Wednesday, November 30, 2016

उन्हाळी बाजरी लागवड करण्यासाठी शेतीचे नियोजन

*माझीशेती: उन्हाळी बाजरी लागवड करण्यासाठी शेतीचे नियोजन (161130)*

उन्हाळी बाजरी अधिक दर्जेदार, टपोरी, हिरवीगार निघते त्यामुळे चांगला भाव मिळतो. ५/६ पाणी देण्याची सोय असेल तर उन्हाळी बाजरी करायला हरकत नाही. १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान उन्हाळी बाजरी पेरता येते. फुलोऱ्यात तापमान ३५ अंश सेल्सियस च्या पुढे गेल्यास उत्पादकता घटते, त्यामुळे शक्य तितक्या लवकर बाजरी पेरावी लागते.

पूर्वमशागत, एकरी २ टन शेण खत, २ वेळा कोळपणी, पेरताना एकरी ५० किलो १८:१८:१०, पेरणीनंतर ३० दिवसांनी ५० किलो युरिया द्यावे.
या काळात पाऊस नसल्याने उत्तम प्रतीचा कडबा/ चारा मिळतो.

उन्हाळी वातावरणात रोग, किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो. ९० दिवसात बाजरी काढणीस येते.

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान:
*महत्वाची सुचना -*
आपले सर्व शेतकरी आपल्या मुलांना शिकायला शहरात पाठवता. तुमचीही मुले शहरात असतील. महानगरे तर आपल्या अगदी हाकेच्या अंतरावर आहेत.....

शेतकरी बांधवांना एक कळकळीची विनंती आहे की, तुम्ही एक पाऊल पुढे टाकलेत तर तुमच्या जवळच्या शहरातील मार्केट यार्डमध्ये "शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांमार्फत" चालविलेले कृषिमाल विक्री केंद्र चालु करणार आहोत. यातील पहिल्या टप्प्यात पुणे आणि मुंबई येथे ही केंद्रे चालू झालेली आहेत.

प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाने महिण्यातुन एक दिवस शेतकऱ्यांसाठी दिल्यास शासनाच्या सहाय्याने व माझीशेतीच्या पुढाकाराने विकासाच्या दिशेने टाकलेला पाऊल प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. आम्ही शेतकर्यांच्या प्रगतीसाठी तुमच्याकडे हजारो हात पसरतो आहोत तुम्ही लाखो हात पुढे करुन प्रगतीचा मार्ग धरावा हि विनंती...

संस्थेचे स्वयंसेवक कोणत्याही स्वार्थाशिवाय तुमच्या प्रगतीसाठी प्रयत्नरत आहेत. आम्हाला अजुन स्फुरण चढवण्यासाठी तुम्ही आमच्या पाठीवर एक हात व हातात एक हात द्यावा ही विनंती.

अधिक माहितीसाठी आमच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क करा. किंवा 09975740444 वर संपर्क करा.

~~~~~
* तुमची संस्था नोंदणीकृत असेल आणि तुम्हाला समाजसेवेची आवड असेल तर mazishetifoundation@gmail.com वर संपर्क करा.
~~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444

Wednesday, November 23, 2016

माझीशेतीच्या RSD प्रकल्पाचा महाराष्ट्रातील आढावा घेतल्यानंतर माझीशेतीचे अध्यक्ष व RSD प्रकल्पाचे प्रमुख महेश बोरगे यांनी व्यक्त केलेले मनोगत.

(आज दि.२३/११/२०१६ रोजी माझीशेतीच्या RSD प्रकल्पाचा महाराष्ट्रातील आढावा घेतल्यानंतर माझीशेतीचे अध्यक्ष व RSD प्रकल्पाचे प्रमुख महेश बोरगे यांनी व्यक्त केलेले मनोगत.)
शब्दांकन - धनंजय उरणे

सर्व सदस्यांसाठी, मग ते क्षेत्रावर काम करणारे असोत वा कार्यालयात.... आपण सर्वजण दि.०२ नोव्हें.१६ पासून माझीशेतीच्या व्यासपीठावर कार्यरत झालो आहोत. कार्यरत म्हणण्यापेक्षा एक सामाजिक कामाचा वसा घेतला आहे म्हणाले तरी वावगे ठरणार नाही. जसे की आपण घरच्यांच्या इच्छेला अनुसरून किंवा स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कृषीचे शिक्षण पुर्ण केले आहे. आपण घेतलेल्या शिक्षणाचा प्रत्यक्ष उपयोग करायची हि उत्तम वेळ आहे. आपल्या ज्ञानाच्या तलवारीला म्यानातून बाहेर काढायची वेळ आली आहे.

समाजातील अतिशय हलाखीत आणि जोखीमेत दिवस काढणाऱ्या शेतकऱ्यांची ध्येयवादी मानसिकता ठेवून मदत करायचे महत्वाचे काम आपल्या हातून घडणार आहे. तुम्ही या सामाजिक कामासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत, याची मला खात्री आहे. 

आपण जेंव्हा हा वसा हाती घेतला तेंव्हा आपल्या मनाचे समाधान होत नाही तोपर्यंत आपल्या कामात बदल घडवीत जायचे. आपण नेहमी म्हणतो की आज मला मूड नाही..., म्हणजे काय तर आपण करीत असलेल्या कामात स्वारस्य नसणे. बरेचदा फक्त काहीतरी काम करायचे म्हणून करायचे आणि आजचा दिवस पुढे ढकलायचा असे वाटते, तेंव्हा समजायचे कि हे सध्या करत असलेले काम माझ्यासाठी नाही. मग अश्या वाट चुकलेल्या गाडीतून प्रवास करत पुढे जाऊन खाली उतरण्यापेक्षा आताच योग्य निर्णय घेतलेला बरा...

जेंव्हा आपण ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांचा शाश्वत विकास करण्यासाठी आराखडा तयार करून कार्यरत होतो तेंव्हा त्यातून स्वतःच्या विकासाचा विचार देखील करायला हवा. आपण करतोय ते काम योग्य कि अयोग्य यासाठी स्वतःचे परीक्षण करण्याची संधी नेहमी स्वीकारली पाहिजे किंवा तशी संधी शोधली पाहिजे.

ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पामधून आपण जेव्हा कृषिच्या रण भूमीत आपल्या ज्ञानाची शस्त्रे घेऊन उतरतो तेंव्हा पहिल्या प्रथम आपला आत्मविश्वास वाढला पाहिजे. माझ्यामुळे माझी आणि शेतकऱ्यांची प्रगती झालीच पाहिजे. आपण विद्यालयात घेतलेले शिक्षण, प्रगत शेतकऱ्यांचे अनुभव, काम करताना आलेले अनुभव, मित्र-सहकाऱ्यांचा अनुभव, महाविद्यालये, शासकीय विभाग यांचा सहयोग घेऊन आपण गरजेनुसार प्रगतीचा आलेख चढता ठेवू शकतो. 

प्रत्यक्ष काम करताना आपली ज्ञानेंद्रिये जागृत ठेवून शेतकऱ्यांसारखा जात्याच संशोधक आपला उपयोग करून घेतो का? यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेली माहिती संकलित करून देणे म्हणजे हे काम आजच्या काळात शेतीला श्री कृष्णाने अर्जुनाला सारथी बनून केलेल्या पवित्र कामासारखे आहे. आणि असे हे पवित्र काम आपल्या वाट्याला आले आहे. माझ्या आणि तुमच्या पालकांचे नावलौकिक वाढविणे आणि आपल्या जन्माचे सार्थक करणे हे आपण आपल्या कर्तृत्वातून दाखवून देणार आहोत. 

शेतकऱ्यांना आपण दिलासा देत असू तर त्यांना गरजेच्या साधनांची उपलब्धता करून देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. कमीत कमी खर्चामध्ये उच्च गुणवत्तापूर्ण संसाधने उपलब्ध करणे आणि उत्पादकता वाढविणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या युगात बऱ्याच कंपन्या शेतकऱ्यांना वेगवेगळी आश्वासने देऊन लुभावत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित करून कृषि निविष्ठांचा गुणवत्तेच्या बाबतीत शोध घ्यायला हवा. जेणेकरून गरजेपेक्षा जास्त आणि गुणवत्ता नसलेली उत्पादने शेतकऱ्यांपासून दूर ठेवता येतील. 

बरेच शेतकरी हे संपुर्ण शेतकरी समाजाला दिशादर्शनाचे काम करीत असतात मात्र दैनंदिन जीवनातील व्यापातून त्यांची माहितीची देवाणघेवाण करणे शेतकऱ्यांना शक्य नसते. याकरिता 15 दिवस किंवा महिन्यातुन किमान तासभर तरी शेतकऱ्यांना एकत्र करुन ग्रुप चर्चा करणे आवश्यक आहे. या ग्रुपचे होणारे उत्पादन योग्य त्या हमी भावाने विकले गेले पाहिजे. आपल्या शेतकरी बांधवांचे पाल्य वेगवेगळ्या शहरात शिक्षण, नोकरी, व्यवसाय करीता गेलेले असतात, त्यांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे आजच्या काळाची गरज आहे. 

RSD प्रकल्पाच्या विशेषतः lll नं.बॅच मध्ये महिलांनी भरारी घेतली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुन्हा एकदा राणी लक्ष्मीबाई च्या रूपाने प्रज्ञा कांबळे, पुनम सुतार, प्रियांका पाटील, प्रियांका सोनगेकर, जुईली गांधी, अश्विनी शिंदे प.महाराष्ट्रात अवतरलेल्या आहेत. प.महाराष्ट्रासारख्या अतिशय प्रगत शेतीच्या रणांगणात या रणरागिणी आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. माझीशेतीचा संपुर्ण स्टाफ या रणरागिनींना सर्वोतोपरी सहकार्यासाठी तत्पर राहील याची मी अध्यक्ष या नात्याने ग्वाही देतो. 

धन्यवाद... 🙏
🏻

Friday, November 4, 2016

माझीशेतीमार्फत शेतीची दशा आणि दिशा बदलण्यासाठी “ग्रामीण शाश्वत विकासाची” पायाभरणी वाफगावमध्ये सुरु.

