पाण्यातून फळ धारणा अवस्थेत फवारा.
* नाग अळी
नियंत्रणासाठी अबामेक्टिन ४ मिली १० लीटर पाण्यातून किंवा डाइफेनथियौरॉन २० ग्रॅम किंवा स्पीरोमेसिफेन १८ मिली किंवा अॅसिफेट +इमीडाक्लोप्रिड ५० ग्रॅम किंवा फ्लोनीकॅमिड ६ मिली प्रति १५ लीटर पाण्यातून फवारा.
* अंकुर आणि मुळे खाणारी अळी
पिकाचे मातीपासून मुळाचे व खोडाचे नुकसान करते प्रतिबंध करण्यासाठी कार्बोफ्युरान ३जी १२ किलो प्रती एकर सरीत टाका. उभ्या पिकातील नियंत्रणासाठी फिप्रॉनिल ५%एस सी ५०० मिली किंवा क्लोरपायरीफॉस २० ई सी ड्रेंचिंग करा किंवा फिप्रोनील + इमीडाक्लोप्रिड ८० डब्ल्यू जी १५० मिली प्रति २५० लीटर पाण्यातून प्रती एकर भिजवणी करा.
* फळ माशी
नियंत्रणासाठी इंडोक्साकार्ब १४.५ एस सी ५ मिली + स्प्रेडिंग एजेंट ६मिली १० लीटर पाण्यातून फवारा किंवा फिप्रोनिल ५ एस सी ३० मिली प्रति १५ लीटर पानी किंवा लॅंब्डा सायहॅलोथ्रिन ५ मिली प्रति १० लीटर पानी ची फवारणी करा.
* पांढरी माशी
ही माशी पिकात मोझाईक व्हायरस पसरवते. नियंत्रणासाठी डाइफेनथियौरॉन ५० डब्ल्यू पी २०ग्रॅम किंवा स्पीरोमेसिफेन १८ मिली किंवा अॅसिफेट ५०%+इमीडाक्लोप्रिड ५० ग्रॅम किंवा फ्लोनीकॅमिड ६ मिली प्रति १५ लीटर पाण्यातून फवारा.
* डाऊनी/केवडा
नियंत्रणासाठी बिटरटेनोल २५ डब्ल्यू पी ३० ग्रॅम प्रति १५ लीटर पानी किंवा क्लोरोथॅलोनील ७५ डब्ल्यू पी ३० ग्रॅम प्रति १५ लीटर पानी किंवा टेब्युकोनॅझोल २५ मिली प्रती १५ लीटर पानी किंवा कार्बनडॅझिम १२%+ मॅनकोझेब ३० ग्रॅम प्रति १५ लीटर पाण्यातून फवारा.
* भूरी
या रोगामध्ये पानांवर पांढरी पावडर दिसून येते. प्रतिबंध करण्यासाठी गंधक पावडर १० किलो प्रति एकर सकाळी पानांवर दव असताना द्या.प्रभावी नियंत्रणासाठी क्लोरोथॅलोनील ७५ डब्ल्यू पी ३० ग्रॅम प्रति १५ लीटर पानी किंवा टेब्युकोनॅझोल १ मिली प्रति लीटर पानी किंवा कार्बनडॅझिम+ मॅनकोझेब २ ग्रॅम प्रति लीटर पाण्यातून फवारा.
* पाना फळांवरील ठिपके रोगात
सुरवातीच्या काळात पानांवर पाण्याने भरलेले डाग दिसून येतात.या ठिपक्यांमध्ये मध्यभागी पांढरा आणि काठावरुन राखाडी रंग दिसून येतो.प्रभावी नियंत्रणासाठी भूरी प्रमाणे नियंत्रण करा.
* तण नियंत्रण
पेंडीमेथलीन १.२५ लीटर प्रती २०० लीटर पाण्यामध्ये मिसळून पेरणीनंतर ४८ तासांच्या आत जमीन ओलसर असताना ऐका एकरात फवारा. तसेच बियाणांची उगवण झाल्यावर १० ते १५ दिवसांनी एक व फुले येण्यापूर्वी १-२ वेळा अंतर मशागत करणे गरजेचे आहे.
