Saturday, February 24, 2018

शेळी पालन प्रशिक्षण

शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रम 

माझीशेती मार्फत शेलीपालनाचे संपुर्ण व्यवसाय शोध अहवालापासून मांस प्रक्रिया व निर्यातीबाबत सविस्तर ३ दिवस दररोज २ सत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. तज्ञ मार्गदर्शक, देशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची सफर असा प्रशिक्षणाचा भाग आहे. 

प्रशिक्षणाचे फायदे - 
  • संपुर्ण प्रशिक्षण कालावधी हा ३ दिवसांचा असतो. प्रत्येक विषयावर स्वतंत्र एक संपुर्ण सत्र घेतले जाते. 
  • प्रशिक्षानार्थींचे वैयक्तिक स्तरावर SWOT अनालिसिस तंत्राद्वारे सक्षमिकरण केले जाते. 
  • प्रकल्प अहवालपासुन प्रगती अहवालापर्यंत सर्व बाबींचे प्रशिक्षणार्थींना स्वतः पृथ्थकरण करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. 
  • व्यवसायासाठी आवश्यक परवानेपासुन आणि लेखापरीक्षणासाठी आवश्यक दस्तऐवज तयार करण्याचे मार्गदर्शन प्रशिक्षनामध्ये समाविष्ट आहे.
  • सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना व्यवसाय सुरु झाल्यानंतर व्यवसाय यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.
  • शासकीय योजना समायोजनसह आपत्कालीन परिस्थितीत टेलीमेडीसीन तंत्रज्ञानाचा वापर याचा आवर्जून समावेश केला जातो.
याशिवाय 
  • सहभागी लाभार्थ्यांचा शासकीय योजना आणि संस्था सामाजिक बांधिलकी अंतर्गत क्लस्टर विकास केला जातो. 
  • विशिष्ठ अटी आणि शर्तीस अधीन राहून पुढे अंतराष्ट्रीय दर्जाचे प्रक्रिया युनिट उभा करण्यास सहाय्य केले जाते. 
प्रशिक्षणाबाबत इतर माहिती - 
  • प्रशिक्षणासाठी खर्च - रु. ३६०० प्रति प्रशिक्षणार्थी 
  • बाहेर गावाच्या प्रशिक्षनार्थींनी निवास खर्च स्वतः करावयाचा आहे. 
  • प्रशिक्षण खर्चामध्ये एकवेळ चहा व दुपारचे जेवण समाविष्ट आहे. 
  • ज्या प्रशिक्षणार्थींना बँक कर्ज मंजुर आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल. 

भारतात शेळयांच्या प्रमुख 25 जाती आढळतात. शेळ्यांचा व्यावसायिक उपयोग करून दुध उत्पादन, लोकर / मोहर उत्पादन, मांस उत्पादन करता येते. दोन शेळ्या एका छोट्या कुटुंबाचा सक्षम उपजीविकेचा आधार बनू शकतात. शेळीच्या जाती निवड आणि जोपासना अधिक वाचा...

शेळी पालनामध्ये गोठा पद्धतीला महत्व आहे. कमीत कमी खर्चात व्यवस्थित संगोपन केल्यास जास्तीत जास्त नफा राहतो. शेळीच्या निवासावरून मुक्त, अर्धबंदिस्त आणि बंदिस्त असे शेळी पालनाचे प्रकार पडतात. गोठा पद्धतीबाबत अधिक वाचा...

साधारणपणे शेळ्यांना दररोज तीन ते चार किलो हिरवा चारा व एक किलो वाळलेला चारा लागतो. त्याचप्रमाणे शेळ्यांच्या खाद्यामध्ये झाडपाला आवश्यक आहे. त्याचबरोबर गाभण शेळी, दूध देणारी शेळी, पैदाशीच्या बोकडासाठी पूरक आहाराची आवश्यकता अधिक वाचा...

