Friday, August 5, 2016

शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर कीटकनाशके

*माझीशेती कृषिवार्ता : शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर कीटकनाशके*(20160805)
- संतोष तनपुरे

खरीप पिके वाढीच्या अवस्थेत रोग व किडीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी *५० टक्के अनुदानावर कीटकनाशकांचे वाटप* करण्यात येणार आहे.
*कडधान्य* पिकांसह दुय्यम पिकांच्या पीक संरक्षणासाठी *राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून* हा कार्यक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे. तर विदर्भातील पाच जिल्हे, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांत भात पिकांच्या संरक्षणासाठी कीटकनाशके देण्यात येणार आहे.
*राष्ट्रीय गळीत धान्य अभियानातून* भुईमूग, सोयाबीन, करडई, जवस, तीळ या पिकांच्या संरक्षणासाठी रासायनिक व जैविक कीटकनाशकांसाठी 50% अनुदान देण्याची तरतूद केली आहे.
*क्रॉपसॅप* अंतर्गत कापूस, सोयाबीन, भात, तूर या पिकांना सर्व कीटकनाशके ५० टक्के अनुदानावर दिली जाणार आहे.

*लाभार्थी निवड*
अभियानांतर्गत निवडलेल्या पिकांच्या प्रकल्पाच्या *शेतकरी गट, शेतकरी कंपन्यातील शेतकऱ्यांना या कीटकनाशकांचा लाभ मिळणार* आहे. त्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment