Thursday, January 22, 2015

घराच्या गच्चीत हरितगृह उभारून घेतले परदेशी भाज्यांचे उत्पादन... मनीष चांदेकर

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान:
दि. 22/01/2015

घराच्या गच्चीत हरितगृह उभारून घेतले परदेशी भाज्यांचे उत्पादन... मनीष चांदेकर

घराच्या गच्चीवरील 1500 चौरस फूट जागेत हरितगृह उभारून, त्यात सहा महिन्यांपासून परदेशी भाजीपाल्यांचे यशस्वी उत्पादन पुण्यातील मनीष चांदेकर यांनी घेतले आहे. शहरातील कमी जागेमध्ये त्यांची शेती करण्याची प्रबळ इच्छा पूर्ण झाली आहे.पुणे येथील मनीष चांदेकर हे हॉटेल व्यवसायाशी संबंधित काम करतात. त्यातून त्यांनी परदेशी (एक्झॉटिक) भाज्यांविषयी समजले. कुतूहलातून परदेशी भाज्यांविषयी लागवडीपासून सर्व बाबींची माहिती गोळा केली. मात्र उत्पादन घेण्यासाठी शेती नसल्याने माहिती असली तरी लागवड करणे शक्य नव्हते. याच दरम्यान सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर (एसआयएलसी)तर्फेआयोजित"एक्झॉटिक भाजीपाला उत्पादन' कार्यशाळेमध्ये सहभागी झाले. त्या ठिकाणी अधिक ज्ञानासोबत अन्य लोकांशी ओळखीही झाल्या. त्यातून टेरेसवरील 1500 चौरसफूट जागेमध्ये भाज्यांची लागवड करण्याची प्रेरणा मिळाली.गच्चीवर उभारले पॉलिहाउसघराच्या गच्चीवर फॅब्रिकेशनद्वारा हरितगृहाचा लोखंडी सांगाडा तयार केला. त्यावर पॉलिथिन पेपरचे छत व चारही बाजूंनी शेडनेट लावले. घरावर शेती करायची असल्याने पुढील गळती टाळण्यासाठी व वजन कमी राहण्यासाठी मातीशिवाय शेती करण्याचा विचार केला. त्यासाठी पर्याय म्हणून कोकोपीटची ग्रो बॅग वापरण्याचे ठरले. मात्रया बॅगेची उपलब्धता पुण्यामध्ये नाही. गुजरातमधील एका कंपनीकडे त्याचे दर अधिक होते. त्यानंतर कोईमतूर येथील कंपनीत दर योग्य असल्याचे कळले, तर प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत किमान एक हजार बॅग घ्याव्या लागतील, असे लक्षात आले. मात्र त्यांना घराच्या गच्चीवरील हरितगृह उभारणीविषयी सांगून एक हजार बॅग घेणे शक्य नसल्याचे पटविले, तेव्हा कुठे त्यांना 100 बॅग मिळाल्या.- हरितगृहामध्ये सिंचनासाठी ठिबक व तापमान, आर्द्रता नियंत्रणासाठी फॉगर यंत्रणा बसविली आहे. पहिल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर चेरी टोमॅटो आणि काकडीची लागवड केली. प्रकल्पाबाबत समजल्यावर एका कंपनीने हे बियाणे मोफत दिले.पॉलिहाउस उभारणीसाठी आलेला खर्चलोखंडी सांगाडा - 20 हजार रुपयेशेटनेट आणि पॉलिथिन पेपर - 30 हजार रुपयेठिबक आणि फॉगर्स - 18 हजार रुपयेकोकोपीट बॅग्ज - 2 हजार 500 रुपयेपाणी टाकी, पंप व अन्य - 12 हजार रुपयेअन्य खर्च - 8 हजार रुपये.............एकूण खर्च - 90 हजार 500 रुपयेपॉलिहाउसमधील विदेशी भाजीपाल्याचे उत्पादन,विक्रीतून मिळालेले उत्पन्न (एप्रिल ते डिसेंबर)भाजीचा प्रकार---रोपे संख्या---उत्पादन---प्रतिकिलो दर---उत्पन्नहिरवी काकडी---70---180 किलो---25 रुपये---4500पांढरी काकडी---90---180 किलो---25 रुपये---4500चेरी टोमॅटो---15---40 किलो---100 रुपये---4000ब्रोकोली---30---15 किलो---80 रुपये---1200लेट्यूस---30---9 किलो---60 रुपये---580येथे मिळाली बाजारपेठउत्पादन तर सुरू झाले, आता धडपड सुरू झाली विक्रीसाठी. रोपांची संख्या कमी, त्यामुळे एकूण उत्पादन कमी. मोठ्या व्यापाऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर परिसरातील भाज्या विक्रेत्याकडे सेंद्रिय परदेशी भाज्या म्हणून विक्रीसाठी नमुने दिले. येरवडा, विमाननगर परिसरातील हॉटेल, घरगुती ग्राहकांकडून त्याची खरेदी चांगल्या दरानेहोत असल्याने हळूहळू विक्रीची समस्या सुटत गेली.दोन बादल्या पाणी पुरेसेचांदेकर यांच्या पॉलिहाउसमध्ये कोकोपीट बॅगेमध्ये एकूण 240 लावली होती. त्यातून बाष्पीभवन होत नाही. तसेच संपूर्ण पाण्याचावनस्पतीसाठी वापर होत असल्याने फारच कमी पाणी लागते. दिवसभरात दोन बादल्या म्हणजेच 30 ते 40 लिटर पाणी पुरेसे होते.- उन्हाळ्यात तापमान नियंत्रणासाठी फॉगर्सची व्यवस्था केली आहे.- ठिबक सिंचनामुळे विद्राव्य खते देता येतात. कीडनियंत्रणासाठी दहा दिवसांनी निंबोळी तेल फवारल्याचे चांदेकर यांनी सांगितले.- सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपली शेतीची आवड जोपासणे शक्य झाले.