Saturday, January 16, 2016

नवलकोल *

माहिती अद्ययावत करणे चालू आहे.

कोबी

कोबी
हवामान आणि जमीन - 
कोबीच्या लवकर येणार्या जातींसाठी हलकी ते मध्यम उशीरा येणार्या जातींसाठी सुपीक, भारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६ -६.५ अस मात्र आम्लयुक्त जमिनीत कोबीच्या पिकास बोरॉन मॉलिब्डेनम  या सूक्ष्म अन्नद्रव्यांची  कमतरता पडून रोपे रोगट दिसू लागतात आणि उत्पादन  घटते.

बीजप्रक्रिया - 
५० ते १०० ग्रॅम बियासाठी २० ते ३० मिली जर्मिनेटर आणि १५ ते २० ग्रॅम प्रोटेक्टंटची पेस्ट बनवून बीजप्रक्रिया करावी.
गादीवाफ्याच्या रुंदीशी समांतर ५ ते ६ सेंमी अंतरावर  पेरावे. साधारणपणे एका चौरस मीटरला १ ग्रॅम बियाणे पडेल अशा तर्हेने बियाणे विरळ पेरावे. साधारणपणे ३ ते ५ आठवड्यांत कोबीची रोपे लागवडीसाठी तयार होतात.

हंगाम, बियाण्याचे प्रमाण आणि लागवडीचे अंतर
खरीप हंगामासाठी रोपवाटीकेत बियाण्याची पेरणी मे - जूनमध्ये करावी. रब्बी हंगामात सप्टेंबर ते ऑक्टोबर आणि उन्हाळी हंगामासाठी जानेवारी महिन्यात रोपे तयार करावीत.
- ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत रोपांची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळते आणि मालाचा दर्जा उत्तम मिळतो.

एक हेक्टर लागवडीसाठी बियाणे - 
हळवे वाण 500 gm
गरवे वाण 300-400 gm
संकरित वाण 200-250 gm

बियाण्यांच्या पेरणीनंतर हंगामानुसार ३ -४ आठवड्यांत रोपे लागवडीसाठी तयार होतात. गादीवाफ्यावरून रोपे उपटून शेतात लावताना आदल्या दिवशी वाफ्यांना पुरेसे पाणी द्यावे. त्यामुळे रपे उपटतान मुळांना इजा होणार नाही.
रोपांची आटोपशीर  वाढ मध्यम आकाराचा गड्डा आणि लवकर काढणीला येणार्या जातींसाठी ४५ x ४५ cm किंवा ३० x ३० cm अंतर ठेवावे. 
मोठा गड्डा, रोपांची पसरट वाढ आणि अशिरा तयार होणार्या जातींची लागवड ६० x ६० cm किंवा ७० x ७० cm अंतरावर करवी. रोपांची पुनर्लागवड करताना १० लि. पाण्यामध्ये १००मिली जर्मिनेटर घेऊन त्ये द्रावणात रोपे पुर्ण बुडवून लावावीत. रोप लावताना मुळ्या जमिनीत सरळ राहतील अशा तर्हेन रोपांची लागवड करावी. लागवडीनंतर लगेच हलके पाणी द्यावे. लागवडीनंतर दुसर्या किंवा तिसरया दिवशी आंबवणी द्यावी.

लागवड पद्धती - 
पावसाळयाच्या सुरुवातीला ताग किंवा धैंचा यासारखे हिरवळीच्या खताचे पीक घेऊन ते जमिनीत गाडावे. हिरवळीचे पीक घेणे शक्य नसल्यास हेक्टरी १५ ते २० टन शेणखत, लेंडीखत किंवा कोणतेही सेंद्रिय खत जमिनीत मिसळून द्यावे. नंतर २ मीटर रुंद आणि ३ मीटर किंवा सोयीस्कर लांबीचे वाफे तयार करावेत. खरीप हंगामात ४५ ते ६० सेंटिमीटर अंतरावर सरी- वरंबे पाडून वरील आकराचे वाफे बांधून घ्यावेत. पाणी देण्यासाठी ड्रीप इरिगेशन पद्धत वापरावी.

महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण - 
१) मावा : (अॅफिड्स ) - किडीची पिल्ले हिरव्या रंगाची असतात, तर कीड काळसर रंगाची असते. कीड कोवळ्या पानांतून अन्नरस शोषून घेतात. पानाच्या बेचक्यात, पानाखाली, फुलकोबीच्या गड्ड्याच्या आतील बाजूस ही कीड asate. पाने पिवळी होऊन गळून पडतात. रोपाची वाढ खुंटते, पाने आकसल्यासारखी रोगट, पिवळी दिसतात. 
उपाय : ढगाळ हवामानात या किडीची झपाट्याने वाढ होते. यासाठी १० लिटर पाण्यात २५ मिली लिटर मॅलाथिऑन आणि २० ग्रॅम प्रोटेक्टंट मिसळून १० ते २५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

२) चौकोनी ठिपक्याचा पतंग -(डायमंड बॅक मॉथ) - या किडीचा पतंग पानकोबी तसेच सर्व कोबीवर्गीय भाज्यांच्या पानांवर पिवळसर राखी रंगाची अंडी घालतो. त्यातून फिकट हिरव्या किंवा भुरकट रंगाच्या अळ्या बाहेर पडतात.या अळ्या पानाच्या खालच्या बाजूस राहून पानाचा पृष्ठभाग खरडून खातात. त्यामुळे पानावर असंख्य छिद्रे पडून पान चाळणीसारखे दिसते. सप्टेंबर ते मार्च या काळात  ही कीड सर्वत्र आढळते.
उपाय - १० लिटर पाण्यात २० मिली क्विनॉलफॉस किंवा ४ % निंबोळी अर्काच्या प्रोटेक्टंट २० ग्रॅमसह (रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर) १० -१२ दिवसांच्या अंतराने २ -३ फवारण्या कराव्यात.

३) मोहरीवरील काळी माशी -(मस्टर्ड सॉ फ्लाय )- ही बारीक, जाडसर काळपट पिवळसर रंगाची माशी असून ती पानांच्या पेशीत अंडी घालते. Tyapasun nighalelyaकाळसर रंगाच्या अळ्या पिकाची कोवळी पाने खातात. या अळ्या कोवळ्या पानाच्या कडेपासून पाने खाण्यास सुरुवात करून संपूर्ण रोपांवरील पाने खातात. पानकोबी, फुलकोबी या पिकांशिवाय नवलकोल, मुळा, मोहरी इत्यादी पिकांवर ही कीड आढळते.

4) कोबीवरील फुलपाखरू (कॅबेज बटरफ्लाय) - कोबीवर्गीय भाज्यांच्या पानांवर पांढर्या रंगाचे मोठे फुलपाखरू अंडी घालते. त्यातून निघणाऱ्या हिरव्या अळ्या पाने खातात. पानांवर असंख्य छिद्रे दिसतात.

५) पानावर जाळी विणणार्या अळ्या (लीफ वेबर ) - या किडीच्या फिकट हिरव्या रंगाच्या आह्या पानाचा पृष्ठभाग खातात पाने गुंडाळून स्वत: भोवती जाळी तयार करतात. त्यामुळे पानांची अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते.

६) गड्डा पोखरणारी अळी (ग्रॅम कॅटरपिलर ) - फिकर पिवळसर विटकरी रंगाचे हे पतंग कोबीच्या पानांवर अंडी घालतात. त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या तांबूस करड्या रंगाच्या असतात. या अळ्या पाने खातात आणि पानांमागे लपून बसतात. तसेच गड्डे पोखरून आत शिरतात. त्यामुळे गड्ड्यांची प्रत खराब होते.

उपाय : वरील सर्व किडींच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात १० मिली मॅलथिऑन आणि २० मिली क्विनॉलफॉस (इकॅलक्स) किंवा ४ % निंबोळी अर्क + २५ ग्रॅम प्रोटेक्टंट एकत्र मिसळून लागवडीनंतर १५ ते २० दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवारण्या दिल्यास कोबीवरील पाने कुरतडणार्या तसेच गड्डा पोखरणार्या सर्व प्रकारच्या अळ्यांचे नियंत्रण होते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृत फवारण्या प्रोटेक्टंटचा नियमित वापर केल्यास किडीस प्रतिबंध होतो.

महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण - 
१) रोपे कोलमडणे (डॅपिन ऑफ) - हा रोग जमिनीत वाढणार्या बुरशीपासून होतो. या रोगाची लागण प्रामुख्याने उष्ण आणि दमट हवामानात, पाण्याचा योग्य निचर न होणार्या जमिनीत होतो. रोपे निस्तेज पिवळसर दिसतात. रोपांचे जमिनीलगतचे खोड कुजून रोपे पडतात.
उपाय : रोपे नेहमी पाण्याचा उत्तम निचरा असलेल्या ठिकाणी गादीवाफ्यावर तयार करावीत. पेरणीपूर्वी १३ ग्रॅम कॅपटॉंन किंवा फायटेलॉन १० लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण गादीवाफ्यावर झारीने शिंपडावे. तसेच पेरणीपूर्वी बियाण्यास व पुनर्लागवडीत रोपांना जर्मिनेटरची प्रक्रिया करा.

