Saturday, February 24, 2018

दुर्लक्ष नको शेळीच्या आरोग्याकडे...

भारतात शेळयांच्या प्रमुख 25 जाती आढळतात. शेळ्यांचा व्यावसायिक उपयोग करून दुध उत्पादन, लोकर / मोहर उत्पादन, मांस उत्पादन करता येते. दोन शेळ्या एका छोट्या कुटुंबाचा सक्षम उपजीविकेचा आधार बनू शकतात. शेळीच्या जाती निवड आणि जोपासना अधिक वाचा...

शेळी पालनामध्ये गोठा पद्धतीला महत्व आहे. कमीत कमी खर्चात व्यवस्थित संगोपन केल्यास जास्तीत जास्त नफा राहतो. शेळीच्या निवासावरून मुक्त, अर्धबंदिस्त आणि बंदिस्त असे शेळी पालनाचे प्रकार पडतात. गोठा पद्धतीबाबत अधिक वाचा...

साधारणपणे शेळ्यांना दररोज तीन ते चार किलो हिरवा चारा व एक किलो वाळलेला चारा लागतो. त्याचप्रमाणे शेळ्यांच्या खाद्यामध्ये झाडपाला आवश्यक आहे. त्याचबरोबर गाभण शेळी, दूध देणारी शेळी, पैदाशीच्या बोकडासाठी पूरक आहाराची आवश्यकता अधिक वाचा...

वाढते तापमान आणि कमी पर्जन्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष या बदलत्या हवामानाचा शेळ्या- मेंढ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. सर्वसाधारणपणे शेळ्या- मेंढ्यांचा पैदासकाळ हा पावसाळ्याच्या सुरवातीला येतो; मात्र पैदाशीसाठी सक्षम शरीर यंत्रणा तयार होण्यासाठी उन्हाळी हंगामातच त्यांची काळजी कशी घ्यायची अधिक वाचा... 


शेळी ही निसर्गतः काटक व रोगांना कमी बळी पडते; मात्र अनेक कारणांमुळे विविध रोगांचे संक्रमण होऊन शेळीपालन व्यवसायाचे व्यवस्थापन बिघडण्याची दाट शक्यनता असते. शेळी संगोपानामध्ये आरोग्य व्यवस्थापन अधिक वाचा...

दुर्लक्ष नको शेळीच्या आरोग्याकडे...

शेळ्यांचे कमी खर्चात चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येते. शेळी व्यवस्थापन करताना सकस चारा, गाभण शेळ्यांची - करडांची काळजी घ्यावी. आरोग्याच्यादृष्टीने वेळच्या वेळी लसीकरण केल्यास संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होऊन अपेक्षित फायदा शेळीपालकाला मिळू शकतो.

लसीकरण तक्ता 
(पशु वैद्यकाचा सल्ला घ्यावा) 

रोग
महिना
मात्रा (शेळी)
मात्रा (करडे)
फुफ्फुसाचा दाह
जानेवारी
२ मि.लि. कातडीखाली
२ मि.लि. कातडीखाली
घटसर्प
मार्च - सप्टेंबर
५ मि.लि. कातडीखाली
५ मि.लि. कातडीखाली
देवी
एप्रिल
कातडीवर (कानाचे टोक/शेपटीखाली
कातडीवर (कानाचे टोक/शेपटीखाली
आंत्रविकार
मे - नोव्हेंबर
५ मि.लि. कातडीखाली
५ मि.लि. कातडीखाली
बुळकांडी
मे - नोव्हेंबर
१ मि.लि. कातडीखाली
१ मि.लि. कातडीखाली
फऱ्या
जुलै
५ मि.लि. कातडीखाली
५ मि.लि. कातडीखाली
पायलाग / लाळ्याखुरकत
ऑगस्ट
५ मि.लि. कातडीखाली
५ मि.लि. कातडीखाली
धनुर्वात
पहिल्या व दुसऱ्या महिन्यात
पुढे प्रतिवर्ष बूस्टर इंजेक्शन द्यावे.
पुढे प्रतिवर्ष बूस्टर इंजेक्शन द्यावे.

रोग व उपचार (पशु वैद्यकाचा सल्ला घ्यावा)
इ - कोलाय जंतू प्रादुर्भाव
बाधित करडांना ताबडतोब वेगळे ठेवावे. त्यांना मीठ व पाणी यांचे द्रावण पाजावे व गरम कापडात किंवा घोंगडीत गुंडाळून ठेवावे. इ. कोलाय हा जीवाणू असल्यामुळे प्रतीजैवीके, सलाईन, अ, ब, क, जीवनसत्व इंजेक्शन द्यावी.

आंत्रविकार / हगवण
जास्त पिष्टमय खाल्ल्याने आम्लीय अपचन होऊन तीव्र हगवण लागते. शेळ्या दूषित, टाकलेले, उरलेले अन्न खाणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे. हगवणीला कारणीभूत घटकांचा योग्य तो उपचार अथवा प्रतिबंध करावा. जसे की हगवण थांबविणाऱ्या औषधांचा उपयोग, प्रतिजैविक गोळ्या (पेसुलिन, फॅजाल, पॅबाडीन इ.) सोबत इलेक्ट्रो लाइटची पावडर हे सर्व एकत्र करून स्वच्छ पाण्यातून दोन ते तीन वेळा पाजावे.
तीव्र हगवणीच्या प्रकारात शिरेतून इलेक्ट्रो लाइट व ऊर्जेचे द्रावण द्यावे.
अचानक अशी समस्या आली तर पाण्यातून खाण्याचा सोडा पाजावा अथवा तीव्रता जास्त असल्यास शिरेद्वारे सोडाबायाकार्बचे द्रावण द्यावे, सोबत जीवनसत्त्वे व कोणतेही एक प्रतिजैविक द्यावे.

जंत
प्रकार - १) पट्टी कृमी २) पर्णकृमी ३) गोलकृमी
जानेवारी ते एप्रिल दरम्यान गाभण शेळ्यांना स्ट्रायगॉलस प्रकारचे जंत होण्याची शक्यता असते. एप्रिल ते जुलै महिन्याच्या दरम्यान शेळ्यांना यकृतकृमी व पट्टीकृमी प्रकारच्या जंतांचा प्रादुर्भाव होतो.  त्यासाठी त्यांना अलबेंडाझॉंल ५ mg/ ltr प्रति किलो वजनास याप्रमाणे औषध द्यावे. उन्हाळ्यात गोठ्यातील मातीमध्ये चुना व कॉस्टिक सोडा मिसळावी.

धनुर्वात
जखम  हायड्रोजन पेरॉक्साईडने स्वच्छ धुऊन घ्या. बाधित शेळ्यांना अंधाऱ्या व शांत जागेत ठेवावे. शेळीला तोंडाच्या स्नायूंमध्ये ताठरपणा जानवला, सर्वांगाला कंप सुटला तर डॉक्टरांच्या सल्ल्याने कवटीच्या मधील फोरेमिन मग्नम् छिद्रातून धनुर्वात प्रतिविष द्यावे. जखमांना वेळीच औषधोपचार हा सर्वात चांगला उपचार आहे. गाभन काळात शेळीला पहिल्या व दुसऱ्या महिन्यात अशी दोन धनुर्वातची इंजेक्शन द्यावीत व पुढे प्रतिवर्ष बूस्टर इंजेक्शन द्यावे.

घटसर्प
- हा अतिशय वेगाने पसरणारा साथीचा रोग आहे. सांसर्गिक प्राण्याची विष्ठा, लाळ, चारा, पाणी यांच्याशी संपर्कात आल्याने या रोगाची लागण होते. या रोगात जनावराचे तापमान अचानक खूप वाढते. शेळी चारा खाणे बंद करते. रवंथ न करता नाक व तोंडातून स्राव बाहेर पडतो.
संसर्गजन्य फुफ्फुसदाह -
हा संसर्गजन्य रोग आहे. या रोगाचे लक्षण म्हणजे कोरडा खोकला, नाकातून पाण्यासारखा द्रव येतो.
फऱ्या -
हा रोग तीव्रपणे पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. या रोगामध्ये खूप ताप येतो, पाय व सांधे यांना सूज येते, या सुजेवर दाबले असता दुखते व गरम लागते. या रोगामुळे जनावरास नीट चालवतही नाही, त्यामुळे ते लंगडते, म्हणूनच या रोगास "एकटांग्या' असेही म्हणतात.
लाळ्या खुरकूत -
हा एक झपाट्याने वाढणारा संसर्गजन्य रोग आहे. याचा प्रसार हवा, पाणी व रोगी प्राण्याच्या संपर्कात आलेला चारा यामुळे होतो. यामध्ये शेळ्यांची भूक मंदावून त्या अशक्त बनतात. दुभत्या शेळ्यांचे दूध कमी होते, खूप ताप येतो व तोंडातून स्राव वाहतो. तोंडात पांढऱ्या रंगाचे फोड येतात, खुरांतही फोड येऊन जखमा होतात, त्यामुळे खाणे आणि चालणे अशक्यय होते. शेळ्या दगावण्याचीही शक्यशता असते.