- घरगुती सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या ताज्या भाज्यांची उपलब्धता.- मोकळी जागेचा, वेळेचा सदुपयोग झाला.- लहान मुलांना रमण्यासाठी बाग.तुम्हीदेखील हे करू शकताग्रामीण भागातील परसबागेप्रमाणे शहरी भागातही गॅलरी, गच्ची येथील जागेमध्ये भाज्यांचे उत्पादन घेता येते. त्या दिशेने चांदेकर प्रयत्न करीत आहेत. हरितगृहाच्या उभारणीची गरज नाही. कोकोपीट वापरातून 6 बाय 2 अशा आकाराचा गादीवाफा करूनही उत्पादन घेता येते. थोड्याशा सामग्रीतून शेडनेट व अन्य घटकांतून लहान आकाराचे हरितगृहही तयार करता येते. त्यात टोमॅटो, मिरची, वांगी,मेथी, कोथिंबीर, कांदा, आले, लसूण यासारख्या भाज्या घेता येतील, असे मनीष चांदेकर यांनी सांगितले.मी कोकणातील काही रिसॉर्ट व्यावसायिकांना पुण्यातून ग्राहक उपलब्ध करून देण्याचे काम करतो. फावल्या वेळेमध्ये "घरची शेती' पाहतो. "एसआयएलसी'च्या कार्यशाळेमध्ये ओळख झालेल्या रवींद्र सावंत यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन आणि मदत मिळाली.- मनीष चांदेकर, 7755955097.

~~~~~
* तुमची संस्था नोंदणीकृत असेल आणि तुम्हाला समाजसेवेची आवड असेल तर mazishetifoundation@gmail.com वर संपर्क करा.
~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444

Sunday, January 18, 2015

Paddy crop chi narsri tyar kraychi aahe khat,pani Vayvsthapan visai mahiti

Paddy crop chi narsri tyar kraychi aahe khat,pani Vayvsthapan visai mahiti deta yeil ka sir?
                                   
                                    R.T.baghade Gondia

Stage 1..
-Preparation of Nursery Area
Prepare 100 m2(10X10 M) nurseries to plant 1 ha. 
-Select a levelled area near the water source.
- Spread a plastic sheet or used polythene gunny bags on the shallow raised bed to prevent roots growing deep into soil.

Stage 2...
-Preparation of Soil Mixture
Four (4) m3 of soil mix is needed for each 100 m2 of nursery.  Mix 70% soil + 20% well-decomposed pressmud / bio-gas slurry / FYM + 10% rice hull.
-Incorporate in the soil mixture 1.5 kg of powdered di -ammonium phosphate(DAP) or 2 kg 17-17-17 NPK fertilizer.

Stage 3..
Blending mixture

-Filling in soil mixture: Place a wooden frame of 0.5 m long, 1 m wide and 4 cm deep divided into 4 equal segments on the plastic sheet or banana leaves.
- Fill the rame almost to the top with the soil mixture.

-Pre-germinating the seeds 2 days before sowing: Soak the seeds for 24 h, drain and incubate the soaked seeds for 24 h, sow when the seeds sprout and radical (seed root) grows to 2-3 mm long.

-Sowing: Sow the pre-germinated seeds weighing 90 -100 g / m-2 (100g dry seed may weigh 130g after sprouting) uniformly and cover them with dry soil to a hickness of 5mm. Sprinkle water immediately using rose can to soak the bed and remove the wooden frame and continue the process until the required area is completed.

Stage - 4
- Sowing Sprouted Seeds
-Watering
Water the nursery with rose can as and when needed (twice or thrice a day) to keep the soil moist. Protect the nursery from heavy rains for the first 5 DAS.
- At 6 DAS, maintain thin film of water all around the seedling mats.
-Drain the water 2 days before removing the seedling mats for transplanting.

Stage - 5
-Spraying fertilizer solution
- If seedling growth is slow, sprinkle 0.5% urea + 0.5% zinc sulfate solution at 8-10 days interval

Stage - 6

-Seedlings reach sufficient height for planting at 15 days.  Lift the seedling mats and transport them to main field.

More information please visit www.mazisheti.org, www.facebook.com/agriindia

Tuesday, January 13, 2015

सद्यःस्थितीत वातावरणात होत असलेला बदल आणि केळी बागांची विशेष काळजी....