वाढते तापमान आणि कमी पर्जन्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष या बदलत्या हवामानाचा शेळ्या- मेंढ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. सर्वसाधारणपणे शेळ्या- मेंढ्यांचा पैदासकाळ हा पावसाळ्याच्या सुरवातीला येतो; मात्र पैदाशीसाठी सक्षम शरीर यंत्रणा तयार होण्यासाठी उन्हाळी हंगामातच त्यांची काळजी कशी घ्यायची अधिक वाचा... 

शेळी ही निसर्गतः काटक व रोगांना कमी बळी पडते; मात्र अनेक कारणांमुळे विविध रोगांचे संक्रमण होऊन शेळीपालन व्यवसायाचे व्यवस्थापन बिघडण्याची दाट शक्यनता असते. शेळी संगोपानामध्ये आरोग्य व्यवस्थापन अधिक वाचा...

माझीशेती मार्फत शेलीपालनाचे संपुर्ण व्यवसाय शोध अहवालापासून मांस प्रक्रिया व निर्यातीबाबत सविस्तर ३ दिवस दररोज २ सत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. तज्ञ मार्गदर्शक, देशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची सफर असा प्रशिक्षणाचा भाग आहे. प्रशिक्षणाबाबत अधिक वाचा... 




गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तुम्ही हातभार लावा. प्रकल्प अहवाल बनवुन घ्या. तुम्ही दिलेला निधी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरला जातो. आमच्या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्या. 

माझीशेतीच्या शेळी पालन ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

उपजिविका विकास अंतर्गत 'शेळी पालन' लाभ दिलेले लाभार्थी शेलीसह...
उपजिविका विकास अंतर्गत 'शेळी पालन' लाभ दिलेले लाभार्थी शेलीसह...

Friday, February 23, 2018

मिलनरिंग - सामुहिक विवाह सोहळा


शेतकरी / शेतमजुर यांनी मुलींच्या लग्नासाठी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करू नये म्हणून मुलीच्या विवाहासाठी रु. १०००० इतकी अनुदानित राशी दिली जाते. मंगळसुत्र व किमान आवश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी सहाय्यक अनुदान दिले जाते. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी माझीशेतीच्या सहयोगी संस्थांमार्फत सहभागी बांधवांच्या मुला- मुलींच्या लग्नात 'फुलाची पाकळी' समजुन अर्थसहाय्य केले जाते. 

जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत थाटामाटात लग्न केले जाते. लग्न समारंभात कोणतीही उणीव भासणार नाही याची काळजी माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानकडून घेतली जाते. 

सहभागी होणाऱ्या वधु-वरांसाठी नियम व अटी

  • वधु, वर व त्यांचे पालक माझीशेतीचे शेतकरी लाभार्थी घटक असावेत.
  • वधु-वर हे संस्थेच्या कार्यक्षेत्रात (महाराष्ट्रात) राहणारे असावेत. 
  • प्रथम वधु-वरास तसेच विधवा आणि घटस्फोटीत वधुच्या विवाहासाठी माझीशेतीकडून सहकार्य केले जाईल.
  • लाभार्थी कोणत्याही क्षणी नोंदणी करू शकतात परंतु एका सहयोगी संस्थेकडे किमान १० लाभार्थी जोडप्यांची नोंदणी झाल्यानंतर यथोचित निमंत्रणे आणि मुहूर्त पाहून सामुहिक लग्नसोहळा केला जातो.
  • सहभागी जोडप्यांनी निबंधक विवाह नोंदणी यांच्याकडे नोंदणी करणे आणि प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे. 
  • सहभागी जोडप्यांनी शेतकरी असलेबाबत (७/१२) व रहिवासी दाखला (तलाठी किंवा ग्रामसेवक) सादर करणे. 