(राजगुरुनगर/जिल्हा:पुणे)

शेतमाल व उत्पादनांना उत्तम व खात्रीशीर बाजारपेठ मिळवून देण्याच्या अनुषंगाने माझीशेती संस्थेद्वारे ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांचा शाश्वत विकास करण्यासाठी “ग्रामीण शाश्वत विकास (RSD) उपक्रम राबाविला जात आहे. याच वाटचालीत दि.०२/११/२०१६ रोजी वाफगाव (ता.राजगुरुनगर) येथे माझीशेती संस्थेमार्फत ग्रामीण शाश्वत शेती उपक्रमाचा उद्देश सांगितला. ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावचे सरपंच मा.श्री.अजय भागवत यांना या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आश्वासन दिले. 
ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पाची सुरुवात करताना वाफगाव ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांच्यासोबत माझीशेती  RSD  प्रकल्पातील सर्व सदस्य उपस्थितीत होते.

यावेळी बोलताना श्री.अजय भागवत उपसरपंच म्हणाले की,शेतकऱ्यांना फक्त माझे ‘शेतकरी बांधव’न म्हणता, त्यांच्या शेतीमालाला सुयोग्य भाव आणि खात्रीशीर उत्पन्न मिळवून देण्याचे प्रयत्न करायला पाहिजे.यासाठी गावातील तरुण युवक व प्रगतशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन माझीशेतीच्या सहकार्याने काम करण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले. श्री. शैलेश मांदळे यांनी गावातील तरुण शेतकऱ्यांना भौगोलिक बंधने विसरून उज्वल भविष्याला गवसणी घालण्यासाठी आधुनिक प्रणालीचा वापर करून प्रगत शेती करण्याची गरज आहे असे सांगितले. तांत्रिकदृष्ट्या सक्षम तरुणांना उद्देशून बोलताना तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतीमध्ये वापर करून शेतीमध्ये प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन केले.
जुईली गांधी यांनी ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पाची माहिती देताना गावातील अर्थव्यवस्था बळकट करण्यावर भर दिला. प्रगतशील शेतकऱ्यांच्या प्रयोगांना प्रसिद्धी देऊन इतर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह शेती करण्यासाठी माझीशेतीच्या RSD प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले. RSD प्रकल्पाच्या माध्यमातून शेती मार्गदर्शन, कृषी निविष्ठा, प्रशिक्षण, बांधावरील बैठक या अश्या वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांची क्षमता बांधणी करणे आणि तयार झालेला शेतीमाल विक्रीसाठी हमी भाव देण्यासाठी प्रयत्न करणे असे माझीशेतीचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. 

डाळिंब पिकातील उत्पादनाच्या दृष्टीने मधमाश्यांचे योगदान…. (१६११०४)

डाळिंब पिकातील उत्पादनाच्या दृष्टीने मधमाश्यांचे योगदान…. (१६११०४)
संकलन - जुईली गांधी 

डाळिंब पिकातील जास्तीत जास्त उत्पादनाच्या दृष्टीकोनातुन अत्यंत महत्वाच्या असणा-या परागीभवनाच्या क्रियेत मधमाश्या मह्तवाचे योगदान देत असतात. परंतु डाळिंब पिकावर होत असलेल्या विविध किटकनाशकांच्या फवारणीतुन मधमाश्या वाचत नाही, त्यामुळे मधमाश्यांचे संगोपन करुन त्यांची संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी मधुमक्षिका पालन करणे गरजेचे आहे.


मधमाशा व पिके एकमेकांना पूरक
भारत अन्नधान्याच्या उत्पादनात जगात पाचव्या स्थानी आहे. मात्र महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची स्थिती फारशी चांगली नाही. अल्पभूधारक शेतकरी आजही शेतीला योग्य पूरक व्यवसायाच्या शोधात आहे. ‘मधुमक्षिका’ पालन हा त्याच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो़ पृथ्वीवरील जीवांच्या उत्क्रांती प्रक्रियेत प्राणी जीवन निर्माण होण्यापूर्वी फुलणाऱ्या वनस्पतीवर खाद्यासाठी पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या मधमाश्यांचा जन्म झाला. शेतातील पिके, वनस्पती व मधमाशा हे एकमेकांना पूरक आहेत. शेतपिकापैकी गळिताची धान्ये, कडधान्ये, चाऱ्याची पिके, मसाल्यांची पिके, बियाण्याची पिके व फळफळावळ यासारखी पिके परागभवनासाठी मधमाशांसारख्या किटकावर अवलंबून असतात. मधमाशांना परागफलन केल्याने या पिकांची प्रत वाढत असल्याचे निष्कर्ष नोंदविण्यात आले आहेत. मधमाश्यांअभावी चांगले उत्पादन होऊ शकत नाही असा निष्कर्षही या संशोधकांनी काढला आहे. इतर कोणत्याही कीटकांपेक्षा पराग फलनासाठी मधमाशा कार्यक्षम आहेत.
मधमाशी पालनातील अडचणी
मधमाश्यांच्या एका वसाहतीत सुमारे ५ ते १० हजार मधमाशा असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात परागसिंचन करण्याची क्षमता दुसऱ्या कोणत्याही किटकांत नसते. या मधमाशा फुलातील मकरंद गोळा करून मधाची निर्मिती करतात. त्यांचे हे कार्य निरंतर सुरू असते. पाळीव मधमाश्यांच्या वसाहतीच्या माध्यमातून हमखास परागफलन करता येते. महाराष्ट्रात सुमारे २१० लाख हेक्टर क्षेत्र निरनिराळ्या पिकांच्या लागवडीखाली आहे. तृणधान्य व भुईमूग वगळता सर्वच गळितांच्या पिकांच्या फुलोऱ्यापासून मधनिर्मिती केली जाते. मात्र मधमाशी पालनात काही अडचणी आहेत. खरीप व रबी हंगाम वगळता अन्य हंगामात त्यांना पुरेसे खाद्य मिळत नाही. कीटकनाशकांचा अती वापर हा मधमाशांसाठी हानीकारक ठरला आहे.
स्वयंरोजगार प्रदान करणारा व्यवसाय
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या यासाठी शासनाने डॉ. स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. त्यांनी आपल्या अहवालात शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करावी अशी शिफारस केली आहे. मधमाशी पालनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो असा निष्कर्ष डॉ.घुगल व डॉ. राहिले यांनीही आपल्या अभ्यासात नोंदविला आहे. मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना एकरी पिक वाढीस मदत मिळू शकते. फुलात सुकून वाया जाणारा मकरंद व पराग मधमाशांच्या माध्यमातून गोळा करून कोट्यवधी रुपये किमतीच्या मधाची व मेनाची निर्मिती केली जाऊ शकते. मधमाशी पालन हा व्यवसाय स्वयंरोजगार प्रदान करणारा ठरू शकतो. यासोबतच या व्यवसायाला लागणारे पूरक व्यवसाय देखील गावांत निर्मित केले जाऊ शकतात. एका शेतकऱ्याने ८ ते १० वसाहती पाळल्यास त्याला चांगला मोबदला मिळू शकतो.

संदर्भ - दैनिक लोकमत

Sunday, October 30, 2016

तुमचा लॅपटॉप / डेस्कटॉप आम्हाला द्याल का?? - महेश बोरगे

तुमच्या किंवा तुमच्याशी संबंधित असलेल्या मित्र-मैत्रिणीं, सहकारी, कुटुंबे, नातेवाईकांमध्ये सुस्थितीत असलेले लॅपटॉप / डेस्कटॉप आम्हाला द्याल का??? 



आधुनिक शेती किंवा नाविन्यपुर्ण व्यावसायिक शेती करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणे क्रमप्राप्त आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आजही संगणक वापरताना मागे हटतो परिणामी शासनाच्या विविध प्रकारच्या योजना आणि सहकार्यापासुन शेतकरी दुर राहतात. माझीशेतीच्या प्रशिक्षण विभागाकडून केलेल्या सर्वेक्षणातून असे पुढे आले आहे. यामध्ये प्रामुख्याने संगणक वापरता येत नसल्यामुळे शेतकरी वर्ग संगणक प्रणाली घेणे टाळतो. माझीशेतीकडून याविषयावर सविस्तर चर्चा करून व्यावसायिक शेती अभ्यासक्रम सुरू करणेत आला आहे. परंतु शेतकऱ्यांची उत्पादकता कमी असल्यामुळे शेतकरी संगणक घेणे आवश्यक बाब समजत नाही. यामुळेच माझीशेतीकडून व्यावसायिक शेतीचे प्रशिक्षण घेणाऱ्या गरजू शेतकऱ्यांना लॅपटॉप / डेस्कटॉप देण्याचे ठरविले आहे. 

आपण दिपावलीच्या मंगल प्रसंगी लॅपटॉप, डेस्कटॉप, आधुनिक मोबाईल खरेदी करतो, तुम्हीही केला असेलच. अश्यावेळी जुना लॅपटॉप / डेस्कटॉप घरी पडून असेल तर तो कृपया आम्हाला द्या. डिजिटल इंडिया मध्ये 1% शेतकरी डिजिटल आहेत मात्र 99% अजूनही प्रतीक्षेत आहेत. तुमचा पुढे केलेला एक हात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रगतीच्या दिशेने पुढे घेऊन जाणार आहे. 

आपणाकडून मिळालेले लॅपटॉप / डेस्कटॉप ग्रामीण भागातील गरजू शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना गरजेचे आणि अतिशय महत्त्वाची संसाधने मिळवण्यासाठी आपण दिलेल्या डोनेशनचा उपयोग केला जातो. दैनंदिन जीवनातील शेतीच्या कामकाजासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून घ्यावयाच्या माहितीसाठी आणि मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी वापर करायला देण्यात येणार आहेत. 

माझीशेतीचा दस्तऐवजामध्ये / डेड स्टॉकमध्ये तुमच्या दिलेल्या योगदानाचा समावेश केला जाईल व योग्य तपासणी करून गरजू शेतकरी गटांना प्रति गट एक याप्रमाणे संगणक देण्यात येईल. यामुळे झालेल्या अमुलाग्र बदलाचा मासिक अहवाल सर्वत्र प्रकाशित केला जाईल. 

Call us - 9975740444
Write us - mazishetifoundation@gmail.com
Know us - mazisheti.org
Like us - fb.com/agriindia
Twit abt us - @mazisheti
Link with us - LinkedIn.com/in/mazisheti

Tuesday, October 25, 2016

शेततळ्यासाठी साडेपाच लाखांपर्यंत अनुदान...

