Wednesday, January 13, 2016

केळी

जमीन 
केळी साठी मध्यम ते भारी, भरपुर सेंद्रिय पदार्थ असनारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन योग्य असते. जमीनीचा आकार ६.५ ते ८.० च्या दरम्यान असावा.क्षारयुक्त चोपन जमिनीत केळीची लागवड करु नये.

लागवड हंगामा 
मृग बाग (जुन/जुलै लागवड),
कांदे बाग (आक्टोबर/नोव्हेंबर लागवड)

लागवड 
मृगबाग 
- नवीन मृगबागेची आडवी-उभी मशागत करावी. यासाठी लाकडी कुळव किंवा छोट्या ट्रॅक्‍टरचा वापर करावा. 
- रोपाभोवती खुरपीने निंदणी करून मोकळ्या झालेल्या मातीने खोडांना आधार द्यावा. पावसाचा खंड पडल्यास रोपांना पाणी द्यावे. 
- लागवडीनंतर 75 दिवसांनी प्रतिझाड 82 ग्रॅम युरिया द्यावा. तसेच नत्र व पालाशची मात्रा दर आठवड्याला फर्टिगेशनद्वारे द्यावयाची असेल तर हजार झाडामागे 6.5 किलो युरिया व 3.00 किलो म्युरेट ऑफ पोटॅश लागवडीनंतर 16 आठवड्यापर्यंत देणे चालू ठेवावे.

डिसेंबरमध्ये मृगबाग केळीचे व्यवस्थापन
मृगबागेच्या लागवडीच्या केळी सध्या मुख्य वाढीच्या अवस्थेत आहेत. यांची काळजी अशी घ्या.
* मृगबागेत स्वच्छता ठेवावी, शेत तणमुक्त ठेवावे. 
* मुख्य खोडालगत येणारी पिले धारदार विळ्याने नियमित कापावीत. 
* बागेमध्ये बनाना स्ट्रीक व्हायरस या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास रोगग्रस्त झाडे मुळासकट उपटून नष्ट करावीत, तसेच करपाग्रस्त व पिवळी पडलेली पाने कापून नष्ट करावीत. 
* मृगबाग लागवडीच्या केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रॉपिकोनॅझोल १० मि.लि. प्रति १९ लिटर पाण्यात मिसळून फवारावे. दुसरी फवारणी १० ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून करावी. 
* मृगबाग लागवडीच्या वेळी खतमात्रा दिलेली असेलच. आता रासायनिक खताचा हप्ता साधारणपणे केळी लागवडीनंतर १६५ दिवसांनी द्यावयाचा असतो. त्यामध्ये ८२ ग्रॅम युरिया व ८३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रतिझाड या प्रमाणे बांगडी पद्धतीने देऊन लगेच मातीने झाकून द्यावे. 
* ठिबकाद्वारा खत घ्यावयाचे असल्यास केळी पिकास ७१ ते १४६ दिवसांच्या दरम्यान प्रति एकरी १९:१९:१९ हे खत ७५ किलो आणि युरिया १५० किलो ही विद्राव्य खते टप्प्याटप्प्याने द्यावीत. तसेच कॅलशियम नायट्रेट १० किलो प्रति एकरी घ्यावे. हा हप्ता पाच किलो याप्रमाणे दोन वेळा विभागून द्यावा. 
* केळी पीक पाण्यासाठी फार संवेदनशील आहे. हिवाळ्यात तसेच उन्हाळ्यात पिकाच्या गरजेप्रमाणे पाण्याचे योग्य नियोजन करावे. हिवाळ्यात केळी पिकास ६ ते ७लिटर पाणी प्रतिझाड प्रतिदिवस याप्रमाणे द्यावे. 
* या महिन्यात गारपीट होण्याची दाट शक्यता असते, त्या पासून बाग संरक्षण करा
* काल दिलेल्या संदेशाचे अवलोकन करा.
* पाण्याचा वापर योग्य करा.

कांदेबाग - 
- कांदेबाग केळीस लागवडीनंतर 30 दिवसांनी प्रतिझाड 36 ग्रॅम युरिया अधिक 83 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. 
- नत्र व पालाशाची मात्रा दर आठवड्याला फर्टिगेशनद्वारे द्यावयाची असेल तर हजार झाडामागे 5.5 किलो युरिया व 7 किलो म्युरेट ऑफ पोटॅश लागवडीनंतर 12 आठवड्यांपर्यंत देणे चालू ठेवावे. 
- झाडांना पॉलीप्रोपीलीन पट्ट्याच्या साहाय्याने आधार द्यावा.

केळीबागेतील उपाययोजना -
- बागेत स्वच्छता राखावी. बागेतील तणाचे प्रमाण तुलनात्मकरीत्या कमी असले तरी बागा निंदणी, कुळवणी करून स्वच्छ ठेवाव्यात. 
- मुख्य खोडालगत येणारी पिल्ले धारदार विळीने जमिनीलगत दर 2-3 आठवड्यांनी कापावीत. 
- मृगबागेत टिचणी करून जमिनीवरील तडे बुजवावेत. झाडांना माती लावून आधार द्यावा. 
- नियमितपणे ठिबक संचाची पाहणी करावी. गरज भासल्यास दुरुस्ती करावी. 
- सर्व बागेची पाहणी करून विषाणूग्रस्त झाडे समूळ उपटून नष्ट करावीत. 
- नवीन बागेत "इर्विनिया रॉट' या जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रादुर्भाव आढळल्यास, क्‍लोरपायरीफॉस 600 मि.ली. अधिक कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड 600 ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन* 30 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून घ्यावे. या द्रावणाची प्रति झाड 250-400 मिली या प्रमाणात आळवणी करावी. 
- पिकाच्या अवस्थेनुसार शिफारशीप्रमाणे पाणीपुरवठा करावा. शक्‍यतो रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे. 
- बागेतील करपा रोगग्रस्त पाने बागेबाहेर नष्ट करावीत. 
- करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम किंवा प्रोपिकोनॅझॉल 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिनरल ऑइल उपलब्ध असल्यास 100 मि.ली. मिनरल ऑइल अधिक प्रोपिकोनॅझॉल 5 मि.ली. किंवा 5 ग्रॅम कार्बेन्डाझीम प्रति 10 लिटर प्रमाणे फवारणी करावी. 
- फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी निसवणीच्या अवस्थेत असलेल्या बागांमध्ये शेवटचे पान बाहेर निघतेवेळी किंवा केळफुल बाहेर पडतेवेळी फिप्रोनील (5 एससी) 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन पानांच्या बेचक्‍यातील केळफुलावर फवारणी करावी.

जाती : 
१) बसराई : बसराई ही जात पनामा विल्ट (Panama Wilt) मुळे होणार्‍या बंची टॉंप रोगास (Buchy top Diasease) प्रतिकारक असून बुटकी आहे. मोठ्या आकाराचे घड असतात. कल्पतरू सेंद्रिय खतास चांगला प्रतिसाद देत असून उत्पादनात वाढ होते. हिवाळ्यामध्ये पक्क केळी पिवळ्या रंगाच्या होतात तर उन्हाळ्यामध्ये हिरव्या रंगाचीच राहतात. या जातीच्या केळी लवकर खराब होतात. या जातीच्या फळांना बाक असतो. वेलची सारखी एकदम सलळ येत नाही.

२) श्रीमंती : 
लांब आकाराची केळी असून महाराष्ट्रामध्ये खानदेश भागातील या केळींचा मोठ्या प्रमाणात मागणी असते. इतर भागातील केळीपेक्षा या भागातील केळी सरस ठरतात. बहुधा तो माती आणि हवामानाचा गुणधर्म असावा. केळी उच्च दर्जाची,फळ देखणे व व्यवस्थित असते. चवीत फारसा फरक नसतो. मराठवाडा भागामध्ये या जातीच्या केळी चिवट वाटतात. गोडीला कमी असतात. एका झाडाच्या घडास साधारणपणे १० फण्या असतात. एका फणीमध्ये १८ केळी असतात. हिरवी साल गोल असते. फण्यामधील अंतर जास्त असून खालच्या फण्या चांगल्या पोसलेल्या असतात.

३) वेलची :
या जातीची केळी एकदम सरळ येतात. आकार लहान असून साल पातळ असते. केळी वजनाला कमी असतात. परंतु भाव चांगला मिळतो. कर्नाटक भागातील या जातीच्या केळींना एप्रिल, मे महिन्यामध्ये जादा आवक असलेल्या केळीस ८००० रू. टनाप्रमाणे दर मिळतो. फळाचा रंग लाल असतो. पावसाळा सुरू झाल्यावर लागवड करतात.

४) सोनकेळी :
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागामध्ये या जातीची लागवड दिसून येते. या जातीच्या केळी वेलचीच्या आकारासारख्या येतात.

५) लालकेळी :
या जातीस येरा, आरती, चंद्राबाले, चेन कटली, चेन वाझई अशीही नावे आहेत. आकर्षक लाल जांभळट रंगाची फळे अधिक पैसे मिळवून देणारी जात आहे. घडाचा दांडा, पानाचा देठ आणि झाडाचा बुंधा लालसर रंगाचा असतो. झाडे ७ ते ८ फुट उंचीची असतात. घडात ५ ते ८ फण्या असून प्रत्येक फणीत साधारण १२ ते १४ केळी असतात. केळी थोडीशी वक्राकार असून जाड सालीची, गर गोड , नारंगी पिवळसर रंगाचा असतो.

६) ग्रॅन्ड नैन : 
कॅव्हेन्डीशी या बुटक्या जातीतल्या केळीत ग्रॅन्ड नैनचा समावेश होतो. कॅव्हेन्डीशी या वर्गातील ही सर्वात बुटकी जात. केळीचे प्रचंड उत्पादन व निर्यात करणार्‍या मध्य व दक्षिण अमेरिकन देशात या जातीने आता प्रवेश केला आहे. बुटकेपपणामुळे ही जात जोमदार वार्‍याला यशस्वीपणे तोंड देऊ शकते. कॅव्हेन्डीशीच्या इतर जातींपेक्षा ही जात ३० टक्के अधिक उत्पादन देते. या जातीत पिले देण्याचे प्रमाण जास्त आहे. बुटकेपणामुळे पानांचा पसारा २० टक्के कमी असल्यामुळे एकरी जास्त झाडांची संख्या बसवता येते. मात्र ही जात पाण्याची कमतरता व पाणी साचून राहणे या परिस्थितीला तोंड देऊ शकते नाही. कमी तापमानाला इतर ठेंगण्या कॅव्हेन्डीशीपेक्षा ही जात जास्त यशस्वीपणे तोंड देऊ शकते.

महाराष्ट्राबाहेरील केळीच्या जाती :
१) चक्रकेळी : 
दक्षिण भारतातील आंध्र राज्यातील गोदावरी जिल्ह्यात ही जात लावतात. झाड आठ फुटापर्यंत उंच वाढते. फळाचा आकार मोठा असतो. गर गोड व मधुर असतो.

२) कुन्नन : 
केरळ राज्यातील ही जात उंचीने मध्यम असते. केळीची साल पातळ असून गर चवदार असतो. या जातीचे फळ सुपारीच्या आकारासारखे असते. पिकण्यापुर्वी, वाळवलेल्या केळ्यांचा गर लहान मुलांना अन्न म्हणून देतात.

३) अमृतसागर : 
पश्चिम बंगालमध्ये ह्या जातीची लागवड करण्यात येते. या जातीची गुणवत्ता उत्कृष्ट असली तरी घडाचे वजन कमी व झाड नाजूक असल्यामुळे याची लागवड मोठ्या प्रमाणात तिकडे कुणी करीत नाही. फळाचा आकार मध्यम, साल मध्यम जाड, गर चवदार व पिठूळ असतो.

४) बोंथा : 
ही आंध्र प्रदेशातील केळीची जात अवर्षण परिस्थितीला तोंड देणारी आहे. दक्षिण भारतात परसदारी (घराशेजारी) या जातीची लागवड मोठ्ये प्रमाणात करतात. झाड उंच व खोड फिकट हिरव्या रंगाचे असते. घडाचे सरासरी वजन १० ते १५ किलो भरते. प्रत्येक घडता फळांची संख्या ६० पर्यंत असते. फळाची साल जाड व हिरवी असते. दक्षिणेत लग्नसमारंभ शोभेकरता या घडाचा वापर करतात. म्हणून आंध्रच्या काही भागात या जातीला 'कल्याणवझाई ' म्हणून संबोधतात. कच्च्या फळांचे काप करून तळून खातात. 

५) जायंट गव्हर्नर : 
ही जात बसराईचाच उपप्रकार आहे. पश्चिम बंगालमध्ये अगदी अलीकडेच लोकप्रिय व्हायला लागली आहे. झाड मध्यम उंचीचे, केळीचा आकार मोठा, केळीच्या सालीचा रंग हिरवा व पिवळसर, गर घट्ट व गोड असतो. घडाचे सरासरी वजन १५ किलोपर्यंत असते. ही जात पानांच्या करपा रोगाला बळी पडणारी आहे.

६) विरूपाक्षी : 
ही एक डोंगरी केळीची जात आहे. ही जात तामिळनाडू राज्यातील ३०० -४०० फूट उंचीवरच्या पलानी टेकड्यांच्या भागात कायमस्वरूपी लागवडी (Pereninal) खाली आहे. या केळीची चव व टिकाऊपणामुळे ती तिकडे लोकप्रिय आहे. आंध्रराज्यातील देवळांतील पंचामृताकरता ही जात वापरतात. सपाट, मैदानी भागात हिची लागवड यशस्वी होत नाही. या जातीवर पर्णगुच्छ रोगाचा जास्त प्रादुर्भाव होती.