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान:

सद्यःस्थितीत तापमानात होत असलेला बदल, तसेच वारा वेग बेताचाच आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण केळी पिकास योग्य असेच असले, तरी केळीच्या विविध अवस्थांनुसार या सर्व अवस्थेतील केळी बागांची विशेष काळजी घेणे अगत्याचे ठरते.

1) सध्या अनेक ठिकाणी तापमानात 15 अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे. या कालावधीत केळी पिकाच्या मुळ्यांची अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्रिया मंदावते. झाडांना अन्नद्रव्यांचा पुरवठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. परिणामी, केळी झाडे पिवळी पडू लागतात. ते टाळण्यासाठी थंडीच्या काळात शेतकऱ्यांनी 19-19-19 या विद्राव्य खताची 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
2) बागेतील तणाचे प्रमाण तुलनात्मकरीत्या कमी असले, तरी बागा निंदणी, कुळवणी करून स्वच्छ ठेवाव्यात.
3) मुख्य खोडालगत येणारी पिल्ले धारदार विळीने जमिनीलगत दर 2-3 आठवड्यांनी कापावीत.
4) मृगबागेत टिचणी करून जमिनीवरील तडे बुजवावेत. झाडांना माती लावून आधार द्यावा.
5) नवीन कांदेबागेत "इर्विनिया रॉट' या जिवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास, 200 लिटर पाण्यात 600 मि.लि. क्‍लोरपायरिफॉस अधिक 600 ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड अधिक 20 ग्रॅम स्ट्रेप्टोमायसिन (----इथे स्टार टाकावा----) या द्रावणाची प्रतिझाड 250-400 मि.लि. या प्रमाणात आळवणी करावी.
6) पीक अवस्थेनुसार व जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणीपुरवठा करावा. शक्‍यतो रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे.
7) सध्याची हवामान परिस्थिती करपा रोग वाढीस अनुकूल आहे. ढगाळ हवामान, अनियमित पाऊस, हवेतील आर्द्रता व तापमान हे घटक केळी करपा वाढीसाठी पूरक आहेत. नवीन लागवड, कांदेबाग लागवड व मृग कापणीवरील मृगबाग यांमध्ये करपा रोगाचे प्रमाण वाढलेले आहे. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करावी -

- सर्व बागेतली "करपा' रोगग्रस्त पाने किंवा पानांचा रोगग्रस्त भाग काढून बागेबाहेर नेऊन नष्ट करावा.
- करपा रोग निर्मूलनासाठी कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम किंवा प्रॉपिकोनॅझोल 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी अधिक स्टिकरचा वापर करावा.
- किंवा 5 मि.लि. प्रॉपिकोनॅझोल किंवा 5 ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक 100 मि.लि. मिनरल ऑईल प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी घ्यावी. पुढील फवारण्या गरजेनुसार तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्याव्यात.

9) बागेचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी सजीव कुंपण करावे. सजीव कुंपण नसल्यास बागेभोवती ज्वारी किंवा बाजरी किंवा मका किंवा कडबा यांच्या झापा करून किमान पश्‍चिम व उत्तरेकडील बाजूस लावावेत.
10) तापमान 10 अंश से.च्या खाली गेल्यास भल्या पहाटे बागेत ओला काडीकचरा जाळून धूर करावा.
11) निंबोळी ढेप प्रतिझाड 200 ग्रॅम (नवीन कांदेबागेस), तर मृग बागेस प्रतिझाड 500 ग्रॅम द्यावी.
12) मृगबागेस लागवडीनंतर 210 दिवसांनी घ्यावयाची खतमात्रा (प्रतिझाड 36 ग्रॅम युरिया) आणून ठेवावे व खते देण्यासंबंधी नियोजन करावे. नवीन कांदेबाग लागवडीस खताचा दुसरा हप्ता (प्रतिझाड 82 ग्रॅम युरिया) लागवडीनंतर 75 दिवसांनी द्यावा.
13) जुन्या कांदेबागेमधील फळवाढीच्या अवस्थेतील घड हे कोरड्या केळी पानांनी किंवा 2 ते 6 टक्के सच्छिद्रतेच्या 100 गेज जाडीच्या पांढऱ्या प्लॅस्टिक पिशवींनी झाकावेत.
14) फळवाढीच्या किंवा कापणी अवस्थेतील जुन्या कांदेबागेत "जळकाचिरूट' सिगारएंड रॉट या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास प्रादुर्भावग्रस्त केळी काढून बागेबाहेर नेऊन नष्ट करावीत. घडावर मॅन्कोझेब - प्रति 10 लिटर पाण्यात 25 ग्रॅम घेऊन घडावर फवारणी करावी.
अशा पद्धतीने केळी पिकांची काळजी घेतल्यास केळीच्या वाढीवर, उत्पादकता व गुणवत्तेवर विपरीत परिणाम होणार नाही.