शेततळ्यासाठी साडेपाच लाखांपर्यंत अनुदान
दोन हजार शेततळ्यांना मिळणार लाभ 

पुणे - पाणीटंचाईच्या काळात शेततळ्यांतील पाण्याचा योग्य वापर करून फळबागा जगविण्यासाठी शेतकरी त्यांचा आधार घेत आहेत. शेततळ्याच्या आकारमानानुसार व योजनेनुसार जास्तीत जास्त साडेपाच लाखांपर्यंतचे अनुदान मिळेल.

वाढत्या पाणीटंचाईमुळे या फळबागा जगविणे मोठे आव्हान बनले अाहे. शासनाने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान (दोन किवा अधिक लाभार्थी) आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सामूहिक शेततळ्यांचा शंभर टक्के अनुदानावर लाभ दिला जातो. 

या दोन्ही योजनेतून २००५ ते २०१४-१५ या कालावधीत राज्यात तब्बल २३ हजार ९०८ शेततळे घेतली असून त्यासाठी शासनाने ४५७ कोटी ९२ लाख रुपये अनुदानापोटी उपलब्ध करून दिले आहेत. राज्यात २०१२ नंतर वाढत्या दुष्काळामुळे शेततळ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत गेली. तर २०१३-१४ यामध्ये या एकाच वर्षी राज्यात सर्वाधिक म्हणजेच ९७०४ एवढी शेततळी झाली. त्यानंतर शेततळ्यांच्या संख्येत घट झाली असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी सामूहिक शेततळ्यांचा लाभ घेण्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेततळ्यांच्या प्रकारानुसार अनुदान 
सध्या योजनेअंतर्गत हाफ डगआऊट, फुलली डगआऊट आणि बोडी टाइप असे शेततळ्यांचे तीन प्रकार आहेत. बहुतांश शेतकरी हाफ डगआऊट प्रकाराची शेततळी घेत आहेत. यासाठी साधारणपणे कमीत कमी पाचशे घनमीटर पाणीसाठ्यासाठी १४ बाय १४ बाय ३ मीटर आकारामानाच्या शेततळ्यासाठी ६५ हजार रुपये एवढे अनुदान मिळते. जास्तीत जास्त दहा हजार घनमीटरच्या पाणीसाठ्यासाठी ४४ बाय ४४ बाय ५.४ मीटर आकारमानाच्या शेततळ्यासाठी पाच लाख ५६ हजार रुपयांचे अनुदान मिळते. त्यासाठी प्रामुख्याने शेतकऱ्याजवळ फळबाग असणे अावश्यक आहे.

पाणीटंचाईमुळे सामूहिक शेततळ्याला आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात निधी दिली आहे.
- सुभाष जाधव, संचालक, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान 

Wednesday, October 19, 2016

हरभरा लागवड

साधारणपणे जगातील एकून हरबऱ्याच्या पिकापैकी ७८% पीक भारत व ९% पीक पाकिस्तानात पेरले जाते, उरलेले १३ % पीक जगातील इतर भागांत पेरले जाते. भारतामध्ये हे पीक पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल व कर्नाटक या राज्यांत मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

महत्त्व : हरबऱ्याचे कोवळे शेंडे भाजी म्हणून वापरतात. दाणे पक्व होण्यापूर्वी कच्च्या स्वरूपात खाल्ले जातात. हरबऱ्यांच्या मुळावरील गाठींमुळे नत्राचे जमिनीतील प्रमाण वाढते. हरबऱ्यात प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे घोडे व इतर जनावरांना खुराक म्हणून हरबरा दिला जातो. मिठाई करण्यासाठी चण्याच्या पिठाचा उपयोग करतात. टरफलासह दाण्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण १६ ते १९ % असते. नुसत्या डाळीत २२ ते २५ % असते. हरबऱ्याच्या कोवळ्या पानात मॅलिक व ऑक्झॉंलिक आम्ल असते.

जमीन व हवामान : मध्यम किंवा मध्यम भारी रानात हरबऱ्याचे पीक घेतात. कमी ते मध्यम पावसाच्या प्रदेशात (६५० ते १००० मिमी) हे पीक उत्तम प्रकारे घेता येते. कडाक्याची थंडी मात्र या पिकास सहन होत नाही. ५ डी. सेल्सिअसच्या वर तापमान असणाऱ्या भागात हरबऱ्याची वाढ चांगली होते.

पूर्व मशागत : खरीपाचे पीक काढल्यानंतर १ नांगरट व कुळवाच्या २ पाळ्या देतात. मशागतीच्या वेळीच पूर्ण कुजलेले शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खत १०० ते १५० किलो एकरी द्यावे.

बी - बियाणे आणि पेरणीचा कालावधी :

जातीपरत्वे हरबऱ्याचे एकरी बियाणे २५ ते ४० किलो लागते. हरभऱ्याची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या १५ तारखेनंतर ३ - ४ आठवड्यांपर्यंत करतात.

बीजप्रक्रिया : मर या रोगापासून वाचविण्यासाठी आणि उगवण चांगली होण्यासाठी जर्मिनेटरची बीज प्रक्रिया करवी. हरबऱ्याचे १ किलो बी जर्मिनेटर २० ते २५ मिली + १ लि. पाण्यात अर्धा तास भिजवून सावलीत सुकवून पेरावे. म्हणजे उगवण चांगली होते, तसेच हवेलीत नत्र खेचून हरबऱ्याच्या मुळावर नत्राच्या गाठी वाढतात. त्यामुळे रासायनिक खतात बचत होते. जमीन खराब न होता जमिनीची जैविक सुपिकता वाढते. त्यामुळे उत्पादन व दर्जा दोन्हीत वाढ होतो.

सुधारित वाण : हरबऱ्याचे विविध सुधारित वाण पुढील तक्त्यात दिले आहेत.
अ. क्र.  वाण  पिकाचा कालावधी (दिवस)  उत्पन्न (क्विं./ एकरी)  प्रमुख वैशिषट्ये  
१)  विकास  १०५ -११०  जिरायत ४.५ ते ५ बागायत ९ ते १०  जिरायत क्षेत्रासाठी योग्य वाण  
२)  विश्वास  ११५ - १२०  जिरायत ४ ते ४.५ बागायत ११ ते १२  टपोरे गोल दाणे, पाणी व खतास प्रतिसाद देणारा वाण, राष्ट्रीय वाण म्हणून प्रसारित  
३)  फुले जी - १२  १०५ -११०  जिरायत ५ ते ५.५ बागायत ११ ते १२  जिरायत तसेच बागायतीसाठी योग्य वाण  
४)  विजय  ८५ - ९०  जिरायत ६ ते ६.५  मर रोगास प्रतिकारक्षम तसेच अवर्षण प्रतिकारक्षम जिरायत बागायत तसेच उशीर पेरणीसाठी योग्य वाण. आकर्षक पिवळे टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक्षम, अधिक उत्पादन क्षमता.  
५)  विशाल  ११० -११५  जिरायत ५.५ ते ६ बागायत १२ ते १४  
६)  श्वेता  १०० -१०५  जिरायत ३.५ ते ४ बागायत ७.५ ते ८  काबुलीवाण, मर रोगास प्रतिकारक्षम, टपोरे दाणे, हळवा वाण.  
७ )  भारती  ११०-११५  जिरायत ५.५ ते ६ बागायत १२ ते १३  मर रोग प्रतिकारक्षम, जिरायत तसेच बागायतीसाठी योग्य  


पेरणीच्या वेळी तापमानाचा अंदाज घेऊन योग्य वेळी पेरणी करावी. पेरणी जर तिफणीने केली तर दोन ओळींत ३० ते ४५ सेंमी अंतर ठेवतात. पेरणी जमिनीखाली ७ ते १० सेंमी खोल करावी.

आंतरमशागत व तणनियंत्रण : पेरणीनंतरसुरूवातीचे ४ ते ६ आठवडे जमीन तणविरहित ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी १ खुरपणी व १ कोळपणी आवश्यक आहे. पेरणीनंतर कोळपे फिरवल्यास हवा खेळती राहून पीक चांगले वाढते.

खत व्यवस्थापन : उपलब्धतेनुसार पुर्ण कुजलेले शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खत कोरडवाहू पिकास ५० ते ७५ किलो तर बागायत पिकास १०० ते १५० किलो एकरी द्यावे.

पाणी व्यवस्थापन : पेरणीनंतर ८ - १० दिवसांनी एक व घाटे भरून काढण्याच्या वेळी एक अशा किमान २ - ३ वेळा पाणी दिल्यास पीक उत्तम येते. तथापि हवामानात उष्णतेचे प्रमाण वाढत गेल्यास पाण्याची जादा पाळी देणे गरजेचे आहे. गरजेपेक्षा जादा पाणी देण्याचे मात्र कटाक्षाने टाळावे. कारण जादा पाण्यामुळे वाढ जादा होऊन घाटे येण्याचे प्रमाण मात्र कमी होते व पर्यायाने उत्पन्न कमी होते.

पीक संरक्षण : हरबऱ्यावर मुख्यत्वे मुळकुजव्या मर, भुरी आणि गेरवा हे रोग पडतात.

पेरणीनंतर लगेचे हवेतील तापमानात वाढ झाल्यास मुळकुजव्या रोगाचा उपद्रव होतो. लहान - लहान रोपे वाळू लागतात व मरतात, यासाठी तापमान योग्य व थंड असतानाच पेरणी करावी आणि बीजप्रक्रियेला जर्मिनेटर आवश्य वापरावे. मर हा रोग जिवाणूंमुळे होतो. चांगले वाढलेले झाड एकाएकी वरपासून वाळू लागते. यासाठी एन -३१ व एन -५९ या जाती रोगप्रतिबंधक जातींची शिफारस केलेली आहे.

हरबऱ्यातील कीड :

घाटेअळी : हरभऱ्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करणाऱ्या किडीत घाटेअळी प्रमुख आहे. घाट्यात अळी शिरते व आतील सर्व दाणे फस्त करते. या अळीचा बंधोबास्त करण्यासाठी प्रोटेक्टंट या किटकनाशकाचा वापर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांमध्ये पुढीलप्रमाणे दर पंधरा दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा फुले येण्याच्या सुरूवातीपासूनच केल्यास पिकाचे संरक्षण होते. मात्र अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे जाणवताच रासायनिक किटकनाशकाची फवारणी घ्यावी.

हरबऱ्याची वाढ समाधानकारक होऊन अधिक फुल - फलधारणा होऊन घाट्यामध्ये ठसठशीत दाणे भरण्यासाठी अर्थातच दर्जा व उत्पदान वाढीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढीलप्रमाणे फवारण्या घ्याव्यात.