संकरित केळीच्या जाती: 
१) बोडलमस अल्टाफोर्ट : 
जागतिक स्तरावर तयार केलेली पहिली केळीची संकरित जात. ग्रोमिशेल या प्रसिद्ध जातीवर पानामा रोगाचा प्रादुर्भाव होऊन प्रचंड नुकसान झाले. तेव्हा ग्रोमिशेल x पिसांग लिलीन या जातींचा संकर करून १९६२ साली जमेकात ही जात निर्माण करण्यात आली. ही जात उंच असल्यामुळे जास्त वार्‍याला बळी पडते म्हणून हिचा प्रसार झाला नाही.
२) सी. ओ. १ : 
तामिळनाडू राज्यात विरूपाक्षी या डोंगरी केळीच्या जातीशी संकर करून ही नवीन संकरित जात निर्माण करण्यात आली आहे. ही जात लाडेन x मुसा बाल्वीझियामा या संकराला कदाली या नराशी संयोग करून सी. ओ. १ ही जात निर्मात करण्यात आली आहे. विरूपाक्षी ही डोंगरी केळीची जात मैदानी भागात लावली असताना तिची चव व स्वाद कमी होतो. परंतु सी. ओ. १ जात मैदानी सपाटीक्षेत्रावरसुद्धा विरूपाक्षीसारखीच चव व स्वाद देते. विरूपाक्षी जातीचा घड तयार व्हायला १७ महिने लागतात तर सी. ओ. १ जातीला १४ ते १४।। महिने लागतात.

जमीन : 
भारी कसदार, भुसभुशीत, पाण्याचा चांगला निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थयुक्त गाळाची सुपीक जमीन केळीस मानवते. केळीची मुळे फार खोलवर जात नसल्याने मध्यम ते कमी खोलीच्या जमिनीत देखील लागवड करता येते. मात्र हे पीक खादाड असल्याने कमी खोलीच्या जमिनीतूनही चांगले उत्पादन घेण्यासाठी अन्नद्रव्याचा भरपूर पुरवठा करणे गरजेचे असते, त्यासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर करावा. सेंद्रिय खतामुळे जमिनीत ओलावा धरून ठेवण्याची क्षमता वाढते. खडकाळ किंवा जांभ्या खडकाच्या जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी असल्याने अशा जमिनीत लागवड केली जात नाही किंवा कमी प्रतिच्या मानल्या जातात. खारवट जमिनी केळीला चालत नाहीत. क्षारांचे शेकडा प्रमाण ८.०५ च्या वर गेलेल्या जमिनी केली लागवडीस अयोग्य आहेत. जमिनीतील थोड्या प्रमाणातील चुनखडी केळीला उपयुक्त ठरते. सामू (pH) थोडा अल्कलीयुक्त असल्यास चालतो.

विभागवार केलीबाबत जमिनीची निवड सांगायचेच झाल्यास जळगाव जिल्ह्यात तापी खोर्‍यातल्या मध्यम खोलीच्या काळ्या जमिनीत लागवड मोठ्या प्रमाणात करता येते. कोकण भागातील जांभ्या जमिनी केळीसाठी योग्य समजतात. ठाणे जिल्ह्यात समुद्र काठाची रेताड जमीन दख्खनमध्ये आढळणार्‍या खोल व तळाशी मुरमाड जमिनी मध्यम काळ्या नरम तांबड्या जमिनी तसेच गुजरातच्या खोल परंतु हलक्या गालाच्या जमिनीत केली यशस्वीरित्या येते.

हवामान : 
केळी हे उष्ण कटिबंधातील फळपीक असून त्यास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. केळीच्या पानांच्या चांगल्या वाढीसाठी २३ डी. ते २८ डी. सेंटीग्रेड तापमान आणि केळीच्या घडाच्या वाढीला थोडे अधिक २९ डी ते ३० डी. सेंटीग्रेड तापमान अधिक फायदेशीर ठरते.

उष्ण कटिबंधात उंच जातीच्या फॅव्हेन्डिशी केळीच्या पानांची वाढ १६ डी. सेंटीग्रेड तापमानाखाली थांबते. आपल्याकडील हिवाळ्यातील तापमान १२ डी. सेंटीग्रेडपेक्षा कमी किंवा उन्हाळ्यातील तापमान ४० डी. सें.ग्रे. पेक्षा अधिक असल्यास पिकाच्या वाढीवर व घडाच्या वाढीवर विपरित परिणाम घडून येतो.

२९ डी. ते २२ डी. सें.ग्रे. पेक्षा कमी तापमानात लोह सोडून सर्वच अन्नद्रव्याचे ग्रहण करण्याचे प्रमाण कमी होते. अधिक तापमानात केळीच्या मुळ्या बोरॉन हे १० पटीने जास्त ग्रहण करतात. पालाश, सोडियम, चुना, लोह आणि जस्त ३ ते ४ वेळा जास्त ग्रहण करतात. नत्र, स्फुरद, मॅग्नेशियाम, मँगनीज, तांबे जास्त ग्रहण झाले तर थंड हवामान केली तयार होण्याचा कालावधी वाढतो. शिवाय कायम स्वरूपी केळीचे पीक घेतले जाते त्या भागात पिले बाहेर पडणे महत्त्वाचे असते. परंतु त्या ठिकाणी पिले कमी बाहेर पडतात.

लागवडीचा हंगाम : 
हवामानाचा केळीच्या वाढीवर, घड येण्याच्या कालावधीवर व घड तयार होण्याच्या कालावधीवर परिणाम होत असतो. त्यामुळे हवामानानुसार केळी लागवडीचा मोसम हा बदलत असतो. जळगाव -खानदेश भागात दोन वेळेला केळीची लागवड करतात. त्या दोन हंगामांना मृगबाग व कांदेबाग म्हणतात. मृग बागेची लागवड मुख्यत: जून महिन्यात करतात. 

जून नंतर अशिराने लागवड केल्यास हिवाळ्यात पडणार्‍या थंडीमुळे झाडाची वाढ खुंटते व फळधारणेचा काळ लांबतो. त्यासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीस किंवा पाण्याची सोय असल्यास मे महिन्याच्या दुसर्‍या पंधरावड्यात लागवड करावी. त्यामुळे पुढे थंडी पडण्याच्या अगोदर वाढीस जास्त अनुकूल काळ मिळतो. त्यामुळे बाग लवकर तयार होऊन उत्पादनातही वाढ होते.

कांदेबाग लागवडीचा कालावधी हा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये चालू होतो ते डिसेंबरपर्यंत चालतो. लागवडीनंतर तर १२ महिन्यांच्या आत केळीचे घड कापणीस येतात. ती कापणी २ -३ महिने चालते. कांदेबाग (ऑक्टोबर ) लागवडीची वाढ ही सावकाश होत असली तरी ती पुर्ण होते.

जून लागवडीचे पीक झपाट्याने वाढते. मात्र त्याच्या फळाचा दर्जा व गुणवत्ता कमी असते. शिवाय जून लागवडीपेक्षा ऑक्टोबर लागवडीच्या फळाचा टिकाऊपणा अधिक असतो. शिवाय ऑक्टोबर लावणी ही बिगर हंगामात येत असल्यामुळे मजुर स्वस्त मिळतात. त्यामुळे खुंट काढण्याचा व गड्डे लावणीचा खर्च कमी येतो. नेहमी ऑगस्ट ते ऑक्टोबर हा केळीचा हंगाम असतो. मात्र कांदेबाग लागवडीची केळी फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये बाजारात येत असल्याने आर्थिक फायदा जास्त होतो.

जळगाव जिल्ह्यातील चिनावल, कुंभारखेड या भागात ठिबक सिंचनाने पाण्याची सोय करून रामनवमी किंवा हनुमान जयंतीच्या वेळेस मार्च - एप्रिल नवीनच लागवड होऊ लागली आहे. ह्या काळात लावलेली केळी एैन उन्हाळ्यात दुसरी फळे नसताना येते. त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात.

बेण्यांची निवड : 
केळीची अभिवृद्धी बेणे, मुनवे (गड्डे) पीपर्स यापासून करतात. मुनवे म्हणजे पानासकट गड्ड्याचा वापर करतात. त्यामध्ये तलवारीसारख्या अरुंद व रुंद पानांचे दोन प्रकार असतात. दमट हवामानाच्या भागात अभिवृद्धीसाठी मुनाव्यांचा वापर करतात. कोरड्या व उष्ण हवामानाच्या भागात मुनव्याची पाने कापून राहिलेले गड्डे वापरतात.
गड्डे निवडताना तलवारीसारख्या अरुंद पानांच्या मुनव्यांचे गड्डे वापरावेत. मुनव्यांचे गड्डे शेंड्याकडे निमुळते असावेत. गड्ड्यांसाठी निवडलेल्या मातृवृक्षाच्या घडांना कमीत कमी आठ ते दहा फण्या असाव्यात.
खुंट कापल्यानंतर त्यापासून फुटलेले असे चांगले वाढलेले, जोमदार तलवारीसारख्या पात्यासारखी पाने असलेले गड्डे खोडापासून हळूवारपणे अलग करून घ्यावे. मुळ्यांची शेंडे छाटणी करावी. फुटलेला कोंब सुमारे ३० सेंमी लांबीचा ठेवून शेंडे छाटणी करावी. साधारण नारळाच्या आकाराचे अर्धा ते एक किलो वजनाचे गड्डे लागणीसाठी वापरावे. म्हणजे त्याची वाढ जोमाने होऊन उत्पन्नही वाढते.

लागवडीतील अंतर :
लागवडीतील अंतर हे केळीच्या जातीच्या वाढीवर व जमिनीच्या सुपीकतेवर अवलंबून असते. लागवडीतील अंतर जास्त असल्यास झाडांची वाढ चांगली होते तसेच घड लवकर लागून मोठे येतात. फळांची प्रतही चांगली राहते. पण अंतर कमी असल्यास झाडांची संख्या वाढून एकूण उत्पादन वाढते. मात्र फळांचा आकार व प्रत बिघडते. घड तयार होण्यास जास्त काळ लागतो. पदेशात केळी निर्यात करावयाची असल्यास केळीच्या घडाचा आकार व प्रत याला जास्त महत्त्व असते. अशावेळी दोन झाडांतील अंतर जास्त ठेवतात. साधारणपणे केळीची लागवड १.८ x १.८ मी. अंतरावर करतात. जळगाव भागामध्ये दाट अंतर असते. ज्या फण्यातील अंतर (सांधा) अधिक असते. त्या फण्यातील केळी अधिक पोसल्या जातात. १०' x १०' अंतर ठेवून ४-४ खोडे (१६ खोडे ) लागतात. नंतर ३ तोडतात व या खोडांचे खत तयार करतात. जातीनुसार केळी लागवडीतील अंतराचा तक्ता खाली दिला आहे.

क्र.   केळीची जात   विभाग   लागवडीचे अंतर फुट
१  लाल केळी        कोकण किनारा   १० x १०   
२   हरीसाल, लाल वेलची, सफेद वेलची     कोकण किनारा   ८ x ८   
३   बसराई            कोकण किनारा   ६ x ६   
४   बसराई         जळगाव   ४.५ x ४.५   
५   वामन केळ      दक्षिण भारत   ८ x ८ किंवा १० x १० 

लागण बहुतांशी चौरस पद्धतीने करतात ३० x ३० x ३० सेंमी. आकाराचे खड्डे घेऊन त्यामध्ये पूर्ण कुजलेले शेणखत, पालापाचोळा आणि कल्पतरू सेंद्रिय खत २५० ग्रॅम व प्रोटेक्टंट आयुर्वेदिक औषध २५ ग्रॅम टाकून खोड लावल्यास वाढ लवकर होते.

मुणवे लागवड : 
केळीच्या लागवडीसाठी अर्ध्या ते एक किलो वजनाचे मुनवे (Suckers) २ ते ३ महिने जुनी निवडावेत. थंडीच्या काळामध्ये वाढ लवकर होत नाही. तेव्हा लागवड करतेवेळी जर्मिनेटर व प्रोटेक्टंटमध्ये खोड संपुर्णपणे बुडवून लावल्यास वाढ लवकर व व्यवस्थित होते. (प्रमाण -१ लि. जर्मिनेटर + ५०० ग्रॅम प्रोटेक्टंट + १०० लि. पाणी.) 

खते : 
रासायनिक खते अजिबात वापरू नयेत. नैसर्गिक सेंद्रिय खते (शेणखत, कंपोस्ट खत ), कल्पतरू सेंद्रिय खत वापरल्याने केळी चांगली पोसली जातातच शिवाय जमिनीची भौतिक व जैविक सुपिकता सुधारण्यास मदत होते. त्यासाठी लागवडीच्या वेळी प्रत्येक खड्ड्यात २५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत शेणखताबरोबर द्यावे. नंतर २ ते २।। महिन्यांनी साधारण झाडे २ ते ३ फुट उंचीची झाल्यावर प्रत्येकी २५० ग्रॅम कल्पतरू खत द्यावे. नंतर केळकमळ निघतेवेळी ५०० ग्रॅम आणि त्यानंतर १ महिन्याने ५०० ते ७५० ग्रॅम कल्पतरू खत ठिबक जवळ किंवा बांगडी पद्धतीने द्यावे. चौफुलीवर लागवड असल्यास हुंडीभोवती द्यावे. 