~~~~~
* तुमची संस्था नोंदणीकृत असेल आणि तुम्हाला समाजसेवेची आवड असेल तर mazishetifoundation@gmail.com वर संपर्क करा.
~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444

Friday, December 26, 2014

दररोज तीनशे लिटर दुधापासून तयार होतात प्रक्रिया पदार्थ

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान:

दररोज तीनशे लिटर दुधापासून तयार होतात प्रक्रिया पदार्थ
- संकलन शुभम ठाकरे, नाशिक

कोल्हापूर जिल्ह्यातील नेर्ली (ता. करवीर) येथील सदाशिव चौगुले व त्यांच्या कुटुंबीयांनी विविध दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन व विक्री व्यवसायात प्रगती केली आहे. धडपड, संपूर्ण कुटुंबाची मेहनत, पदार्थांचा दर्जा, योग्य सेवेमुळे हा व्यवसाय चांगला बहरू लागला आहे. दररोज पन्नास लिटर दूध संकलनापासून सुरू झालेला हा उद्योग आता तीनशे लिटरपर्यंत विस्तारला आहे. 
राजकुमार चौगुले 

कोल्हापूर शहरापासून सुमारे दहा किलोमीटवर गोकूळ शिरगाव औद्योगिक वसाहतीनजीक नेर्ली गाव आहे. या गावातील सदाशिव चौगुले यांनी दुग्धजन्य पदार्थनिर्मितीत आपला ठसा तयार केला आहे. त्यांची अडीच एकर शेती आहे. सुरवातीला जनावरांचे संगोपन केले. काही काळ सेंटरिंगचे, तसेच पतसंस्थेत क्‍लार्क म्हणून काम केले. त्यानंतर स्वतःकडील 20 ते 25 लिटर दूध व शेजारील पाच गावांतून दूध संकलित करून ते कोल्हापूर येथे दुग्धप्रक्रिया उद्योजकांना पुरवू लागले. अशा प्रकारे दररोज पाचशे लिटर दूध पुरवण्याचा व्यवसाय दहा वर्षे चालला. त्यात कधी प्रक्रियादारांकडून दुधाची मागणी कमी असायची. त्यामुळे दूध शिल्लक राहायचे. हे दूध संघाकडे दिले तरी दर कमी मिळायचा. ही आर्थिक कोंडी फोडण्यासाठी स्वतःच प्रक्रिया उद्योजक व्हायचे ठरवले. 

सुरवात 50 लिटर दुधापासून 
चौगुले यांनी उद्योगाला पन्नास लिटर दुधापासून सुरवात केली. एक लाख रुपये खर्च करून खवा तयार करणारी यंत्रणा आणली. पण दररोज खव्याची विक्री होत नव्हती. मग हळूहळू दही, लस्सी, चक्का, क्रीम, पनीर, खवा, पेढे श्रीखंड, आम्रखंड बासुंदी तयार करायला सुरवात केली. 