Thursday, February 22, 2018

नारळ लागवड माहिती

नारळ लागवड 
सर्वच प्रकारच्या जमिनीत नारळ लागवड करता येते. जमिनीच्या प्रकारानुसार मशागत करावी. शेताच्या बांधावर देखील नारळाची लागवड करता येते. 1 × 1 × 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावे. खड्डे खोदण्याचे काम पावसाळ्यापूर्वी एक ते दीड महिना अगोदर पूर्ण करावे. रेताड, वरकस किंवा मुरमाड जमिनीत खड्डे भरताना खड्ड्याच्या तळात कमीत कमी एक ते दोन टोपल्या चांगल्या प्रतीची माती टाकावी. अधिक काळ पाणी धरून ठेवणाऱ्या भारी प्रतीच्या जमिनीत खड्ड्याच्या तळाला एक ते दोन टोपल्या रेती (वाळू) घालावी; तसेच खड्डा भरताना एक ते दोन टोपल्या रेती मातीत मिसळावी, त्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होतो. वालुकामय जमिनीत खड्ड्याच्या तळाशी नारळाच्या सोडणांचा थर दिल्यास उत्तम. त्याद्वारे जमिनीत ओल टिकून राहते. खड्डा भरताना खड्ड्यात चार ते पाच घमेली शेणखत, दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 50 ग्रॅम फॉलिडॉल पावडर खड्ड्याच्या मातीत मिसळावी. जमीन सपाट असल्यास खड्डे पूर्ण भरून घ्यावेत. 
पावसाचा जोर ओसरल्यानंतर ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये लागवड करावी. 


लागवडीचे अंतर -
उंच जाती - 7.5X7.5 मीटर
बुटक्या जाती - 6X6 मीटर
कुंपन करिता - 7 मीटर


एक वर्षे वयाच्या रोपांना पाच ते सहा पाने असावीत. रोपे निरोगी व जोमदार असावीत.  रोपांचा बुंधा आखूड व जाड असावा. रोपे कृषी विद्यापीठ, शासकीय आणि शासकीय मान्यताप्राप्त रोपवाटिकेतूनच खरेदी करावीत.

जातींची माहिती
उंच जाती 
बाणवली (वेस्ट कोस्ट टॉल) - 
या जातीचे आयुष्यमान 80 ते 100 वर्षे असून सहा ते सात वर्षांनी फुलोऱ्यात येते. उत्पादन - सरासरी 80 ते 100 फळे मिळतात.


लक्षद्वीप ऑर्डिनरी (चंद्रकल्पा) - 
या जातीची झाडे आणि फळे बाणवलीसारखीच असतात, परंतु फळाच्या तीनही कडा उठावदार असतात.
उत्पादन - सरासरी 150 फळे मिळतात. या जातीच्या नारळात सरासरी 140 ते 180 ग्रॅम खोबरे मिळते, तर तेलाचे प्रमाण 72 % असते.


प्रताप - 
प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र (भाट्ये) रत्नागिरी येथे ही जात बाणवली वाणातून निवड पद्धतीने विकसित करून महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आली आहे. नारळाचा आकार मध्यम, गोल असून ती सहा ते सात वर्षांत फुलोऱ्यात येते.
उत्पादन - या जातीच्या एका झाडापासून 150 नारळ मिळतात.


फिलिपिन्स ऑर्डिनरी - 
या जातीचे नारळ आकाराने फारच मोठे असतात. 
उत्पादन - सरासरी 105 नारळ आहे.सरासरी 213 ग्रॅम खोबरे मिळते.


बुटक्या जाती (सिंगापुरी)
ऑरेंज डार्फ, ग्रीन डार्फ आणि यलो डार्फ -
लागवड केल्यापासून तीन ते चार वर्षांनी फुलोऱ्यात येतात. बुतक्या जातीचे आयुष्यमान 30 ते 35 वर्षे असते. रंगावरून ऑरेंज डाफर्‌ , ग्रीन डार्फ आणि यलो डार्फ अशा पोटजाती आहेत. 
शहाळ्यासाठी ऑरेंज डार्फ ही जात सर्वांत उत्तम आहे. 100 ml. पाण्यात 7 gm एवढी साखर असते. 