२) काळी कूज (ब्लॅक लेग) - बियाण्यात वाढणार्या बुरशीपासून या रोगाचा प्रसार होतो. रोगाचे प्रादुर्भाव झालेल्या रोपांची सर्व मुळे खालून वरच्या भागाकडे कुजतात.
उपाय : बियाण्याचे निर्जंतुकीकरण करावे. त्यासाठी १ ग्रॅम कॅपटॉंन १ लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात पानकोबी, फुलकोबी किंवा नवलकोल बियाणे prakriya karun पेरणीसाठी वापरावे.

३) केवडा (डाऊनी मिल्ड्यू ) - रोगग्रस्त पानांवर पिवळसर किंवा जांभळट रंगाचे डाग दिसतात. पानाच्या खालच्या भागावर भुरकट केवड्याच्या बुरशीची वाढ झालेली दिसते. गड्ड्यांची काढणी लांबल्यास गड्ड्यांवर काळपट चट्टे दिसतात आणि असे गड्डे सडू लागतात.

४) करपा (ब्लॅक स्पॉट) - या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या रोपांची पाने, देठ आणि खोडावर वर्तुळाकर किंवा लंबगोल काळसर रंगाचे डाग दिसू लागतात. नंतर हे डाग एकमेकांत मिसळून लागण झालेला सर्व भाग करपल्यासारख्या काळपट रंगाचा दिसतो.
उपाय : केवडा व करपा दोन्ही रोगाची प्राथमिक लक्षणे दिसताच पिकावर १% बोर्डो मिश्रण फवारावे किंवा १० लिटर पाण्यात २५ मिली थ्राईवर + २५ मिली क्रॉंपशाईनर+ २५ ग्रॅम डायथेन एम - ४५ हे औषध मिसळून १० दिवसांच्या अंतराने २ फवारण्या करा.

५) भुरी (पावडरी मिल्ड्यू ) - कोबीवर्गीय पिकांवर भुरी हा बुरशीजन्य रोग क्वचित प्रसंगी आढळतो. सुरुवातीला पानांच्या वरच्या बाजूला पांढर्या रागाचे ठिपके दिसतात. काही काळाने संपूर्ण पानावर करड्या रंगाची बुरशी वाढलेली दिसते.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाची लागण दिसून येताच १० लिटर पाण्यात थ्राईवर २५ मिली + २५ ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक मिसळून फवारणी करवी.

६) मुळकुजव्या (फ्लबरूट ) - या बुरशीजन्य रोगामुळे झाडाच्या मुळांवर अनियमित गाठी तयार होतात. झाडाची पाने पिवळी पडतात आणि सुकतात. ज्या जमिनीचा  सामू ७ पेक्षा कमी आहे अशा जमिनीत  या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळतो.
उपाय : जमिनीत चुना टाकून जमिनीचा आम्ल - विम्ल निर्देशांक वाढवावा. रोपांच्या लागवडीपूर्वी रोपे जर्मिनेटर १० मिली आणि २ ग्रॅम बाविस्टीन १ लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात बुडवून नंतर रोपांची लागवड करावी.

पिकांची काळजी :
वरील कीड, रोग, विकृतींवर प्रतिबंधक व प्रभावी उपाय तसेच भरघोस, दर्जेदार उत्पादनासाठी खालीलप्रमाणे फवारण्या कराव्यात. 
फवारणी :
१) पहिली फवारणी : ( लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी) : जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २०० मिली + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : ( लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : ( लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ४०० मिली + २५० लि. पाणी.

जवस

कमी कालावधीचे, कमी खर्चामध्ये उत्पादन शक्य असलेले जवस हे पीक आहे. या पिकाच्या कोरडवाहू क्षेत्रातही उत्तम उत्पादन देणाऱ्या ‘लातूर जवस-९३’ हे वाण लातूर येथील गळितधान्य संशोधन केंद्रामध्ये विकसित करण्यात आले आहे. परभणी येथे झालेल्या ॲग्रेस्कोमध्ये या वाणाची महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रात लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

कमी कालावधीचे, कमी खर्चामध्ये उत्पादन शक्य असलेले जवस हे पीक आहे. या पिकाच्या कोरडवाहू क्षेत्रातही उत्तम उत्पादन देणाऱ्या ‘लातूर जवस-९३’ हे वाण लातूर येथील गळितधान्य संशोधन केंद्रामध्ये विकसित करण्यात आले आहे. परभणी येथे झालेल्या ॲग्रेस्कोमध्ये या वाणाची महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रात लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