फवारणी:

१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (३० ते ४० दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर ३५० मिली. + क्रॉंपशाईनर ३५० मिली. + राईपनर २५० मिली + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली + हार्मोनी १५० मिली. + १०० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : ( ४५ ते ६० दिवसांनी) : थ्राईवर ५०० मिली.+ क्रॉंपशाईनर ५०० मिली. + राईपनर ३५० ते ४०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली + हार्मोनी २५० मिली. + १५० लि.पाणी.

४) आवश्यकता भासल्यास (प्रतिकुल हवामानात) चौथी फवारणी ७५ दिवसांनी : वरीलप्रमाणेच (तिसरी फवारणीप्रमाणे) फवारणी करावी. मात्र यामध्ये थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, आणि न्युट्राटोन प्रत्येकी १ मिली प्रती लि. पाण्यामध्ये जादा द्यावे.

पीकपक्वता / काढणी : शेताच्या सर्व भागांतील पीक वाळल्यावर पाने झडतात. त्यानंतर पिकाची कापणी जमिनीलगत कापून केल्यास नत्राच्या गाठी असलेल्या मुळ्या जमिनीत राहून त्यातील नत्राचा पुढील पिकास उपयोग होतो. डॉ. बावसकर तंत्रज्ञानाचा वापर वरीलप्रमाणे केल्यास हरबऱ्याच्या मुळावर नत्राच्या गाठी नेहमीच्या तुलनेत दुप्पटीहून अधिक आल्याचे कृषी विज्ञान मधून शेतकऱ्यांनी कळविले आहे. (संदर्भासाठी कृषी विज्ञानचे मागील अंक वाचावेत. ) साधारणत: कोरडवाहू क्षेत्रामध्ये एकरी २०० ते ३०० किलो तर बागायती क्षेत्रामध्ये ६०० ते ९०० किलो इतके उत्पादन येते. 

Tuesday, September 6, 2016

गटाला किंवा शिवाराला रस्ता मिळवून देण्यासाठी ....

माझीशेती : शेतरस्ता (160906)

एखाद्या गटाला किंवा शिवाराला रस्ता मिळवून देण्यासाठी तुम्हाला तहसिलदाराकडे अर्ज करावा लागेल. शेतीला रस्ता मिळवून देणे हे तहसिलदाराचे आद्य कायदेशीर कर्तव्य आहे. नकाशामध्ये शेतरस्ता उपलब्ध नसेल तर एकमेकांना क्षेत्र सरकवून देणे किंवा रस्ता खरेदी करणे हे उत्तम पर्याय आहेत. 

शेतीचे संपूर्ण नकाशे आणि इतर स्वरूपाचे रेकॉर्ड भूमी-अभिलेख तालुका कार्यालयात मिळतील. शेतीचे नकाशे दोन प्रकारचे असतात.
१. गाव शिवाराचा नकाशा
२. गटाचा नकाशा

नकाशांत रस्ता असेल पण काही कारणास्तव बंद झाला असेल तर खुला करून शेतीच्या प्रत्येक गटाला रस्ता उपलब्ध करून देण्याचे काम महसुल विभागामार्फत होते. *प्रत्येक शेतकऱ्याला गटाच्या रस्त्यापर्यंत दुसर्‍याच्या शेतातून जाण्याचा कायदेशीर अधिकार आहे.*

तहसिलदारांचा निर्णय अंतिम असत नाही. जिल्हाधिकार्‍यापर्यंत त्याला आव्हान देता येते. तहसिलदारांच्या निर्णयाविरोधात न्यायालयातही जाता येते. गरज भासल्यास सर्वोच्च न्यायालयापर्यंत शेतकरी लढू शकतात. अश्या खटल्यांना दिवाणी न्यायालय असते. एकेका न्यायालयात ते अनेक वर्षे चालतात. कनिष्ठ न्यायालयातच २० ते २५ वर्षे खटले चालतात. *संस्थेमार्फत वकील पुरवठा करून शेतकऱ्यांना कायद्याचे मार्गदर्शन केले जाईल त्याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा.*कोणत्याही परिस्थितीत कायदा हाती घेऊ नये. परस्पर समन्वय साधुन स्वतःची आणि शेजाऱ्याची प्रगती साधावी. बांधावरची भांडणे पिढ्यानपिढ्या बरबाद करतात.

यामध्ये काही अडचण असेल तर तुमच्या गावासाठी संस्थेमार्फत नियुक्त केलेले *ग्रेझर* यांच्याशी संपर्क करा किंवा संस्था कार्यालयास संपर्क करा. 

*माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान*
********************** 
📞 9975740444 (नोंदणी - वैयक्तिक)
📞 9130010471 (नोंदणी - ग्रामपंचायत) 
📞 18001801551 (KCC - पिकसल्ला)
📞 18002330418 (KCC - हवामान)
🌐 www.mazisheti.org 
👥 www.fb.com/agriindia

Thursday, August 25, 2016

प्रतिबंधात्मक उपायांनी रोखा जनावरांतील सांसर्गिक गर्भपात

माझीशेती : 160825
*प्रतिबंधात्मक उपायांनी रोखा जनावरांतील सांसर्गिक गर्भपात*
- डॉ. प्रफुल्लकुमार पाटील

*सांसर्गिक गर्भपात (ब्रुसेलॉसिस)* हा आजार ब्रुसेला जीवाणुमूळे प्राण्यांपासून मानवाला व मानवापासून प्राण्यांना होणारा आजार आहे.

*प्रसाराचे मार्ग*
* जननेंद्रियांतून पडणारा स्राव, झार यांच्या संपर्कात आलेला चारा व पाणी याद्वारे.
* हवेतून श्‍वसनाद्वारे
* नैसर्गिक रेतनामधून
* डोळे व कातडीच्या जखमांतून

*लक्षणे*
* गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात (7व्या ते 8व्या महिन्यापासून)गर्भपात होणे
* झार किंवा वार न पडणे, जनावर वारंवार उलटणे.
* जननेंद्रियातून पू-सारखा स्राव येणे.
* वळूमध्ये अंडाशयाला सूज येणे, सांधे सुजणे.
* ताप कमी जास्त होणे, अशी लक्षणे आढळतात.
*उपचार*
जनावर खरेदी केल्यानंतर त्यांना एक महिना वेगळे ठेवून त्यांच्या रक्ताची तपासणी करावी.
विकत घेतलेल्या जनावराचे, वासरांचे लसीकरण, जंतनिर्मूलन करावे
पृष्ठभाग पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा.
वर्षातून १ ते २ वेळा रक्ताची तपासणी करावे
रेतन वळू आणि गाईंची वर्षातुन दोन वेळा रक्त तपासणी करावी.

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान :
चळवळ - नाविन्यपुर्ण शेतीची
-----------------------------------
*आमच्या शेतीविषयक सेवांसाठी www.mazisheti.org/p/loading.html या संकेतस्थळावर भेट द्या.
------------------------------------------
www.mazisheti.org 
www.agriindia.club
www.fb.com/agriindia 
Whatsapp -9975740444

Wednesday, August 17, 2016

कपाशी कृषि विषयक सल्ला (160817)

*कृषि विषयक सल्ला*

_★ *जूनी पाने काढणे*

कपाशीचे पीक ६० दिवसांचे असतांना झाडांना ११ ते १३ फांद्या आलेल्या असतात.
यावेळी शेंड्याकडील तीन फांद्या सोडून झाडांवरील इतर फांद्यांखालील जूने मोठे पान काढावे.
 जास्तीत जास्त ७ ते १० पाने एका झाडाची निघतात.
पाने शेतातच पडू द्यावीत.
या पद्धतीमुळे उत्पादनात निव्वळ २०% पर्यंत वाढ होते.
संपूर्ण झाड मोकळे होत असल्यामुळे जून्या पानांखाली लपून बसणा-या कीडींपासून व रोगांपासून संरक्षण तर होतेच त्याच बरोबर संपूर्ण खोड व फांद्या सूर्यप्रकाशात आल्यामुळे बोंडे लागण्याचे प्रमाण वाढते._

_★ *कपाशीमध्ये संजीवकांचा वापर: संजीवकांचा वापर हा लागवड अंतराशी निगडीत आहे*.

 लागवड अंतर ५ X १ फूट किंवा यापेक्षा जास्त असल्यास लिहोसीनची फवारणी लागवडीपासून ६० दिवसांनी १० लिटर पाण्यात २ मिली या प्रमाणात करावी.
यानंतर पीक ९० दिवसांचे असतांना जीए १० पीपीएम व १% युरीयाची फवारणी करावी.
लागवड अंतर कमी असल्यास व जोड ओळ पद्धतीमद्धे या फवारण्या १० दिवस अगोदर (म्हणजेच ५० दिवसांनी व ८० दिवसांनी) करणे गरजेचे आहे.
लागवडीपासून १०० दिवसांनी पोटॅशियम हायड्रोजन ऑर्थोफॉस्फेट ५० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे._

_★ *कपाशी मधे गुलाबी बोंड अळी: गेल्यावर्षी बीटी कपाशीचे ७० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान गुलाबी बोंडअळीमुळे झाले होते*

.शेतकरी बांधवांनो यावर्षी या अळीचा प्रादुर्भाव पूर्वहंमामी कपाशीमध्ये मोठ्या प्रमाणावर एक ऑगष्टपासूनच दिसू लागला आहे.
यापुढेही अळी मोठ्या प्रमाणावर कापूस पिकाचे नुकसान करू शकते. वेळीच या कीडींवर नियंत्रण न मिळवल्यास आलेले पीक हातेच जावू शकते.

_यासाठी दररोज दुपारी तीन नंतर कपाशी पिकांमध्ये निरिक्षणे घ्यावीत. निरिक्षण करतांना जर एखादे फुल पिवळे दिसले तर तात्काळ ते तोडावे. अशा फुलाचे तोंड एकदम घट्ट चिकटलेले दिसेल.
यालाच डोमकळी असेही म्हणतात. अशावेळी या फुलाच्या पाकळ्या वेगळ्या केल्यास अशा फुलांमध्ये एक ते दोन गुलाबी बोंडअळ्या आपणास पहावयास मिळतील._
_तोडलेली फुले तात्काळ नष्ट करावीत. फवारणी करतांना क्लोरोपायरीफॉस ५०% + सायपरमथ्रीन ५% एकत्र असलेले किंवा प्रोफेनोफॉस ४०% + सायपरमेथ्रिन ४% मिश्रण २ मिली अधिक युरिया १० ग्राम प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. एकरी तीन ते पाच डेल्टास्टिकी ट्रॅप लावावेत.