आंत्रविषार :
प्रामुख्याने हा आजार चांगल्या पोषित, पौष्टिक चाऱ्यावर चरणाऱ्या, मांसाने भरीव असणाऱ्या मेंढ्यांना व शेळ्यांना बाधित करतो. कोकरांनी आजारास बळी पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे जास्त प्रमाणात प्यायलेले दूध होय. प्रादुर्भाव झालेली नवजात कोकरे हवेमध्ये उडी घेऊन जमिनीवर कोसळतात, थरथर कापतात व काही मिनिटांतच गतप्राण होतात.

उपाययोजना - शेळ्या, मेंढ्यांना पावसाळ्याच्या सुरवातीला लस टोचून घ्यावी. कोकरांना लस दिल्यानंतर तीन आठवड्यांनी बूस्टर डोस द्यावा. लस टोचल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती तयार होण्याकरिता 21 दिवसांचा कालावधी लागतो. प्रादुर्भावादरम्यान दीर्घक्रियाशील प्रतिजैविके योग्य मात्रेत द्यावीत.

फाशी :
हवामानातील अचानक बदल, मुसळधार पाऊस व दुष्काळ परिस्थितीमुळे फाशीचा रोग पसरतो. यात खूप ताप येतो, जनावर थरथरते, तोल जातो, नाकातोंडातून काळपट रक्तस्राव होतो. श्वाोस घेण्यास त्रास होतो व शेळी-मेंढी ताबडतोब मरते.
उपाययोजना - पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रतिबंधक लसीकरण करावे. मेलेल्या शेळ्या-मेंढ्या वर-खाली चुनखडी (चुना) टाकून खोल खड्ड्यात पुराव्यात. त्यांची कातडी विकू नये. शवचिकित्सा करू नये.

जरबा :
याचा प्रसार चावणाऱ्या चिलटांपासून म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या होतो. जास्त पाऊस व ढगाळ वातावरणामध्ये चिलटांची उत्पत्ती डबक्याजत पाणी साठल्यामुळे अधिक प्रमाणात होते. याची लक्षणे म्हणजे तोंडाला गरे पडतात, तोंडातील आतील भाग लालसर पडतो, काही वेळा लाळ येते, शेळ्या-मेंढ्या कुचंबतात, डोळे लाल होतात, जनावर लंगडू लागते, छातीला व जबड्याखाली जखमा होतात.
उपाययोजना - 
पावसाळ्यात सायंकाळी वाडग्यात करंज, कडुनिंब, निरगुडीच्या पाल्याची धुरी करावी. डबकी व साचलेल्या पाण्यावर रॉकेल फवारणी करावी. असे केल्याने चिलटांचे प्रजनन कमी होऊन संख्या वाढत नाही. बाधित मेंढीस पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार प्रतिजैविके योग्य मात्रेत द्यावीत. कोमट पाण्यात मीठ टाकून तोंड धुवावे.

बुळकांडी :
या आजारात शेळ्या-मेंढ्यांमध्ये ताप येणे, नाकातून पाणी येणे, चिकट व रक्तमिश्रित जुलाब होणे इत्यादी प्रमुख लक्षणे दिसून येतात.
उपाययोजना - पशुतज्ज्ञांकडून नियमित पी.पी.आर. लस टोचून घेणे. वाडग्यात स्वच्छता पाळावी. आजारी शेळ्या, मेंढ्यांना वेगळे ठेवावे.



माझीशेती मार्फत शेलीपालनाचे संपुर्ण व्यवसाय शोध अहवालापासून मांस प्रक्रिया व निर्यातीबाबत सविस्तर ३ दिवस दररोज २ सत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. तज्ञ मार्गदर्शक, देशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची सफर असा प्रशिक्षणाचा भाग आहे. प्रशिक्षणाबाबत अधिक वाचा... 




गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तुम्ही हातभार लावा. प्रकल्प अहवाल बनवुन घ्या. तुम्ही दिलेला निधी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरला जातो. आमच्या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्या. 

माझीशेतीच्या शेळी पालन ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

उपजिविका विकास अंतर्गत 'शेळी पालन' लाभ दिलेले लाभार्थी शेलीसह...
उपजिविका विकास अंतर्गत 'शेळी पालन' लाभ दिलेले लाभार्थी शेलीसह...

शेळी पालनामध्ये गोठा पद्धतीला महत्व

भारतात शेळयांच्या प्रमुख 25 जाती आढळतात. शेळ्यांचा व्यावसायिक उपयोग करून दुध उत्पादन, लोकर / मोहर उत्पादन, मांस उत्पादन करता येते. दोन शेळ्या एका छोट्या कुटुंबाचा सक्षम उपजीविकेचा आधार बनू शकतात. शेळीच्या जाती निवड आणि जोपासना अधिक वाचा...

शेळी पालनामध्ये गोठा पद्धतीला महत्व 

शेळी पालनामध्ये गोठा पद्धतीला महत्व आहे. कमीत कमी खर्चात व्यवस्थित संगोपन केल्यास जास्तीत जास्त नफा राहतो. शेळीच्या निवासावरून मुक्त, अर्धबंदिस्त आणि बंदिस्त असे शेळी पालनाचे प्रकार पडतात. गोठा पद्धतीबाबत अधिक वाचा...

शेळीला निवा-यासंदर्भात महत्‍वाच्‍या गोष्‍टी:-
  • शेळीला निवा-यामध्‍ये ऊन,थंडी,पाऊसापासून संरक्षण होणे आवश्‍यक आहे.
  • शेळीचा निवारा शेळीस पूरेशी जागा ऊपलब्‍ध करणारा असावा,शेळीला मोकळी हवा व जागा मिळावी..
  • निवा-याची जागा राहत्‍या घरापासून दूर व उंचवटयावर असावी.तसेच निवारा फार खर्चिक नसावा.निवा-यातील जमीनीवर ३ अंशाचा प्रत्‍येक फूटास उतार ठेवावा व त्‍यावर मूरूम पसरून नीट धूमसून[चोपून] त्‍यात ३% कळीचा चूना मिसळावा व मूरूम पून्‍हा चोपून घ्‍यावा.
  • वयोगटानूसार व शारीरीक अवस्‍थेनूसार शेळयाचे गट करावेत उदा- दूध देणा-या शेळया,०-३ महिन्‍याची पिले,३-६ महिन्‍यांची मादी पिले,३-६ महिन्‍यांची नर पिले,६ महिन्‍यांच्‍या पूढील ते १ वर्षाची मादी पिले ,१ वर्षापूढील व मोठया खाटया[भाकड शेळया],गाभण शेळया,बोकड व आजारी जनावरे इ.चे गट करावेत म्‍हणजे अशी जनावरे गोठयात वेगवेगळी/ स्‍वतंत्र ठेवावीत.
  • निवा-यात छप्‍पर असलेला व मोकळा भाग असावा.छप्‍पर असलेल्‍या भागात गव्‍हाण व पिण्‍याच्‍या पाण्‍याची टाकी असावी.गव्‍हाणीची रूंदी १-१.२५ फूट,उंची १.५ फूट [गव्‍हाणीचा तळ],व लांबी दर शेळीस १ फूट एवढी असावी.
  • गोठयाची उंची मध्‍यभागी १२ फूट व व कडेला ८ फूट असावी व दिशा उत्‍तर -दक्षिण असावी.शेडची रूंदी ३० फूट व दोन्‍हीकडे मोकळा परंतू चेनलिंक जाळीचा भाग १५ फुट असावा.कडेची जाळी ६ फूट उंच,व मधील विभागातील जाळी ५ फूट उंच असावी.


मुक्त गोठा पद्धत
या शेळीपालनात शेळ्या दिवसभर चरण्यासाठी सोडल्यामुळे अतिरिक्त आहाराची तितकीशी आवश्यकता भासत नाही. परंतु शेळयांची चरण्याची पध्दत इतर गुरांप्रमाणे म्हणजे गाय, म्हैस मेंढी, यापेक्षा वेगळी असून त्या प्रत्येक झाडाचे झुडपाचे कोवळे शेंडे खातात त्यामुळे झाडांची वाढ खुंटते या प्राण्यामुळे जंगलांचा -हास होत आहे त्यामुळे हि पद्धतीची आम्ही शिफारस करत नाही. शेळीपालनात शेळ्या दिवसभर चरण्यासाठी सोडल्यामुळे अतिरिक्त आहाराची तितकीशी आवश्यकता भासत नाही. 

अर्धबंदीस्त शेळीपालन
पूर्णत: बंदिस्‍त शेळीपालन करण्‍यामध्‍ये शेळी मरतूकीची शक्‍यता असते. कारण शेळी हा पूर्वापार पासून फिरणारा प्राणी आहे व शेळीला एकदम बंदिस्‍त अवस्‍थेत ठेवणे चूकीचे आहे.यासाठी शेळीला अर्धबंदिस्‍त अवस्‍थेत ठेवणे उपयूक्‍त आहे.काही जाती उदा. बोअर,बारबेरी शेळया पूर्ण बंदिस्‍त शेळीपालनासाठी योग्‍य आहेत. शेळी पालनाअगोदर प्रशिक्षण घेणे हितावहच असते. 