राज्यातील बदलते वातावरण आणि रब्बी हंगामातील पावसाची अनियमितता यामुळे कोरडवाहू क्षेत्र वाढत आहे. अशा स्थितीमध्ये कमी कालावधी व कमी लागवड खर्च, कीड व रोगाचा कमी प्रादुर्भाव यामुळे जवस हे पीक रब्बी हंगामातील (विशेषतः कोरडवाहू क्षेत्रातील) महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणून राज्यात शेतकऱ्यासाठी वरदान ठरू शकते. काही ठिकाणी हे पीक बागायती पिकांमध्ये आंतरपीक म्हणूनही घेतले जाते.

वास्तविक जवस पिकाची उत्पादन क्षमता हेक्टरी २० क्विंटल व धाग्याचे उत्पादन हेक्टरी १२ क्विंटल एवढी आहे. मात्र, आपल्याकडे विशेषतः कोरडवाहू क्षेत्रामध्ये जवस पिकाची उत्पादनक्षमता व प्रत्यक्ष उत्पादन यात प्रचंड तफावत दिसून येते. त्यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत गळीतधान्ये संशोधन केंद्र, लातूर येथे कोरडवाहू क्षेत्रासाठी उपयुक्त असे ‘लातूर जवस-९३’ हे नवीन वाण विकसित केले आहे. मे २०१७ मध्ये परभणी येथे झालेल्या महाराष्ट्र कृषी विद्यापीठे संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठकीत ‘महाराष्ट्रात कोरडवाहू क्षेत्रात लागवडीसाठी जवसाचा नवीन वाण’ म्हणून शिफारस करण्यात आली आहे.

वाणाची विशिष्ट्ये :

अखिल भारतीय समन्वयीत प्रयोग व राज्यस्तरिय प्रयोगात ‘लातूर जवस-९३’ या वाणाने कोरडवाहू क्षेत्रात ८००-१००० किलो/हेक्टर उत्पादन दिले, तर बागायती क्षेत्रात १४००-१६०० किलो/हेक्टर उत्पादन दिले.अन्य वाणाच्या तुलनेत हा वाण १० ते १५ दिवस लवकर (म्हणजे ९५-१०० दिवसांत) परिपक्व होत असल्यामुळे कोरडवाहू लागवडीसाठी योग्य आहे.यात तेलाचे प्रमाण (३९ %) असून, १००० दाण्याचे वजन ७.५० ग्रॅम आहे. बियाणे मध्यम टपोरे आहेत.‘लातूर-९३’ हा वाण कमी उंचीचा (३०-३५ सेमी) असल्याने अवकाळी पाऊस, गारपीठ व अन्य नैसर्गिक आपत्तीमध्ये जमिनीवर लोळत नाही. कमी उंचीमुळे आंतरपीक म्हणूनही करडई, हरभरा, उस, गहू या मुख्य पिकात लागवड शक्य आहे. त्याची मुख्य पिकाशी स्पर्धा होत नाही. आंतरपिकापासून ५-७ क्विंटलपर्यंत उत्पादन प्रति हेक्टर मिळू शकते.वेळेवर पेरणी केल्यास (१५ ते ३० ऑक्टोबर) पीक किडी, रोग प्रादुर्भाव व पाण्याच्या ताणापासून वाचू शकते. परिणामी शेतकऱ्यांच्या लागवड खर्चात बचत होऊन, उत्पादनात वाढ होते.राज्यातील कोरडवाहू क्षेत्रामध्ये लागवडीसाठी अत्यंत महत्त्वाचा असे हे पीक व वाण ठरणार आहे.

संपर्क : डॉ. अमोल मिसाळ, ७५८८६१२९४३
(गळीत धान्य संशोधन केंद्र, लातूर)

तेलताड *

माहिती अद्ययावत करणे चालू आहे.

करडई

जमीन 
या पिकास मध्यम ते भारी खोल, पाण्याचा निचरा आवश्यक, थोडी चोपन जमीन चालते.


लागवड 
*लागवड १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान योग्य.
* यास हिवाळा मानवतो मात्र पक्व होताना उष्ण, कोरडे हवामान चांगले.
*करडई स्वतंत्र पेरल्यास दोन ओळीतील अंतर ४५ X २० सेमी.ठेवावे तर यास  अंतर पिक, मिश्र पिक म्हणूनही पेरतात. शाळू ज्वारीत दर २५ फुटावर पट्टा, तसेच हरभरा करडई,जवस करडई मिश्र पिक घेतल्यास अधिक उत्पन्न मिळते.