हे सापळे कृषी विक्रेते यांचेकडे उपलब्ध असतात.
 या कामगंध सापळ्यांमध्ये येणा-या कीडींवर सतत निरिक्षण ठेवावे._

*कृषि विभाग*
*वसमत*

Saturday, August 13, 2016

माझीशेती : हुमणी किडींचा प्रार्दुभाव व व्यवस्थापन

माझीशेती : हुमणी किडींचा प्रार्दुभाव व व्यवस्थापन (160813)
- मनोज लोखंडे, हिंगोली
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पांतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधासाठी www.mazisheti.org/p/project-service.html येथे क्लिक करा.


*हुमणीमुळे होणारे नुकसान-*
हुमणी पिकाची तंतुमुळे, सेंद्रिय पदार्थ खातात. नंतर मुख्य मुळे खाण्यास सुरू करतात. परिणामी झाड वाळते. एका झाडाचे मूळ कुरतडून खाल्ल्यानंतर हुमणी दुसऱ्या झाडाकडे वळते. शेतात एका ओळीत झाडे वाळल्याचे दिसून येते.

*रासायनिक नियंत्रणासाठी-*
-ठिबकद्वारा पाण्यामध्ये  क्‍लोरपायरीफॉस  (20 टक्के ईसी)  किवा नुवान 2 लिटर + 500  gm कापर आक्सीक्लोराइड  प्रति एकर सोडावे.

- cartrap hydrochloride 4%  (biostat-Dartriz 4g, caldan 4%)  or  fertera  dupont  3kg प्रतीएकर soil application द्वारे देणे

*जैविक नियंत्रण*
जैविक नियंत्रणात *मेटारेजीयम ॲनिसोफिली* या बुरशीमुळे आणि *हेटरोरेब्डीटीस सूत्र कृमी (निमेटोड)* द्वारे नियंत्रण होते.

सुत्रकृमीने बाधित एकरी दोन हजार अळ्या जमिनीत सोडल्यास ते सर्व हुमणी नष्ट करतात. हुमणी मेल्यानंतर तिच्या शरीरातून दीड पावणेदोन लाख सुत्रकृमी बाहेर पडतात. हुमणीचे वास्तव्य असेल तेथे जाऊन हुमणीच्या शरीरात या सुत्रकृमी घुसून तिला नष्ट करतात.

Wednesday, August 10, 2016

पिकांचे नुकसान टाळा कामगंध सापळ्याच्या सहाय्याने....

माझीशेती: कृषिवार्ता - कामगंध सापळ्याविषयी माहिती (१६०७२६)

कीड - हिरवी बोंड आळी
सापळा - फनेल ट्रॅप
पिक - कापूस, हरभरा, टोमॅटो, तूर, मका, ढबू, वाटाणा, द्राक्षे
संख्या - ५ ते ७ एकरी
घ्यावयाची काळजी - २१ दिवसांनी गोळी बदलणे.

कीड - पाने खाणारी आळी
सापळा - फनेल ट्रॅप
पिक - सोयाबीन,कापूस, गुलाब, भुईमूग, द्राक्षे, कोबी, फ्लॉवर,मिरची, तंबाखु, सुर्यफुल
संख्या - ५ ते ७ एकरी
काळजी - २१ दिवसांनी गोळी बदलणे

कीड - गुलाबी बोंड आळी
सापळा - डेल्टा स्टीकी ट्रॅप
पिक - कापूस
संख्या - ५ एकरी
काळजी - २१ दिवसांनी गोळी बदलणे

कीड - ठिपक्यांची बोंड आळी
सापळा - फनेल ट्रॅप
पिक - कापूस, भेंडी
संख्या - ५ ते ७ एकरी
काळजी - २१ दिवसांनी गोळी बदलणे

कीड - काटेरी बोंड आळी
सापळा - फनेल ट्रॅप
पिक - कापूस
संख्या - ५ ते ७ एकरी
काळजी - २१ दिवसांनी गोळी बदलणे

कीड - वेलवर्गीय फळमाशी
सापळा - फ्लायटी ट्रॅप
पिक - काकडी, दोडका, पडवळ, ढेमसे, कोहळा, कलिंगड, खरबुज, दुधी भोपळा
संख्या - ४ एकरी
काळजी - ६० दिवसांनी गोळी बदलणे

Friday, August 5, 2016

शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर कीटकनाशके

*माझीशेती कृषिवार्ता : शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर कीटकनाशके*(20160805)
- संतोष तनपुरे

खरीप पिके वाढीच्या अवस्थेत रोग व किडीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी *५० टक्के अनुदानावर कीटकनाशकांचे वाटप* करण्यात येणार आहे.
*कडधान्य* पिकांसह दुय्यम पिकांच्या पीक संरक्षणासाठी *राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून* हा कार्यक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे. तर विदर्भातील पाच जिल्हे, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांत भात पिकांच्या संरक्षणासाठी कीटकनाशके देण्यात येणार आहे.
*राष्ट्रीय गळीत धान्य अभियानातून* भुईमूग, सोयाबीन, करडई, जवस, तीळ या पिकांच्या संरक्षणासाठी रासायनिक व जैविक कीटकनाशकांसाठी 50% अनुदान देण्याची तरतूद केली आहे.
*क्रॉपसॅप* अंतर्गत कापूस, सोयाबीन, भात, तूर या पिकांना सर्व कीटकनाशके ५० टक्के अनुदानावर दिली जाणार आहे.

*लाभार्थी निवड*
अभियानांतर्गत निवडलेल्या पिकांच्या प्रकल्पाच्या *शेतकरी गट, शेतकरी कंपन्यातील शेतकऱ्यांना या कीटकनाशकांचा लाभ मिळणार* आहे. त्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

Wednesday, July 27, 2016

घरच्या घरी खते तपासणी भाग - २

माझीशेती : कृषिवार्ता
घरच्या घरी खते तपासणी भाग - २
(२०१६०७२६)
लेखक - श्री. सुहास पाटील, वाळवा

शेतकरी मित्रांनो आमचे प्रसारण आपणास आवडत आहे हे पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे. आपले वेळोवेळी मिळणारे प्रतिसाद आमच्या स्वयंसेवकांना स्फूर्ती देत आहे. मागील घरच्या घरी खते तपासणी लेखावरील वरील तुमच्या प्रतिक्रिया पाहून आम्ही आपणासाठी खते तपासणीचा पुढील भाग प्रसारित करत आहोत.

नत्र, स्फुरद, पालाश :- तपासनळीत १ ग्रॅम खत घेऊन त्यात ५ मिली डिस्टिल्ड वॉटर व १ मिली संद्र सोडियम हैड्रोक्सीड मिसळून गरम करा. नंतर लाल लिटमस पेपर तपासनळीच्या तोंडावर धरा. पेपर निळा झाला तर नायट्रोजन आहे. कलर न बदलल्यास नायट्रोजन नाही असे समजावे.

०१ ग्रॅम खतात डिस्टिल्ड वॉटर ५ मिली मिसळून गाळून घ्या. मिश्रणामध्ये ०.५ मिली फेरिक क्लोराईड मिसळा. पिवळसर झालेले मिश्रण ०१ मिली संद्र आम्लात मिश्रित झाले तर फॉस्फरस आहे असे समजावे.

०१ ग्रॅम खतात ०५ मिली डिस्टिल्ड वॉटर मिसळून गाळून घ्यावे. त्या मिश्रणात २ मिली फॉर्मल्डीहाईड मिसळा लाल कलर येईल. पुढे पिवळा कलर येईपर्यंत मिसळत रहा. नंतर त्यात ०१ मिली कोबाल्टीक नायट्रेट रिएजंट मिसळा. पिवळा रंग येणे म्हणजे पोटॅश आहे.

फेरस सल्फेट : ०१ ग्रॅम खतास ५ मिली पाण्यात मिक्स करा. मिश्रणामध्ये १ मिली पोटॅशिअम फेरोसायनाईड मिसळल्यानंतर मिश्रण निळे बनले म्हणजे ते फेरस सल्फेट आहे.

केंद्रीय खते व गुणवत्ता नियंत्रण व प्रशिक्षण संस्था हरयाणा यांनी यासाठी परीक्षण किट विकसित केले आहे.

Sunday, July 24, 2016

आता तुम्हीच पारख करा रासायनिक खतांची...

माझीशेती : आता तुम्हीच पारख करा रासायनिक खतांची.. (२०१६०७२४)
लेखक - सुहास पाटील, वाळवा

शेती उत्पन्न वाढीसाठी शेतकरी बांधव बरेच वेळेस कर्ज काढून खते आणतात पण बरेच वेळेला आपणास मिळालेली खते योग्य आहेत का ? ही तपासणी गरजेची असते.

खते तपासणी -
१. युरिया :
 तपास नळीत १ gm युरिया, ५ ते ६ थेंब सिल्व्हर नायट्रेट, ५ ml डिस्टिल्ड वॉटर मिसळुन ढवळल्यास द्रावण पांढरे झाल्यास भेसळ आहे.

२. युरिया :
१ gm युरिया तपास नळीत गरम केल्यास संपुर्ण युरिया विरघळला नाही तर भेसळ आहे.

३. DAP :
१ gm DAP खत, ५ ml डिस्टिल्ड वॉटर, ०१ ml आम्ल मिसळून हलवा. संपुर्ण DAP विरघळला नाही तर भेसळ आहे.

४. म्युरेट ऑफ पोटॅश :
०१ gm खत, १० ml पाणी तपासनळीत घेऊन हलवून पाहिल्यास बरेच कण तरंगत असतील तर भेसळ आहे.
याशिवाय
पेटत्या निखाऱ्यावर खत टाकल्यानंतर निखारा पिवळा झाल्यास भेसळ समजावी.

५. सिंगल सुपर फॉस्फेट :
१ gm खत, ५ ml डिस्टिल्ड वॉटर मिश्रण गाळून घ्या. नंतर त्यामध्ये १ थेंब (२%) डिस्टिल्ड अमोनिअम हैड्रोक्साइड आणि १ ml सिल्व्हर नायट्रेट मिसळले तर द्रावनास पिवळा रंग न आल्यास भेसळ समजावी.