पाणी : 
हिवाळ्यामध्ये १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. उन्हाळ्यामध्ये ६ ते ७ दिवसांच्या अंतराने पाणी देणे आवश्यक आहे. ठिबक सिंचन केल्यास उत्पन्न चांगले येते. वेळेवर पिकाची भूक भागते. पाणी कमी असलेल्या ठिकाणी कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर केल्यास घड चांगला होतो. कल्पतरू हवेतील बाष्पशोषून घेत असल्याने अशा ठिकाणी वरदान ठरते व त्याचा फायद खानदेश, विदर्भ, मराठवाड्यातील अति उन्हाळ्यातील अति उष्ण ३८ ते ४४ डी. सें.ग्रे. या तापमानातही कल्पतरू वरदान ठरते. 

किडी : केळीच्या झाडावर किडींचा किरकोळ उपद्रव होतो. विशेषत: मावा, पाने खाणार्‍या अळ्या, मुळ्यावरील सोंडे, फुलकीड, सुत्रकृमी या किडींचा प्रादुर्भाव केळीच्या झाडावर होतो. 

१) मावा : 
मावा ही कीड केळीच्या पानाच्या खालच्या बाजूस आढळते. पर्णगुच्छ (बंची टॉंप) या रोगाचा प्रसार या किडीमुळे होतो. 

उपाय : 
या किडीच्या नियंत्रणासाठी प्रोटेक्टंट आणि मोनोक्रोटोफॉस या किटकनाशकांची फवारणी करावी. 

२) सोंडे कीड :
भुरकट, काळसर रंगाची कीड असून जमिनीत असणार्‍या कंदात (खोडात) शिरून अंडी घालते. अंडी उबविल्यानंतर अळी कंदावर उपजिवीका करते. अळी कंदातील गर खात खात जात असल्याने तेथील भाग कुजतो, कमकुवत होत जातो आणि शेवटी झाड कोलमडते. 

प्रतिबंधात्मक उपाय : 
१) कीड मुक्त बागेतून बेणे निवडावे.
२) धारधार विळ्याने तासणे.
३) बेणे जर्मिनेटर व बुरशीनाशकाचे द्रावणात बुडवून लावावे.
४) प्रत्येक खोडास २० ते २५ ग्रॅम प्रोटेक्टंटचे द्रावण सोडणे.
५) बागेत स्वच्छता ठेवावी. खोडवा घेणे शक्यतो टाळावे.

३) फुलकिडे : 
केळकमळ बाहेर पडल्यानंतर निसवण्यास सुरुवात होताना त्याच्या खालच्या बाजूला फुल किड्याची अळी अंडी घालते. त्यामुळे फळावर टाचणी तोचल्यासारखे तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येतात. फळ पिकल्यावर ते ठिपके मोठे होतात. परिणामी फळाची प्रत कमी होऊन बाजारभाव कमी मिळतो.

४) खोडकीड : 
जुन्या खोडात व दलदलीच्या ठिकाणी या किडीचा उपद्रव जास्त दिसून येतो. या किडीची अळी खोड पोखरते. त्यामुळे झाड निस्तेज होऊन वाढ खुंटते. छिद्राभोवती तपकिरी रंगाचे वलय निर्माण झाल्याचे दिसल्यावर किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात येते.

५) केळीवरील सुत्रकृमी : 
केळीचे उत्पादनात घट येण्यामागचे सुत्रकृमीचा प्रादुर्भाव हे एक मुख्य कारण आहे. सुत्रकृमी हा लांब धाग्याचा (०.२ ते ०.५ मिमी ) प्राणी असून त्याला जगण्यासाठी ओलावा व पिकांच्या मुळ्यांची आवश्यकता असते. केळी पिकावर महाराष्ट्रामध्ये एकूण ११ प्रकारचे सुत्रकृमी आढळून आले आहेत.
त्यापैकी पुढील चार सुत्रकृमीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून यतो. 
१) हेलिकोटामळ कस मल्टीसिक्टस, 
२) होप्लालॅमस इंडिकास, 
३) रोटीनेलक्स रनिकॉर्मिस, 
४) टायलेकोरकिस

ह्या सुत्रकृमींचे अस्तित्व जमिनीत खोडाच्या कंदाच्या मुळ्यात असते. मुळाबाहेर राहून त्यातील रस व गर शोषतात. प्रथम अळी मुळामध्ये घुसून आपली उपजिवीका करून तेथेच अंडी घालते. त्यामुळे पाने पिवळी पडतात, झाडाची वाढ खुंटते, पुर्ण वाढ झालेले झाड कोलमडते. काही प्रसंगी थोड्याप्रमाणात फळगळसुद्धा होते. त्यामुळे जवळजवळ १० ते १५ टनापर्यंत उत्पन्नात घट येते. 

उपाय : 
१) प्रत्येक केळी पिकानंतर मका, ज्वारी, गहू, ऊस अशा पिकांची लागवड करावी. 
२) झेंडूसारखे मिश्रपीक घ्यावे किंवा झेंडूचे आंतरपीक घ्यावे. कारण झेंडूच्या मुळांतून अल्फार्थोनाईल रसायन बाहेर येते ते सुत्रकृमीनाशक असते. 
३) लागवडीपुर्वी २ -३ आठवडे अगोदर एकरी ६०० ते ८०० किलो निंबोळीपेंड जमिनीत मिसळून पाणी द्यावे. ती पेंड कुजवून त्यातून फिनॉल रसायन सल्फर -डाय - ऑक्साईड व कार्बन -डाय - ऑक्साईड वायू बाहेर निघतो. त्यामुळे सुत्रकृमींचे चांगले नियंत्रण होते. 
४) मोहरी, ताग, तीळ अशी मिश्रपिके घेऊन ती ५०% फुलोर्‍यात असतानाचा गाडून हिरवळीचे खत तयार करावे. 

केळीवरील रोग : 
केळीवर मर (पनामा), शेंडे झुपका (बंची टॉंप) तसेच अलिकडच्या काळात सिगाटोका (करपा) हे रोग प्रामुख्याने आढळतात. 

१) मर (पनामा) गोर : 
जमिनीतील कवकामुळे हा रोग होतो. खुंटावरील साल पिवळी होऊन सुकते. पाने कडेला पिवळी होऊन सुकतात. रोगट खुंटाच्या कंदात काळ्या रेषा दिसतात. फळे खराब होतात. पाण्याचा निचरा न झाल्याने किंवा आम्लयुक्त भारी जमिनीत हा रोग होतो.

उपाय : 
बसराई, लालकेळ, हरीसाल या जातीच्या केळी मर रोगास प्रतिकारक आहेत. ५०० मिली जर्मिनेटर आणि २५० ग्रॅम कॉपरऑझीक्लोराईडचे १०० लिटर पाण्यात द्रावण तयार करून ५०० मिली ते १ लिटर द्रावण झाडाचे खोडावरून गोलाकार ओतणे. ८ दिवसांचे अंतराने २ ते ३ वेळा करावे.

२) शेंडे झुपका / पर्णगुच्छ (बंचीटॉंप) : 
हा रोग विषाणूमुळे होतो. मावा किडीमुळे ह्या रोगाचा प्रसार होतो. शेंड्यावर लहान पानांचा झुपका / गुच्छ तयार होतो. झाडांची वाढ खुंटते.

उपाय : 
निरोगी कंद व मुनवे वापरावेत. रोग प्रतिकारक बसराई जातीची केली लावावी. रोगट झाडे काढून टाकावीत. माव्याचे नियंत्रणासाठी प्रोटेक्टंटचे प्रमाण फवारणीपत्रकापेक्षा १ ते २ ग्रॅम / लि. पाण्यासाठी वाढवून घेणे. माव्याचे प्रमाण वाढलेले असल्यास मोनोक्रोटोफॉस २५ मिली १० लि. पाण्यातून फवारावे.

३) पिवळा सिगाटोका (करपा) : 
हा रोग बुरशीमुळे होतो. सतत पाऊस व हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे पाण्याचा निचरा न झाल्यामुळी रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. प्रथम पानावर लहान पिवळसर डाग दिसून येतात. नंतर हे ठिपके ३ ते ४ मि. मी. लांब व १ मि. मी. रुंद होतात. काही दिवसांनी हे ठिपके तपकिरी रंगाचे होऊन आकाराने लांबट, गोलाकार वाढत जाऊन १२ ते १५ मि. मी. लांब व २.५ ते ३ मि.मी. रुंद होतात. ठिपक्याभोवती पिवळे वलय तयार होऊन ठिपके राखाडी होत जाऊन पाने फाटतात. करपल्यासारखी दिसतात व देठापासून मोडून लोंबकळतात. रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यावर केळी पुर्णपणे भरत नाहीत. फळांचा आकार लहान राहतो. अल्पकालावधीत पक्क होऊन घडातून केळी गळू लागतात. फळाचा गर पिवळसर होऊन त्यास दुर्गंध येतो.

उपाय : 
१) लागवडीसाठी कंद शंकु आकाराचे ७५० ग्रॅम ते १ किलो वजनाचे, ३ ते ४ महिने वयाचे, निरोगी बागेतील निवडावे.
२) नत्रयुक्त खतांचा अधिक वापर टाळावा व ६ महिन्यानंतर नत्रयुक्त खतांचा वापर करू नये.
३) बागेस पाणी दुपारच्या वेळेत द्यावे. पाणी देताना आवश्यकतेनुसार देणे.

मुनवे लागवडीच्या वेळी : 
मर, पर्णगुच्छ (Bunchy Top) होऊ नये म्हणून - जर्मिनेटर १०० मिली + ५० ग्रॅम प्रोटेक्टंट + कार्बेनडेझीन १० ते १५ ग्रॅम + १० लिटर पाणी या द्रावणात मुणवे पुर्ण बुडवून लागवड करावी.

मुळकुज होऊ नये व वाढ निरोगी होण्यासाठी आळवणी : 
जर्मिनेटर ५०० मिली + थ्राईवर ५०० मिली + १०० लि. पाणी हे द्रावण तयार करून प्रत्येक मुणव्याचे भोवती खोडावरून १०० मिली, १५० मिली, २०० मिली या प्रमाणात ३ वेळा आळवणी करणे.

फवारणी :
१) पहिली फवारणी : लागवडीनंतर १ महिन्याने : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ राईपनर १०० मिली. + प्रोटेक्टंट १५० ते २०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १५० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : लागवडीनंतर २।। ते ३ महिन्यांनी (पिकाच्या निरोगी, जोमदार वाढीसाठी) : जर्मिनेटर ४०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ राईपनर २५० मिली. + प्रोटेक्टंट ३०० ते ४०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १५० मिली + १०० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : लागवडीनंतर ४ ते ५ महिन्यांनी (पिकाच्या निरोगी, जोमदार वाढीसाठी) : जर्मिनेटर ४०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ राईपनर २५० मिली. + प्रोटेक्टंट ३०० ते ४०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १५० मिली + १०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : लागवडीनंतर ५ ते ६ महिन्यांनी (रोग प्रतिकार शक्ती वाढून जोमदार वाढ व कमळ लागण्यासाठी ):जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ न्युट्राटोन ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + हार्मोनी २५० मिली + १५० लि.पाणी.

५) पाचवी फावणी : लागवडीनंतर ७ ते ८ महिन्यांनी : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी २५० मिली + १५० लि.पाणी.

६) सहावी फवारणी : लागवडीनंतर ९ महिन्यांनी (केळी पोसण्यासाठी) :थ्राईवर १ लि . + क्रॉंपशाईनर १ ते १।। लि .+ राईपनर १ लि. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम ते १ किलो + न्युट्राटोन १।। लि. + हार्मोनी ४०० ते ५०० मिली.+ २०० ते २५० लि.पाणी. 

घडांची काढणी : 
लोंगर येण्याचा काळ हा निरनिराळ्या जातीनुसार व लागणीच्या हंगामानुसार वेगवेगळा असतो. काही वेळेस एकाच जातीच्या झाडास लोंगर बाहेर येण्यास कमी जास्त वेळ लागतो. बुटक्या जातींना १२ ते १४ आणि उंच जातींना १४ ते १६ महिन्याचा कालावधी लागतो. लोंगर बाहेर आल्यानंतर ९० ते १४० दिवसात घड तयार होतो. बसराई केळीचे लोंगर ८ ते १२ महिन्यात बाहेर पडतात. लाल वेलची, सफेद वेलची व मुठेळी जातीचे लोंगर बाहेर पडण्यास ९ ते १३ महिन्याचा कालावधी लागतो. 

घडातील सर्व फण्या बाहेर पडल्यावर त्याच्या टोकाला असलेल्या वांझ फण्या कापून घ्याव्यात हे केळफुल कापल्याने घडातील केळी चांगली पोसून वजन वाढते. 