बंदीस्त शेळीपालन -
शेळीकरीता कमी गुंतवणुकीचे वाडे (गाळे) असावे हेवाडे बास, बल्ली, तट्टे तु-हाटया प-हाटया यांच्या सहायाने करावे. प्रती शेळी किमान 100 ग्रॅम खुराक दयावा प्रत्येक शेळीला किमान दिड ते 2 किलो हिरवा चारा दयावा झाडांची पाने दिल्यास उत्तम विविध झाडांची पाने उदा चिंच, बाभुळ, बोर, पिंपळ, सुबाभूळ, कंदब, निंब इत्यादी
कळपात 20 ते 25 शेळयामागे एक नर असावा.

बंदिस्त शेळीपालन : 
शेडची दिशा ठरवताना दक्षिण - उत्तर अथवा पूर्व - पश्चिम ठेवावी. प्रत्येक शेळीला १५ चौ. फुट जागा ठेवावी. गोठ्यांच्या आजूबाजूला चाऱ्यासाठी सुबाभूळ, शेवगा अशी झाडे लावावीत. १५ ते २० माद्यांकरिता प्रजननासाठी एक नर ठेवावा. पिण्यासाठी पाणी शुद्ध असावे. करडे, नुकत्याच व्यायलेल्या शेळ्या, आजारी शेळ्या, गाभन व इतर शेळ्या असे भाग करावेत. शक्य असेल तर शेळीचा चारा टांगून द्यावा. शेळ्यांना १०० ते १५० ग्रॅम खुराक द्यावा लागतो. चाऱ्याचे वार्षिक नियोजन करणे आवश्यकता आहे. कडवळ, गजराज, बरसीम, लसूणघास, मका इ. एकदल व द्विदल पिकांची लागवड करावी. त्याचप्रमाणे वाळलेल्या चाऱ्याकरिता कडबा, गहू, सोयाबीन, तांदळाचा कोंडा, उडदाच्या भुश्याय चा वापर करावा.

बंदीस्त शेळीपालनाची आवश्यकता -
शेळयांची चरण्याची पध्दत इतर गुरांप्रमाणे म्हणजे गाय, म्हैस मेंढी, यापेक्षा वेगळी असून त्या प्रत्येक झाडाचे झुडपाचे कोवळे शेंडे खातात त्यामुळे झाडांची वाढ खुंटते या प्राण्यामुळे जंगलांचा -हास होत आहे असा सर्व साधारण समज आहे व तो काही प्रमाणात खराही आहे जर आपण शेळयांना जंगलात चरण्याकरीता न सोडता त्यांचे बंदिस्त संगोपन केले तर त्यांची झपाटयाने वाढ होते.

बंदीस्त शेळीचे व्यवस्थापन -
शेळीकरीता कमी गुंतवणुकीचे वाडे (गाळे) असावे हेवाडे बास, बल्ली, तट्टे तु-हाटया प-हाटया यांच्या सहायाने करावे
प्रती शेळी किमान 100 ग्रॅम खुराक दयावा प्रत्येक शेळीला किमान दिड ते 2 किलो हिरवा चारा दयावा झाडांची पाने दिल्यास उत्तम विविध झाडांची पाने उदा चिंच, बाभुळ, बोर, पिंपळ, सुबाभूळ, कंदब, निंब इत्यादी
कळपात 20 ते 25 शेळयामागे एक नर असावा
गाभळ शेळयाची व दुभत्या शेळयाची विशेष काळजी ध्यावी
करडांची जोपासना काळजीपुर्वक करावी
दिवसभरात किमान एक वेळा तरी शेळयांचे निरीक्षण करावे आजारी शेळयांना अगक करून पशुवैदयकांच्या सल्यानुसार औषधे दयावीत.
शेळयाबांबत नोंदी ठेवाव्या व्याल्याची तारीख, शेळया फळल्याची तारीख मृत्यूच्या नोंदी इत्यादी

साधारणपणे शेळ्यांना दररोज तीन ते चार किलो हिरवा चारा व एक किलो वाळलेला चारा लागतो. त्याचप्रमाणे शेळ्यांच्या खाद्यामध्ये झाडपाला आवश्यक आहे. त्याचबरोबर गाभण शेळी, दूध देणारी शेळी, पैदाशीच्या बोकडासाठी पूरक आहाराची आवश्यकता अधिक वाचा...

वाढते तापमान आणि कमी पर्जन्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष या बदलत्या हवामानाचा शेळ्या- मेंढ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. सर्वसाधारणपणे शेळ्या- मेंढ्यांचा पैदासकाळ हा पावसाळ्याच्या सुरवातीला येतो; मात्र पैदाशीसाठी सक्षम शरीर यंत्रणा तयार होण्यासाठी उन्हाळी हंगामातच त्यांची काळजी कशी घ्यायची अधिक वाचा... 

शेळी ही निसर्गतः काटक व रोगांना कमी बळी पडते; मात्र अनेक कारणांमुळे विविध रोगांचे संक्रमण होऊन शेळीपालन व्यवसायाचे व्यवस्थापन बिघडण्याची दाट शक्यनता असते. शेळी संगोपानामध्ये आरोग्य व्यवस्थापन अधिक वाचा...

माझीशेती मार्फत शेलीपालनाचे संपुर्ण व्यवसाय शोध अहवालापासून मांस प्रक्रिया व निर्यातीबाबत सविस्तर ३ दिवस दररोज २ सत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. तज्ञ मार्गदर्शक, देशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची सफर असा प्रशिक्षणाचा भाग आहे. प्रशिक्षणाबाबत अधिक वाचा... 




गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तुम्ही हातभार लावा. प्रकल्प अहवाल बनवुन घ्या. तुम्ही दिलेला निधी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरला जातो. आमच्या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्या. 

माझीशेतीच्या शेळी पालन ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

उपजिविका विकास अंतर्गत 'शेळी पालन' लाभ दिलेले लाभार्थी शेलीसह...
उपजिविका विकास अंतर्गत 'शेळी पालन' लाभ दिलेले लाभार्थी शेलीसह...

शेळीच्या जाती निवड आणि जोपासना

भारतात शेळयांच्या प्रमुख 25 जाती आढळतात. शेळ्यांचा व्यावसायिक उपयोग करून दुध उत्पादन, लोकर / मोहर उत्पादन, मांस उत्पादन करता येते. दोन शेळ्या एका छोट्या कुटुंबाचा सक्षम उपजीविकेचा आधार बनू शकतात. शेळीच्या जाती निवड आणि जोपासना अधिक वाचा...

शेळीच्या जाती निवड आणि जोपासना 
संगोपनासाठी शेलीची निवड :
  • शेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी व बोकड यांवर अवलंबून आहे. 
  • उत्पादनाच्या उद्दिष्टांसाठी योग्य शेळी व बोकडांची निवड करावी. 
  • एकदा वेत झालेली (व्यायलेली) शेळी विकत घेणे चांगले असते. तिची आई जुळी करडे देणारी शेळी मिळत असेल, तर अशा शेळीची पैदास विकत घेणे चांगले असते. 
  • निरोगी व भरपूर दूध देणाऱ्या शेळीचे करडू खरेदी करावे. 
  • करडे रोगमुक्त, तसेच परोपजीवी कीटकांपासून मुक्त असावीत.
  • माझीशेती 'उस्मानाबादी' शेलीची शिफारस करते.
  • दक्षिण आफ्रिकेतील खास मटण उत्पादनासाठी विकसित केलेल्या सुधारित बोअर जातीच्या शेळी आफ्रिकेतून ऑस्ट्रेलिया मध्ये आयात करण्यात आली. त्या शेळ्या काही रोगांपासून रोगमुक्त असल्याचेही जाहीर झाले.
  • ऑस्ट्रेलियन उच्चायोगाने विकास साहाय्य योजने अंतर्गत ऑस्ट्रेलियातून फलटण येथील महाराष्ट्र शेळी व मेंढी संशोधन व विकास संस्थेच्या माध्यमातुन २० गोठविलेले बोअर भ्रूण व १०० बोअर वीर्य मात्रांची आयात करण्यात आली.
  • १४ डिसेंबर १९९३ रोजी ऑस्ट्रेलियन ब्रीडिंग सर्व्हिसेसच्या पशुवैद्यांनी फलटण येथे संस्थेच्या सिरोही शेळ्यांमध्ये बोअर जातीच्या भ्रूणांचे प्रत्यारोपण केले. परिणामी मे १९९४ मध्ये बोअर जातीची ४ नर व ३ मादी पिल्ले जन्माला आली.
गाभण शेळी निवड 
  • आकार - शेळी आकाराने मोठी असावी. तिची मान लांब असावी. तोंडापासून शेपटीपर्यंत असणारा लांबपणा हेही महत्त्वाचे लक्षण आहे. केस मऊ व चमकदार दिसणारे असावेत. भरपूर छाती असावी. बांधा मोठा असावा, जेणेकरून दोन किंवा अधिक करडांना शेळी आपल्या गर्भाशयात जोपासू शकेल. पाय सरळ, पिळदार व खूर (टाचा) उंच असावेत. 
  • दात - शेळीचे सर्व दात बळकट व सुस्थितीत असावेत. शक्यशतो एक ते दोन वर्षे वयाचीच (दोन ते चार दाती) शेळी विकत घ्यावी.
  • कास - शेळी विकत घेताना तिची कास नीट पारखून घ्यावी. तिला कासदाह तर नाही ना, याची तपासणी करावी.
दुभती शेळी निवड 
  • दुभती शेळी निवडताना तिचे वय, करडांची संख्या, दुधाचे प्रमाण इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्यावे.
  • दुभती शेळी लठ्ठ व मंद नसावी, टवटवीत व चपळ असावी. 
  • दुभत्या शेळीची धार काढून पाहावी. दुधाचे प्रमाण, दुधाचा रंग, कासेवर सूज या गोष्टी पारखून घ्याव्यात. 
बोकडाची निवड 
  • कळपात जन्मणाऱ्या शेळ्यांचे 50 टक्के गुणधर्म बोकडांवर अवलंबून असतात, म्हणून कळपाची सुधारणा बऱ्याच प्रमाणात पैदाशीच्या बोकडांवर अवलंबून असते.
  • शुद्ध जातीचा बोकड शक्यतो विकत घ्यावा. ते न जमल्यास निदान सुधारित जातीचा बोकड घ्यावा.
  • तो चपळ व माजावर आलेल्या शेळीकडे चटकन आकर्षित होणारा असावा व बोकड मारका नसावा. 
  • आकार - विकायला आलेल्या बोकडांपैकी सर्वांत मोठा डौलदार व निरोगी बोकड निवडावा. त्याची छाती भरदार असावी व पायांत भरपूर अंतर असावे. शरीराचा मागील भाग जास्त मोठा व उंच असावा. पाय मजबूत व खूर उंच असावेत. डोके व खांद्याचा भाग दणकट, थोराड व नराची लक्षणे दाखवणारा असावा.
दूध व मांस देणाऱ्या - उस्मानाबादी, संगमनेरी, बारबेदी, जमनापारी, मलबारी, मेहसाना, झालावाडी, बीटल, सिरोही, अजमेरी, कच्छी
मांस उत्पादनासाठी 
आष्ट्रेलियन बोअर, आसाम डोंगरी, काळी बंगाली, तपकिरी बंगाली, मारवाडी, काश्मिरी, गंजभ या जाती चांगल्या आहेत.