बॅंकांचे अर्थसाह्य 
कमी जागेत व्यवसाय सुरू केला आहे. सुरवातीला बॅंकांनी सहकार्य केले नाही. मात्र सहा महिने पाठपुरावा केल्यानंतर बॅंक ऑफ इंडिया व एनकेजीएसबी बॅंकेमार्फत दहा लाख रुपयांचे अर्थसाह्य झाले. यातून विविध यंत्रे आणणे शक्‍य झाले. सुरवातीला उद्योगातील तांत्रिक माहिती नव्हती. एका तज्ज्ञाला उद्योगस्थळी बोलावून त्याच्यामार्फत दोन-तीन महिने प्रशिक्षण घेतले. घरातील अन्य सदस्यांना याबाबतची माहिती दिली. सध्या चौगुले यांच्यासह पत्नी सौ. वसुंधरा, आई गुणवंती, पृथ्वीराज, ऋतुराज ही मुले, असे सर्व कुटुंब या व्यवसायात गुंतले आहे. याशिवाय तीन कर्मचारी आहेत. सध्या खव्यासह श्रीखंड मशिन, क्रीम सेपरेटर, चिलर, तीन फ्रिज, लस्सी मशिन, पॅकिंग मशिन आदी यंत्रसामग्री आहे. 

असा आहे दिनक्रम 
दररोज नजीकच्या सांगवडे व सुळकूड गावातील दूध संस्थांमधून गरजेनुसार अडीचशे ते तीनशे लिटर दूध घेतले जाते. सहकारी संघापेक्षा या संस्थांना लिटरमागे चार ते साडेचार रुपये जास्त दिले जातात. दूध संकलनासाठी स्वतःची स्वतंत्र गाडी आहे. सकाळी लवकर दूध संकलन केल्यानंतर नऊ ते साडेनऊ वाजता प्रक्रिया सुरू होते. 

दही - दररोज शंभर ते एकशेवीस लिटर दुधाचे दही लावले जाते. संध्याकाळी ते तयार होते. रात्री नऊच्या दरम्यान प्लॅस्टिक कपांत (150 ग्रॅम) पॅकिंग करून ते चिलिंगसाठी ठेवले जाते. 

पनीर - सुमारे ऐंशी लिटर दुधापासून पंधरा ते सोळा किलो पनीर दररोज केले जाते. एक किलोचे भाग विक्रीसाठी तयार केले जातात. 

लस्सी - दररोज साठ लिटर दुधापासून साखर, वेलची, केशर अर्क घालून लस्सी बनविली जाते. यासाठी आठ फॅटचे दूध वापरले जाते. मलईयुक्त दह्याचा वापर त्यासाठी होतो. 

श्रीखंड - यासाठी चाळीस ते पन्नास लिटर दुधाचा वापर केला जातो. मलई दही, मलई चक्का वापरला जातो. वीस किलो चक्‍क्‍यात वीस किलो साखर घालून दररोज सरासरी चाळीस किलो श्रीखंड तयार होते. मागणीनुसार आम्रखंड, पेढे, खवा व बासुंदीही तयार केली जाते. सकाळी नऊ ते रात्री अकरा वाजेपर्यंत अखंडपणे काम सुरू असते. 

तयार केले मार्केट, नियमित ग्राहक 
चौगुले यांनी किरकोळ दुकानदार व हॉटेल असे सुमारे सत्तर ग्राहक तयार केले आहेत. गावाशेजारीच औद्योगिक वसाहत असल्याने त्याचा फायदा दुग्धजन्य पदार्थ विकण्यासाठी झाला आहे. विक्रीसाठी स्वत:ची गाडी आहे. दूध संकलनापासून ते मार्केटिंगपर्यंत सर्व जबाबदाऱ्या ते लीलया सांभाळतात. 
विक्रीसाठी आठवड्याचे काही वार ठरलेले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलांत, कागलसह शेजारील गावांमध्ये पदार्थांची विक्री केली जाते. अशा पदार्थांच्या विक्रीवर मोठ्या दूध संघाचे वर्चस्व असले तरी दर्जा ठेवल्याने आम्ही आमचे खास ग्राहक तयार केले असून, त्यांच्याकडून मागणी होत असल्याचे चौगुले यांनी सांगितले. सर्व व्यवहार रोखीने चालतो. यामुळे थकबाकीचा प्रश्‍न येत नाही. पूर्वी कोल्हापूर शहरात दूध विक्री करीत असताना परतीच्या वेळी अनेक दुकानदारांचे सामान ते बाजारातून घेऊन येत. त्यातून दुकानदारांच्या ओळखी वाढल्या. त्याचा उपयोग पुढे पदार्थ विक्रीसाठी झाला. 

किफायतशीर उद्योग - 

- दररोजचे दूध संकलन - 250 ते 300 लिटर 

दररोजचे उत्पादन 
शंभर लिटर दही प्रति 150 ग्रॅम पॅकिंगला 10 रुपये
पंधरा किलो पनीर 220 रुपये प्रति किलो 
पंधरा किलो श्रीखंड- आम्रखंड - 120 रुपये प्रति किलो 
नव्वद लिटर लस्सी - प्रति 200 ग्रॅमला 10 रुपये 

(मागणी व हंगामानुसार यात बदल होतो. पेढे, बासुंदी किंवा काही पदार्थ दररोज तयार न करता मागणीनुसार बनवले जातात. याशिवाय मोठ्या समारंभासाठी आर्डर्स घेतल्या जातात.) 

- प्रति लिटर दुधावर प्रक्रिया करून त्यातून 15 ते 20 रुपये उत्पन्न मिळते. त्यातून प्रक्रिया, मार्केटिंग व अन्य खर्च वजा जाता नफा शिल्लक राहतो.) 

चौगुले यांच्या व्यवसायाची वैशिष्ट्‌ये 
- दर्जेदार उत्पादन हाच महत्त्वाचा मुद्दा मानून व्यवसाय सुरू केला. 
-वसुंधरा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्‍ट्‌स या फर्मच्या माध्यमातून "पृथ्वी' ब्रॅंडने पदार्थांची विक्री 
- या संस्थेचा परवाना 
* केवळ म्हशींचे दूध वापरून पदार्थ तयार केले जातात. 
* दररोज दूध आणून ताजे पदार्थ तयार केले जातात. यामुळे दर्जा चांगला राहतो. 
* स्वत: विक्री केल्यामुळे पदार्थाच्या दर्जाबाबत ग्राहकांकडून माहिती मिळते. 
* दही व लस्सीला वर्षभर मागणी. औद्योगिक वसाहत नजीक असल्याने अनेक हॉटेलमध्ये दररोज मागणी. 
* प्रतिकूल परिस्थितीतून उभा केला व्यवसाय. 
* व्यवसायात आधुनिकीकरण आणण्यासाठी प्रशिक्षण घेण्याची तयारी. 
* मोठ्या संघांच्या स्पर्धेतही टिकून. 

सदाशिव चौगुले - 9881981154 
~~~~~
* तुमची संस्था नोंदणीकृत असेल आणि तुम्हाला समाजसेवेची आवड असेल तर mazishetifoundation@gmail.com वर संपर्क करा.
~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444

Saturday, December 6, 2014

हवामान अंदाज (दि.०६/१२/२०१४ ते १५/१२/२०१४) करिता

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान कडुन प्रसारित हवामान अंदाज (दि.०६/१२/२०१४ ते १५/१२/२०१४) करिता

*** प. महाराष्ट्र
(सांबरा, बेळगाव येथुन प्राप्त माहितीनुसार)
तापमानः १५ ते ३१°
आद्रता: २९ - ५६%
हवादाब : १०१४ hPa
दृश्यता: ०८ km
वारा - ०५ km/hr (प.)

मंगळवार पर्यंत वातावरन कोरडे राहील. बुधवारपासुन पुढे वातावरन ढगाळ राहील. शुक्रवार,  शनिवार तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. या काळात पहाटेची सापेक्ष आद्रता वाढलेली राहील.

*** खाणदेश

तापमानः १० ते ३३°
आद्रता: २९ - ५६%
हवादाब : १०१४ hPa
दृश्यता: ०८ km
वारा - ०५ km/hr (प.)

वातावरन कोरडे राहील.

*** मराठवाडा

तापमानः १५ ते ३१°
आद्रता: २९ - ५६%
हवादाब : १०१४ hPa
दृश्यता: ०८ km
वारा - ०५ km/hr (प.)

मंगळवार पर्यंत वातावरन कोरडे राहील. बुधवारपासुन पुढे वातावरन ढगाळ राहील. शनिवारी तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. या काळात पहाटेची सापेक्ष आद्रता वाढलेली राहील.

*** िवदर्भ
तापमानः १० ते ३१°
आद्रता: २९ - ५६%
हवादाब : १०१८ hPa
दृश्यता: ०८ km
वारा - ०५ km/hr (प.)

मंगळवार पर्यंत वातावरन कोरडे राहील. बुधवारपासुन पुढे वातावरन ढगाळ राहील.