घडाचा गर्द हिरवा रंग फिक्कट हिरवा होऊन फळावरील शिरा जाऊन फळांना गोलाई येते. फळावर टिचकी मारल्यावर धातूवर टिचकी मारल्यासारखा आवाज येतो. तेव्हा घड कापणीस आला असे समजावे. चांगल्याप्रकारे तयार झालेला घड काढल्यावर ४ -५ दिवसांनी पिकतो. मात्र लांबच्या बाजारपेठेत माल पाठवायचा असल्यास ७५% पक्क झाल्यावर म्हणजे घड पक्क होण्यासाठी १० ते १५ दिवस वेळ असतानाच काढणी करावी. म्हणजे वाहतुकीच्या काळात घड न पिकता कठीण राहतो. घड काढताना लांब दांडा ठेवून काढावा. म्हणजे वाहतुकीत सोईचे होते. घड काढल्यानंतर मात्र झाड बुंध्यापासून कापून टाकावे. काही भागात खोड ३ -४ महिने तसेच ठेवतात किंवा अर्धे कापतात. त्या मागचा हेतू हाच की, पील बाग ठेवायचा (धरायचा) असल्यास खोडातील अन्नद्रव्ये पिले बागेला मिळावीत. घड डोक्यावरून वाहताना खरचटणार नाहीत याची काळजी घ्यावी. कारण साल खरचटल्याने केळ पिकल्यावर काळे पडते. घड काढल्यानंतर ट्रक वॅगनमध्ये भरण्यापुर्वी ऊन, पावसापासून बचाव होण्यासाठी सावलीत ठेवावेत. 

निर्यातीसाठी पाठवायच्या केळीची काढणी :
* केळीचे घड काढण्यापुर्वी बागेला आठवडाभर अगोदर पाणी देणे बंद करावे. त्यामुळे घडांची काढणी आणि शेतातून वाहतूक करणे सोईचे होते. 
* बागेमध्ये तात्पुरता निवारा उभारून तेथे घडाच्या फण्या वेगळ्या कराव्यात. घडावर मेणाचा किंवा बुरशीनाशकाचा वापर करणे सोईचे होते.
*  बागेमेध्ये तात्पुरता निवारा उभारून तेथे घडाच्या फण्या वेगळ्या कराव्यात. घडावर मेणाचा किंवा बुरशीनाशकाचा वापर करणे सोईचे होते.
*  निर्यातीसाठी केळी ७५% पक्क असावी आणि केळाला खरचटणे किंवा डाग असलेली वेडीवाकडी केळी काढून टाकावी.
*  केळीवरील धारा जाऊन गोल आकार आला की केळी ७५% पक्क झाली असे समजावे.
*   बसराई केळीचा घड ७५% तयार झाल्यावर केळातील गर व केळावरील साल यांचे प्रमाण ३५:१ किंवा ४०:१ असते.

काढणीच्या वेळी वरच्या फणीपासून २० ते २५ सेमी लांबीचा दांडा ठेवून घड कापावा आणि तो केळीच्या पानांवर जमिनीवर ठेवावा. घडातील शेवटच्या (खालच्या) फणीतील केळी जर लहान असेल तर ती कापून काढावी.
निर्यातीसाठी केळी ही मोठी, आकर्षक असणे आवश्यक असते. तर काही वेळेस घडातील फणीमधील काही केळी लहान राहते. त्यासाठी वेळीच सप्तामृत औषधांच्या फवारण्या केल्या तर पुर्ण घडातील सर्व फण्यांचा व केळीचा आकार मोठा, एकसारखा, आकर्षक मिळतो. त्यामुळे काढणीच्या ८ - १० दिवस अगोदर लहान केळीच्या विरळण्याचा खर्च कमी होतो. शिवाय ही लहान केळीदेखील पुर्ण पोसल्यामुळे उत्पादनात वाढ होते.

साठवण : 
घड काढणीनंतर १० ते १५ मिनिटे पाण्यात बुडवून ठेवावेत, म्हणजे घडाचे तापमान कमी होऊन जीव रासायनिक प्रक्रिया मंदावते, तसेच घडावरील जीवाणू पाण्यामुळे धुवून जातात. त्यामुळे साठवणुकीचा (टिकाऊक्षमतेचा) काळ वाढतो.
घडाची काढणी करताना कापलेल्या दांड्याला पॅरेफिन मेण किंवा व्हॅसली लावतात. वाहतुकीत किंवा साठवणूकीत बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे बुरशीमुळे केळी सडण्याला प्रतिबंध होतो. शिवाय केळी आकर्षक दिसून जास्त दिवस टिकतात. या प्रक्रियेसाठी १०० घडांना अर्धा किलो मेण पुरेसे होतो.
केळी साठवणुकीसाठी साधारणत: १३ ते १५ डी. सेल्सिअस तापमान व ८० ते ८५% आर्द्रता असल्यास १८ ते २२ दिवड टिकाऊपणा वाढतो. १३ डी. सेल्सिअसच्या खाली तापमान गेल्यास केळी काळ्या

केळीसाठी फर्टिगेशन : 
ठिबक सिंचनाद्वारे पाण्यासोबतच विद्राव्य खते देण्याच्या पद्धतीस फर्टिगेशन असे म्हणतात. टिश्यूकल्चर केळी लागवड हे आधुनिक तंत्रज्ञान असल्यामुळे त्यास सर्व आधुनिक तत्वांची जोड देणे गरजेचे आहे. टिश्यूकल्चर केळी रोपांजवळ कुठल्याही प्रकारचे अन्नद्रव्य साठविलेले नसल्याने लागवडीनंतर ५ ते ७ दिवसांनी त्वरीत फर्टिगेशन सुरू करणे गरजेचे आहे. आपल्या देशामध्ये अनेक वर्षापासून पारंपारिक खतांचा वापर करण्यात येत आहे. परंतु या खतांची उपलब्धता अत्यंत कमी असल्यामुळे आणि ती पूर्णपाने पाण्यात विरघळणारी नसल्याने विद्राव्य खते वापरणे हिताचे आहे. त्याचप्रमाणे पारंपारिक खतांची कार्यक्षमता ३० ते ५० % असून विद्राव्य खतांची कार्यक्षमता ८० ते ९० % आहे. त्याचाप्रमाणे विद्राव्य खते ही आम्लधर्मीय असल्याने क्षारता की करण्यास मदत करतात. विद्राव्य स्वरूपातील खते वापरावयाची झाल्यास १० ते २० टक्के अन्नद्रव्याची बचत होवू शकते.

फर्टिगेशन खतांची मात्रा व वेळापत्रक : 
नत्र २०० ग्रॅम, स्फुरद : ६० ग्रॅम , पालाश : २८० ग्रॅम प्रति झाड. या खतांच्या मात्र फक्त मार्गदर्शनासाठी असून मातीपरीक्षण अहवालानुसार व प्रत्यक्ष अनुभवानुसार त्यात बदल करावेत.

आंतर मशागत व तण नियंत्रण : 
केळी लागवडीनंतर शेत भुसभुशीत रहावे म्हणून तीन महिन्यापर्यंत कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. मुळांना इज होणार नाही अशाप्रकारे आंतरमशागत करावी. माती भुसभुशीत करून झाडाला भर लावावी. तन महिन्यानंतर आंतर मशागत करू नये. वेळोवेळी तणांचा बंदोबस्त करावा. लागवड पावसाळयानंतरची असल्यास जास्त वेळा आंतर मशागत करायची गरज नाही.

पिल कापणे :
 केळी रोपे लागवडीपासून तिसऱ्या महिन्यानंतर मोठ्या प्रमाणात मुख्य खोडाच्या बाजूला पिलांची निर्मिती होते. ही पिले वेळोवेळी कापली नाहीत तर मुख्य पिकला स्पर्धा करतात व अन्नद्रव्याचा ऱ्हास करतात. त्यासाठी अशी पिले विळ्याच्या सहाय्याने कापत रहावीत. यासाठी कुठल्याही तणनाशकाचा उपयोग करू नये. त्यामुळे केळीच्या कंदाला इजा होऊन रोग व किडींना आमंत्रण मिळते.

पाने व केळफूल कापणे : 
जसजशी झाडाची वाढ जोमाने होते तसे नवीन पाने येण्याचे प्रमाण वाढते. सर्वसाधारणपणे दर महिन्याला ४ ते ५ नवीन पाने येतात. तेव्हा जुनी व खालची पाने पिवळी होऊन सुकतात. ती पिवळी किंवा सुकलेली पाने कापून शेताच्या बाहेर नेउन टाकावीत किंवा कंपोष्ट खड्ड्यात घालावीत. परंतु कुठलेही हिरवे पान कापू नये. केळफूल बाहेर पडायच्या आधी झाडवर कमीत कमी १५ ते १६ कार्यक्षम पाने असावीत. केळी वाढीच्या काळात कमीत कमी १० ते १२ पाने झाडावर असावीत याची काळजी घ्यावी.

केळफूल बाहेर पडल्यानंतर जेव्हा सर्व कळ्या मोकळ्या होतात. त्यानंतर लहान फुलफणी निघतात अशा दोन फुलफण्या बाहेर पडल्यानंतर केळफूल कापावे. त्यात विलंब झाल्यास घडाच्या भरणीवर विपरीत परिणाम होतो.

झाडाला आधार देणे : 
टिश्यू कल्चर केळीची घडाचे सरासरी वजन २५ ते ३५ किलोच्या दरम्यान असल्याने वजनाने झाडे झुकतात किंवा सोयाट्याचा वारा आल्यानंतर मोडतात. म्हणून झाडाला बांबूचा आधार द्यावा.

केळी घड झाकणे : 
केळीचा घड बाहेर पडल्यानंतर घडाच्या दांड्याचे उष्ण सुर्यप्रकाशापासून संरक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी केळीच्या वाळलेल्या पानांचे पेंढी करून ते घडांच्या दांड्यावर पानांमध्ये अडकवून दांडा आणि घडांचे उष्ण तापमान हवामानापासून संरक्षण होईल. अन्यथा दांड्यावर प्रखर उन्हामुळे काळा डाग पडतो व दांडा सडून घड गळून पडतो.

केळी निर्यात करायची असल्यास किंवा ज्या परिसरात बनाना रेड ईस्ट थ्रीप्स या किडीचा प्रादुर्भाव असल्यास ५ मायक्रॉन गेजच्या बॅगेला क्षेत्राच्या १० % हिस्सा होईल अशा प्रकारे ४ ते ५ मी. मी. आकाराचे छिद्र पाडावे व ती बॅग घडावर घालून संरक्षण करावे.

खोडव्यांसाठी पिलाची निवड करणे : 
सर्व साधारणपणे ७५ ते ८० % केळफूल बाहेर पडल्यानंतर किंवा पहिली कापणी सुरू झाल्यानंतर घडाच्या विरुद्ध दिशेने, नवीन आलेला, न कापलेला व तलवारीसारखी पाने असलेला आणि खोडाच्या सर्वांत जवळ असलेला एक पील निवडावा व त्याला खोडवा पीक म्हणून त्वरित अन्नद्रव्याची मात्रा द्यायला सुरुवात करवी.

अशाच पद्धतीने निदव्याची पद्धत पण करावी. या पद्धतीने आपणास १२ महिन्यात पहिले पीक आणि २० ते २१ महिन्यात दुसरेपीक आणि २८ ते ३० महिन्यात तिसरे पीक असे एकूण ३० महिन्यात तीन पिके मिळतात.

केळी खोडापासून धागा निर्मिती

कृषी विज्ञान केंद्र, पाल, ता. रावेर, जि. जळगाव.
महाराष्ट्रात अंदाजे ७२,००० हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. केळी घड / लोंगर काढल्यानंतर केळी खोड निरूपयोगी म्हणून बाहेर फेकले जाते आणि जाळले जाते. काही शेतकरी थोड्याप्रमाणात त्याचा उपयोग कंपोस्ट खत करण्यासाठी करतात. केळी लागवड बहुतांशी १.५ x १.५ मिटर (५ x ५ फूट) अंतरावर केली जात असल्याने हेक्टरी ४,४४० झाडे किंवा एकरी १,७४० झाडे असतात. केळी घड काढल्यानंतर पाने, खोड, घडाचा दांडा आणि जमिनीखालील खोड / कंद शिल्लक राहतात. या शिल्लक अवशेषाचा उपयोग खालीलप्रमाणे होतो.

अ) कंद : पिल्लांपासून नवीन लागवडीसाठी बियाणे. मुख्य कंद गुरांसाठी खाद्य किंवा सरपण/ इंधन म्हणून उपयोग.
ब) खोड : वरील ८ ते १० पापुद्यांपासून धागा निर्मिती आतील पांढऱ्या गाभ्यापासून गोड किंवा खारट कँडी.
क) पाने: मध्यशिरेपासून धागा निर्मिती. पानापासून द्रोण, लहान डिश आणि पत्रावळी तयार करणेबाबत कृषी विज्ञान केंद्र पाल येथे प्रयत्न चालू नयेत.
ड ) घडांच दांडा : केळी घड काढल्यानंतर झाडावर शिल्लक राहिलेल्या दांड्यापासून धागा निर्मिती.

महाराष्ट्राचा विचार केल्यास केळीबाबत …
केळी धागा उद्योग : 
१) कमी गुंतवणूकीत हा स्वयंरोजगार सुरू करता येतो. धागा काढण्याच्या मशिनची किंमत रू. २२,००० / - असल्याने भांडवल गुंतवणूक कमी आहे. तसेच किंमतीवर महाराष्ट्रा शासनाच्या कृषी विभागार्फत २५% किंवा जास्तीत जास्त रू. ५००० / - पर्यंत अनुदान दिले जाते.
२) केली धागा काढण्याच्या मशिनवर एका दिवसात ८० ते १०० खोडापासून १५ ते २० किलो धागा निघतो.
३) एक मशिनवर केळी धागा निर्मिती उद्योगात दररोज तीन युवक / मजुरांना रोजगार उपलब्ध होतो.
४) धागा काढत असताना खोडातील पाणी (सॅप) आणि चोथा शिल्लक राहतो.