महाराष्ट्रात मांसासाठी व दूधासाठी उत्तंम जातीच्या् शेळ्या खालीलप्रमाणे आहेत.
शेळीची जात
पालन प्रकार
उपयोग
उस्मानाबादी
अर्धबंदिस्त शेळीपालन
मांस उत्पादनासाठी
संगमनेरी
अर्धबंदिस्त शेळीपालन
मांस व दुध उत्पादनासाठी
सिरोही
अर्धबंदिस्त शेळीपालन
मांस व दुध उत्पादनासाठी
बोअर
बंदिस्त शेळीपालन
मांस उत्पादनासाठी
सानेन
बंदिस्त शेळीपालन
दुध उत्पादनासाठी
कोकण कन्यावळ
अर्धबंदिस्त शेळीपालन
मांस उत्पादनासाठी

उस्मानाबादी शेळया मूखेड - नांदेड, रेणापूर - लातूर, कोण -कल्यााण, लोणंद - सातारा, म्हसवड - सातारा च्या आठवडी बाजारात या शेळया विकत मिळू शकतात. 

शेळ्यांचे माज आणि भरवणे:
  • शेळ्यांचा मुका माज ओळखण्यासाठी शेळ्यांच्या कळपात नर नेहमी ठेवावा.
  • योग्य आहार व वजन असलेस शेळी १० महिने वयानंतर शेळी भरवावी.
  • गाभन काळात शेळीला अधिक सकस चारा व खाद्य द्यावे. 
  • शेळी विण्यास एक महिना असताना दूध काढणे बंद करावे. 
  • या काळात त्यांना २०० ते २५० ग्रॅम खाद्य द्यावे. त्यामुळे गर्भाची वाढ चांगली होते.
  • शेळी माजावर येत नसेल तर गुळभेंडीची टेंबरे एक आठवड्यातून ३ वेळेस भाकारीतून चारा.
शेळ्यांची जोपासना
गाभण शेळीची जोपासना -
गाभण शेळीची व्यवस्था स्वतंत्ररीत्या करावी. तिला ओला व सुका चारा आणि मुबलक स्वच्छ पाणी यांची योग्य प्रमाणात व्यवस्था करावी. शेवटच्या दोन - तीन महिन्यांत 200 ते 250 ग्रॅम पोषण आहार द्यावा. शेळी नैसर्गिकपणे विते; मात्र काही घटनांमध्ये वैद्यकीय मदत आवश्यक असते.

दुभत्या शेळीची जोपासना -
दुभत्या शेळ्यांना शारीरिक गरजेसाठी लागणाऱ्या ऊर्जेपेक्षा अतिरिक्त ऊर्जेची आवश्ययकता भासते. म्हणून त्यांना ओल्या व सुक्याे चाऱ्यासोबतच 100 ग्रॅम खुराक प्रति लिटर दुधामागे जास्त द्यावा. चारा देताना त्यामध्ये योग्य प्रमाणात मीठ व खनिजद्रव्ये मिसळून द्यावीत.

नवजात करडांचे संगोपन


  • शरीर स्वच्छ करणे - नवजात करडास शेळी स्वतः चाटून स्वच्छ करते, त्याचे दोन फायदे असतात. त्यामुळे करडांचे रक्ताभिसरण वाढत असते; शेळीने चाटून स्वच्छ न केल्यास पिल्लांचे अंग स्वच्छ, खरखरीत कापडाने स्वच्छ करावे. नाकातील व तोंडातील चिकट स्राव काढावा, त्यामुळे करडांना श्वांस घेण्यास सोपे जाते. खुरांवर वाढलेला पिवळा भाग हळूच खरडून काढावा, जेणेकरून करडांना ताठ उभे राहता येईल.
  • चीक पाजणे - करडांना उभे राहण्यास मदत करावी. करडे उभे राहिल्यानंतर शेळीच्या सडाला तोंड लावून दूध पिण्याचे प्रयत्न करते की नाही ते पाहावे. नाही तर दूध पिण्यास शिकवावे. पिल्लू जन्मल्यानंतर अर्धा तासाच्या आत शेळीचे दूध म्हणजे चीक पाजणे आवश्याक असते, यामुळे करडांची रोगप्रतिकारक्षमता वाढत असते आणि करडांची पचनसंस्था व पचनमार्ग साफ होतो.
  • दुध पाजणे - पहिल्या आठवड्यात करडाच्या वजनाच्या दहा टक्के एवढे दूध चार- पाच वेळेस विभागून पाजावे. आवश्य्कतेपेक्षा जास्त दूध पाजू नये, नाही तर अपचन होऊन हगवण वाढते. करडे जन्मल्यानंतर त्याचे वजन करून नोंद करून घ्यावी.
  • जन्मल्यानंतर पाच- सात दिवस शेळी व करडे एकत्र ठेवावीत व रोज त्यांना वजनाच्या दहा टक्के दूध तीन- चार वेळा विभागून पाजावे. शेळीच्या पाण्याची व्यवस्था/ भांडे उंचीवर असावे, जेणेकरून करडे पाण्यात पडणार नाहीत, याची काळजी घेता येते.
  • आहार - साधारणपणे 65- 70 दिवसांपासून करडांचे दूध कमी करत 90 दिवसांपर्यंत पूर्णपणे बंद करावे आणि शेळीपासून पूर्णपणे वेगळे करावे. करडांना वयाच्या 30 ते 40 दिवसांपासून मऊ, लुसलुशीत चारा देण्यास सुरवात करावी, जेणेकरून चारा खाण्याची सवय होऊ लागते.
  • करडांची निरोगी व झपाट्याने वाढ करण्यासाठी त्यांना आवश्यक औषधी, सकस आहार इ.कडे बारकाईने लक्ष देण्यात यावे. खनिज क्षारांचा पुरवठा करण्यासाठी खनिज विटा टांगून ठेवाव्यात.
  • करडे पाच महिन्यांच्या नंतरच विक्रीसाठी काढावीत, कारण या वयानंतर करडांची वाढ झपाट्याने होते व जास्त नफा मिळतो.
  • आरोग्य - तीन महिन्यांनंतर करडांना आंत्रविषार, लाळ्या खुरकूत व घटसर्प आणि फर रोगांविरुद्धचे लसीकरण करून घेणे आवश्यतक आहे.
पैदाशीच्या बोकडाची जोपासना
पैदाशीकरिता योग्य शारीरिक व वांशिक गुण असणाऱ्या निरोगी बोकडाची निवड करावी. निवड करताना त्याचे वय एक वर्षापेक्षा जास्त असावे, तो मारका नसावा. अशा बोकडास योग्य प्रमाणात हिरवा, वाळलेला चारा, खुराक व मुबलक पाण्याची व्यवस्था करावी.

शेळी पालनामध्ये गोठा पद्धतीला महत्व आहे. कमीत कमी खर्चात व्यवस्थित संगोपन केल्यास जास्तीत जास्त नफा राहतो. शेळीच्या निवासावरून मुक्त, अर्धबंदिस्त आणि बंदिस्त असे शेळी पालनाचे प्रकार पडतात. गोठा पद्धतीबाबत अधिक वाचा...