बियाणे / वाण
*सुधारित वाण डी एस एच -१२९, बिनाकाट्याचे वाण नारी - ६, नारी एन एच १ आहेत. कोरडवाहूसाठी भीमा, फुले कुसुमा हे वाण आहेत.


बिजप्रक्रिया 
*पेरणी पूर्वी बियान्यास बुरशीनाशक आणि अझोटोबेक्टर चोळावे.


खत व्यवस्थापन
एकरी ३ टन शेणखत शिवाय ५० किलो नत्र,५० किलो सुपर फोस्फेट आणि २५ किलो म्युरेट ऑफ पोटाश, पेरणी करताना द्यावे.


पाणी व्यवस्थापन
*या पिकास पेरताना,३० दिवसांनी आणि ६० दिवसांनी असे ३ पाणी आवश्यक आहेत.


कीड नियंत्रण 
* यात सगळ्यात मोठी अड़चन मावा अधिक येतो त्यासाठी  पेरणी नंतर प्रादुर्भाव होण्या पूर्वी निंबोळी अर्काची फवारनी करावी, प्रादुर्भाव आढळल्यास क्लोरोपायरीफोस + कॉपर ऑक्सिकलोराइड दोन तीन वेळा फवारावे.

*साधारणपणे १३० दिवसांनी पीक पक्व होते. पाने आणि बोंडे पिवळी पडू लागल्यावर बुडापासून कापणी करावी,खळ्यावर वाळवून मळणी करावी.*कोरडवाहूमध्ये एकरी ५ ते ६ क्विंटल आणि बागायतमध्ये एकरी ८ ते १० क्विंटल उत्पन्न मिळू शकते.

तीळ

तीळ लागवड तंत्रज्ञान
जमीन :
पाण्याचा चांगला निचरा होणारी, भुसभुशीत जमीन आवश्यक आहे.
जमीन तयार करताना प्रति एकरी ४ टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे.

बियाणे :
उन्हाळी हंगामाकरिता प्रति हेक्‍टरी तीन ते चार किलो बियाणे वापरावे.
एकेटी-101, पीकेव्ही एनटी-११

बीजप्रक्रिया :
पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा कार्बेन्डाझिम यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची प्रति किलो तीन ग्रॅम, तसेच ट्रायकोडर्मा व्हिरीडी चार ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आटोपून घ्यावी.

आंतरमशागत :
पेरणीनंतर सात-आठ दिवसांनी नांगे भरावेत. पेरणीनंतर 15-20 दिवसांनी पहिली व आठ दिवसांनी दुसरी विरळणी करून, दोन रोपांत दहा सें.मी. अंतर ठेवावे. आवश्‍यकतेनुसार दोन-तीन कोळपण्या/खुरपण्या देऊन व निंदण करून शेत स्वच्छ ठेवावे. पीक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तण होणार नाही, याची काळजी घ्यावी. 

खत व्यवस्थापन :
माती परीक्षणानुसार पेरणीच्या वेळी अर्धे नत्र (12.5 किलो प्रति हेक्‍टरी) आणि पूर्ण स्फुरद (25 किलो प्रति हेक्‍टरी) द्यावा.
दुसरा हप्ता पेरणीनंतर 30 दिवसांनी उरलेल्या नत्राचा (12.5 किलो प्रति हेक्‍टरी) द्यावा, तसेच पेरणीच्या वेळी झिंक व सल्फर या खताच्या मात्रा 20 किलो प्रति हेक्‍टरी या प्रमाणात द्यावे.

पाणी व्यवस्थापन:
उन्हाळी पिकास आवश्‍यकतेनुसार पेरणीपूर्व व पेरणीनंतर ताबडतोब व नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसांनी ओलित करावे. फुलोऱ्यास सुरवात होताना व बोंड्या भरताना ताण पडल्यास सुरक्षित ओलित द्यावे. ओलित करताना पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी.

कीड व रोग नियंत्रण:
पाने गुंडाळणाऱ्या/खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता 20 मि.लि. क्विनॉलफॉस (25 टक्के प्रवाही) प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पर्णगुच्छ या रोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार तुडतुड्यामार्फत होतो. तुडतुडे नियंत्रणासाठी  4 मि.लि. इमिडाक्लोप्रिड प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोगट झाडे दिसल्यास उपटून टाकून त्यांचा नाश करावा.