पाण्यापासून नैसर्गिक रंग तयार करता येती किंवा या पाण्याला गाळून / फिल्टर करून पॉटॅश पुरवठ्यासाठी केळी बागेत उपयोग करता येतो.

चौथ्यापासून स्टार्च वेगळा करून स्टार्च उद्योग सुरू करता येईल. स्टार्च काढल्यानंतर राहिलेल्या शिल्लक मालापासून कंपोस्टखत / गांडूळ खत तयार करता येते.

क) केळी धागा निर्मितीमुळे संभाव्य परिणाम :

१) बेरोजगार युवकांन त्यांच्या गावातच स्वयंरोजगार उपलब्ध होईल.
२) केळी खोड / कच्चामाल गावातच उपलब्ध असल्याने टंचाई आणि वाहतूक खर्च या समस्या नाहीत.
३) शेतकऱ्याने धागा काढल्यास त्याला हेक्टरी ६५० ते ७५० किलो धागा मिळून त्यापासून हेक्टरी रू. १५,००० / - ते रू. २०,००० / - पर्यंत निव्वळ नफा मिळेल.
४) केळी धाग्यापासून रोजच्या वापरातील वस्तू किंवा शोभेच्या वस्तू करून महिला बचत गटांना आर्थिक लाभ होईल. 
५) केळी धाग्यापासून हातकागद बनविण्याचे उधोग महाराष्ट्रात केळी उत्पादक भागात उभारून रोजगार तसेच आर्थिक लाभ वाढविता येईल.
६) केळी धाग्यापासून हेदलूम / पावरलूमवर कापड / साडी करता येत असल्याने कापड निर्मिती हा स्वतंत्र उधोग उभारला जाऊ शकतो.

कालांतराने केळी धागा निर्मिती आणि त्यावर आधारित उधोग हा ग्रामीण भागातील एक रोजगार आणि उत्पन्न देणारा 'कुटिरोद्योग' होऊ शकतो. 'कचर्‍यापासून सोने निर्मिती' हे दृश्य स्वरूपात नजिकच्या भविष्यात शक्य आहे. अशाप्रकारे केळीच्या सर्व भागांचा विविध प्रकारे उपयोग शेतकऱ्यांना होत आहे आणि म्हणूनच केळी शेतकऱ्यांसाठी 'कल्पतरू' आहे.

केळी खोडापासून धागा काढण्याची मशीन :
'कृषी विज्ञान केंद्र राजमंद्री, आंध्रप्रदेश' यांनी विकसित केली असून या मशिनची निर्मिती 'आंध्रप्रदेश स्टेट अॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कापॉरेशन लि. ' हे करतात. या मशिनची किंमत रू. २२,००० / - आहे. या मशिनद्वारे सुरवातीस रोज ८ ते १० किलो धागा आणि अनुभवाअंती १५ ते २० किलो धागा प्रतिदिनी निघतो. प्रति हेक्टरी ६५० ते ७५० किलो धागा मिळतो. सरासरी एक किलो धागा काढण्यासाठी रू १५ पर्यंत खर्च येतो. एका खोडापासून सरासरी २०० ग्रॅम धागा निघतो. म्हणजेच ५ खोडांपासून १ किलो धागा निघतो. खर्च वजा जात प्रति हेक्टरी रू. १५ ते २० हजार निव्वळ नफा मिळू शकतो.

धाग्याचा उपयोग : 
या धाग्याचा उपयोग बारीक दोरी, दोर, शोभेच्या वस्तू, पिशवी, हात कागद, क्रॉप्ट पेपर, टिश्यू पेपर, फिल्टर पेपर, नोटांसाठी कागद, कापड, पृष्ठ, फाईलसाठी जाड कागद, सुटकेसेस, बुटांचे सोल इ. मध्ये केला जातो. धाग्याची लांबी ७५ सेमी ते १ मीटर पाहिजे.

धाग्याचा भाव :
१) पांढरा शुभ्र धागा : रू. ६ ०ते ८० प्रति किलो.
२) सिल्व्हर शाइन धागा : रू. ४० ते ६० प्रति किलो.
३) पिगमेंटयुक्त धागा : रू २५ ते ४० प्रति किलो.

केळी धागा काढण्यासाठी लागणारा प्रतिदिनी खर्च 

तपशिल  खर्च / दिनी (रू.)  १) केळी धागा मशिनवरील घसारा    १०.०० २) बागेतून खोड बाहेर काढणे व खोडाच्या 
७.५ ते १० सेंमी रुंद पट्ट्या करणे आणि धागा 
काढणे ( रू. ५० x तीन मजूर)  १५०.०० ३) किरकोळ खर्च (मशिन वाहतूक, दुरुस्ती इ.)   ५०.००  ४) विजेचा खर्च ( ६ युनिट x २.५ रू.)    १५.००   ----------  एकूण खर्च  २२५.००  

एका दिवसात (८ तास) सरासरी १५ किलो धागा निघतो. महणजे प्रतिकिलो रू. १५ खर्च येतो. एका किलोचा सरासरी भाव रू. ४५ प्रति किलो मिळाल्यास रू. ३० निव्वळ नफा मिळतो. हेक्टरी ४३५० केळीची झाडे असतात, पैकी धागा निर्मितीसाठी ४००० झाडे उपलब्ध झाल्यास ७०० किलो धागा मिळेल. रू. ४५ प्रति किलो भावानुसार रू. ३१,५०० / - उत्पन्न मिळेल. प्रति किलो घाग्याचा खर्च रू. १५ प्रमाणे ७०० किलो धाग्याचा खर्च रू.१०,५०० येऊन रू. २१,००० / - निव्वळ नफा हेक्टरी राहतो.

केळी उत्पन्नाव्यतिरिक्त धागा निर्मितीमुळे शेतकऱ्यांना अधिक/ बोनस उत्पन्न मिळते. बऱ्याच वेळी नैसर्गिक आपत्ती, केळीची कमी भाव, केळी माल वेळेत बाजारपेठेमध्ये व गेल्याने होणारे नुकासन इत्यादी कारणामुळे शेतकऱ्याला फार मोठे आर्थिक नुकसान होते. अशा परिस्थितीत खोडापासून धागा काढल्यास आर्थिक नुकसान कमी करता येते. यंत्राद्वारे केळी खोडाव्यतिरिक्त केळी घडाचा दांडा, पानाची मध्यशिर, घायपात / केतकी इत्यादीचा धागा काढता येतो.

धागा काढण्याच्या यंत्राची तांत्रिक माहिती:

१) ह्या यंत्रास एक अश्वशक्ती, सिंगल फेज, २२० व्होल्टस विद्युत मोटार पासून शक्ती मिळते.
२) यंत्राची लोखंडी फ्रेम मजबूत असून त्यावर विद्युतमोटर, बेल्ट - पुली व त्यावर जाळीचा पिंजरा तसेच फिरत्या लोखंडी पट्ट्याचा ड्रम व त्यावर अर्धगोलाकार झाकण बसविलेले असल्याने हे यंत्र सुरक्षित आहे.
३) ड्रमवर आडव्या जाड पट्ट्या बसविलेल्या आहेत.
४) केळी खोडाच्या पट्ट्या यंत्रामध्ये जाण्यासाठी मार्गदर्शक रूळ बसविलेले आहेत. त्याआधी तांब्याच्या तारांचे दोन ब्रश धागा साफ करण्यासाठी आहेत.

संपर्क पत्ते :
यंत्र खरेदी : जनरल मॅनेजर, आंध्रप्रदेश स्टेट अॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉरपोरेशन लि., अॅडव्होकेटस कॉलनी . ए. सी. गार्डस, हैद्राबाद - ५००००४ 
फोन नं - (०४०) २३३९४२३४ 

नैसर्गिक रंग निर्मिती : स्कूल ऑफ लाईप सायन्सेस
उत्तम महाराष्ट्र विद्यापीठ, पोस्ट बॉक्स ८०, जळगाव - ४२५००१
फोन नं. (०२५७) २२५८४१७ 

केली धागा निर्मिती आणि गांडूळ खतप्रशिक्षण
प्रमुख शास्त्रज्ञम कृषी विज्ञान केंद्र, पाल ता. रावेर, जि. जळगाव - ४२५५०४
फोन नं. (०२५८४) २८८४३९ / २८८५२५ 

केळी धागा विक्री :
१) मे. नेशनल हँडमेड पेपर इंडस्ट्रीज इंडस्ट्रीयल एरिया, रामसिंगपुरा, शिकेरपुर रोड, संगनीर, जयपूर ३०३९०२. (राजस्थान) 

२) मे. जैन इंडस्ट्री, ६४५, गंगौरी बजार, जयपूर - ३०२००२.(राजस्थान)

३) मे. सुरेशकुमार, इकासिल हँडमेड पेपर, १.१० - ११०६, ज्योती नगर, जि. करीमनगर.

४) सलिम पेपर प्रा. लि. , ई - १४२ / १४३, सितापुर इंडस्ट्रीअल एरिया, टॅक रोड, जयपूर - ३०२०२२

अननस

माहिती अद्ययावत करणे चालू आहे, काही काळासाठी प्रतीक्षा करावी.

चिकू

जमीन 
चिकू लागवडीसाठी चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी.

लागवड
लागवडीसाठी खिरणीचा खुंट वापरून तयार केलेले भेट कलम किंवा शेंडा कलम निवडावे. लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर अंतरावर खड्डे खणून त्यामध्ये चांगली माती, तीन घमेली शेणखत, दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 100 ग्रॅम कार्बारिल भुकटी यांच्या मिश्रणाने भरावेत. लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेटबॉल या जातींची निवड करावी. 
लागवड केल्यानंतर पाऊस सुरु झालेवर आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अशी दोन भागात विभागुन 150: 100: 100 NPK खतांची मात्रा द्यावी. 
चिकूच्या झाडाला नेहमी पाणी मिळाले पाहिजे, परंतु पाणी जास्त होणार नाही याची काळजी घ्या. पाणी जास्त झाले तर फुले आणि फळांची गळ होते पाणी ठिबक पद्धतीने द्यावे.

कीड नियंत्रण 
बी पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण
या किडीच्या प्रादुर्भावामुळे फळांचे उत्पादन घटते, फळांची गुणवत्ताही खालावते. बागेची स्वच्छता ठेवावी. बागेमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश पोचण्यासाठी गरजेनुसार फांद्यांची छाटणी करावी. कीडलेली तसेच गळलेली फळ नष्ट करावित. ०१ मि.लि. प्रोफेनोफॉस (40 टक्के प्रवाही) किंवा ०१ मि.लि. डेल्टामेथ्रीन (2.8 टक्के प्रवाही) किंवा ०१ मि.लि. लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (05 टक्के प्रवाही) प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीडनाशक आलटून पालटून फवारावे. 

कळी पोखरणारी अळीचे नियंत्रण 
नोव्हेंबर ते फेब्रुवारी आणि मे जून महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. कळी पोखरणाऱ्या अळीचा उपद्रव झाला तर फलधारणा होत नाही.
किडीच्या नियंत्रणासाठी 0.45 ग्रॅम इनामेक्‍टीन बेन्झोएट (पाच एसजी) किंवा एक मि.लि. डेल्टामेथ्रीन (2.8 ईसी) किंवा एक मि.लि. लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (पाच ईसी) किंवा एक मि.लि. प्रोफेनोफॉस (40 ईसी) प्रति लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी पन्नास टक्के फुले आल्यानंतर करावी. त्यानंतर एक महिन्याच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. कीटकनाशक निवडताना कोणतेही कीटकनाशक लागोपाठच्या फवारणीत परत वापरू नये. फवारणीपूर्वी झाडावर तयार असलेली फळे काढून घ्यावीत. 

पेरू

यशस्वी लागवड पेरूची
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर 

हवामान - पेरूची लागवड प्रामुख्याने उष्ण व समशीतोष्ण कटिबांधाच्या प्रदेशामध्ये केली जाते. कमाल व किमान उष्ण तापमानात फरक असलेल्या कोरड्या व उष्ण हवामानाच्या प्रदेशामध्ये पेरूचे उत्पादन चांगले येते. जास्त उष्णतामान असलेल्या प्रदेशापेक्षा हिवाळ्यामध्ये अधिक थंडी असलेल्या प्रदेशात फळांची गुणवत्ता अधिक चांगली राहते. जास्त पावसाच्या तसेच दमट हवामानाच्या भागामध्ये देवी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. तसेच ज्या भागामध्ये धुके अधिक पडते तेथे पेरूची लागवड करणे शकयतो टाळावे. पेरूचे झाड काटक तसेच पाण्याचा ताण सहन करणारे असल्याने दुष्काळी भागात देखील बाग पाण्याचा ताण सहन करते. 

जमीन - पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या, हलक्या मध्यम ते काळ्या जमिनीत पेरूची लागवड करावी. दीड ते दोन फूट खोल काळ्या व त्याखाली मुरुमाचा थर असलेल्या जमिनीत पेरूची लागवड यशस्वी होऊ शकते. हलक्या जमिनीत लागवड केल्यास जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा. सर्व साधारण जमिनीचा सामू ५ ते ७.५ च्या दरम्यान असावा. चुनखाडीच्या, पाण्याचा निचरा न होणाऱ्या चोपण जमिनीत पेरूची लागवड करणे टाळावे. 