साधारणपणे शेळ्यांना दररोज तीन ते चार किलो हिरवा चारा व एक किलो वाळलेला चारा लागतो. त्याचप्रमाणे शेळ्यांच्या खाद्यामध्ये झाडपाला आवश्यक आहे. त्याचबरोबर गाभण शेळी, दूध देणारी शेळी, पैदाशीच्या बोकडासाठी पूरक आहाराची आवश्यकता अधिक वाचा...

वाढते तापमान आणि कमी पर्जन्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष या बदलत्या हवामानाचा शेळ्या- मेंढ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. सर्वसाधारणपणे शेळ्या- मेंढ्यांचा पैदासकाळ हा पावसाळ्याच्या सुरवातीला येतो; मात्र पैदाशीसाठी सक्षम शरीर यंत्रणा तयार होण्यासाठी उन्हाळी हंगामातच त्यांची काळजी कशी घ्यायची अधिक वाचा... 

शेळी ही निसर्गतः काटक व रोगांना कमी बळी पडते; मात्र अनेक कारणांमुळे विविध रोगांचे संक्रमण होऊन शेळीपालन व्यवसायाचे व्यवस्थापन बिघडण्याची दाट शक्यनता असते. शेळी संगोपानामध्ये आरोग्य व्यवस्थापन अधिक वाचा...

माझीशेती मार्फत शेलीपालनाचे संपुर्ण व्यवसाय शोध अहवालापासून मांस प्रक्रिया व निर्यातीबाबत सविस्तर ३ दिवस दररोज २ सत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. तज्ञ मार्गदर्शक, देशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची सफर असा प्रशिक्षणाचा भाग आहे. प्रशिक्षणाबाबत अधिक वाचा... 




गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तुम्ही हातभार लावा. प्रकल्प अहवाल बनवुन घ्या. तुम्ही दिलेला निधी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरला जातो. आमच्या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्या. 

माझीशेतीच्या शेळी पालन ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

उपजिविका विकास अंतर्गत 'शेळी पालन' लाभ दिलेले लाभार्थी शेलीसह...
उपजिविका विकास अंतर्गत 'शेळी पालन' लाभ दिलेले लाभार्थी शेलीसह...

दुष्काळी परिस्थितीत शेळ्या- मेंढ्यांची घ्यावयाची काळजी

भारतात शेळयांच्या प्रमुख 25 जाती आढळतात. शेळ्यांचा व्यावसायिक उपयोग करून दुध उत्पादन, लोकर / मोहर उत्पादन, मांस उत्पादन करता येते. दोन शेळ्या एका छोट्या कुटुंबाचा सक्षम उपजीविकेचा आधार बनू शकतात. शेळीच्या जाती निवड आणि जोपासना अधिक वाचा...

शेळी पालनामध्ये गोठा पद्धतीला महत्व आहे. कमीत कमी खर्चात व्यवस्थित संगोपन केल्यास जास्तीत जास्त नफा राहतो. शेळीच्या निवासावरून मुक्त, अर्धबंदिस्त आणि बंदिस्त असे शेळी पालनाचे प्रकार पडतात. गोठा पद्धतीबाबत अधिक वाचा...

साधारणपणे शेळ्यांना दररोज तीन ते चार किलो हिरवा चारा व एक किलो वाळलेला चारा लागतो. त्याचप्रमाणे शेळ्यांच्या खाद्यामध्ये झाडपाला आवश्यक आहे. त्याचबरोबर गाभण शेळी, दूध देणारी शेळी, पैदाशीच्या बोकडासाठी पूरक आहाराची आवश्यकता अधिक वाचा...

वाढते तापमान आणि कमी पर्जन्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष या बदलत्या हवामानाचा शेळ्या- मेंढ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. सर्वसाधारणपणे शेळ्या- मेंढ्यांचा पैदासकाळ हा पावसाळ्याच्या सुरवातीला येतो; मात्र पैदाशीसाठी सक्षम शरीर यंत्रणा तयार होण्यासाठी उन्हाळी हंगामातच त्यांची काळजी कशी घ्यायची अधिक वाचा... 

दुष्काळी परिस्थितीत शेळ्या- मेंढ्यांची घ्यावयाची काळजी

उष्माघात -
शेळ्या जर जास्त काळापर्यंत तीव्र उन्हात राहिल्या किंवा बाहेर सोडल्या, तर ही समस्या उद्‌भवण्याची शक्य्ता अधिक असते. त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, त्या मलूल दिसतात. चारा- पाणी घेण्याचे थांबते अथवा शरीराचे तापमान सामान्य तापमानाच्याही वर साधारणतः 105-106 फॅ.पर्यंत पोचते. कधीकधी शेळ्या मूर्च्छित होऊन पडतात. उपचाराला प्रतिसाद देण्याच्या आधी दगावतात.
उपचार व प्रतिबंध -
उष्माघाताचा त्रास होऊ नये, म्हणून शेळ्यांना दिवसातील थंड काळ जसे सकाळी लवकर (सहा ते दहा वाजेपर्यंत) आणि संध्याकाळी उशिरा (तीन ते सात वाजेपर्यंत) या काळातच चरावयास सोडावे. स्वच्छ, ताजे व थंड पाणी शेळ्यांना उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी.

उन्हाळी हगवण -
एकंदरीत अशा हगवणीसाठी अनेक घटक कारणीभूत असतात. जसे उष्माघात, गरम व दूषित पाणी, साचलेल्या दूषित पाण्याद्वारे जंतबाधा, जिवाणूबाधा किंवा अपचन अशा अनेक घटकांचा समावेश करता येईल. हगवणीची बाधा झाल्यास जनावरांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण व इलेक्ट्रो लाइटचे प्रमाण फार कमी होते, त्यामुळे शेळ्या अगदी अशक्त होतात व जमिनीवर पडून राहतात. जंतबाधेची हगवण असल्यास शेणाला विशिष्ट वास येतो.


उपचार व प्रतिबंध -
हगवणीला कारणीभूत घटकांचा योग्य तो उपचार अथवा प्रतिबंध करावा. जसे की हगवण थांबविणाऱ्या औषधांचा उपयोग, प्रतिजैविक गोळ्या (पेसुलिन, फॅजाल, पॅबाडीन इ.) सोबत इलेक्ट्रो लाइटची पावडर हे सर्व एकत्र करून स्वच्छ पाण्यातून दोन ते तीन वेळा पाजावे. तीव्र हगवणीच्या प्रकारात शिरेतून इलेक्ट्रोलाइट व ऊर्जेचे द्रावण द्यावे.

आम्लीय अपचन -
उन्हाळ्यात जनावरांची पचनशक्ती मंदावलेली असते. बाह्य तापमानाचे नियंत्रण करण्यासाठी शेळ्या पाणी जास्त पितात. शेळ्यांच्या खाद्यामध्ये जर कोरडा चारा जास्त प्रमाणात असला, तर पचनशक्तीवर परिणाम होतो. उन्हाच्या तीव्रतेने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन रक्तामध्ये आम्ल वाढते व आम्लीय अपचन होते. कधीकधी समारंभातील उरलेले तेलकट, पिष्टमय, दूषित अन्न खाल्ल्यामुळेसुद्धा असे अपचन होते.
उपचार व प्रतिबंध -
जास्त पिष्टमय खाल्ल्याने आम्लीय अपचन होऊन तीव्र हगवण लागते. शेळ्या दूषित, टाकलेले, उरलेले अन्न खाणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे. अचानक अशी समस्या आली तर पाण्यातून खाण्याचा सोडा पाजावा अथवा तीव्रता जास्त असल्यास शिरेद्वारे सोडाबायाकार्बचे द्रावण द्यावे, सोबत जीवनसत्त्वे व कोणतेही एक प्रतिजैविक द्यावे.

जंतबाधेमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम -
खरे तर उन्हाळ्यामध्ये जंतांची वाढीची अवस्था म्हणजे अंडी, अंड्यांपासून विषारी अवस्था व वयस्क अवस्था ही थांबलेली असते; परंतु शरीराच्या आत असलेले जंत जसे यकृत, आतडी व पोटाचे कप्पे यांतील जंत क्रियाशील असतात. सामान्यतः यकृतातील जंत जास्त क्रियाशील असतात. अशा जंतांची शरीरातील संख्या वाढली, की शेळ्यांमध्ये रक्ताल्पता वाढते व शेळ्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. शेळ्यांची हाडे व बरगड्या दिसायला लागतात. केस राठ झालेले व चकाकी नसलेले, तसेच कातडी निस्तेज झालेली दिसते. डोळ्यांची श्लेष्मा निस्तेज, फिकट दिसते आणि यकृतावर व पचनक्रियेवर परिणाम झालेले दिसतात. काही प्रसंगी शेवटी शेळ्यांना हगवणीचा तीव्र त्रास होऊन शेळ्या अगदी अशक्त होतात व उपचाराला प्रतिसाद न देता दगावतात.
उपचार व प्रतिबंध -
जंतबाधा ही शेळ्यांमधील प्रमुख समस्या आहे. उन्हाळ्यात जंतांची अंडी सुप्तावस्थेत असतात, अशा काळात गोठ्यातील जंतयुक्ती माती काढून घ्यावी व त्याठिकाणी जंतरहित माती टाकावी. या मातीमध्ये चुना व कॉस्टिक सोडा मिसळल्यास जमीन निर्जंतुक होण्यास मदत होईल, याशिवाय शरीरातील क्रियाशील जंत मारणे अति आवश्यक असते, त्यासाठी सर्व प्रकारच्या जंतांवर प्रभावी असलेले जंतुनाशक जसे फेनबेन्डॅझाल, डिस्टोडीन, बॅनमिन्थसारखी जंतुनाशक औषधे वापरून जंतनिर्मूलन करून घ्यावे, जेणेकरून उत्पादनक्षम काळात शेळ्यांचे आरोग्य चांगले राहील व गर्भाची योग्य वाढ होईल.

