बागायती
वेळेवर पेरणीकरीता शिफारशीतवाण
|
बागायती
उशिरा पेरणीकरीता शिफारशीतवाण
|
1) AKAW 3722 (विमल)
2) AKW 1071 (पूर्णा)
3) MACS 6222
4) MACS 2846
5) NIAW 301 (त्र्यंबक)
6) HD 2189
7) NIAWnWWQ 917 (तपोवन)
|
1) AKW 381
2) AKAW 4627 (नविन वाण)
3) HD-2501
4) NIAW 34
5) HI 977
|
Thursday, January 28, 2016
गहू
Friday, January 22, 2016
बाजरी
बाजरी
लागवड
मॉन्सून पावसानंतर जमिनीत पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करावी. पेरणीसाठी शिफारस केलेल्या सुधारित व संकरित वाणांचाच वापर करावा.
संकरित वाण -
श्रद्धा (आर.एच.आर.बी.एच. 8609), सबुरी (आर.एच.आर.बी.एच. 8924) शांती (आर.एच.आर.बी.एच. - 9808) ओलिताची सोय असेल अशा ठिकाणी शक्यतो संकरित वाण पेरावेत.
पेरणी व बीजप्रक्रिया -
पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करून 45 x 15 सें.मी. अंतराने पेरणी करावी. बाजरीचे वाणानुसार हेक्टरी तीन ते चार किलो बियाणे वापरा. बाजरी अधिक तूर 2:1, 2:2 या प्रमाणात आंतरपीक घ्यावी. कोरडवाहू बाजरीसाठी सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी.अरगट रोग नियंत्रणासाठी 20 टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया करावी. गोसावी रोगाच्या नियंत्रणासाठी सहा ग्रॅम मेटॅलॅक्झील 35 एसडी (बीजप्रक्रियेसाठीचे) प्रति किलो बियाण्यास चोळावे. त्यानंतर प्रति 10 किलो बियाण्यावर 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धक व 250 ग्रॅम स्फुरद जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी.
खत व्यवस्थापन -
शिफारशीप्रमाणे वरखते वेळेवर द्यावीत. हलक्या जमिनीसाठी 40 किलो नत्र, 20किलो स्फुरद, 50 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. मध्यम जमिनीसाठी 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद, 25 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे.
आंतरमशागत -
पेरणीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी गरजेनुसार विरळणी करावी किंवा नांग्या भरून दोन रोपांतील अंतर 12-15 सें.मी. ठेवावे. जमिनीत चांगली ओल असल्यास विरळणी केलेली रोपे नांग्या भरण्यास वापरता येतात. तीस ते चाळीस दिवसांपर्यंत पीक तणविरहित राहण्यासाठी खुरपणी किंवा डवरणी करावी. एक महिन्यानंतर पिकास नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. कोरडवाहू पिकास युरिया देताना जमिनीत चांगली ओल असणे गरजेचे आहे.
हंगाम ----माध्यान्ह---- उपाययोजना -
चांगल्या उगवणीनंतर मधल्या काळात पावसाचा खंड पडला तर मृद्बाष्पाची गरज भागविण्यासाठी डवरणी करून जमिनीचा वरचा पापुद्रा मोकळा करावा. यालाच डस्ट मल्चिंग म्हणतात. पिकातील काढलेले तण दोन ओळींत पसरून ठेवावे. डवरणी करताना डवऱ्याला खाली दोरी बांधल्यास पिकाला मातीची भर बसेल व पडणाऱ्या पावसाचे पाणी तयार झालेल्या सरीमध्ये व्यवस्थित मुरले जाऊन त्याचा उपयोग पिकाच्या पुढील वाढीच्या काळात होतो.
पाणी व्यवस्थापन -
बाजरी पिकास फुटवे येण्याची वेळ, पीक पोटरी अवस्थेत असताना आणि कणसात दाणे भरताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे. या अवस्थेत जमिनीत पुरेशी ओल नसल्यास पिकास संरक्षित ओलित म्हणून पावसाचा अंदाज बघून हलकेसे पाणी द्यावे.