संकरित जाती 
केरासंकरा (T × D) - 
या जातीची झाडे चार ते पाच वर्षांत फुलोऱ्यात येतात. 
उत्पादन - सरासरी 150 नारळ फळे मिळतात. खोबऱ्यात तेलाचे प्रमाण 68 % इतके असते.


चंद्रसंकरा (D X T) - या संकरित जातीची फळधारणा चार ते पाच वर्षांनी होते. 
उत्पादन - सरासरी उत्पादन 116 फळे आहे


रोपांची निवड, निगा महत्त्वाची -
रोपाची लागवड केल्यानंतर लगेचच त्याला आधार द्यावा. पश्‍चिमेकडील वाऱ्याने ते हलू नये म्हणून रोपाच्या उंचीच्या दोन काठ्या 45 सें.मी. अंतरावर रोपाच्या दक्षिणोत्तर बाजूवर रोवून त्याला एक आडवी काठी बांधावी. त्यावर रोप सैलसर बांधून ठेवावे.  पहिली दोन वर्षे उन्हाळ्यात सावली करणे आवश्‍यक आहे, त्यासाठी रोपांच्या चारही बाजूला उंच वाढणारी केळी; तसेच पपई यांची लागवड करावी. 
कोकणात काळी मिरी, जायफळ, दालचिनी या पिकांची लागवड आंतरपिके घेता येतात.

खते आणि पाणी व्यवस्थापन : नारळाच्या झाडांना चांगल्या वाढीसाठी नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची गरज असते. खते आणि पाणी नियमित दिले तर नारळाची वाढ होऊन झाड ५ ते ६ वर्षांतच फुलोर्‍यावर येते. पहिल्यावर्षी शेणखत १० किलो, नत्र २०० ग्रॅम , स्फुरद १०० ग्रॅम, पालाश २०० ग्रॅम आणि कल्पतरू सेंद्रिय खत ५०० ग्रॅम या प्रमाणात द्यावे. नंतर पुढे तेवढेच प्रमाण वाढवून दरवर्षी खते द्यावीत.

नत्र व पालाश ह्या खतांच्या मात्रा जून, सप्टेंबर आणि फेब्रुवारी महिन्यांमध्ये तीन वेळा विभागून द्याव्यात. तर शेणखत, कल्पतरू सेंद्रिय खत आणि स्फुरद संपूर्ण मात्रा जूनमध्ये द्यावी.

खते कशी द्यावीत : झाडाच्या बुंध्यापासून एक मीटर अंतरावर ३० सेंमी रुंदीचा व १५ सेंमी खोलीचा चर काढून त्यात खते द्यावीत आणि चर पुन्हा बुजवावा. जसजसे रोप मोठे होईल तसतसा चर बुंध्यापासून दूर काढावा.

मिठाचा वापर :
कोकणातील काही शेतकरी नारळाच्या झाडाला खत म्हणून काही प्रमाणात मिठाचा वापर करतात. परंतु खत म्हणून मिठाची उपयुक्तात सिद्ध झालेली नाही. यामुळे खत म्हणून मिठाच वापर करू नये. देशावरील भागात तर मिठाचा वापर अजीवात करू नये.

पाणी : नारळाच्या झाडांना नियमितपणे पाणी दिले तर त्यांचे उत्पादन बर्‍याच प्रमाणात वाढते. नारळाच्या झाडांना मुख्यत्वेकरून उन्हाळ्यात पाणी देण्याची जास्त आवश्यकताही असते. काही ठिकाणी पावसाळ्यानंतर नारळाच्या झाडांना पाणी दिले जात नाही. परिणामी झाडांची योग्य वाढ होत नाही आणि उत्पादन कमी मिळते.