शरीरावर वाढणारे परोपजीवीसुद्धा या काळात सुप्तावस्थेत असतात. मात्र, त्याआधी योग्य ते औषध फवारणी करून शरीरावरील परोपजीवींचा बंदोबस्त करावा. अशाप्रकारे उन्हाळ्यात घेतलेली आरोग्याची काळजी पुढील काळात विशेषतः पावसाळ्यातील संक्रमण काळात प्रतिबंधक म्हणून आणि उद्‌भवणाऱ्या समस्येवर उपाय ठरते.


शेळी ही निसर्गतः काटक व रोगांना कमी बळी पडते; मात्र अनेक कारणांमुळे विविध रोगांचे संक्रमण होऊन शेळीपालन व्यवसायाचे व्यवस्थापन बिघडण्याची दाट शक्यनता असते. शेळी संगोपानामध्ये आरोग्य व्यवस्थापन अधिक वाचा...

माझीशेती मार्फत शेलीपालनाचे संपुर्ण व्यवसाय शोध अहवालापासून मांस प्रक्रिया व निर्यातीबाबत सविस्तर ३ दिवस दररोज २ सत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. तज्ञ मार्गदर्शक, देशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची सफर असा प्रशिक्षणाचा भाग आहे. प्रशिक्षणाबाबत अधिक वाचा... 




गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तुम्ही हातभार लावा. प्रकल्प अहवाल बनवुन घ्या. तुम्ही दिलेला निधी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरला जातो. आमच्या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्या. 

माझीशेतीच्या शेळी पालन ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

उपजिविका विकास अंतर्गत 'शेळी पालन' लाभ दिलेले लाभार्थी शेलीसह...
उपजिविका विकास अंतर्गत 'शेळी पालन' लाभ दिलेले लाभार्थी शेलीसह...

शेळी चारा व्यवस्थापन

भारतात शेळयांच्या प्रमुख 25 जाती आढळतात. शेळ्यांचा व्यावसायिक उपयोग करून दुध उत्पादन, लोकर / मोहर उत्पादन, मांस उत्पादन करता येते. दोन शेळ्या एका छोट्या कुटुंबाचा सक्षम उपजीविकेचा आधार बनू शकतात. शेळीच्या जाती निवड आणि जोपासना अधिक वाचा...

शेळी पालनामध्ये गोठा पद्धतीला महत्व आहे. कमीत कमी खर्चात व्यवस्थित संगोपन केल्यास जास्तीत जास्त नफा राहतो. शेळीच्या निवासावरून मुक्त, अर्धबंदिस्त आणि बंदिस्त असे शेळी पालनाचे प्रकार पडतात. गोठा पद्धतीबाबत अधिक वाचा...

साधारणपणे शेळ्यांना दररोज तीन ते चार किलो हिरवा चारा व एक किलो वाळलेला चारा लागतो. त्याचप्रमाणे शेळ्यांच्या खाद्यामध्ये झाडपाला आवश्यक आहे. त्याचबरोबर गाभण शेळी, दूध देणारी शेळी, पैदाशीच्या बोकडासाठी पूरक आहाराची आवश्यकता असते. 

शेळीपालनमध्ये चारा नियोजन

बंदिस्त शेळीपालनासाठी चाऱ्याचे वार्षिक नियोजन करणे आवश्यक आहे. कडवळ, गजराज, बरसीम, लसूणघास, मका इ. एकदल व द्विदल पिकांची लागवड करावी. त्याचप्रमाणे वाळलेल्या चाऱ्याकरिता कडबा, गहू, सोयाबीन, तांदळाचा कोंडा, उडदाच्या भुश्याय चा वापर करावा.

खाद्य प्रमाण : शेळीला दिवसाकाठी ३ ते ४ किलो ओला चारा व दीड ते दोन किलो सुका चारा द्यावा. शेळ्यांना प्रथिनयुक्त ल्यूसर्न,बरसीम, चवळी असा चारा द्यावा. मका, ज्वारी, बाजरी, ओट, नाचणी व त्यांचे कोंडा द्यावा त्यासोबत शेंगदाण, तीळ, सरकी सरकी, सोयाबीन, सूर्यफूल, खोबरे, करडई यांच्या पेंढि द्याव्यात. गाभण काळात शेवटी ३० दिवसात ४०० ते ५०० ग्रॅम खाद्य द्यावे.

लहान करडांचा चारा व खाद्य प्रमाण :
सुरवातीचा आठवडा चीक आणि दूध द्यावे. नंतर ओल्या व सुक्या गवतांचा तसेच झाडा झुडूपांच्या पाल्याचा चारा द्यावा. शेळ्यांना शेवरी, सुबाभूळ, पकार, पिंपळ, बेल, ओक, लिंबोळी, करवंद अश्या काटेरी झाडांचा पाला टांगून द्यावा. करडे १.५ ते २ महिन्यांची झाल्यावर दूध पाजने बंद करावे. याच काळात आंबवण व ओला चारा वाढवत जावे. चार महिन्यानंतर मटणासाठी विकण्यापर्यंत वैरणीशिवाय २५० ते ३०० ग्रॅम आंबवण द्यावे.

पैदाशीसाठी बोकडाचा चारा व खाद्य प्रमाण : 
चाऱ्यासह ५०० ते ८०० ग्रॅम प्रति दिन (त्याच्या वजनानुसार) खाद्य देणे आवश्यक आहे.

वाढते तापमान आणि कमी पर्जन्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष या बदलत्या हवामानाचा शेळ्या- मेंढ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. सर्वसाधारणपणे शेळ्या- मेंढ्यांचा पैदासकाळ हा पावसाळ्याच्या सुरवातीला येतो; मात्र पैदाशीसाठी सक्षम शरीर यंत्रणा तयार होण्यासाठी उन्हाळी हंगामातच त्यांची काळजी कशी घ्यायची अधिक वाचा... 

शेळी ही निसर्गतः काटक व रोगांना कमी बळी पडते; मात्र अनेक कारणांमुळे विविध रोगांचे संक्रमण होऊन शेळीपालन व्यवसायाचे व्यवस्थापन बिघडण्याची दाट शक्यनता असते. शेळी संगोपानामध्ये आरोग्य व्यवस्थापन अधिक वाचा...

माझीशेती मार्फत शेलीपालनाचे संपुर्ण व्यवसाय शोध अहवालापासून मांस प्रक्रिया व निर्यातीबाबत सविस्तर ३ दिवस दररोज २ सत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. तज्ञ मार्गदर्शक, देशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची सफर असा प्रशिक्षणाचा भाग आहे. प्रशिक्षणाबाबत अधिक वाचा... 




गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तुम्ही हातभार लावा. प्रकल्प अहवाल बनवुन घ्या. तुम्ही दिलेला निधी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरला जातो. आमच्या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्या. 

माझीशेतीच्या शेळी पालन ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

उपजिविका विकास अंतर्गत 'शेळी पालन' लाभ दिलेले लाभार्थी शेलीसह...
उपजिविका विकास अंतर्गत 'शेळी पालन' लाभ दिलेले लाभार्थी शेलीसह...

शेळी पालन प्रशिक्षण

शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रम 

माझीशेती मार्फत शेलीपालनाचे संपुर्ण व्यवसाय शोध अहवालापासून मांस प्रक्रिया व निर्यातीबाबत सविस्तर ३ दिवस दररोज २ सत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. तज्ञ मार्गदर्शक, देशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची सफर असा प्रशिक्षणाचा भाग आहे. 

प्रशिक्षणाचे फायदे - 
  • संपुर्ण प्रशिक्षण कालावधी हा ३ दिवसांचा असतो. प्रत्येक विषयावर स्वतंत्र एक संपुर्ण सत्र घेतले जाते. 
  • प्रशिक्षानार्थींचे वैयक्तिक स्तरावर SWOT अनालिसिस तंत्राद्वारे सक्षमिकरण केले जाते. 
  • प्रकल्प अहवालपासुन प्रगती अहवालापर्यंत सर्व बाबींचे प्रशिक्षणार्थींना स्वतः पृथ्थकरण करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. 
  • व्यवसायासाठी आवश्यक परवानेपासुन आणि लेखापरीक्षणासाठी आवश्यक दस्तऐवज तयार करण्याचे मार्गदर्शन प्रशिक्षनामध्ये समाविष्ट आहे.
  • सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना व्यवसाय सुरु झाल्यानंतर व्यवसाय यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.
  • शासकीय योजना समायोजनसह आपत्कालीन परिस्थितीत टेलीमेडीसीन तंत्रज्ञानाचा वापर याचा आवर्जून समावेश केला जातो.
याशिवाय 
  • सहभागी लाभार्थ्यांचा शासकीय योजना आणि संस्था सामाजिक बांधिलकी अंतर्गत क्लस्टर विकास केला जातो. 
  • विशिष्ठ अटी आणि शर्तीस अधीन राहून पुढे अंतराष्ट्रीय दर्जाचे प्रक्रिया युनिट उभा करण्यास सहाय्य केले जाते. 
प्रशिक्षणाबाबत इतर माहिती - 
  • प्रशिक्षणासाठी खर्च - रु. ३६०० प्रति प्रशिक्षणार्थी 
  • बाहेर गावाच्या प्रशिक्षनार्थींनी निवास खर्च स्वतः करावयाचा आहे. 
  • प्रशिक्षण खर्चामध्ये एकवेळ चहा व दुपारचे जेवण समाविष्ट आहे. 
  • ज्या प्रशिक्षणार्थींना बँक कर्ज मंजुर आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल. 