* काढणी
२ ते २.५ महिन्यानी सुरु करता येईल, आठ ते दहा तोडे करुण १८० दिवसात उत्पादन एकरी १० टना पर्यंत उत्पन्न मिळवता येईल.
Thursday, January 28, 2016
गहू
बागायती
वेळेवर पेरणीकरीता शिफारशीतवाण
|
बागायती
उशिरा पेरणीकरीता शिफारशीतवाण
|
1) AKAW 3722 (विमल)
2) AKW 1071 (पूर्णा)
3) MACS 6222
4) MACS 2846
5) NIAW 301 (त्र्यंबक)
6) HD 2189
7) NIAWnWWQ 917 (तपोवन)
|
1) AKW 381
2) AKAW 4627 (नविन वाण)
3) HD-2501
4) NIAW 34
5) HI 977
|
Friday, January 22, 2016
बाजरी
बाजरी
लागवड
मॉन्सून पावसानंतर जमिनीत पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करावी. पेरणीसाठी शिफारस केलेल्या सुधारित व संकरित वाणांचाच वापर करावा.
संकरित वाण -
श्रद्धा (आर.एच.आर.बी.एच. 8609), सबुरी (आर.एच.आर.बी.एच. 8924) शांती (आर.एच.आर.बी.एच. - 9808) ओलिताची सोय असेल अशा ठिकाणी शक्यतो संकरित वाण पेरावेत.
पेरणी व बीजप्रक्रिया -
पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करून 45 x 15 सें.मी. अंतराने पेरणी करावी. बाजरीचे वाणानुसार हेक्टरी तीन ते चार किलो बियाणे वापरा. बाजरी अधिक तूर 2:1, 2:2 या प्रमाणात आंतरपीक घ्यावी. कोरडवाहू बाजरीसाठी सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी.अरगट रोग नियंत्रणासाठी 20 टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया करावी. गोसावी रोगाच्या नियंत्रणासाठी सहा ग्रॅम मेटॅलॅक्झील 35 एसडी (बीजप्रक्रियेसाठीचे) प्रति किलो बियाण्यास चोळावे. त्यानंतर प्रति 10 किलो बियाण्यावर 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धक व 250 ग्रॅम स्फुरद जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी.
खत व्यवस्थापन -
शिफारशीप्रमाणे वरखते वेळेवर द्यावीत. हलक्या जमिनीसाठी 40 किलो नत्र, 20किलो स्फुरद, 50 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. मध्यम जमिनीसाठी 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद, 25 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे.
आंतरमशागत -
पेरणीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी गरजेनुसार विरळणी करावी किंवा नांग्या भरून दोन रोपांतील अंतर 12-15 सें.मी. ठेवावे. जमिनीत चांगली ओल असल्यास विरळणी केलेली रोपे नांग्या भरण्यास वापरता येतात. तीस ते चाळीस दिवसांपर्यंत पीक तणविरहित राहण्यासाठी खुरपणी किंवा डवरणी करावी. एक महिन्यानंतर पिकास नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. कोरडवाहू पिकास युरिया देताना जमिनीत चांगली ओल असणे गरजेचे आहे.
हंगाम ----माध्यान्ह---- उपाययोजना -
चांगल्या उगवणीनंतर मधल्या काळात पावसाचा खंड पडला तर मृद्बाष्पाची गरज भागविण्यासाठी डवरणी करून जमिनीचा वरचा पापुद्रा मोकळा करावा. यालाच डस्ट मल्चिंग म्हणतात. पिकातील काढलेले तण दोन ओळींत पसरून ठेवावे. डवरणी करताना डवऱ्याला खाली दोरी बांधल्यास पिकाला मातीची भर बसेल व पडणाऱ्या पावसाचे पाणी तयार झालेल्या सरीमध्ये व्यवस्थित मुरले जाऊन त्याचा उपयोग पिकाच्या पुढील वाढीच्या काळात होतो.
पाणी व्यवस्थापन -
बाजरी पिकास फुटवे येण्याची वेळ, पीक पोटरी अवस्थेत असताना आणि कणसात दाणे भरताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे. या अवस्थेत जमिनीत पुरेशी ओल नसल्यास पिकास संरक्षित ओलित म्हणून पावसाचा अंदाज बघून हलकेसे पाणी द्यावे.