सुधारित जाती - पेरूच्या गरावरून दोन जाती आढळून येतात. एक म्हणजे पांढऱ्या गराचा सफेद पेरू आणि दुसरा लाल गारच गुलाबी पेरू. सफेद पेरू गोडीला जास्त चांगला असून तो लोकप्रिय आहे. काही जाती प्रादेशिक नावावरून ओळखल्या जातात. 

१) सरदार पेरू - पुर्वी ही जात लखनौ -४९ या नावाने प्रचलित होती. निवड पद्धतीने ही जात तयार करण्यात आली असून या जातीची झाडे उंच न वाढता पसरट (आडवी) वाढतात. पाने अंडाकृती असून दोन्ही टोकांकडे निमुळती होत जातात. फळे आकाराने मोठी व गोल असतात. शिवाय फळांत बियांनी संख्या कमी असते. गर, सफेद, घट्ट, मऊ, असून चवीस गोड असतो. 

ही जात उत्पादनास चांगली असून महाराष्ट्रात या जातीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. 

२) लखनौ ४६ - ही जात निवड पद्धतीने तयार केली असून या जातीचे झाड आकराने लहान असून फार सावकाश वाढते. पाने अंडाकृती दोन्ही टोकांकडे निमुळती असून आकाराने मोठी असतात. खोडाची साल राखी, करड्या रंगाची असून त्यावर हिरव्या रंगाचे ठिपके असतात. फळ अंडाकृती, मध्यम आकाराची असून फळाची साल गुळगुळीत असते व पिकल्यावर ती पिवळी पडते. गर गोड असून बिया मऊ असतात. उत्पादन सरदार जातीपेक्षा कमी आहे. 

३) नाशिक - या जातीची झाडे सरळ व उंच वाढतात. फळ बाटलीसारखे देठाकडे निमुळते व लांब असते. फळाची साल खडबडीत असते. बिया गराच्या मध्यभागी एकवटलेल्या असतात. गर घट्ट व गोड असतो. फळ टणक टिकाऊ असते. म्हणून दूरच्या मार्केटला पाठविता येते. कँकर रोग या जातीवर कमी प्रमाणात आढळतो. 

४) धारवाड - धारवाड जातीचे झाड मध्यम आकराचे असून फळ लहान असून देठाकडील भाग निमुळता असतो. फळे टणक व टिकाऊ असून बियांचे प्रमाण अधिक असते. या जातीचे उत्पादन कमी आहे. 

५) ढोलका - या जातीचे झाड उंच असून घेर मोठा असतो. फळे आकाराने मोठी व त्यात बियांचे प्रमाण कमी असते. गर गोड असतो. उत्पदान साधारण आहे. 

अभिवृद्धी - पेरूची अभिवृद्धी ही बियांपासून तसेच कलमापासून केली जाते. बियांपासून तयार केलेल्या झाडांचे उत्पादन, फळांची प्रत याविषयी खात्री देता येत नाही. त्याकरिता इच्छित गुणधर्म टिकविण्यासाठी दाब कलम, भेटकलम, गुटीकलम या पद्धतींचा अवलंब केला जातो. 

दाबकलम - दाब कलम यास 'जिभली' कलम असेही म्हणतात. दाब कलम करण्यासाठी खोडालगतच्या व जमिनीवर टेकवता येतील अशा फांद्या निवडाव्यात या फांद्या जोमाने वाढणाऱ्या पण जास्त जुन्या किंवा कोवळ्या नसाव्यात. निवडलेल्या फांदीला खालील बाजूस काप द्यावा. हा काप खालील बाजूने फांदीच्या मध्य भागाकडे शेंड्याच्या दिशेने तिरपा २ ते ३ सें. मी. काप घ्यावा. हा भाग जिभलीसारखा दिसतो म्हणून याला 'जिभली' कलम असेही म्हणतात. काप घेतलेला खालील भाग जमिनीवर अगर कुंडीमध्ये (परळीत) वाकवून मातीत गाडावा. अशा फांदीच्या १५ सेमी लांबीवरील पाने काढून टाकवीत. हा भाग पक्व असावा. पाने काढताना डोळ्यास इजा होणार नाही. याकडे लक्ष द्यावे. जमिनीवर टेकलेल्या डोळ्यापैकी एका चांगल्या डोळ्याची निवड करावी. त्या डोळ्याच्या खोडाकडे अर्धा सेंमी अंतरापासून फांदीच्या शेंड्याकडे खोल काप घ्यावा. या कापाची लांबी मध्यभागातून २ ते ३ सेंमी असावी. कापाचे दोन्ही भाग एकत्र जोडले जाऊ नये म्हणून त्यामध्ये बारीकशी काडी घालावी. या कापाला जर्मिनेटर चा (१लि. पाण्यामध्ये २५ मिली जर्मिनेटर) वापर केल्यास मुळ्या लवकर व अधिक प्रमाणात फुटतात. 

हा कलम केलेला भाग काळजीपुर्वक मातीत दाबावा व पाणी द्यावे. कलम केलेली फांदी वर उचलली जाऊ नये म्हणून त्यावर लहानसा दगड ठेवाव. कलमास १ महिन्यानंतर मुळ्या फुटण्यास सुरुवात होते. मुळ्यांची वाढ होऊन कलमे झाडापासून वेगळी करण्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी लागतो. 

कलम मातृवृक्षापासून वेगळे केल्यानंतर ते सरळ आणि व्यवस्थित करावे. रोप काही दिवस सावलीत ठेवून नंतर कायम जागी लावावे. 

लागवड - साधारणपणे मे महिन्यात जमिनीची आखणी करून १५ x १५ फुट अंतरावर २ x २ x २ आकाराचे खड्डे घ्यावेत. हे खड्डे भरताना तळाशी पालापाचोळा घालून त्यावर १५ ते २० किलो चांगले कुजलेले शेणखत आणि २५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत टाकून चांगल्या मातीने खड्डे भरून घ्यावेत. उन्हाळी जोराचा पाऊस संपल्यानंतर कलम केलेली रोपे त्यामध्ये लावावीत. थेट कलम केलेली रोपे लावताना कलम केलेला भाग जमिनीपासून १५ ते २० सें.मी. वर राहील अशा पद्धतीने लावावीत. 

खत : लागवडीनंतर लहान झाडांची जोमाने वाढ करण्याच्या हेतूने पहिले ४ वर्षे फळे घेण्यास सुरुवात करेपर्यंत द्यावीत. त्याचे प्रमाण पुढीलप्रमाणे असावे. 

१) एक वर्षाच्या झाडास ५ ते ६ किलो शेणखत/कंपोस्ट खत आणि २५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे. 

२) दुसऱ्या वर्षी झाडास १० ते १२ किलो शेणखत/कंपोस्ट खत आणि ५०० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे. 

३) तिसऱ्या वर्षी १५ ते १८ किलो शेणखत/कंपोस्ट खत आणि ७५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे. 

४) चौथ्या वर्षी २० ते २५ किलो शेणखत/कंपोस्ट खत आणि १ किलो कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे. 

५) पाचव्या वर्षी तसेच त्यापुढील प्रत्येक वर्षी २५ ते ३० किलो शेणखत/कंपोस्ट खत आणि १ ते १.५ किलो कल्पतरू सेंद्रिय खत वापरावे. 

वरील खते वापरताना ती खोडाभोवती बांगडी पद्धती ने गाडून द्यावीत. खत दिल्यानंतर बागेस पाणी द्यावे. 

पाणी - पेरूची झाडे लहान असताना पाण्याच्या पाळीतील अंतर कमी ठेवावे. पाण्याच्या पाळीतील अंतर वाढल्यास एकदम जादा पाणी देण्यापेक्षा अंतर कमी ठेवून बेताने पाणी द्यावे. दिलेल्या पाण्याचा झाडांना योग्य उपयोग व्हावा. याकरीता खोडाभोवती आळी किंवा वाफे बांधून घ्यावेत. वाफ्यात किंवा आळ्यात दिलेले पाणी खोडाला लागू नये म्हणून खोडाभोवती मातीचा उंचवटा करावा. बागेस उन्हाळ्यामध्ये १० ते १५ दिवसांच्या अंतराने तर हिवाळ्यात १५ ते २० दिवसांच्या अंतराने आणि पावसाळ्यात गरजेनुसार पाणी द्यावे. याप्रमाणे माल चालू होईपर्यंत ४ वर्षापर्यंत पाणी द्यावे. बहार धरल्यानंतर फुले निघाल्यापासून फळे तयार होईपर्यंत आणि विशेषत: फळे पोसण्याच्या काळामध्ये बागेस पाणी वेळेवर नियमित द्यावे. फळांची काढणी झाल्यानंतर दुसऱ्या बहाराची फुले लागेपर्यंत गरजेपुरतेच पाणी द्यावे. 

नवीन बागेची निरोगी, लवकर, जोमदार वाढ होण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या खालीलप्रमाणे फवारण्या घ्याव्यात. 

१) पहिली फवारणी : (लागवडीनंतर १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १५० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर १ ते १॥ महिन्यांनी ) : जर्मिनेटर ४०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २५० मिली. + १५० लि.पाणी.

नंतर दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी वरील प्रमाणात पहिली फवारणी जून - जुलैच्या दरम्यान आणि दुसरी फवारणी ऑगस्ट - सप्टेंबरच्या दरम्यान करावी, म्हणूजे तीन वर्षानंतर बहार धरता येईल. 

बहार धरणे - पेरूला वर्षातून ३ वेळा बहार येतो. बहाराची फुले जून, ऑक्टोबर आणि जानेवारी महिन्यात येतात. जूनमध्ये फुले येणार्या बहाराला मृग बहार तर जानेवारी महिन्यात फुले येणाऱ्या बहाराला आंबेबहार म्हणतात. 

स्थानिक परिस्थिती आणि मार्केटचा अभ्यास करून वर्षातून एकच बहार घेतल्याने उत्पादन अधिक चांगल्या प्रतिचे मिळते. तसेच पाणी तोडणे, पाणी देणे, मशागत करणे रोगराईचा बंदोबस्त करणे इ. गोष्टी सुलभतेने करता येतात. महाराष्ट्रातील हवामानाचा विचार केला असता 'मृग बहार' धरणे किफायतीशीर ठरते. मृग बहाराची फळे धरण्यासाठी बागेस फेब्रुवारी ते मे मध्ये ताण द्यावा. फेब्रुवारी ते मे उन्हाळाच असल्याने बागेस ताण देणे सोपे होते. मृग बहाराची फळे हिवाळ्यात तयार होतात. त्यामुळे फळमाशीचा उपद्रव कमी होतो. तसेच फळे चांगल्या प्रतीची मिळतात. 

भारी जमिनीत ४० ते ६० दिवसांचा ताण द्यावा. हलक्या जमिनीस ३० ते ३५ दिवसांचा ताण द्यावा. पाणी तोडल्यामुळे झाडाची वाढ थांबते व पाणगळ होते. त्यामुळे झाडांना संपूर्ण विश्रांती मिळून झाडांमध्ये अन्नद्रव्याची साठवण होते आणि ह्या अन्नद्रव्याचा पुढे पाणी दिल्यानंतर फुलोरा तयार होण्यास चांगला फायदा होतो. अर्धवट पानगळ झाल्यानंतर बागेतील जमिनीची मशागत करण्याकरीता हलकीशी खाणणी किंवा नांगरणी करावी. भारी जमिनीत पानांची गळ लवकर होत नाही. म्हणून खोल नांगरणी करावी. बागेतील तण पुर्णपणे काढून जमीन भुसभुशीत करावी. 

ताण देताना काळजीपुर्वक द्यावा, जर जास्त ताण दिल्यास पानगळ अधिक होऊन फुले धरणाऱ्या काड्यांची मर होते व त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. मे महिन्यात खत देऊन खोडाभोवती मातीची हुंडी करून आळी किंवा वाफे बांधणी करावी. 

छाटणी (झाडांना आकार देणे) - झाड लहान असल्यापासून त्याला वळण देणे गरजेचे असते. सुरुवातीला मुख्य खोडावरच झाडाची वाढ करून घ्यावी. त्यासाठी १ ते १।। फुटापर्यंत होणारी फूट काढून टाकावी. त्यानंतर झाडाचा गोलाकार घेर होईल अशा पद्धतीने ३ ते ४ फांद्या वाढवाव्यात. किडलेल्या किंवा वाळलेल्या फांद्या छाटाव्यात. तसेच गर्दी करणाऱ्या फांद्या आणि जमिनी लगतची फूट काढावी. जुन्या झाडांची छाटणी केल्यानंतर त्याच्यावर नवीन फूट येते व त्यामुळे त्यांना नवजीवन मिळते. 

पेरूच्या झाडाला नवीन फुटीवर फुले व फळे येतात. या नवीन फुटी येण्यासाठी छाटणी करणे आवश्यक आहे. झाडांची छाटणी एप्रिल - मे महिन्यात करावी. झाडांची जास्त छाटणी केली तर उत्पादन कमी येते. मात्र फळांचा आकार, वजन व फळाची प्रत चांगली मिळते. 