नारळाची नवीन लागवड केल्यानंतर पहिली ३ ते ४ वर्षे झाडांना हिवाळ्यात व उन्हाळ्यात आठवड्यातून दोन वेळा पाणी द्यावे. पूर्ण वाढलेल्या नारळाच्या झाडांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे ५ ते १० दिवसांतून वेळा पाणी द्यावे. नारळाच्या झाडाच्या बुंध्याभोवती झाडाच्या आकारानुसार १ ते २ मीटर व्यासाचे गोल किंवा चौकोनी आले करून पाणी द्यावे. पाणी झाडाच्या खोडाजवळ फार काळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

किडी व रोग नियंत्रण - 
गेंड्या भुंगा -
हा भुंगा नवीन येणारा कोंब खातो, त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. झाडावर नवीन पाने त्रिकोणी आकारात कापलेली दिसतात. लिंडेन (५०%) किंवा कार्बारिल (५०%) पावडर २० ग्रॅम (पाण्यात मिसळणारी) दहा लिटर पाण्यात मिसळून झाडांवर फवारावीत. खताचे खड्डे बागेजवळ बनवु नये. झाडांतून कीडे काढून नष्ट करावेत.


सोंड्या भुंगा -
खोडाच्या आतील मऊ भाग पोखरला जातो, त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. काही दिवसांनी झाड मरते. झाडावर प्रत्येक बेचक्यात २५० ग्रॅम लिंडेन भुकटी टाकावी. झाडावर भुंग्यामुळे पडलेल्या सर्वांत वरच्या छिद्रात २० ग्रॅम कार्बारिल (५०%) टाकावे. तत्पूर्वी खालची सर्व छिद्रे वाळू आणि १० % लिंडेन १:१ प्रमाणात मिसळून  बंद करावीत. ४० ग्रॅम ५०% कार्बारिल भुकटी (पाण्यात मिसळणारी) १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावित.


पानावरील कोळी -
या किडीच्या प्रादुर्भावामुळे पानांवर पिवळसर ठिपके पडतात. लहान फळांची गळ होते. १० लिटर पाण्यात २५ ग्रॅम वेटेबल गंधक मिसळून फवारणी करावी.


उंदीर -
उंदीर नारळाची कोवळी वाढणारी फळे पोखरतात. बुंध्यावर जमिनीपासून २ मीटर उंचीवर अर्धा मीटर गुळगुळीत पत्र्याच्या गोलाकार पट्ट्या बसवाव्यात. १०० ग्रॅम गव्हाच्या पिठामध्ये ६ ग्रॅम झिंक फॉस्फाईड मिसळून त्याच्या गोळ्या तयार करुन खोडातील व बागेतील बिळातही टाकाव्यात.

रोग नियंत्रण -
कोंब कुजणे - 
या रोगाची लागण झालेल्या झाडाचा कोंब कुजतो व त्याला दुर्गंधी सुटते. कोवळी झाडे अधिक प्रमाणात बळी पडतात. या रोगाची लागण झालेल्या झाडाचा कुजलेला कोंब आणि कोंबाचा भाग खरडून त्यावर बोर्डो मिश्रणाची पेस्ट लावावी. १% बोर्डो मिश्रण किंवा डायथेन एम -४५ बुरशीनाशक औषध एक लिटर पाण्यात २ ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.


फळांची गळ - 
नारळाच्या झाडाला नारळा धरण्यास सुरुवात झाल्यावर पहिली १ - २ वर्षे फळांची नैसर्गिक गळ होते. खते आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे.

करपा - 
नारळाच्या झाडाच्या पानांवर पेस्टोलोशिया नावाच्या बुरशीमुळे तपकिरी लालसर रंगाचे ठिपके पडतात. ठिपके मोठे होऊन झाडाचे संपूर्ण पान करपते. वाळलेली पाने काढून नष्ट करावीत. १% बोर्डो मिश्रण किंवा १० लिटर पाण्यात ३ ग्रॅम डायथेन झेड -७८ हे बुरशीनाशक मिसळून फवारणी करावी.

खोड पाझरणे - 
जमिनीतून पाण्याचा चांगला निचरा करून घ्यावा. रोगामुळे कुजलेला भाग खरडून काढावा आणि त्यावर बोर्डो पेस्ट लावावी. खते आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे.