६. फेरस सल्फेट :
१ gm खत आणि ५ ml पाणी मिसळा त्यात १ ml पोटॅशिअम फेरोसिनाईड मिसळल्यास मिश्रण निळे बनेल अन्यथा भेसळ समजावी.

*** "प्रोफेशनल ऍग्रीकल्चर" प्रशिक्षण करीता नोंदणी चालू आहे. ३० किंवा त्यापेक्षा जास्त शेतकरी असतील तर आपल्या भागात ग्रामपंचायत मार्फत प्रशिक्षणाची सोय केली जाईल. 

Sunday, April 24, 2016

जैविक खते - शैलजा तिवले

जैविक खते

जमिनीची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक जैविक गुणधर्मांची वाढ होण्यास जमिनीतीलच सूक्ष्म जीवजीवाणूंचा उपयोग करून तयार करण्यात आलेली जैविक खते मदत करतात. वनस्पतींच्या पेशींची वाढ आणि गुणन ही प्रमुख कार्ये नत्रामुळे होत असतात. हवेतील नत्र शोषून व साठवून नंतर पिकांना उपलब्ध करून देणा-या जीवाणूंची  प्रयोगशाळेत वाढ करून त्यापासून तयार केलेल्या खतांना जैविक/जिवाणू खते असे म्हणतात.
जैविक खतांचे वर्गीकरण-

नत्र स्थिर करणारे जीवाणू
रायझोबियम: हे जीवाणू पिकांच्या मूळावर गाठी स्वरूपात राहून हवेतील नत्र शोषून घेवून पिकांना पुरवितात. परंतु निरनिराळ्या पीकासाठी विशिष्ट प्रकारच्या रायझोबियम जिवाणूचे खत वापरावे लागते .काही महत्त्वाचे पीकांचे गट पुढे दिले आहेत.
पीके - जीवाणू खत
सोयाबीन – (रायझोबियम) जापोनिकम, (रायझोबियम) इटलाय, (रायझोबियम) फ्रिडाई
वाटाणा - (रायझोबियम) लग्युमिनोसायरम
हरभरा - (रायझोबियम)  सिसीराय चवळी, मुग, तूर, मटकी इ. - (रायझोबियम) जीवाणूचा प्रकार
बरसीम - (रायझोबियम)  ट्रायफेली फ्रेंच बीन / बीन -(रायझोबियम) फँझिओलाय
अँझोटोबॅक्टर: हे जीवाणू जमिनीमध्ये वनस्पतीच्या मुळाच्या भोवती राहून नायट्रोजन द्रव्याच्या साहाय्याने हवेतील नत्र अमोनिआच्या स्वरुपात पिकांना उपलब्ध करुन दिला जातो. हे जीवाणू नत्रस्थिरीकरण करण्याबरोबरच जिब्रेलीक अँसीड, व्हिटॅमीन आणि इंडॉल अँसीटीक अँसीड यांसारखी संप्रेरके जमिनीत सोडतात. त्याचा फायदा उगवण आणि पिकाची झपाटयाने वाढ होण्यासाठी होतो.
अँझोस्पिरीलम: हे जीवाणू जमिनीमध्ये वनस्पतींच्या मूळांवर त्याचप्रमाणे मूळांमध्ये असतात तसेच या जीवाणूमूळे मात्र गाठी तयार होत नाही. एकदल पिकांची पेरणी करताना या खतांचा वापर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे भाजीपाला, ऊस, फळझाडे या पिकांसाठी या खताचा वापर केला जातो.
बायजेंरीकीया: हे जीवाणू 6.5 सामूपेक्षा कमी असलेल्या जमिनीमध्ये नत्र स्थिर करण्याचे कार्य प्रभावीपणे करु शकतात त्यामुळे कोकणात याचा जास्त वापर केला जातो.

नत्र स्थिर करणार्‍या सूक्ष्म वनस्पती

अँझोला: ही पाण्यावर तंरगणारी वनस्पती असून भात खाचरामध्ये वाढताना पिकाला कोणताही त्रास न देता तणाचा नाश करते.
निळे-हिरवे शेवाळ: शेवाळे कार्बोदके तयार करत असताना पाण्यामध्ये प्राणवायू सोडतात आणि हाच प्राणवायू भाताच्या रोपांनी घेतला तर त्यांची वाढ होते.
स्फुरद विरघळणारे जीवाणू: निसर्गात काही जीवाणू असे आहेत की जे अविद्राव्य स्थितीत असणा-या स्फूरदांवर प्रक्रिया करतात . ह्या प्रक्रियेत सुक्ष्म जीवाणू उदा. बँसिलस, सुडोमोनेस, पेनीसीलीयम, इत्यादी विशिष्ट प्रकारच्या आम्लांची निर्मिती करतात, ज्यामुळे अविद्राव्य स्फुरदाचे विघटन होऊन स्फुरद पिकांना उपलब्ध होतो. हे जिवाणू खत वापरल्य़ाने पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
सेंद्रिय पदार्थ कुजणारे जीवाणू- बुरशी, अँक्टीनोमायसीटस
सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध करुन देणारे जीवाणू

- शैलजा तिवले.

Sunday, March 20, 2016

माझीशेती : राष्ट्रीय कृषी विकास बँक अर्थसहाय्यित डेअरी उद्योजकता विकास योजना

माझीशेती : राष्ट्रीय कृषी विकास बँक अर्थसहाय्यित डेअरी उद्योजकता विकास योजना (160320)

आजच्या पोस्टमध्ये आपण वाचाल
माझीशेती: शासकीय योजना - डेअरी संबंधित 09 योजना
माझीशेती: कार्यक्रम पत्रिका - सातारा आणि अहमदनगर मधील कार्यक्रम माहिती
माझीशेती : माझा प्रयोग - सुधाकर जाधव यांचे सुमारे 20 लाखांचे मिरची उत्पादन

🔷 माझीशेती: शासकीय योजना 🔷

1. लहान गोठा (संकरित गाई / म्हैशी -१०)
प्रकल्प खर्च - ₹ 05 लाख प्रति 10 जनावरे (कमीत कमी 02)
सहाय्य प्रकार - (Message published by - www.mazisheti.org)
जनरल - प्रकल्प रक्कमेच्या 25% किंवा जास्तीत जास्त ₹ 1.25 लाख
SC/ST - प्रकल्प रक्कमेच्या 33.33% किंवा जास्तीत जास्त ₹ 1.67 लाख

2. वासरे संगोपन (संकरित, देशी, दुभत्या जातीची -20)
प्रकल्प खर्च - ₹ 4.80 लाख प्रति 20 वासरे (कमीत कमी 05)
सहाय्य प्रकार - (like our page www.facebook.com/agriindia)
जनरल - प्रकल्प रक्कमेच्या 25% किंवा जास्तीत जास्त ₹ 1.20 लाख
SC/ST - प्रकल्प रक्कमेच्या 33.33% किंवा जास्तीत जास्त ₹ 1.60 लाख

3. गांडूळ खत
प्रकल्प खर्च - ₹ 20 हजार
सहाय्य प्रकार -
जनरल - प्रकल्प रक्कमेच्या 25% किंवा जास्तीत जास्त ₹ 5 हजार
SC/ST - प्रकल्प रक्कमेच्या 33.33% किंवा जास्तीत जास्त ₹ 6.7 हजार

4. दुग्ध व्यवसाय मशीनरी खरेदी (2000 लिटर क्षमता)
- दूध दोहन यंत्र, दूध तपासणी यंत्र, दूध शीतकरण यंत्र
प्रकल्प खर्च - ₹ 18 लाख
सहाय्य प्रकार -
जनरल - प्रकल्प रक्कमेच्या 25% किंवा जास्तीत जास्त ₹ 4.5 लाख
SC/ST - प्रकल्प रक्कमेच्या 33.33% किंवा जास्तीत जास्त ₹ 6 लाख

5. दुग्धपदार्थ बनविण्यासाठी प्रक्रिया साधने
प्रकल्प खर्च - ₹ 12 लाख
सहाय्य प्रकार-
जनरल - प्रकल्प रक्कमेच्या 25% किंवा जास्तीत जास्त ₹ 3 लाख
SC/ST - प्रकल्प रक्कमेच्या 33.33% किंवा जास्तीत जास्त ₹ 4 लाख

6. दुग्धपदार्थ वाहतूक व शीत साखळी
प्रकल्प खर्च - ₹ 24 लाख
सहाय्य प्रकार -
जनरल - प्रकल्प रक्कमेच्या 25% किंवा जास्तीत जास्त ₹ 6 लाख
SC/ST - प्रकल्प रक्कमेच्या 33.33% किंवा जास्तीत जास्त ₹ 8 लाख

7. दुग्धपदार्थ साठविण्यासाठी शीतगृह सुविधा
प्रकल्प खर्च - ₹ 30 लाख
सहाय्य प्रकार -
जनरल - प्रकल्प रक्कमेच्या 25% किंवा जास्तीत जास्त ₹ 7.50 लाख
SC/ST - प्रकल्प रक्कमेच्या 33.33% किंवा जास्तीत जास्त ₹ 10 लाख

8. खासगी पशुवैद्यकीय दवाखाना
प्रकल्प खर्च -
चल - ₹ 2.40 लाख
अचल - ₹ 1.80 लाख
सहाय्य प्रकार-
जनरल - प्रकल्प रक्कमेच्या 25% किंवा जास्तीत जास्त
चल - ₹ 60 हजार
अचल - ₹ 45 हजार
SC/ST - प्रकल्प रक्कमेच्या 33.33% किंवा जास्तीत जास्त
चल - ₹ 80 हजार
अचल - ₹ 60 हजार

9. दुग्धपदार्थ विक्री केंद्र / पार्लर
प्रकल्प खर्च - ₹ 56 हजार
सहाय्य प्रकार -
जनरल - प्रकल्प रक्कमेच्या 25% किंवा जास्तीत जास्त ₹ 14 हजार
SC/ST - प्रकल्प रक्कमेच्या 33.33% किंवा जास्तीत जास्त ₹ 18.6 हजार

निधी उपलब्धता पद्धत -
* व्यावसायिक हिस्सा - 10% (min.)