कीड व रोग - 

१) साल व शेंडा पोखरणारी अळी - 

या किडीचा प्रादुर्भाव पेरूवर मोठ्या प्रमाणात होत असतो. विशेषत: दुर्लक्षित बागेमध्ये हा प्रादुर्भाव आढळतो. या किडीची अळी रात्रीच्या वेळी सालीच्या आतील बाजूस शिरून आतील भागावर उपजीविका करते. त्यावेळेला ती सालीच्या भुसकाटात व तिच्या शरीरातून निघणाऱ्या धाग्यापासून तयार झालेल्या जाळीत लपून बसते. या किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास झाड सुकते व वाळते. 

या किडीच्या नियंत्रणासाठी पेट्रोलमध्ये प्रोटेक्टंट पावडरचा २:१ प्रमाणात मिसळून त्यामध्ये कापसाचा बोळा भिजवून तो बोळा तारेच्या सहाय्याने छिद्रात घालावा व वरून छिद्र चिखलाने लिंपावे. 

२) पिठ्या ढेकण्या : ही कीड कोवळ्या फुटीतील व फळांतील रस शोषून घेते. याशिवाय किडीच्या अंगातून स्रवणाऱ्या गंधासारख्या चिकट पदार्थांवर काळ्या बुरशीची वाढ होते. त्यामुळे फळांची प्रत बिघडते व उत्पादनात घट येते. 

३) फळमाशी : 

पेरूवर या किडीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येतो. पुर्ण वाढ झालेली मादी. फळाच्या सालीमध्ये होल पाडून अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या फळ पोखरून गरामध्ये बसतात. त्यामुळे फळ कुजते. आल्या मोठ्या होतात तसा फळाचा कुजलेला भाग वाढत जाऊन फळे गळू लागतात. 

या किडीचा प्रादुर्भाव पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात होतो. 

रोग - 

१) पेरू फळावरील देवी रोग - हा बुरशीजन्य रोग असून याला देवी किंवा खैऱ्या असेही म्हणतात. सतत भरपूर पाऊस व जास्त दमट हवा यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. बुरशीची वाढ फळांच्या सालीवर होत असते. हा रोग कोवळ्या, हिवाव्या फळांवर अधिक प्रमाणात आढळतो. फळांवर प्रथम रोगाचे लहान लालसर तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. लालसर ठिपक्यासाठी फळाची बाह्यसाल गोलाकार, करवतीसारखी फाटते व फळे तडकतात. फळावर गोलाकार काळ्या पुळ्या दिसतात. या रोगाचे व्रण फळामध्ये खोलवर रुतलेले नसतात. रोगट फळे चवीस पांचट लागतात. पक्व फळावर क्वचितच या रोगाची लागण होते. काही पानांवर देखील या रोगाचा प्रादुर्भाव जाणवतो. जुन्या पानांवर रोगाचे लालसर तपकिरी रंगाचे वर्तुळाकार ठिपके दिसतात. या रोगाचा प्रादुर्भाव सरदार जातीच्या पेरूवर अधिक प्रमाणात होतो. 

२) पाने तांबडी पडणे - झिंक द्रव्याच्या कमततेमुळे ही विकृती आढळते. पाने लहान राहून लांबट होतात. पानांचा हिरवा रंग जाऊन पिवळसर फिक्कट चट्टे दिसतात. क्वचित पानांच्या कडा लाल होतात व त्याचे प्रमाण वाढत जाऊन संपूर्ण पान लाल पडते. त्यामुळे पाने पक्व होण्याआधीच गळून पडतात. त्यामुळे झाडांची वाढ खुंटते. 

३) फांद्यावरील खैऱ्या रोग - हा बुरशीजन्य रोग असून त्याची लक्षणे फांद्यावर व सालीवर वेड्या वाकड्या आकाराचे खोलगट चट्टे दिसून येतात व साल फाटलेली दिसते. रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास फांद्या सुकतात. 

या कीड व रोगांवर प्रतिबंधक व प्रभावी उपाय करण्यासाठी तसेच भरघोस, दर्जेदार पेरू उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची खालीप्रमाणे फवारणी करावी. 

फवारणी : 

१) पहिली फवारणी : (बहार धरल्यानंतर १५ दिवसांनी): जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ४०० मिली. + क्रॉंपशाईनर ४०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + हार्मोनी १५० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (बहार धरल्यानंतर ४५ दिवसांनी): जर्मिनेटर ७५० मिली.+ थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + न्युट्राटोन ३०० मिली. + हार्मोनी २५० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (बहार धरल्यानंतर ७५ दिवसांनी): थ्राईवर १ लि.+ क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + प्रिझम ७५० मिली.+ न्युट्राटोन ७५० मिली. + हार्मोनी ३०० ते ४०० मिली. + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (बहार धरल्यानंतर ९० ते १०५ दिवसांनी) : थ्राईवर १॥ लि. + क्रॉंपशाईनर १॥ लि. + राईपनर १ लि. + प्रोटेक्टंट १ किलो + न्युट्राटोन १ लि. + हार्मोनी ४०० ते ५०० मिली + २५० लि.पाणी.

माल चालू झाल्यानंतर १५ ते २१ दिवसांच्या अंतराने वरील फवारणीप्रमाणे फवारणी चालू ठेवावी. म्हणजे प्रत्येक तोड्याचा माल उत्तम प्रतीचा मिळून उत्पादनात वाढ होते. 

पेरूची काढणी - फुले आल्यानंतर १२ दिवसांत फलधारणा होते. लहान फळे सुरुवातीला झपाट्यानने वाढतात. नंतर त्यांची वाढ थोडी मंदावते व पुन्हा जोरात वाढतात. सरदार (लखनौ - ४९) ह्या जातीचे पेरू तयार होण्यास १०५ ते १३५ दिवस लागतात. थंडी अधिक असल्यास फळे पिकण्यास वेळ लागतो. तर तापमान अधिक असल्यास ती लवकर पिकतात. लाल गर असलेल्या पेरूमध्ये सुरुवातीला 'टॉंरटॉंरीक आम्ल' (चिंचेसारख्या चवीचे) असते. फळ पिकताना मात्र त्यात 'सायट्रीक आम्ल' (लिंबूवर्गीय फळांच्या चवीसारखे) असते. सिडलेस जातीत सुरूवातीस आम्लाचे प्रमाण जास्त असते. मात्र बियायुक्त जातीत आम्लाचे प्रमाण फळे तयार होताना जास्त असते. 

फळांचा गर्द हिरवा रंग जाऊन ती फळे हिरवट पिवळसर झाली म्हणजे ती तयार झाली असे समजावे, तसेच फळे पिकताना किंचीत मऊ होतात. तोडणी शक्यतो सकाळी व संध्याकाळी करावी. फळे वाहतुकीसाठी पानांनी आच्छादलेल्या टोपल्या किंवा प्लॅस्टिक क्रेटसचा वापर करावा. फळांचा मोठा ढिग न करता सावलीत पसरून लावावीत. किडलेली, डागाळलेली व खराब फळे बाजूला निवडून काढावीत. फळे तोडताना फळांना देठ ठेवू नये, त्याने फळे खराब होतात. 

उत्पादन : रोपांपासून तयार केलेल्या झाडांना तिसऱ्या ते चौथ्या वर्षी फळे लागतात. तर कलमापासून तयार केलेल्या झाडांना २ ऱ्या वर्षापासून बहार धरता येतो. कलमी पेरूचा मृग बहार धरल्यास सरासरी १००० ते २००० फळे (२०० ते ३५० किलो) मिळतात. रोपांपासून तयार केलेल्या झाडांना ५०० ते ८०० फळे (६० ते १०० किलो) मिळतात. 

सौजन्य- डॉ. बावस्कर टेक्नॉलॉजी

कोकम

जमीन
हलकी / भारी चालते,पाण्याचा निचरा आवश्यक.

लागवड
पूर्व मशागत - 6X6 मीटर अंतरावर 2X2X2 फुटाचे खड्डे करून शेणखत आणि मातीने एकत्रित भरावे. दोन ओळी आणि दोन झाडात १५ फुट अंतर असावे. शेनखत 20 किलो आणि सिंगल सुपर फॉस्फेट 1 किलो घेवून खड्डे भरून घ्यावेत. वाळवीपासुन रक्षणासाठी 50 ग्रॅम (2%) फोलिडोल पावडर प्रत्येक खड्यात टाकावी.
लागवड कालावधी - जून / जुलैमध्ये पाऊस मान पाहून 2 रोप किंवा 1 कलम लावावे. 
प्रजाती - अमृता, हतिस (पपई प्रमाणे हे मादी झाड असलेने स्वतंत्र 5 ते 6% नर रोपे बागेत लावावी)

खत व्यवस्थापन 
पहिल्या वर्षी -
शेनखत - 2किलो 
युरिया - 100 ग्रॅम
सिंगल सुपर फॉस्फेट - 150 ग्रॅम
म्यूरेट ऑफ़ पोट्याश - 50 ग्रॅम

दहा वर्षापर्यंत प्रमाण वाढवत जावे. 
शेनखत - 20-30 किलो 
युरिया - 1 किलो 
सिंगल सुपर फॉस्फेट - 1.5 किलो
म्यूरेट ऑफ़ पोट्याश - 500 ग्रॅम

कीड व रोग व्यवस्थापन 
पिंक रोग पांढऱ्या रंगाचे गोलसर ठिपके पडतात व उत्पन्न कमी होते. नियंत्रणासाठी लागन भाग कापून टाकुन त्यावर बोर्डो पेस्ट लावावी.

काजू

जमीन
पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व जमिनींत, जांभा दगडापासून तयार झालेल्या वरकस जमिनीत काजूचे पीक चांगले येते. काजूचे झाडास थंडी सहन होत नाही. रेताड आणि दरसाल सुमारे ७५ - ३८० सेंमी. पाऊस पडणाऱ्या भागातही चांगले वाढते. सामान्यतः काजूची लागवड समुद्रकिनाऱ्या नजीकच्या प्रदेशात केली जाते. परंतु समुद्रकिनाऱ्यापासून १६० किमी. इतक्या आत किमान तापमान ७-१० अंश से. असलेल्या प्रदेशात त्याची लागवड करता येते. क्षारपड जमीन वगळता इतर सर्व प्रकारची जमीन चालते. 



बियाणे
डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने काजूच्या वेंगुर्ला - १ ते वेंगुर्ला - ८ जातीचे संशोधन केले आहे. यापैकी प्राधान्याने वेंगुर्ला - 4, वेंगुर्ला - 8 या जातींची कलमे निवडावीत. लागवडीसाठी वेंगुर्ला-1, वेंगुर्ला-4, वेंगुर्ला-6, वेंगुर्ला-7, वेंगुर्ला-8 या जातींची निवड करावी. 

लागवड
रोपे तयार करण्यासाठी लागणारे बी निरोगी, एकसारखे मोठया आकाराचे व वजनदार आणि भरपूर बी देणाऱ्या झाडांपासून निवडावेत. वाफ्यात 20 दिवसांत रोपे 10-13 सेंमी. उंच वाढलेनंतर खड्यात लावतात. खड्यासाठी 1.5 X 1.5 X 1.5 फूटाचे खड्डे घेवून पावसाची सुरुवात झालेवर कलमे / रोपे लावावित. बिया लावण्याच्या वेळी खड्डयात बोर्डो मिश्रण टाका. खड्डा भरताना त्यामध्ये चांगली माती, चार घमेली शेणखत, तीन किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण भरा. दोन खड्डयांमधील अंतर 4 ते 9 मी. ठेवावे. एक हेक्टरमध्ये सुमारे 250 झाडे बसवतात. कोकणातील उतारावरील रोपांना पावसाच्या पाणलोटापासून वाचविण्यासाठी खड्डयाच्या वरच्या बाजूला मातीचा बांध घाला. 


कलम

कलमे लावताना कलमांची हंडी फुटणार नाही, याची काळजी घ्या. कलमाला काठीचा आधार द्या. कलमाच्या खुंटावर येणारी फूट काढून टाका. कलमांच्या जोडावरील प्लॅस्टिकची पिशवी काढून टाकावी. आळ्यात गवताचे आच्छादन करावे. उन्हाळ्यात गरजेनुसार कलमांना पाणी द्यावे.

खत व्यवस्थापन
मोठया झाडांना साधारणपणे पाचव्या वर्षापासून प्रतिवर्ष पावसाळयात प्रतिझाड ४ ते ५ घमेली शेणखत, २ किलो युरिया, १.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ०.५०० गॅ्रम म्युरेट ऑफ पोटॅश ही खते द्यावीत. त्यापूर्वी वयोमानानुसार प्रतिवर्ष मात्र कमी करून द्यावी.


पाणी व्यवस्थापन 
कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचे प्रमाण जास्त असते. या फळबागांना उन्हाळ्यात पाणी व्यवस्थापन संवेदनशील असते. फळबागांच्या सिंचनासाठी अस्तरित शेततळ्याचा (कोकण जलकुंड तंत्रज्ञान) वापर फायदेशीर आहे. पाणी साठवणीसाठी दर दहा झाडांमध्ये जमीन जर डोंगरउताराची व खडकाळ असल्यास 4 x 1 x 1 मी. किंवा 2 x 1 x 2 मी. या मापाचा चौकोनी खड्डा खोदावा. अस्तराच्या स्वरूपात माती किंवा भातपेंढ्याचा वापर करून सुमारे 15 सें.मी. जाडीचा थर पसरावा. अस्तरीकरनामध्ये कीटकनाशक पावडर वापरावी. अस्तरीकरण करताना प्लॅस्टिक व्यवस्थित पसरावे. बाष्पीभवनाद्वारा होणारा पाण्याचा ऱ्हास टाळण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर 100 मि.लि. नीम / उंडी तेल ओतावे. तसेच तेलाच्या उग्र वासामुळे मोकाट जनावरे, उंदीर, सरडा, विंचू इत्यादी पाण्याजवळ जात नाहीत. 