फळांची काढणी आणि उत्पादन :
नारळाच्या झाडाला फुलोरा आल्यापासून १२ महिन्यांनी त्याची फळे पक्क होतात. या वेळी फळाचा हिरवा रंग जाऊन पिवळसर तपकिरी रंग येतो. नारळाच्या तयार फळावर टिचकी मारल्यास खणखणीत आवाज येतो. नंतर पाडेली कडून नारळाचा घस कापून काढावा.
शहाळ्यासाठी पहले ६ महिन्यांनंतर आवश्कतेनुसार नारळ काढतात.


प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, ता. जि. रत्नागिरी
संपर्क - 02352 - 255077 

Wednesday, February 21, 2018

महिला सक्षमीकरण : बचत गटांचे योगदान

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या २५ वर्षे पुर्ण केलेबद्दल
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
कार्यशाळेची सुरुवात सावित्रीबाईफुले यांच्या प्रतिमा पुजनाने
 करताना मा. संरक्षण अधिकारी श्री. रावताळेसो व सहाय्यक
संरक्षण अधिकारी पंचायत समिती, तासगाव.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तासगाव जि.सांगली येथे व्यावसायिक शेतकरी महिला सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. मा. संरक्षण अधिकारी श्री. रावताळे साहेब यांचे हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणामध्ये श्रीमती प्राजक्ता पाटील यांनी सावित्रीबाईनी समाजाशी दिलेला लढा आणि आताच्या जमान्यात महिलांना उपजीविकेसाठी द्यावा लागणारा लढा याचे अलंकारिक भाषेत वर्णन केले.

मा. संरक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनापासून कार्यक्रमाला सुरुवात झाली. महिलांनी सक्षम होण्याकरिता प्रथम महिलांनी एकत्र येणे गरजेचे आहे हे सांगत रावताळे सरांनी एकीचे महत्व पटवून दिले. शासनाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन समजावून सांगताना त्यांनी महिलांचे अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली. 
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या २५ वर्षे पुर्ण केलेबद्दल
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान यांच्यासोबत संयुक्त विद्यमाने
आयोजित कार्यशाळेमध्ये मा. संरक्षण अधिकारी यांचे मार्गदर्शन 
संरक्षण अधिकारी म्हणुन काम करताना असणाऱ्या जबाबदारीचे विश्लेषण करून महिलांच्या पाठीशी भावासारखे खंबीरपणे उभा राहण्याचे आश्वासन दिले. ग्रामीण भागात महिलांनी चिकाटीने आणि जिद्दीने सुरु केलेल्या उद्योगांची यशोगाथा दिल्लीपर्यंत पोहचल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

संस्थेचे अध्यक्ष महेश बोरगे, उपजिविका तज्ञ यांनी ग्रामीण भागाच्या विकासामध्ये शेतकरी विकास प्राधान्याने करणे आणि त्यासाठी उद्योजक महिला बचत गट, इतर सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणा यांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे असे सांगितले. त्यांनी व्यावसायिक स्तरावर शेती व्यवस्थापन करण्यावर महिला शेतकऱ्यांनी भर द्यावा असे सांगितले. शेती व्यवस्थेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करताना हवामान अंदाज, बाजारभाव, पिकसल्ला, शासकीय योजना यांची माहिती घेणे कसे महत्वाचे आहे यावर माहिती दिली. 
महाराष्ट्र राज्य महिला आयोग २५ वर्षे पुर्ण झालेच्या निमित्ताने
कार्यशाळेमध्ये व्यावसायिक शेती व्यवस्थापन व माहिती तंत्रज्ञानाचा
ग्रामीण विकासामध्ये उपयोग याविषयावर मार्गदर्शन करताना
श्री. महेश बोरगे, उपजिविका तज्ञ व माझीशेती प्रमुख 

महिला बचत गटांच्या माध्यमातुन ग्रामीण भागात निर्माण होणारा रोजगार आणि आर्थिक सक्षमता यांचे उदाहरण देत उपस्थित महिलांना बोलते केले. माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या उपजिविका विकास कार्यक्रमाची माहिती देऊन त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी शेती आणि शेती पुरक व्यवसायांची शृंखला तयार करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आम्ही महिलांच्या औद्योगिक सद्गुणांना वाव देण्यासाठी गौरव करण्यासाठी सदैव तत्पर आहे, असे सांगितले.