आंतरपीक -
अन्नद्रव्यासाठी व जागेसाठी स्पर्धा नसलेला कालावधी या तत्त्वानुसार बाजरी + तूर ही आंतरपीक पद्धती सर्व दृष्टीने फायदेशीर आहे. यासाठी बाजरी व तूर यांची आंतरपीक म्हणून पेरणी करताना याचे ओळीचे प्रमाण 2ः1 (बाजरी ः तूर) किंवा 4ः2 ठेवावे. या प्रमाणेच बाजरीत सोयाबीन, सूर्यफूल ही पिकेसुद्धा 4ः2 या प्रमाणात आंतरपीक म्हणून घेता येतात.
हलक्या जमिनीत आणि कमी पाऊस असणाऱ्या प्रदेशात बाजरी + मटकी 2ः1 या प्रमाणात आंतरपीक अवलंब करावा.
तणनाशकाचा वापर -
गरजेनुसार बाजरी पिकात तणनाशकांचा वापर करता येतो. यासाठी ऍट्राझीन किंवा सिमाझीन हे उगवणपूर्व (पेरणीनंतर परंतु बी उगवण्यापूर्वी) तणनाशक हेक्टरी 1.5 ते 2 किलो 600 ते 700 लिटर पाण्यासोबत फवारावे. फवारणी नंतर 15 ते 20 दिवस पिकात खुरपणी किंवा डवरणी करू नये. तसेच पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी 2,4-डी (फक्त सोडिअम साल्ट) हे उगवणपश्चात तणनाशक हेक्टरी 1250 ग्रॅम या प्रमाणात 600 लिटर पाण्यासोबत तणावर फवारावे. तणनाशक फवारणीपूर्वी तज्ज्ञाचा सल्ला अवश्य घ्यावा.
बीट लागवड
मेथी
मेथी लागवड.
वर्षभर चवीने खाल्ली जाणारी भाजी म्हणजे मेथी. याची मागणीपण वर्षभर असते आणि समशीतोष्ण हवामानात लागवडही वर्षभर करता येते.
* यासाठी जमीन मध्यम ते काळी, पाण्याचा निचरा होणारी असावी.
* हि भाजी ४०ते ६० दिवसांनी काढता येते त्यामुळे टप्प्या टप्प्याने वाफे लावल्यास वर्षभर उत्पन्न घेता येते.
* लागवड करण्यापूर्वी दोन वखर पाळ्या देवुन जमीन भुसभूषित करावी.
* त्यानंतर ३ बाय २ मीटरचे सपाट वाफे करुण भाजीसाठी फेकून लागवड करता येते.
* वाण: मेथी-१, राजस्थान मेथी-१. मेथी नं.४७, प्रभा,पुसा अर्ली बंचिंग, कसुरी इत्यादि सुधारित वाण निवडावेत.
* पाणी व्यवस्थापन करताना जमिनीच्या मगदुरा नुसार मध्यम जमिनीस दर ७-८ दिवसांनी एक पाणी पाळी द्यावी.
* यात मर हाच प्रमुख रोग आहे. बियाणे संस्कार करुण तो टाळता येतो. इतर विशेष रोग येत नाही.
* किडी मधे नागअळी हा मोठा धोका आहे. यासाठी लागवडी नंतर ७ दिवसांनी १००० पी पी एम निंबोळी अर्काची ३ मिली प्रति लीटर प्रमाणे एक फवारनी घ्या.ु
* ४० ते ६० दिवसांनी उपटून जुड्या बांधाव्या व भाजीची माती तिथेच शेतात झटकुन घ्यावी. हिरवी भाजी उत्पादन एकरी ३ टन मिळू शकते.
मेथी बीजोत्पादन करण्यासाठी:
* मेथी बिया उत्पादनासाठी थंडी आवश्यक म्हणून लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर मधे करावी.
* दोन रोपात १० सेमी.अंतर काही राज्यात रोप तयार करून सरी वरंबालागवड करतात
* बिया काढणीसाठी १५० दिवसांनी काढनी करुण खळ्यावर वाळवाव्या नंतर मळणी करावी याचे उत्पादन एकरी ५ ते ७ क्विंटल मिळते.