किड व रोग नियंत्रण
कीड
बी पोखरणारी अळी
बी व फळ जेथे एकमेकांना चिकटलेली असतात, त्यामधून प्रादुर्भाव होतो. झाडावरील भुशासारखा भुसा बियांवर दिसू लागला की अस्तित्व समजते. प्राथमिक अवस्थेत रोगट फळे व बिया गोळा करुन नष्ट कराव्यात.

मूळ किडा व खोड किडा
याच्या प्रदुर्भावमुळे झाड मरते. त्यांच्या नाशासाठी क्रिओसोटमध्ये भिजवलेले कापसाचे बोळे छिद्रात ठेवाव्यात. मेलेले किडे काढून टाकतात. पाने खाणाऱ्या अळया व गर्दभुऱ्या फुलकिडयांचाही उपद्रव होतो. त्यांच्या नाशासाठी फॉलिडॉल फवारावे.

रोग 
रोप कूज
हा रोग पिथियम स्पायनोसम व फायटॉप्थोरा जातीच्या कवकांमुळे (हरितद्रव्य रहित बुरशीसारख्या सूक्ष्म वनस्पतींमुळे) होतो. यामुळे रोपे उगवल्यानंतर कुजतात. रोग निवारणासाठी बिया लावण्याच्या वेळी खड्डयात बोर्डो मिश्रण टाकतात.

भुरी
ओडडियम जातीच्या बुरशीमुळे हा रोग होतो. डिसेंबर जानेवारी महिन्यात ढगाळ हवा पडल्यास, मोहोरावर या रोगाचा प्रादुर्भाव होतो. या काळात तुडतुडयांचाही उपद्रव होतो. फॉलिडॉल व गंधक सम प्रमाणात घेऊन ती भुकटी मोहोरावर मारावी. 

फळकूज
रायझोपस व ऍस्परजिलस जातीच्या बुरशीमुळे हा रोग होतो. रोगनाशनासाठी बोर्डो मिश्रण फवारावे.

सडी लागणे
पिलिक्युलेरिया साल्मोनीकलर या बुरशीमुळे झाडाच्या फांद्यावरुन खाली सुकू लागतात. रोग इतर सर्व भागांत पसरुन झाड मरते. रोग निवारणाचे खात्रीचे उपाय नाहीत त्यामुळे रोगग्रस्त झाडे नष्ट करावित.

टी मॉस्किटोचा प्रादुर्भाव 
पालवी व मोहोरावर काजूवरील ढेकण्या (टी मॉस्कीटो)चा प्रादुर्भाव दिसून येतो. पूर्ण वाढलेले ढेकण्या तसेच त्यांची पिल्ले कोवळ्या पालवीतून, मोहोरातून तसेच कोवळ्या फळांमधून रस शोषून घेतात व त्या जागी विषारी द्रव सोडतात. त्यामुळे कोवळ्या पालवीवर व मोहोरावर काळे चट्टे उठतात. हे चट्टे वाढून पूर्ण पालवी व मोहोर सुकतो, जळल्यासारखा दिसतो. फळावर काळ्या रंगाचे खोलगट खड्डे उठतात. या किडीचे वेळीच नियंत्रण न केल्यास उत्पादनात घट संभवते. 

फुलकिडीचा प्रादुर्भाव 
कोवळ्या पालवीवर व मोहोरावर फुलकिडीचा (थ्रिप्स) प्रादुर्भाव दिसून येतो. फुलकिडी पिवळसर रंगाच्या, अतिशय सूक्ष्म आकाराच्या असतात. त्या कोवळी पालवी, कोवळा मोहोर तसेच कोवळी फळे खरवडतात. फळांवर करड्या रंगाचे चट्टे उठलेले दिसतात. काजू बिया खराब दिसतात, वेड्यावाकड्या वाढतात, तसेच उत्पादनात घट येते. 

वरील दोन्ही किडींच्या नियंत्रणासाठी मोहोर अवस्थेतील बागेमध्ये, प्रोफेनोफॉस 10 मि.लि. प्रति 10 लिटरप्रमाणे फवारणी करावी. फळधारणा सुरवात झालेल्या बागेमध्ये, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ( 5 टक्के) 6 मि. लि. प्रति 10 लिटर. 

उत्पन्न
पुर्ण वाढलेले काजूचे झाड साधारण १० ते १२ वर्षानंतर १५ ते २० किलोपर्यंत काजू बीचे उत्पन्न देते. एका झाडापासून २ ते २.५ हजार रूपयांचे उत्पन्न मिळू शकते. प्रत्येक झाडापासून मिळणारी फळे व बिया यांचे उत्पन्न निरनिराळे असते. पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून सरासरी 68 किग्रॅ. फळे व 9 किग्रॅ. बिया मिळतात.

शासकीय सहाय्य्य
काजू लागवडीसाठी म. गां. रा. ग्रा. रो. हमी योजनेतून तीन वर्षासाठी अनुदान मिळत असून अल्प व अत्यल्प भूधारकांना याचा मोठया प्रमाणावर लाभ घेता येईल. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतक-यांनी नजिकच्या ग्रामपंचायतीत ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.

संपर्क - 02366-262234 
प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग.

आंबा

जमीन - 
आंबा फळझाडास उत्तम निचऱ्याची जमीन योग्य असते. भारी चिकण मातीच्या, पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनी आंब्यासाठी योग्य नसतात.


लागण -
हे फळपीक मुख्यतः दमट तसेच कोरड्या हवामानात चांगले येते. हापूस, रत्ना, सिंधू आणि कोकण रुची या दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या जाती लागवडीस योग्य आहेत. 

आंब्याचे झाड हे बहुवर्षीय आहे, त्यामुळे एकदा लागवड केल्यानंतर जमिनीतील दोष काढता येणे अवघड होते. तेव्हा लागवडीपूर्वीच योग्य जमिनीची निवड करावी. निवडलेल्या जमिनीत पावसाळा सुरू होण्यापूर्वी एप्रिल-मे महिन्यांत 10 - 10 मीटर अंतरावर 1 - 1 - 1 मीटर आकाराचे खड्डे खणून ते चांगली माती आणि तीन ते चार घमेली कंपोस्ट किंवा शेणखत आणि तीन किलो सिंगल सुपर फॉस्फेट या मिश्रणाने भरावे. 

कलम पद्धत -
कलमे करण्यासाठी मे ते जुलै हा कालावधी योग्य असतो. 15 ते 20 दिवसांचे रोप मुळासकट (कोयीसह) काढून घ्यावे. रोपाचा खालचा सात ते नऊ सें.मी.चा भाग ठेवून शेंडा छाटावा. कापलेल्या टोकामधून सुमारे चार ते सहा सें.मी. लांबीचा बरोबर मध्ये काप घ्यावा. कलमे करायची जातीची तीन ते चार महिने वयाची, जून, निरोगी आणि डोळे फुगीर, परंतु न फुटलेली 10 ते 15 सें.मी. लांबीची काडी कापून घ्यावी. त्या काडीवरील सर्व पाने कापून टाकावीत. काडीच्या खालच्या बाजूस चार ते सहा सें.मी. लांबीचे दोन तिरकस काप विरुद्ध बाजूला देऊन पाचरीसारखा आकार द्यावा. त्यानंतर ही काडी मुळ रोपांवर दिलेल्या कापात व्यवस्थित बसवावी. हा जोड दोन सें.मी. रुंद व 20 सें.मी. लांबीच्या पॉलिथिनच्या पट्टीने घट्ट बांधून घ्यावा. नंतर ही कलमे 14 x 20 सें.मी. आकाराच्या पॉलिथिनच्या पिशवीत लावावीत. लावताना कलमांचा जोड मातीच्या वर राहील याची काळजी घ्यावी. कलम बांधल्यापासून 15 ते 20 दिवसांत काडीला नवीन फूट येते. पावसाळा सुरू झाला की लागवड करावी. कलमाची पिशवी अलगद कापून काढावी. पिशवीतील कलम मातीच्या हुंडीसह भरलेल्या खड्ड्याच्या मध्यभागी ठेवून लावावे. लागवड करतेवेळी कलमाचा जोड जमिनीच्या थोडा वर राहील असे पाहावे. कलमासाठी बांधलेली प्लॅस्टिक पिशवी किंवा सुतळी काढून टाकावी. लागवडीनंतर कलमांना मातीचा आधार द्यावा.


मोहोर संरक्षण 
आंबा पिकास पाण्याचा ताण महत्त्वाचा आहे. पावसाळ्यानंतर आंब्याच्या झाडाला सतत पाणी मिळत गेले, तर अशा आंब्याच्या झाडाला मोहोर उशिरा येण्याची दाट शक्‍यता असते. प्रमुख व दुय्यम पोषण प्राण्यांची कामतरता, संजीवकांचा अभाव, योग्य पाणी व्यवस्थापन नसणे आणि किडी – रोगांचा प्रादुर्भाव आदि कारणांमुळे मोहोर आणि फलगळ होते.


तुडतुडे
हे कीटक पाचरीच्या आकाराचे असतात. रंग भुरकट असून, डोक्‍यावर तांबड्या रंगाचे तीन ठिपके असतात. हे कीटक अत्यंत चपळ असून, त्यांची चाल तिरपी असते. मादी हिवाळ्यात फुले व पाने यांच्या शिरांत अंडी घालावयास सुरवात करते. या अंड्यांतून आठ ते दहा दिवसांत पिल्ले बाहेर पडून रस शोषण करावयास लागतात. त्यांची संपूर्ण वाढ 15 ते 20 दिवसांत होते आणि त्यापासून प्रौढ तुडतुडे तयार होतात. या किडींची पिल्ले आणि प्रौढ कोवळ्या पानांतील व मोहोरातील रस शोषून घेतात, त्यामुळे मोहोर सुकून गळून पडतो. त्याशिवाय तुडतुडे मधासारखा चिकट पदार्थ शरीरावाटे बाहेर टाकतात. तो पानांवर पडून नंतर त्यावर काळी बुरशी वाढते, त्यामुळे झाडे, फळे काळी पडतात.
तुडतुडे वर्षभर झाडावर असल्यामुळे आंब्याच्या झाडाला मोहोर येण्यापूर्वी कीडनाशकांचा वापर करावा, तसेच व्हर्टिसीलियम लेकॅनी या बुरशीजन्य कीटकनाशकाचा वापर करावा.

मिजमाशी
मोहोर तसेच पालवी फुटताच कोवळ्या दांडयामध्ये अंडी घालते, दोन ते तीन दिवसांत अंडी उबून आळी मोहोरच्या देठातील आतील भाग खाते, त्या ठिकाणी सुरवातीस लहान गाठ आल्याप्रमाणे दिसते. प्रादुर्भित मोहोर वाकडा झालेला दिसून येतो. कोवळ्या पालवीवर प्रादुर्भाव झाल्यास पाने काळी पडून गळून जातात.

भुरी
या रोगामुळे मोहोरचा देठ, फुले आणि लहान फळे यावर सूक्ष्म बुरशीची वाढ होते, त्यामुळे प्रादुर्भित भाग पांढरट, भुरकट दिसतो. रोगाचा प्रसार वाऱ्यामुळे होतो. फुले व लहान फळे गळून पडतात आणि फलधारणेवर अनिष्ट परिणाम होतो. दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विध्यापीठाने किडनाशक फवारणीचे वेळापत्रक तयार केले आहे. त्याची मदत घेऊन किडी – रोग नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

करपा
या रोगाच्या प्रादुर्भावाची विविध लक्षणे म्हणजे डहाळ्या वाळणे, फांद्यांचे शेंडे झडणे, मोहोर करपणे, पाने करपणे ही आहेत. पानांवर 20 ते 25 मि.मी. व्यासाचे अंडाकृती किंवा अनियमित वेडेवाकडे फिकट विटकरी किंवा गडद विटकरी ठिपके पडतात. आर्द्र वातावरणात बुरशीची वाढ जलद होते. रोगाचा प्रादुर्भाव जुन्या पानांपेक्षा नवीन पानांवर जास्त होतो. पानांची रोगग्रस्त देठे काळी पडतात, पाने खाली वाकतात, वाळतात, शेवटी गळून पडतात. पानगळ झालेल्या ठिकाणी काळे व्रण निर्माण होतात. रोगग्रस्त फांद्यांवर काळे ठिपके पडतात, फांद्यांचे शेंडे वरून वाळण्यास सुरवात होते. शेंडे झडल्याचे लक्षण दिसून येते. मोहरामध्ये फुलांच्या देठांवर काळसर विटकरी काळे डाग पडतात. उमललेल्या फुलांवरही छोटे काळे डाग पडतात. हे डाग मोठे होतात. नंतर मोहोर वाळतो. फळांवर सुरवातीस हे डाग गोल असतात; परंतु नंतर डागांचे एकत्रीकरण होते, मोठे अनियमित डाग तयार होतात. काही वेळा डागांमुळे संपूर्ण फळ पडते. डागांवर खोल चिरा निर्माण होतात. बुरशी फळात खोल शिरते व फळे नासतात.