* अनुदान - वरीलप्रमाणे
* बँक कर्ज - शिल्लक किंवा कमीत कमी 40%

अधिक माहितीसाठी वाचा - https://www.nabard.org/pdf/Annexure_1.pdf

🔷 माझीशेती: कार्यक्रम पत्रिका  🔷

दिनांक: २४ ते २८ मार्च २०१६
विषयः कृषी, औद्योगिक व पशु पक्षी प्रदर्शन
स्थळ : जिल्हा परिषद मैदान, सातारा
आयोजक:
१. शेती उत्पन्न बाजार समिती, सातारा
२. जिल्हा परिषद, सातारा
३. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

दिनांक - 15, 16 आणि 17 एप्रिल 2016
विषय : किसान मित्र कृषी प्रदर्शन
स्थळ - न्हावरे फाटा, पुणे-नगर रोड, शिरूर, अहमदनगर
आयोजक –
1. अग्रोनॉमी सर्विसेस
2. क्युरिअस मिडिया प्रा. लि.

🔷 माझीशेती : माझा प्रयोग 🔷

नमस्ते, मी सुधाकर जाधव रा. सोनजांब ता. दिंडोरी जि. नाशिक येथील रहिवाशी आहे. मी 03 एकर वाण V.N.R-270 ही मिरची लागण केली. योग्य वेळी योग्य सल्ला व नियोजन यामुळे मी एकरी 170 क्विंटल मिरची उत्पन्न घेऊ शकलो. ठिबक सिंचन केल्यामुळे पाण्याची कमतरता जाणवली नाही. मला मुंबई मार्केटमध्ये विकुण सुमारे 20 लाखाचे उत्पन्न 04 महिन्याच्या कालावधीत मिळाले.

🔷 माझीशेती : नोटीस बोर्ड 🔷

📣 शेतकऱ्यांना उपयोगी अशी तुमची माहिती प्रसिध्द करायची असेल तर 9130010471 या क्रमांकावर संपर्क करा.
📣 माझीशेती कडून प्रसिद्ध झालेल्या माहितीचा प्रत्यक्षात वापर करताना तज्ञांचा सल्ला घ्यावा.

* माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान *
**********************
📞 9975740444 (नोंदणी)
📞 9130010471 (कृषि व्यवसाय संसाधन)
📞 18001801551 (KCC - पिकसल्ला)
📞 18002330418 (KCC - हवामान)
🌐 www.mazisheti.org
👥 www.fb.com/agriindia
**********************
(जास्तीत जास्त शेतकरी या चळवळीत सामावून घ्या. त्यांच्या मोबाईल वरुन खालील प्रमाणे whats app मेसेज करायला सांगा)
नाव -
गाव -
तालुका -
जिल्हा -
जमीन क्षेत्र (एकर) -
प्रमुख पिक व त्याचे क्षेत्र -

Friday, March 11, 2016

कोंबडी / कुक्कुट पालन

कोंबडी / कुक्कुट पालन

निवड
मांस उत्पादन - ब्रॉयलर
अंडी उत्पादन (खालीलप्रमाणे)
गावठी कोंबड्या (वार्षिक अंडी उत्पादन 60-80),
व्हाइट लेगहॉर्न (वार्षिक अंडी उत्पादन 240-260)
ऱ्होड आयलॅंड रेड (वार्षिक अंडी उत्पादन 240-260)

संगोपन
शेड
हवामानातील बदल ,ऊन, वारा ,पाऊस,थंडी तसेच इतर प्राण्यांपासून संरक्षणासाठी कॊंबडयांना घराची आवश्यकता आहे. कोंबडी घराची दिशा ही नेहमी पूर्व - पश्‍चिम ठेवा. प्रत्येक ब्रॉयलर पक्ष्याला एक चौ.फुट जागा लागते तर प्रत्येक अंडी देणा-या कोंबडीस अडीच ते तीन चौरस फूट जागा लागते. घराची लांबी पक्ष्यांच्या संख्येवर अवलंबून असते.मात्र रूंदी २५ फुटापेक्षा जास्त असू नये ही घरे जमीनीपासून २ फुट उंचीवर असावीत .सुरवातीस २ ते ३ फुट भिंती घ्याव्यात व त्यावर छतापर्यत बारीक जाळ्या बसवाव्यात .मधली उंची १२ ते १५ फूट असावी व छत दोन्ही बाजूस उतरते असावे. दोन्ही बाजूंस छपराचा पत्रा साधारणतः चार फूट बाहेर काढल्याने पडनारा पाऊस जमिनीवर पडून लिटर ओले होत नाही. घराची मधली उंची 12 ते 15 फूट व बाजूची उंची सात ते आठ फूट ठेवल्याने छपरास योग्य ढाळ मिळून पावसाचे पाणी झटकन ओघळून जाते.

खाद्य 
खाद्यात दोन प्रकारचे अन्न घटक असावेत .
१) उर्जा पुरविणारे
२) प्रथिने पुरविणारे
उर्जा पुरविण्यासाठी मका ,ज्वारी ,बाजरी ,बारली ,गहू ही धान्ये वापरतात तर प्रथिनांसाठी शेगदाणा,सोयाबीन ,तीळ पेंड वापरतात.

कोंबडयांचे खाद्य 
एकूण खर्चाच्या ६० – ७० % खर्च फक्त खाद्यावर होतो त्यासाठी ते फायदेशीर ठरण्यासाठी खाद्य संतुलित व चांगले असावे.

कोंबडी खाद्यनिर्मितीबाबत माहिती
1) पोल्ट्री व्यवसायामध्ये एकूण खर्चाच्या 70 टक्के खर्च हा फक्त खाद्यावर होतो. कोंबड्यांना दिल्या जाणाऱ्या एकूण खाद्यापैकी 35 ते 45 टक्के खाद्याचे रूपांतर हे अंडी व मांसामध्ये होते.
2) पक्ष्यांच्या वाढीसाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी प्रथिनांची गरज असते. कडधान्यांमध्ये सुमारे आठ ते 12 टक्के आणि द्विदल धान्यांमध्ये 30 ते 40 टक्के प्रथिने असतात. कोंबडीखाद्यामध्ये वनस्पतिजन्य प्रथिने आणि प्राणिजन्य प्रथिनांचा समावेश करावा.
3) ज्वारी, गहू, मका, तांदूळ इ. धान्यांत पिष्टमय पदार्थ भरपूर असतात. हे घटक आहारात असावेत.
4) पक्ष्यांच्या वाढीसाठी स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते. हे पदार्थ अन्न तुटवड्याच्या कालावधीमध्ये शरीरास उष्णता व कार्यशक्ती पुरवितात. स्निग्ध पदार्थांमुळे खाद्याला चांगली चव येते. सर्व प्रकारचे खाद्यतेल व चरबी यांपासून स्निग्ध पदार्थ मिळतात.
5) हाडांची बळकटी आणि अन्नपचनासाठी कोंबड्यांना खनिजांची आवश्यकता असते. कोंबड्यांच्या आहारात खनिजांचा वापर योग्य प्रमाणात केल्यास पायांतील अशक्तपणा दूर होतो. हाडांची योग्य पद्धतीने वाढ होते, त्यांना बळकटी मिळते. शरीरास कॅल्शिअम, लोह, मीठ, फॉस्फरस, आयोडीन, तांबे, सोडिअम, पोटॅशिअम, सेलेनिअम, मॅग्नेशिअम, मॅंगेनिज, झिंक इत्यादी खनिजांची आवश्यकता असते.
6) जीवनसत्त्वांमुळे कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते, उत्पादन वाढते. शरीर कार्यक्षम व तजेलदार राहण्यासाठी जीवनसत्त्वांचा उपयोग होतो.
पाणी व्यवस्थापण 
पाण्याची भांडी रोज स्वच्छ व ताज्या पाण्याने भरावीत .त्यावर झाकण असावे, पाण्याची भांडी उंच विटांवर ठेवावीत व विटांस चुना लावावा,त्यामुळे पाणी गादीवर सांडणार नाही व घर कोरडे राहण्यास मदत मिळेल .भाडी दरदोज स्वच्छ करून भरावीत पाच कोंबड्यांना अंडी देण्यासाठी १४-१२ – १२ इंच आकाराचा एक खुराडा जमिनीपेक्षा दीड ते दोन फुट उंच ठेवावा.

लसीकरण
वय - रोग - लसीचे नाव-टोचणीची पध्दत (table)
१ दिवस - मँरेक्स - मँरेक्स - पायाच्या स्नायुमध्ये
५- ७ दिवस - राणिखेत - लासोटा - नाकात एक थेंब टाका
४ आठवडे - श्वासनलिकेचा डोळयात दोन थेंब टाकणे.संसर्गजन्य रोग
५ आठवडे - राणिखेत - लासोटा पिण्याच्या पाण्यातुन 
६ आठवडे - देवी - देवी लस पंखाखाली कातडीतून टोचून
८ आठवडे राणिखेत राणिखेत आर बी पंखाखाली कातडीतून टोचून
१८ आठवडे - देवी - देवी लस पंखाखाली कातडीतून टोचून
२० आठवडे - राणिखेत - राणिखॆत आर बी पंखाखाली कातडीतून टोचून

रोग नियंत्रण 
१) काँक्सिडिआँसिस - ओलसर असल्यास केव्हाही होते-गादी कोरडी ठेवावी.
२) जंत - जंताचे औषध दर ३ महिन्यांनी पाण्यातून द्यावे.
३) उवा, गोचिड, कुकुडवा - सर्व वयात येतात - स्वच्छता ठेवा, कोबडयांना जंतुनाशक लावा.

ब्रॉयलर कोंबड्यांतील आजारावर करा वेळीच उपाययोजना
ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये थंडीमध्ये उष्णतेची कमतरता, अमोनिया वायू साठणे, विविध संसर्गजन्य आजार, मूत्रपिंडाचे आजार, परोपजीवी जंतूचा प्रादुर्भाव, खाद्य घटकातील असमतोलता, अशा विविध कारणांमुळे पहिल्या एक-दोन आठवड्यांमध्ये मरतुक आढळते. हे टाळण्यासाठी कुक्कुटपालनामध्ये नेहमी आढळणारे आजार, प्रतिबंधक उपाय आणि औषधोपचार याविषयी माहिती असणे आवश्‍यक आहे. 
डॉ. एम. व्ही. धुमाळ, डॉ. डी. एस. गाडे

प्रथिनयुक्त मांसाची गरज भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणात ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपन केले जाते. ब्रॉयलर कोंबड्या 6 ते 8 आठवड्यांत अतिशय जलद वाढतात. बदलते हवामान, आहारातील असमतोलपणा, व्यवस्थापनातील त्रुटीमुळे कोंबड्यांना विविध प्रकारचे संसर्गजन्य आजार होतात. त्यामुळे ब्रॉयलर कोंबड्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो व कोंबड्यांची उत्पादनक्षमता घटते. त्यासाठी ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये मरतुक कोणत्या कारणामुळे होते हे जाणून घेणे आवश्‍यक आहे.