उत्पादन :
बोंड्या पिवळ्या होण्यास सुरवात होताच पेंड्या बांधून त्या उभ्या ठेवाव्यात.
बोंड्या वाळल्यानंतर ताडपत्रीवर हळूच उलटे धरून काठीच्या साह्याने तीळ झाडावे. चार-पाच दिवसांनी परत पेंड्या झाडाव्या व बियाणे स्वच्छ करून आणि वाळवून साठवावे. सुधारित लागवड पद्धतीमुळे हेक्‍टरी सहा ते सात क्विंटल उत्पादन मिळते. तेलाचे प्रमाण ४८ टक्के राहते.

अखिल भारतीय तेलबियाणे संशोधन केंद्र, (जवस/तीळ), कृषी महाविद्यालय, नागपूर
0712 - 2541245 

Friday, January 15, 2016

भुईमुग

उन्हाळी भुईमुग

ओळख - भारतात भुईमुगाचे क्षेत्राचे बाबतील तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरातच्या खालोखाल महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक लागतो. आपल्या राज्यातील या पिकाखालील खरीप हंगामातील एकूण क्षेत्र ३.५३ लाख हेक्टर असून उत्पादन ४.१५ लाख टन आणि उत्पादकता ११७५ किलो / हेक्टर आहे. हाराष्ट्रात उन्हाळी भुईमूगाखाली २.२५ लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापासून ३.७५ लाख टन उत्पादन मिळते. सरासरी उन्हाळी भुईमूगाची उत्पादकता ही १६५० ते १७०० किलो आहे. 

हवामान भुईमुग हे उष्ण आणि कोरड्या हवामानातले पीक असून साधारणतः १८ ते ३० अंश सें.ग्रे. तापमानात हे पीक चांगले येते. दिवसातला १० ते १२ तास भरपूर आणि स्वच्छ सूर्यप्रकाश योग्य वेळी पाणी पुरवठा, किडी- रोगांचा कमी प्रादुर्भाव इ. मुळे खरीपापेक्षा उन्हाळी भुईमुगाचे दीडदुपटीने जास्त उत्पादन मिळते. पश्चिम महाराष्ट्रात जानेवारीच्या शेवटी आणि फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात उन्हाळी भुईमुगाची पेरणी करावी.  कोकणात भात काढल्यानंतर रान तयार करून पेरणी करावी. कारण तिथे थंडी कमी असते तर विदर्भ मराठवाड्यात मार्चपर्यंत पेरणी करावी.

जमीन - उत्तम निचऱ्याच्या, मध्यम मऊ वाळूमिश्रित, चुनखडी युक्त, सेंद्रिय युक्त जमिनीत भुईमुगाचे पीक चांगले येते.  ६.५ ते ७.५ इतका सामू असावा.  भारी चिकन जमिनीत भुईमुगाचे पीक घेऊ नये. खरीपातले पीक काढल्यानंतर लगेचच हिवाळी नांगरट करावी.  २-३ कुळवाच्या पाळ्या द्याव्यात.  एकरी ६ ते ७ टन कुजलेले शेणखत शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या अगोदर टाकून मातीत मिसळून घ्यावे आणि जमीन पेरणीसाठी तयार करून ठेवावी.

बीज आणि प्रक्रिया - भुईमूग लागवड करताना हेक्‍टरी 100 ते 125 किलो बियाणे लागते. उन्हाळी भुईमुगासाठी टीएजी २४, टीजी २६, आय. सी. जी. एस. ११, एसबी ११, फुले २८५, पसाऱ्यामध्ये एम १३ या अधिक उत्पादन देणाऱ्या आणि चांगल्या जाती आहेत. निवडलेल्या जातीचे निरोगी आणि टपोरे बियाणे निवडून त्याच्यावर १ टक्का पारायुक्त अॅगॅलॉल अगर सेरेसॉन किंवा थायरम किंवा कार्बेन्डझिमची २ ग्रॅम प्रतिकिलोस बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर रायझोबियम व स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धनाची २५० ग्रॅमची रबडी १० किलो बियाण्यास लावून सावलीत वाळवून मग पेरणी करावी.