आंतरपीक -
अन्नद्रव्यासाठी व जागेसाठी स्पर्धा नसलेला कालावधी या तत्त्वानुसार बाजरी + तूर ही आंतरपीक पद्धती सर्व दृष्टीने फायदेशीर आहे. यासाठी बाजरी व तूर यांची आंतरपीक म्हणून पेरणी करताना याचे ओळीचे प्रमाण 2ः1 (बाजरी ः तूर) किंवा 4ः2 ठेवावे. या प्रमाणेच बाजरीत सोयाबीन, सूर्यफूल ही पिकेसुद्धा 4ः2 या प्रमाणात आंतरपीक म्हणून घेता येतात.
हलक्या जमिनीत आणि कमी पाऊस असणाऱ्या प्रदेशात बाजरी + मटकी 2ः1 या प्रमाणात आंतरपीक अवलंब करावा.
तणनाशकाचा वापर -
गरजेनुसार बाजरी पिकात तणनाशकांचा वापर करता येतो. यासाठी ऍट्राझीन किंवा सिमाझीन हे उगवणपूर्व (पेरणीनंतर परंतु बी उगवण्यापूर्वी) तणनाशक हेक्टरी 1.5 ते 2 किलो 600 ते 700 लिटर पाण्यासोबत फवारावे. फवारणी नंतर 15 ते 20 दिवस पिकात खुरपणी किंवा डवरणी करू नये. तसेच पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी 2,4-डी (फक्त सोडिअम साल्ट) हे उगवणपश्चात तणनाशक हेक्टरी 1250 ग्रॅम या प्रमाणात 600 लिटर पाण्यासोबत तणावर फवारावे. तणनाशक फवारणीपूर्वी तज्ज्ञाचा सल्ला अवश्य घ्यावा.
बीट लागवड
मेथी
मेथी लागवड.
वर्षभर चवीने खाल्ली जाणारी भाजी म्हणजे मेथी. याची मागणीपण वर्षभर असते आणि समशीतोष्ण हवामानात लागवडही वर्षभर करता येते.
* यासाठी जमीन मध्यम ते काळी, पाण्याचा निचरा होणारी असावी.
* हि भाजी ४०ते ६० दिवसांनी काढता येते त्यामुळे टप्प्या टप्प्याने वाफे लावल्यास वर्षभर उत्पन्न घेता येते.
* लागवड करण्यापूर्वी दोन वखर पाळ्या देवुन जमीन भुसभूषित करावी.
* त्यानंतर ३ बाय २ मीटरचे सपाट वाफे करुण भाजीसाठी फेकून लागवड करता येते.
* वाण: मेथी-१, राजस्थान मेथी-१. मेथी नं.४७, प्रभा,पुसा अर्ली बंचिंग, कसुरी इत्यादि सुधारित वाण निवडावेत.
* पाणी व्यवस्थापन करताना जमिनीच्या मगदुरा नुसार मध्यम जमिनीस दर ७-८ दिवसांनी एक पाणी पाळी द्यावी.
* यात मर हाच प्रमुख रोग आहे. बियाणे संस्कार करुण तो टाळता येतो. इतर विशेष रोग येत नाही.
* किडी मधे नागअळी हा मोठा धोका आहे. यासाठी लागवडी नंतर ७ दिवसांनी १००० पी पी एम निंबोळी अर्काची ३ मिली प्रति लीटर प्रमाणे एक फवारनी घ्या.ु
* ४० ते ६० दिवसांनी उपटून जुड्या बांधाव्या व भाजीची माती तिथेच शेतात झटकुन घ्यावी. हिरवी भाजी उत्पादन एकरी ३ टन मिळू शकते.
मेथी बीजोत्पादन करण्यासाठी:
* मेथी बिया उत्पादनासाठी थंडी आवश्यक म्हणून लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर मधे करावी.
* दोन रोपात १० सेमी.अंतर काही राज्यात रोप तयार करून सरी वरंबालागवड करतात
* बिया काढणीसाठी १५० दिवसांनी काढनी करुण खळ्यावर वाळवाव्या नंतर मळणी करावी याचे उत्पादन एकरी ५ ते ७ क्विंटल मिळते.