कलिंगड
भोपळा
काकडी
जमीन
जमिनीची नांगरट करून एकरी 15 टन शेणखत किंवा एरंड पेंड 500 किलो देवून जमीन तयार करावी.
1.5 ते 2 मी. अंतराच्या ओळी तयार करा.
लागणीची पद्धत
काकडीच्या लागवडीस सरी वरंबा चांगली मानली जाते .काकडीच्या जाती नुसार 90 सेंमी वर लागवड करून दोन वेलीतील अंतर 45सेंमी ठेवावे. खुरप्या सहायाने 3ते 4 बीयाची लागवड करावी .
बियाणे
हिमांगी, फुले शुभांगी, पूना खिरा, पुसा संयोग, शीतल या जाती जास्त वापरल्या जातात.
बीज प्रक्रिया -
लागनीपूर्वी बियाणे 30 मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवा. सुरवातीच्या काळात मातीतून येणारे रोग व बियाणांच्या अन्य समस्यांच्या नियंत्रणासाठी कार्बेनडाझिम 50WP @ 3gm प्रती किलो बियाणे याप्रमाणे लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया करा.
ट्राइकोडर्मा विरडी 250 ग्रॅम 10 किलो शेणखतासोबत पिकाच्या सुरवातीच्या काळात ओळींमध्ये टाकल्याने मातीतून येणा-या रोगांचे व तसेच बुरशीजन्य रोगांमुळे येणा-या मर रोगापासून पिकाचे रक्षण होवू शकते.
पाणी व ख़त व्यवस्थापन
काकडी पिका करीता पेरणी पूर्वी 25 टन शेनखत द्यावे .लागवड करताना प्रति हे 50 किलो प्रमाणे नत्र , स्फूरद ,पालाश द्यावे .आणी परत 30 दिवसानी 50 किलो नत्राची मात्रा द्यावी .
किड नियंत्रण
1) लाल भुंगेरे - नियंत्रना करीता 10 लिटर पाण्यात 40 ग्राम कर्बारील किंवा डायमेथोयेट 10 मिली ची फवारनी करावी .
2) फळ माशी - मॅलेथियॉन 10- मिली 10 लिटर पाण्यात 1ते 2 वेळा फवारावेत .
काकडी
रोग नियंत्रण
1)भुरी - फळावर पांढरे डाग पडतात ,वाढ खुंटते
नियंत्रण - बाव्हिस्टीन किंवा कॅरेथेन 10 ग्राम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे .
2) केवडा -नियंत्रण करीता 10 लिटर पाण्यात 25 ग्रॅम डायथेन - एम -45 हे बुरशी नाशक फवारावे .
महत्वाची घ्यावयाची काळजी
काकडी वर येणारे रोग व किडिचे नियंत्रण वेळीच करने आवश्यक आहे जेणेकरून फळाच्या गुणवत्तेवर व उत्पादनावर फरक पडणार नाही
उन्हाळी काकडी लागवड तंत्र
उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानतील तीव्र झळांच्या काळात काकड़ी जवळपास सर्वांना आवडते. उन्हाळी काकड़ी लागवड तंत्रज्ञान देत आहे.
* या पिकासाठी जमीन सर्व प्रकारची चालते पण तिचा पी एच ५.५ ते ६.५ दरम्यान असल्यास अधिक योग्य.
* यासाठी हवामान कोरडे अधिक मानवते. तापमान १८ ते २८ सेल्सियस उत्तम.
* पेरणी पूर्वी खोल नांगरणी करावी त्यानंतर दोन उभ्या-आडव्या वखर पाळ्या द्याव्यात. शेवटच्या पाळी पूर्वी एकरी २ ते ३ टन चांगले कुंजलेले शेणखत व्यवस्थित मिक्स करावे सोबतच फळमाशी नियंत्रणसाठी निंबोळी खत वापरावे.
* लागवड कालावधी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी योग्य.
* बाजारात अनेक नवीन वाण उपलब्ध आहेत. वाण निवड करताना अधिक उत्पन्न,रोग प्रतिकारक क्षमता, इत्यादि बाबी तपासून घ्या.प्रामुख्याने बलम खिरा, पुसा संजोग, संकरित हिमांगी, फुले शुभांगी, प्राची, शीतल, चंपा हे वाण शिफरशीत आहेत.