भारतात शेळयांच्या प्रमुख 25 जाती आढळतात. शेळ्यांचा व्यावसायिक उपयोग करून दुध उत्पादन, लोकर / मोहर उत्पादन, मांस उत्पादन करता येते. दोन शेळ्या एका छोट्या कुटुंबाचा सक्षम उपजीविकेचा आधार बनू शकतात. शेळीच्या जाती निवड आणि जोपासना अधिक वाचा...

शेळी पालनामध्ये गोठा पद्धतीला महत्व आहे. कमीत कमी खर्चात व्यवस्थित संगोपन केल्यास जास्तीत जास्त नफा राहतो. शेळीच्या निवासावरून मुक्त, अर्धबंदिस्त आणि बंदिस्त असे शेळी पालनाचे प्रकार पडतात. गोठा पद्धतीबाबत अधिक वाचा...

साधारणपणे शेळ्यांना दररोज तीन ते चार किलो हिरवा चारा व एक किलो वाळलेला चारा लागतो. त्याचप्रमाणे शेळ्यांच्या खाद्यामध्ये झाडपाला आवश्यक आहे. त्याचबरोबर गाभण शेळी, दूध देणारी शेळी, पैदाशीच्या बोकडासाठी पूरक आहाराची आवश्यकता अधिक वाचा...

वाढते तापमान आणि कमी पर्जन्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष या बदलत्या हवामानाचा शेळ्या- मेंढ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. सर्वसाधारणपणे शेळ्या- मेंढ्यांचा पैदासकाळ हा पावसाळ्याच्या सुरवातीला येतो; मात्र पैदाशीसाठी सक्षम शरीर यंत्रणा तयार होण्यासाठी उन्हाळी हंगामातच त्यांची काळजी कशी घ्यायची अधिक वाचा... 

शेळी ही निसर्गतः काटक व रोगांना कमी बळी पडते; मात्र अनेक कारणांमुळे विविध रोगांचे संक्रमण होऊन शेळीपालन व्यवसायाचे व्यवस्थापन बिघडण्याची दाट शक्यनता असते. शेळी संगोपानामध्ये आरोग्य व्यवस्थापन अधिक वाचा...

माझीशेती मार्फत शेलीपालनाचे संपुर्ण व्यवसाय शोध अहवालापासून मांस प्रक्रिया व निर्यातीबाबत सविस्तर ३ दिवस दररोज २ सत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. तज्ञ मार्गदर्शक, देशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची सफर असा प्रशिक्षणाचा भाग आहे. प्रशिक्षणाबाबत अधिक वाचा... 




गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तुम्ही हातभार लावा. प्रकल्प अहवाल बनवुन घ्या. तुम्ही दिलेला निधी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरला जातो. आमच्या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्या. 

माझीशेतीच्या शेळी पालन ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

उपजिविका विकास अंतर्गत 'शेळी पालन' लाभ दिलेले लाभार्थी शेलीसह...
उपजिविका विकास अंतर्गत 'शेळी पालन' लाभ दिलेले लाभार्थी शेलीसह...

Friday, February 23, 2018

मिलनरिंग - सामुहिक विवाह सोहळा


शेतकरी / शेतमजुर यांनी मुलींच्या लग्नासाठी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करू नये म्हणून मुलीच्या विवाहासाठी रु. १०००० इतकी अनुदानित राशी दिली जाते. मंगळसुत्र व किमान आवश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी सहाय्यक अनुदान दिले जाते. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी माझीशेतीच्या सहयोगी संस्थांमार्फत सहभागी बांधवांच्या मुला- मुलींच्या लग्नात 'फुलाची पाकळी' समजुन अर्थसहाय्य केले जाते. 

जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत थाटामाटात लग्न केले जाते. लग्न समारंभात कोणतीही उणीव भासणार नाही याची काळजी माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानकडून घेतली जाते. 

सहभागी होणाऱ्या वधु-वरांसाठी नियम व अटी

  • वधु, वर व त्यांचे पालक माझीशेतीचे शेतकरी लाभार्थी घटक असावेत.
  • वधु-वर हे संस्थेच्या कार्यक्षेत्रात (महाराष्ट्रात) राहणारे असावेत. 
  • प्रथम वधु-वरास तसेच विधवा आणि घटस्फोटीत वधुच्या विवाहासाठी माझीशेतीकडून सहकार्य केले जाईल.
  • लाभार्थी कोणत्याही क्षणी नोंदणी करू शकतात परंतु एका सहयोगी संस्थेकडे किमान १० लाभार्थी जोडप्यांची नोंदणी झाल्यानंतर यथोचित निमंत्रणे आणि मुहूर्त पाहून सामुहिक लग्नसोहळा केला जातो.
  • सहभागी जोडप्यांनी निबंधक विवाह नोंदणी यांच्याकडे नोंदणी करणे आणि प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे. 
  • सहभागी जोडप्यांनी शेतकरी असलेबाबत (७/१२) व रहिवासी दाखला (तलाठी किंवा ग्रामसेवक) सादर करणे. 

Thursday, February 22, 2018

नारळ लागवड माहिती

नारळ लागवड 
सर्वच प्रकारच्या जमिनीत नारळ लागवड करता येते. जमिनीच्या प्रकारानुसार मशागत करावी. शेताच्या बांधावर देखील नारळाची लागवड करता येते. 1 × 1 × 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावे. खड्डे खोदण्याचे काम पावसाळ्यापूर्वी एक ते दीड महिना अगोदर पूर्ण करावे. रेताड, वरकस किंवा मुरमाड जमिनीत खड्डे भरताना खड्ड्याच्या तळात कमीत कमी एक ते दोन टोपल्या चांगल्या प्रतीची माती टाकावी. अधिक काळ पाणी धरून ठेवणाऱ्या भारी प्रतीच्या जमिनीत खड्ड्याच्या तळाला एक ते दोन टोपल्या रेती (वाळू) घालावी; तसेच खड्डा भरताना एक ते दोन टोपल्या रेती मातीत मिसळावी, त्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होतो. वालुकामय जमिनीत खड्ड्याच्या तळाशी नारळाच्या सोडणांचा थर दिल्यास उत्तम. त्याद्वारे जमिनीत ओल टिकून राहते. खड्डा भरताना खड्ड्यात चार ते पाच घमेली शेणखत, दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 50 ग्रॅम फॉलिडॉल पावडर खड्ड्याच्या मातीत मिसळावी. जमीन सपाट असल्यास खड्डे पूर्ण भरून घ्यावेत. 
पावसाचा जोर ओसरल्यानंतर ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये लागवड करावी. 


लागवडीचे अंतर -
उंच जाती - 7.5X7.5 मीटर
बुटक्या जाती - 6X6 मीटर
कुंपन करिता - 7 मीटर


एक वर्षे वयाच्या रोपांना पाच ते सहा पाने असावीत. रोपे निरोगी व जोमदार असावीत.  रोपांचा बुंधा आखूड व जाड असावा. रोपे कृषी विद्यापीठ, शासकीय आणि शासकीय मान्यताप्राप्त रोपवाटिकेतूनच खरेदी करावीत.

जातींची माहिती
उंच जाती 
बाणवली (वेस्ट कोस्ट टॉल) - 
या जातीचे आयुष्यमान 80 ते 100 वर्षे असून सहा ते सात वर्षांनी फुलोऱ्यात येते. उत्पादन - सरासरी 80 ते 100 फळे मिळतात.


लक्षद्वीप ऑर्डिनरी (चंद्रकल्पा) - 
या जातीची झाडे आणि फळे बाणवलीसारखीच असतात, परंतु फळाच्या तीनही कडा उठावदार असतात.
उत्पादन - सरासरी 150 फळे मिळतात. या जातीच्या नारळात सरासरी 140 ते 180 ग्रॅम खोबरे मिळते, तर तेलाचे प्रमाण 72 % असते.


प्रताप - 
प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र (भाट्ये) रत्नागिरी येथे ही जात बाणवली वाणातून निवड पद्धतीने विकसित करून महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आली आहे. नारळाचा आकार मध्यम, गोल असून ती सहा ते सात वर्षांत फुलोऱ्यात येते.
उत्पादन - या जातीच्या एका झाडापासून 150 नारळ मिळतात.


फिलिपिन्स ऑर्डिनरी - 
या जातीचे नारळ आकाराने फारच मोठे असतात. 
उत्पादन - सरासरी 105 नारळ आहे.सरासरी 213 ग्रॅम खोबरे मिळते.