पेरणी - उन्हाळी भुईमुगाची पेरणी 10 फेब्रुवारीपर्यंत पेरणी पूर्ण करावी. जमीन ओलवून वाफशावर आल्यानंतर दोन चाड्याच्या पाभरीने करावी. उपट्या जातीसाठी ३० × १० सें. मी. तर पसाऱ्या जातीसाठी ४५ × १० सें. मी. अंतरावर पेरणी करावी. उन्हाळी भुईमुगाची लागवड इक्रीसॅट पद्धतीने म्हणजे वरंबा, गादीवाफे पद्धतीने करावी. गादीवाफ्यावर प्लॅस्टिक मल्चिंग पेपरने लागवड केल्यास अधिक उत्पादन मिळते. उपट्या जातीचे एकरी ५० किलो प्रक्रिया केलेले बियाणे, तर पसाऱ्या जातीसाठी एकरी ४० किलो बियाणे वापरावे.  पेरणी करताना १०० किलो डीएपी दुसऱ्या चाड्याने पेरावी. माती परीक्षणानुसार खते वापरावीत.

सुधारित पेरणी पद्धत : जमिनीची १५ ते १८ इंच खोल नांगरट करावी. त्यानंतर जमिनीमध्ये प्रति हेक्टर दहा टन शेणखत अगर कंपोस्ट मिसळावे. पुन्हा १० ते १२ इंच खोल उभी - आडवी वखरणी करावी. जमीन भुसभुशीत झाल्यानंतर एकसमान सपाट करावी. पाण्याचे व्यवस्थापन एकसमान राहण्यासाठी लहान आकाराचे वाफे किंवा गादी वाफे करताना माती परीक्षणाच्या शिफारशी प्रमाणे खताची मात्रा द्यावी. पेरणीसाठी स्पॅनिश उपटा प्रकाराचा वाण निवडावा.

सपाट वाफा : जमिनीचा उतार पाहून सर्वसाधारण १५ फूट लांब व दहा फूट रुंदीचे लहान वाफे करावेत. पुन्हा वाफ्यामध्ये जमीन एकसमान सपाट करावी. एक फूट अंतर असलेल्या दातेरी कोळप्याने दीड ते दोन इंच खोल ओळी आखाव्यात. ओळीमध्ये चार इंच अंतरावर एक बी किंव सहा इंच अंतरावर दोन बियाणे टोकण करावे. एका ठिकाणी दोन बियांचे टोकण केल्याने झाडाची कमाल संख्या राहते व उत्पादनात वाढ होते. टोकण झाल्यानंतर सर्व बियाणे दक्षतापूर्वक झाकून घ्यावे. नंतर पाणी सिंचन महत्त्वाचे असून, वाफ्यातील सर्व जमिनीस पाणी पोचल्यानंतर दुसऱ्या वाफ्यात पाणी सिंचन करावे.

गादी वाफा : जमिनीच्या सपाटीकरणानंतर पूर्व - पश्चिम गादी वाफे तयार करावेत, गादी वाफ्याची तळाची रुंदी ३.५ फूट, टपाची रुंदी २.५ फूट व उंची ०.५ फूट ठेवावी. यामुळे दोन गादी वाफ्यांमध्ये एक फूट रुंदीची सरी तयार होते. पेरणीपासून काढणीपर्यंत सर्व मशागत सरीतून करता येते. गादी वाफ्याच टप एकसमान सपाट करावा. टपावर १२ इंच अंतरावर दीड ते दोन इंच खोल ओळी आखाव्यात, ओळीमध्ये चार इंच अंतरावर एक बी किंवा सहा इंच अंतरावर दोन बियांचे टोकण करावे. टोकण झाल्यावर सर्व बियाणे मातीचे झाकून घ्यावे. तुषार सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे.