शासनाने ई- गव्हर्नन्स मध्ये घेतलेला पुढाकार हा ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा चेहरा बदलून देईल हे सांगताना त्यांनी संगणकीय भाषेतील डोमेन आणि वेबसाईट याबाबत माहिती देत शासकीय, खाजगी, शैक्षणिक, व्यावसायिक वेबसाईट कश्या ओळखायच्या हे सांगितले. माहिती तंत्रज्ञान आणि सोशल मिडिया याचे फायदे –तोटे समजावून सांगताना त्यांनी ‘ब्ल्यु व्हेल’ या ऑनलाईन खेळाचे गंभीर परिणाम सांगितले. सोशल मिडिया आणि संकेतस्थळे यांचा व्यवसाय वृद्धीसाठी वापर करणेसाठी संस्थेची बहुआयामी डिजिटल व्यासपीठ उपयोग करण्याबाबत प्रोत्साहन दिले. या योजनेचा विद्यार्थी, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांना होणारा उपयोग आणि त्यातुन रोजगार निर्मिती याकडे लक्ष वेधले. सहभागी महिलांना शंका विचारून त्यांनी भाषणाची सांगता केली.

मा. वकील श्री. राजेंद्र माने, यांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा - १९५६, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधि. - २०१३, भारतीय दंडसंहिता कलमे - ३७६, ४७९, ४९३, ४९४, ४९५, ४९६, ४९८ (अ), ३५४, ३७६, ५०४, ५०६, ५०९ आणि सायबर क्राईम अधि. - २०१५, कौटुंबिक हिंसाचार - २००५, तिहेरी तलाक, हिंदु वारसा हक्क, प्रसूतीपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायदा - १९९४, बाल-लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (POCSO) - २०१२ या कायद्यांचे सविस्तर मार्गदर्शन केले. 
महाराष्ट्र राज्य महिला आयोग २५ वर्षे पुर्ण झालेच्या निमित्ताने
कार्यशाळेमध्ये ग्रामीण विकासामध्ये उपयोग याविषयावर
मार्गदर्शन करताना मा. वकील श्री. राजेंद्र माने

न्यायालयातील विकृत मानसिकतेचे अनुभव सांगताना त्यांनी उपस्थितांना भावनांच्या परमोच्च शिखरावर नेले. कार्यक्रमादरम्यान दुखःद अनुभव सांगताना उपस्थितांचे डोळे पाणावून गेले तसेच काही अनुभवातून सभागृहात हास्यफवारे उडाले. महिलांनी आणि पुरुषांनी सामाजिक ठिकाणी घ्यावयाची काळजी यावरील त्यांचे प्रबोधन मोलाचे ठरले.


कार्यकमाची सांगता बचत गटातील उद्योजक महिला यांनी स्वतः शंका आणि प्रश्नांच्या माध्यमातुन सर्व सहभागी शासकीय, कंत्राटी, निमशासकीय महिला कर्मचाऱ्यांच्या व बचत गटांच्या वतीने आभार प्रदर्शित केले. एकंदरीत संपुर्ण कार्यक्रम नियोजित कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे  पार पडला.


गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि देश पातळीवर स्वतःच्या कर्तुत्वाने दिशादर्शकाचे काम करणाऱ्या माय-माऊलींना प्रशस्तीपत्राने सन्मानित करताना मान्यवर...

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशस्वी महिला उद्योजक आणि सक्षम बचत गटांना सन्मानित करणेत आले.

कार्यक्रमातील क्षणचित्रे -