बुटक्या जाती (सिंगापुरी)
ऑरेंज डार्फ, ग्रीन डार्फ आणि यलो डार्फ -
लागवड केल्यापासून तीन ते चार वर्षांनी फुलोऱ्यात येतात. बुतक्या जातीचे आयुष्यमान 30 ते 35 वर्षे असते. रंगावरून ऑरेंज डाफर्‌ , ग्रीन डार्फ आणि यलो डार्फ अशा पोटजाती आहेत. 
शहाळ्यासाठी ऑरेंज डार्फ ही जात सर्वांत उत्तम आहे. 100 ml. पाण्यात 7 gm एवढी साखर असते. 


संकरित जाती 
केरासंकरा (T × D) - 
या जातीची झाडे चार ते पाच वर्षांत फुलोऱ्यात येतात. 
उत्पादन - सरासरी 150 नारळ फळे मिळतात. खोबऱ्यात तेलाचे प्रमाण 68 % इतके असते.


चंद्रसंकरा (D X T) - या संकरित जातीची फळधारणा चार ते पाच वर्षांनी होते. 
उत्पादन - सरासरी उत्पादन 116 फळे आहे


रोपांची निवड, निगा महत्त्वाची -
रोपाची लागवड केल्यानंतर लगेचच त्याला आधार द्यावा. पश्‍चिमेकडील वाऱ्याने ते हलू नये म्हणून रोपाच्या उंचीच्या दोन काठ्या 45 सें.मी. अंतरावर रोपाच्या दक्षिणोत्तर बाजूवर रोवून त्याला एक आडवी काठी बांधावी. त्यावर रोप सैलसर बांधून ठेवावे.  पहिली दोन वर्षे उन्हाळ्यात सावली करणे आवश्‍यक आहे, त्यासाठी रोपांच्या चारही बाजूला उंच वाढणारी केळी; तसेच पपई यांची लागवड करावी. 
कोकणात काळी मिरी, जायफळ, दालचिनी या पिकांची लागवड आंतरपिके घेता येतात.

खते आणि पाणी व्यवस्थापन : नारळाच्या झाडांना चांगल्या वाढीसाठी नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची गरज असते. खते आणि पाणी नियमित दिले तर नारळाची वाढ होऊन झाड ५ ते ६ वर्षांतच फुलोर्‍यावर येते. पहिल्यावर्षी शेणखत १० किलो, नत्र २०० ग्रॅम , स्फुरद १०० ग्रॅम, पालाश २०० ग्रॅम आणि कल्पतरू सेंद्रिय खत ५०० ग्रॅम या प्रमाणात द्यावे. नंतर पुढे तेवढेच प्रमाण वाढवून दरवर्षी खते द्यावीत.

नत्र व पालाश ह्या खतांच्या मात्रा जून, सप्टेंबर आणि फेब्रुवारी महिन्यांमध्ये तीन वेळा विभागून द्याव्यात. तर शेणखत, कल्पतरू सेंद्रिय खत आणि स्फुरद संपूर्ण मात्रा जूनमध्ये द्यावी.

खते कशी द्यावीत : झाडाच्या बुंध्यापासून एक मीटर अंतरावर ३० सेंमी रुंदीचा व १५ सेंमी खोलीचा चर काढून त्यात खते द्यावीत आणि चर पुन्हा बुजवावा. जसजसे रोप मोठे होईल तसतसा चर बुंध्यापासून दूर काढावा.

मिठाचा वापर :
कोकणातील काही शेतकरी नारळाच्या झाडाला खत म्हणून काही प्रमाणात मिठाचा वापर करतात. परंतु खत म्हणून मिठाची उपयुक्तात सिद्ध झालेली नाही. यामुळे खत म्हणून मिठाच वापर करू नये. देशावरील भागात तर मिठाचा वापर अजीवात करू नये.

पाणी : नारळाच्या झाडांना नियमितपणे पाणी दिले तर त्यांचे उत्पादन बर्‍याच प्रमाणात वाढते. नारळाच्या झाडांना मुख्यत्वेकरून उन्हाळ्यात पाणी देण्याची जास्त आवश्यकताही असते. काही ठिकाणी पावसाळ्यानंतर नारळाच्या झाडांना पाणी दिले जात नाही. परिणामी झाडांची योग्य वाढ होत नाही आणि उत्पादन कमी मिळते.

नारळाची नवीन लागवड केल्यानंतर पहिली ३ ते ४ वर्षे झाडांना हिवाळ्यात व उन्हाळ्यात आठवड्यातून दोन वेळा पाणी द्यावे. पूर्ण वाढलेल्या नारळाच्या झाडांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे ५ ते १० दिवसांतून वेळा पाणी द्यावे. नारळाच्या झाडाच्या बुंध्याभोवती झाडाच्या आकारानुसार १ ते २ मीटर व्यासाचे गोल किंवा चौकोनी आले करून पाणी द्यावे. पाणी झाडाच्या खोडाजवळ फार काळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

किडी व रोग नियंत्रण - 
गेंड्या भुंगा -
हा भुंगा नवीन येणारा कोंब खातो, त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. झाडावर नवीन पाने त्रिकोणी आकारात कापलेली दिसतात. लिंडेन (५०%) किंवा कार्बारिल (५०%) पावडर २० ग्रॅम (पाण्यात मिसळणारी) दहा लिटर पाण्यात मिसळून झाडांवर फवारावीत. खताचे खड्डे बागेजवळ बनवु नये. झाडांतून कीडे काढून नष्ट करावेत.


सोंड्या भुंगा -
खोडाच्या आतील मऊ भाग पोखरला जातो, त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. काही दिवसांनी झाड मरते. झाडावर प्रत्येक बेचक्यात २५० ग्रॅम लिंडेन भुकटी टाकावी. झाडावर भुंग्यामुळे पडलेल्या सर्वांत वरच्या छिद्रात २० ग्रॅम कार्बारिल (५०%) टाकावे. तत्पूर्वी खालची सर्व छिद्रे वाळू आणि १० % लिंडेन १:१ प्रमाणात मिसळून  बंद करावीत. ४० ग्रॅम ५०% कार्बारिल भुकटी (पाण्यात मिसळणारी) १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावित.


पानावरील कोळी -
या किडीच्या प्रादुर्भावामुळे पानांवर पिवळसर ठिपके पडतात. लहान फळांची गळ होते. १० लिटर पाण्यात २५ ग्रॅम वेटेबल गंधक मिसळून फवारणी करावी.


उंदीर -
उंदीर नारळाची कोवळी वाढणारी फळे पोखरतात. बुंध्यावर जमिनीपासून २ मीटर उंचीवर अर्धा मीटर गुळगुळीत पत्र्याच्या गोलाकार पट्ट्या बसवाव्यात. १०० ग्रॅम गव्हाच्या पिठामध्ये ६ ग्रॅम झिंक फॉस्फाईड मिसळून त्याच्या गोळ्या तयार करुन खोडातील व बागेतील बिळातही टाकाव्यात.

रोग नियंत्रण -
कोंब कुजणे - 
या रोगाची लागण झालेल्या झाडाचा कोंब कुजतो व त्याला दुर्गंधी सुटते. कोवळी झाडे अधिक प्रमाणात बळी पडतात. या रोगाची लागण झालेल्या झाडाचा कुजलेला कोंब आणि कोंबाचा भाग खरडून त्यावर बोर्डो मिश्रणाची पेस्ट लावावी. १% बोर्डो मिश्रण किंवा डायथेन एम -४५ बुरशीनाशक औषध एक लिटर पाण्यात २ ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.


फळांची गळ - 
नारळाच्या झाडाला नारळा धरण्यास सुरुवात झाल्यावर पहिली १ - २ वर्षे फळांची नैसर्गिक गळ होते. खते आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे.

करपा - 
नारळाच्या झाडाच्या पानांवर पेस्टोलोशिया नावाच्या बुरशीमुळे तपकिरी लालसर रंगाचे ठिपके पडतात. ठिपके मोठे होऊन झाडाचे संपूर्ण पान करपते. वाळलेली पाने काढून नष्ट करावीत. १% बोर्डो मिश्रण किंवा १० लिटर पाण्यात ३ ग्रॅम डायथेन झेड -७८ हे बुरशीनाशक मिसळून फवारणी करावी.

खोड पाझरणे - 
जमिनीतून पाण्याचा चांगला निचरा करून घ्यावा. रोगामुळे कुजलेला भाग खरडून काढावा आणि त्यावर बोर्डो पेस्ट लावावी. खते आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे.

फळांची काढणी आणि उत्पादन :
नारळाच्या झाडाला फुलोरा आल्यापासून १२ महिन्यांनी त्याची फळे पक्क होतात. या वेळी फळाचा हिरवा रंग जाऊन पिवळसर तपकिरी रंग येतो. नारळाच्या तयार फळावर टिचकी मारल्यास खणखणीत आवाज येतो. नंतर पाडेली कडून नारळाचा घस कापून काढावा.
शहाळ्यासाठी पहले ६ महिन्यांनंतर आवश्कतेनुसार नारळ काढतात.


प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, ता. जि. रत्नागिरी
संपर्क - 02352 - 255077