~~~~~
* तुमची संस्था नोंदणीकृत असेल आणि तुम्हाला आमचेसोबत सामाजिक काम करावयाचे असल्यास mazishetifoundation@gmail.com वर संपर्क करा.
* शेतीविषयक माहितीसाठी तुमचे नाव, संपुर्ण पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल ही माहिती ९९७५७४०४४४ या नंबरवर पाठवा.
~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
मोबाईल - ०९९७५७४०४४४
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444

Tuesday, December 2, 2014

ढगाळ वातावरण झाल्यानंतर दुपारचे तापमान कमी होते आणि रात्रीचे तापमान वाढते. त्यामुळे…… - संकलन श्री.दत्ताञय पाटील, अंजनी

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान:

ढगाळ वातावरण झाल्यानंतर दुपारचे तापमान कमी होते आणि रात्रीचे तापमान वाढते. त्यामुळे……
- संकलन श्री.दत्ताञय पाटील, अंजनी

सध्या कुठल्याही द्राक्ष विभागामध्ये पावसाची शक्‍यता नाही. परंतु शनिवार, रविवारपर्यंत सांगली, सोलापूर आणि पुणे विभागांमध्ये वातावरण ढगाळ होण्याची शक्‍यता आहे. ढगाळ वातावरण झाल्यानंतर दुपारचे तापमान कमी होते आणि रात्रीचे तापमान वाढते. त्यामुळे सध्या बऱ्याच विभागांमध्ये सकाळी दव पडत आहे. ते कमी होईल किंवा पडणार नाही. असे झाल्यास डाऊनीचा धोका कमी होईल. सध्या बऱ्याच विभागांमध्ये शेंड्यावरती वाढणाऱ्या पानांवरती डाऊनी दिसत आहे. सध्या अशा प्रकारच्या डाऊनीचा नवीन प्रादुर्भाव होणार नाही. परंतु ढगाळ वातावरणामध्ये जुनी जिवंत असलेली डाऊनी फुलण्याची शक्‍यता आहे. परंतु अशी फुललेली डाऊनी दिसल्यास नियंत्रणासाठी जास्त फवारणीची जरुरी नाही.

1) जर छाटणीनंतर 50 दिवसांपुढे बाग पोचलेली असल्यास अशा बागेमध्ये पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ऍसिड 2 ते 3 ग्रॅम अधिक मॅन्कोझेब 2 ग्रॅम मिसळून फवारणी करावी. शक्‍य झाल्यास शेंड्याच्या काही पानांवर वाढलेली डाऊनी काढून टाकावी. 
2) जर फुलोऱ्याच्या जवळपास बाग असल्यास आंतरप्रवाही बुरशीनाशके उदा. डायमिथोमार्फ (50 टक्के) 1 ग्रॅम व मॅन्कोझेब दोन ग्रॅम किंवा इप्रोव्हॅलिकार्ब अधिक प्रॉपीनेब संयुक्त बुरशीनाशक 3 ग्रॅम किंवा मॅन्डीप्रोपामीड 0.65 मि.लि. प्रति लिटर अधिक दोन ग्रॅम मॅन्कोझेब, सायमोक्‍झॅनील अधिक मॅन्कोझेब 3 ग्रॅम प्रति लिटर मिसळून फवारावे. 
3) फुलोऱ्याच्या जवळपास असलेल्या बागांमध्ये डाऊनी मिल्ड्यूच्या नियंत्रणासाठी दोन फवारण्यांतील अंतर आता पाच ते सहा दिवसांपर्यंत वाढविल्यास धोका राहणार नाही. 

भुरीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना - 
1) ढगाळ वातावरणामध्ये विशेषतः काड्या व घडांची जास्त गर्दी असलेल्या बागांमध्ये वेगाने भुरी वाढू शकते. अशा बागांमध्ये आता भुरीच्या नियंत्रणासाठी फवारणी आवश्‍यक आहे. बागा छाटणीनंतर 50 ते 60 दिवसांपर्यंत असल्यास डिनोकॅप 25 मि.लि. प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. 
2) फुलोऱ्याच्या जवळपासच्या बागांमध्ये हेक्‍झाकोनॅझोल 5 ईसी 1 मि.लि. प्रति लिटर किंवा फ्ल्यूसिलॅझोल 25 मि.लि. प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. ज्या ठिकाणी अगोदरच भुरी वाढलेली असेल, अशा ठिकाणी या बुरशीनाशकांच्या बरोबरीने पोटॅशिअम बायकार्बोनेट 5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात मिसळून फवारल्यास चांगले नियंत्रण मिळेल. 
3) गर्दी असलेल्या बागांमध्ये आतल्या भागापर्यंत बुरशीनाशकाची फवारणी चांगल्या प्रकारे पोचत नाही, म्हणून प्रथम बागेतील गर्दी झालेली खालची पाने काढून बुरशीनाशकाची फवारणी केल्यास चांगले नियंत्रण मिळेल. 
4) फळधारणा झाल्यानंतर फ्ल्यूसिलॅझोल आणि हेक्‍झाकोनॅझोलची फवारणी शक्‍य नाही. असे केल्यास रेसिड्यूचा धोका वाढेल. छाटणीनंतरच्या 60 दिवसांनंतर डायफेनकोनॅझोल अर्धा मि.लि. प्रति लिटर किंवा टेट्राकोनॅझोल 0.75 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून भुरीच्या नियंत्रणासाठी रेसिड्यूचा धोका न घेता वापरणे शक्‍य आहे
~~~~~
संस्थेचे निर्णय, दिशा, धोरणे, शेतीविषयक बातम्या तुमच्या स्मार्ट मोबाईलवर हवे असल्यास तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल, जिल्हा ही माहिती ९९७५७४०४४४ या नंबरवर पाठवा.
~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444

Monday, December 1, 2014

आपल्या गावात दुर्देवानी शेतकर्यांचा अपघाती मृत्यु झाला तर ....

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान:
शेतकरी बाधंवाना महत्वाची सुचना....
संकलन - मनोज ओ. लोखंडे, कृषि विभाग, वसमत

आपल्या गावात दुर्देवानी शेतकर्यांचा अपघाती मृत्यु झाला तर महाराष्ट्र शासन, कृषि विभाग मार्फत '' शेतकरी अपघात विमा योजना अंर्तगत 100000/- ची मदत केली जाते. त्यासाठी लागणारी कागदपत्राचा तपशील

1. 7/12
2.होंल्डीग
3.गावनमुना 6-ड
4.गावनमुना 6-क
5.तलाठी प्रमाणपत्र (गोल शिक्का)
6.वयाचा पुरावा
7.FIR
8.मृत्यु /अपंगत्वाचा दाखला
9.घटना स्थळाचा पंचनामा (पोलीस सांक्षाकीत)
10.मरणोत्तर पंचनामा (पोलीस सांक्षाकीत) 11.पोस्टमार्टम पंचनामा
12.ड्रायव्हिग लायसन्स (मोटारसायकल अपघात)
13.MSEB report (विजेचा शॉक लागुन)
14.पासबुक झेराक्स (क्लेम धारक)
15.रहिवाशी प्रमाणपत्र

अधिक माहीतीसाठी आपल्या तालुक्याच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा

कृपया विनंती जवळील शेतकरी बाधंवाना ही माहीती सागंणे.
~~~~~
संस्थेचे निर्णय, दिशा, धोरणे, शेतीविषयक बातम्या तुमच्या स्मार्ट मोबाईलवर हवे असल्यास तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल, जिल्हा ही माहिती ९९७५७४०४४४ या नंबरवर पाठवा.
~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444

Saturday, November 29, 2014

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर 1012 हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान:
संकलन - मिलींद पोळ, वार्ताहर

डॉ. रामचंद्र साबळे
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर 1012 हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. मध्य प्रदेशावर 1014, राजस्थान सीमेवर 1016 हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. मात्र वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. त्यामुळे उत्तर भारतातून दक्षिण भारतात थंड वारे वाहतील. वाऱ्याचा वेगही साधारणपणे 10 किलोमीटर राहील. कमाल तापमानात फरक दिसेल. कोकणात 25 ते 32 अंश सेल्सिअस,
उत्तर महाराष्ट्रात 29 ते 32 अंश सेल्सिअस,
मराठवाड्यात 24 ते 27 अंश सेल्सिअस,
विदर्भात 25 ते 30 अंश सेल्सिअस;
पश्चिम महाराष्ट्रात 23 ते 26 अंश सेल्सिअस राहील.

संपूर्ण महाराष्ट्रात किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस राहील. त्यानुसार रात्रीचे तापमान घटेल.
अरबी समुद्राचे आणि बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान 300 ते 301 केलव्हिन्स इतके राहील. हिंदी महासागरावर ढगांचा समूह जमलेला असून, त्या ढगांचे तापमान उणे 40 अंश सेल्सिअस राहील. हवेच्या दाबात फरक
होत असल्याने मोठ्या प्रमणात ढग दक्षिण भारताबरोबरच महाराष्ट्रावरही दिसून येतील. प्रामुख्याने डिसेंबरच्या 1 ते 3 तारखेच्या दरम्यान अशी स्थिती निर्माण होऊन महाराष्ट्रावरही ढग जमतील आणि मेघ गर्जनेसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यांत पावसाची शक्य

उत्तर महाराष्ट्र -
उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस धुळे आणि जळगाव जिल्ह्यांत राहील. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान 29 ते 30 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात 17 अंश, तर धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यांत 19 अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 47 ते 58 टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 19 ते 22 टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग 7 ते 10 किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
मोबाईल - ०९९७५७४०४४४
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444