1. पिलांमध्ये कमी-अधिक तापमानामुळे होणारी मरतुक- 
- ब्रॉयलर कोंबड्याच्या शरीराचे सामान्य तापमान 105 ते 107 अंश फॅरनहाइट असते. 
- पहिल्या आठवड्यामध्ये ब्रॉयलर कोंबड्यांना 95 अंश फॅरनहाइट तापमान देणे आवश्‍यक असते. यापेक्षा तापमान जास्त झाले तर पिलांच्या शरीरातील पाणी कमी होते. पर्यायाने विष्टेमधील कमी पाण्यामुळे विष्ठा पिलांच्या गुद्वाराजवळ साचते. गुद्वार बंद होऊन पिलांची मरतुक वाढते. 
- जास्त तापमानामध्ये पिलांना धाप भरते व पिलांचा श्‍वसनाचा वेग वाढतो. त्यामुळे पिलांचे खाद्य खाण्याचे प्रमाण घटते, वजनात वाढ होत नाही. 
- जास्त तापमानामध्ये कॅनिबालीझमची (स्वजाती भक्षण) समस्या निर्माण होते व पिलांचे मरतुकीचे प्रमाण वाढते. जेव्हा शेडमधील तापमान 60 ते 65 अंश फॅरनहाइटच्या खाली जाते तेव्हा पिले उष्णता असलेल्या ठिकाणी गर्दी करून एकमेकांवर बसतात, त्यामुळे चिलिंग (शीतकरण) होऊन वाढ खुंटते. 
- श्‍वसनाचे आजार होऊन पिलांमध्ये मरतुक होते.

उपाय - 
- वरील परिणाम टाळण्यासाठी पिले पक्षिगृहात येण्यापूर्वी 12 ते 14 तास ब्रुडर चालू करून शेडचे तापमान नियंत्रित ठेवावे. 
- पिलांना पहिले एक-दोन आठवडे 95 अंश फॅरनहाइट तापमान द्यावे, जेणेकरून पिलांना आल्हाददायक तापमान मिळेल. पिलांच्या सर्व शारीरिक क्रिया सामान्यपणे चालू राहतील. पिलांची सारखी वाढ होईल. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढून पिलांची मरतुक कमी होते.

2. शेडमध्ये जास्त प्रमाणात अमोनिया वायू जमा झाल्यामुळे होणारे विपरीत परिणाम ः 
- शेडमधील लिटर (पक्ष्यांची गादी) पाणी व पिलांच्या विष्टेमुळे दमट व ओलसर होते. त्यामुळे अमोनिया वायू तयार होतो. 
- अमोनिया वायू पिलांच्या डोळ्यातील आवरणावर परिणाम करतो. त्यामुळे पिलांचे खाद्य खाण्याचे प्रमाण घटते. पिलांची वाढ कमी होऊन श्‍वसन नलिकेमध्ये रक्तस्राव होतो. 
- अमोनिया वायूचे प्रमाण 25 पी.पी.एम.पेक्षा जास्त वाढल्यास असे परिणाम पिलांमध्ये दिसतात. 

प्रतिबंधात्मक उपाय - 
- पक्ष्यांचे लिटर दररोज दोन-तीन वेळा हलवावे. (खाली-वर करणे) 
- लिटरवर जास्त प्रमाणात पाणी सांडणार नाही याची काळजी घ्यावी. 
- ओलसर व पेंडीसारखे झालेले लिटर शेडमधून काढून नष्ट करावेत. 
- शेडमध्ये सतत खेळती व आल्हाददायक हवा ठेवावी. 
- लिटर ओले झाल्यास 1 किलो चुना पावडर प्रति 100 चौ. फुटास लिटरमध्ये मिसळावी.

3. आजारी नाभी (ओम्फालायटीस, नेव्हल इल) - 
- अंड्यामधून निघालेल्या नाभीचे मुख शक्‍य तो बंद होते, परंतु कधी कधी काही कारणांमुळे बंद होत नाही. त्यामधून जंतू प्रवेश करतात व नाभिला संसर्ग होतो, त्यामुळे पिलांच्या पोटाजवळील कातडी सुजते आणि पिलांचा पोट फुगून मृत्यू होतो. 
- अशा पिलांचे शवविच्छेदन केल्यानंतर पोटामध्ये शोषला न गेलेला अंड्याचा पिवळा भाग दिसतो आणि त्याचा घाण वास येतो. 
- हा आजार अंडी उबवणूक केंद्रामधील निर्जंतुकीकरणाच्या अभावामुळे होतो.

उपाय - 
- प्रतिजैवकांचा वापर पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार करावा. 
- अंडी देणाऱ्या कोंबड्यांची घरे स्वच्छ ठेवावीत. 
- अंडी उबवणूक यंत्रातील याचर व सेटर, बास्केट व इतर उपकरणांचे परिणामकारक निर्जंतुकीकरण करावे. 
- याचर बास्केट कोरडे असावे. 
- पिले आल्यानंतर त्यांना आठ तास गुळाचे पाणी व भरडलेली मका द्यावी. 
- उबवणुकीच्या वेळी अंडे ओलसर होऊ देऊ नये.

4. पांढरी हगवण (साल्मोनेल्लोसीस/पुल्लोरम डिसीज) - 
- हा आजार सूक्ष्म जीवाणूपासून होतो. या आजाराला पांढरी हगवणसुद्धा म्हणतात. कारण पिलांची विष्ठा पांढऱ्या रंगाची होते. 
- हा आजार प्रामुख्याने अंडी उबवणूक केंद्रात कोंबड्यांच्या बीजांडामध्ये दोष किंवा संसर्ग झाला असेल तर पुढे नुकत्याच तयार झालेल्या पिलांमध्ये उद्‌भवतो. 
- या आजारात पिल्लांचे पंख विस्कटलेले दिसतात. गुद्वाराजवळ पांढरी विष्ठा असते. 
- पिल्ले खाद्य खात नाहीत आणि श्‍वसनास त्रास झाल्यामुळे पिलांमध्ये मरतुक होते.

उपाय - 
- हा आजार मोठ्या कोंबड्यांना होतो, त्यामुळे आजारी, अंड्यांवरील कोंबड्या काढून टाकाव्यात. 
- पिलांना पाण्यामधून प्रतिजैवकाचा वापर पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार करावा.

5. रक्ती हगवण (कोक्‍सिडीओसिस) - 
- हा रोग परोपजीवी जंतूपासून होतो. 
- यामध्ये विटकरी किंवा लालसर रंगासारखी रक्ती विष्ठा (हगवण) असते. 
- पंख विस्कटलेले दिसतात. 
- पिलांमध्ये खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणामुळे पिलांचा मृत्यू होतो.

उपाय - 
- अशा रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास शेडचे प्रभावी निर्जंतुकीकरण करणे आवश्‍यक आहे. 
- निर्जंतुकीकरण केलेल्या शेडमध्येच पिलांचे संगोपन करावे. 
- कोंबड्यांची गादी (लिटर) नियमित खाली-वर करून त्यामध्ये चुन्याची पावडर मिसळावी. 
- पिलांना आल्हाददायक मोकळी हवा, पिण्यासाठी पुरेसे स्वच्छ पाणी द्यावे. 
- आजारी पिलांवर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत.

6. संधीरोग (गाऊट) - 
- या आजारामध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, पिले निस्तेज दिसतात. 
- पिसे विस्कटलेली दिसतात. गुद्वार ओले दिसून काही वेळेस हिरवट विष्ठा दिसते आणि त्यामुळे पिलांमध्ये मोठ्या प्रमाणात मरतुक होण्याची शक्‍यता वाढते. 
- खाद्यातील प्रथिनांच्या चयापचयानंतर युरिक आम्ल तयार होते. 
- युरिक आम्ल हे रक्तामधून मूत्रपिंडाद्वारे शरीराच्या बाहेर विष्टेद्वारे टाकले जाते. 
- जेव्हा रक्तामधील युरिक आम्लाचे प्रमाण वाढते व ते मूत्रपिंडाद्वारे बाहेर काढण्यासाठी मूत्रपिंडाचे काम वाढते त्यामुळे मूत्रपिंडावर ताण निर्माण होतो तेव्हा गाऊट आजार होतो. 
- खाद्यातील जास्त प्रथिने, खनिजाचे कमी-जास्त प्रमाण, जीवनसत्त्वे व रसायनांमुळे चयापचयातील होणाऱ्या बिघाडामुळे पिलांमध्ये हा मूत्रपिंडाचा आजार होतो. 
- जास्त प्रमाणात सोडियम बाय कॅर्बोनेटचा वापर केल्यामुळेसुद्धा अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या मूत्रपिंडामध्ये कडक खडे तयार होतात. 
- खाद्यामधील प्रथिनाचे प्रमाण जास्त असल्यास युरिक आम्ल तयार होते आणि गाऊट होतो. 
- पाण्याच्या कमतरतेमुळे रक्तामधील युरिक आम्ल व इतर खनिजाचे प्रमाण वाढते. ही स्थिती उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसते. 
- कठीण पाणी व मिठाच्या जास्त प्रमाणामुळेसुद्धा मूत्रपिंडावरील ताण वाढतो व गाऊट होतो. 
- लहान पिलामध्ये प्रतिजैवकांचा अनावश्‍यक वापर झाल्यास असमतोल चयापचयामुळे मूत्रपिंडावर ताण निर्माण होतो व गाऊट होण्याची शक्‍यता वाढते.

उपाय - 
- पिलांना पिण्याचे पाणी 24 तास उपलब्ध असावे. 
- पिलांना शिफारशीनुसार वयोमानाप्रमाणे खाद्य द्यावे. 
- आजार झाल्यास एक दिवस भरडलेली मका व गुळाचे पाणी पिण्यासाठी द्यावे. 
- शास्त्रोक्तपणे संतुलित आहार द्यावा. 
- तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावेत.

7. लसीकरण - 
ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये विविध रोगांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. उपचारापेक्षा प्रतिबंधक लसीकरण हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार खालील रोगाचे लसीकरण करावे.

संपर्क - डॉ. एम. व्ही. धुमाळ, 9422176705. 
(कुक्कुटपालन विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)