* बियाणे एकरी एक किलो वापरावे.
* लागवड पद्धत - दोन ओळीतील अंतर १.५ ते २.५ मीटर, दोन रोपात ९० सेमी ठेवावे.
* प्लास्टिक मल्चिंग पेपर टाकूनही ठिबक वर लागवड केल्यास पाण्याची बचत होते व उत्पन्नही अधिक मिळते.
* ठिबकने विद्राव्य खते द्यावी.
* जमिनीच्या मगदुरा नुसार ६५ टक्के आर्द्रता टिकवून ठेवावी. तापमानानुसार किंवा दर आठवड्याला एक पानी द्यावे.
* डाऊणी आल्यास मेंकोझेब फवारावे किंवा कॉपर किंवा सल्फरची धुरळणी चालते.
* फळमाशीचा प्रादुर्भाव दिसन्याची शक्यता असल्यास निंबोळी अर्काची फवारणी करावी.
* साधारणपणे ४५ दिवसांनी तोडणी सुरु होते यात ८ ते १० तोडण्या मधे गावरान एकरी ३० क्विंटल तर संकरित एकरी १०० क्विंटल उत्पादन मिळू शकते.
* बियाणे वांझ निघण्याचे प्रमाण हल्ली वाढले आहे, योग्य ती खबरदारी घ्यावी.
* खरेदी केलेल्या बियान्याची पावती, लेबल, थोड़े सैंपल बीयाने सांभाळून ठेवा.
* दुष्काळजन्य परिस्थितीत लागवड जर योग्य राहिली तर नक्की फायदा होवू शकेल.
टरबूज उत्पादन
७० ते ८० दिवसात लखपती होण्यासाठी
टरबूज उत्पादन उत्तम
पर्याय आहे. सविस्तर
"Seed to Seed
Program"
पुस्तक मागणीनुसार घरपोच पाठवले जाते.
|
- फुलगळ रोखण्यासाठी,उत्पादनात 10% वाढ
होण्यासाठी व चांगला आर्थिक परतावा मिळण्यासाठी पिक फुलोरा अवस्थेत असताना
हुमिक एसिड @3ml + MAP (12: 61: 00) @5gm/Ltr पाण्यातून
फवारा.
- फुले,फळे येण्याच्या व पक्व होण्याच्या
काळात,सॅलिसीलिक ऍसिड(ऍस्पिरिन टॅबलेट 350mg,4-5गोळ्या)/15Ltr पाण्यातून 30दिवसाने 1/2वेळा फवारा.
- चांगली फुलधारणा व
उत्पादन मिळण्यासाठी 00: 52: 34 @150 gm / 15 Ltr पाण्यातून
फुलोरा अवस्थेत व फळे तयार होताना फवारा .
- चांगले उत्पादन व
गुणवत्ता मिळण्यासाठी 13: 0: 45 @ 100g/10
Ltr+हाइ बोरान (बायफॉलॉन) 1 ml/Ltr पाण्यातून
फळ धारणा अवस्थेत फवारा.
- पाणी व्यवस्थापन रबी
हंगामात 10-20 दिवसाच्या अंतराने पाणी
द्या.उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई भासू देवू नका.
- चांगले उत्पादन व
वाढीसाठी पिकाला ठिबक मधून 1-2 Ltr/प्रती झाड/प्रती दिवस आणि 3-6 Ltr/प्रती
झाड/प्रती दिवस पाणी परंपरागत पद्धतीद्वारे पाणी द्या.
- ठिबक सिंचनाचा वापर
केल्यास उत्पादनात 18% वाढ होते व पारंपारिक पद्धती पेक्षा
40% पाण्याची बचत होते.
- फळ माशी
- पांढरी माशी
- अंकुर आणि मुळे
खाणारी अळी
- पान पायांचा ढेकूण
- नाग अळी
- गाठी करणारे कीटक
- डाऊनी
- भूरी
- पाना फळांवरील ठिपके