प्लॅस्टिक अच्छादन तंत्र : ही सुधारित तंत्रज्ञान पद्धत आहे. या तंत्रज्ञानातील बारकावे लक्षात घेणे आवश्यक असते. प्लॅस्टिक आच्छादन मशागतीसाठी कुशल मजुरांची गरज असते. या पद्धतीमध्ये प्राथमिक खर्च व वेळ अधिक लागतो. प्लॅस्टिक आच्छादनाची मशागत योग्य व व्यवस्थित करणे महत्त्वाचे असते. या पद्धतीमध्ये वर नमूद केल्याप्रमाणे गादी वाफे तयार करावेत. तीन फूट रुंदी, सात मायक्रॉन जाडी व १.२५ इंच व्यासाचे ८ x ८ इंच अंतरावर छिद्रे असलेले प्लॅस्टिक उपलब्ध असते. प्लॅस्टिक अंथरण्यापूर्वी गादी वाफ्यावर माती परीक्षण शिफारशीनुसार खताची मात्रा द्यावी. दुसऱ्या दिवशी प्लॅस्टिक अंथरण्याची प्रक्रिया सुरू करावी. प्लॅस्टिकच्या टोकाकडील कडा गादी वाफ्याच्या सुरवातीच्या कडावर अलगद खोचून मातीने बंद करावे. नंतर गाडी वाफ व प्लॅस्टिकच्या लांबीनुसार हळूहळू अलगद ताणून अंथरावे, प्लॅस्टिकच्या दोन्ही कडा गादी वाफ्याच्या काडावर अलगद खोचून बंद करावे. टोकण करण्यापूर्वी छिद्रातील माती भुसभुशीत करावी. छिद्रामध्ये दोन बियांचे टोक जमिनीकडे खाली दीड ते दोन इंच अलगद टोकण करावे. नंतर सरीमधील ओलसर मूठभर माती छिद्रावर लावून छिद्र संपूर्ण झाकले जाईल, याप्रमाणे बंद करावे. टोकण झाल्यावर तुषार सिंचन पद्धतीने सिंचन करावे. राज्यातील जमिनीमध्ये उन्हाळी हंगामात जमिनीच्या सुपीकतेनुसार सपाट वाफा मशागत पद्धतीने प्रति हेक्टर ५० ते ६० क्विंटल व प्लॅस्टिक आच्छादन पद्धतीने ६५ ते ७५ क्विंटल उत्पादनक्षमता आहे.

खत व्यवस्थापन - साधारणतः प्रति एकरी 10 किलो नत्र आणि 20 किलो स्फुरद द्यावे. त्यासाठी ५० किलो अमोनियम सल्फेट किंवा २२ किलो युरिया आणि १२५ किलो सिंगल सुपर फोस्फेट, १० ते १२ किलो झिंक सल्फेट, २ ते ३ किलो बोरेक्स, पेरणीच्या वेळी द्यावे.  १ ते १|| किलो फेरस सल्फेट ५०० लिटर पाण्यातुन उभ्या पिकावर फवारावे.  खताच्या बाबतीत भुईमुग फुलावर येण्यापूर्वी साधारण ४० दिवसांनी एकरी २५० ते ३५० किलो जिप्सम दोन ओळीत सरळ मिसळुन पाणी द्यावे.

सुक्ष्मअन्नद्रव्ये -
१)      जस्त (झींक) : झाडांची पाने लहान राहतात. पानांच्या शिरामधील भाग पिवळा होतो व नंतर पाने वाळल्यासारखी दिसतात. जमिनीत जस्त कमी असल्यास ४ किग्रॅ. प्रति एकरी झींक सल्फेट पेरणीच्या वेळेस जमिनीत मिसळावे किंवा उभ्या पिकात कमतरता आढळल्यास १ किलोग्रॅम झींक सल्फेट २०० लि. पाण्यात मिसळून फवारावे.
२)      लोह : भुईमूगाची वाढ खुंटते, पाने पिवळी व त्यानंतर पांढरी पडतात. त्यासाठी एकरी १ किलोग्रॅम फेरस सल्फेट, ४०० ग्रॅम चुना आणि १ किलोग्रॅम युरिया २०० लिटर पाण्यात विरघळून पिकावर फवारणी करावी.
३)      बोरॉन : पेरणीनंतर ३० ते ५० दिवसांनी पिक असताना १०० ग्रॅम बोरीक आम्ल २०० लिटर पाण्यात विरघळून फवारले असता किंवा एकरी २ किलोग्रॅम बोरॅक्स पेरणीपूर्वी जमिनीत मिसळल्यास बोरॉन ची कमतरता राहत नाहीउत्पादनात वाढ होते.
४)      कॅल्शियम व गंधक : ज्या जमिनीत कॅल्शियमचे प्रमाण ४० ग्रॅम/१०० ग्रॅम पेक्षा कमी आहे. अशा जमिनीत भुईमूगासाठी प्रती एकरी २०० किलोग्रॅम जिप्सम पेरणीच्या वेळी आणि पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी २ हप्त्यांत झाडालगत ५ सें. मी. अंतरावर आऱ्यांची वाढ होते त्या भागात जमिनीत पेरून दिल्यास उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. भुईमूगाच्या इक्रीसॅट पद्धतीच्या लागवडीत जिप्सम हे खत देण्याची शिफारस आहे. जिप्सममधून कॅल्शियम २४% आणि गंधक १८.६ % उपलब्ध होते असल्याने भुईमूगाच्या आऱ्या जमिनीत सुलभरित्या जाण्यास, जसेच शेंगा चांगल्या पोसण्यास मदत होते.

आंतरमशागत - भुईमुगाची उगवन झाल्यानंतर नांग्या पडल्या असतील तर बी टोकून नांग्या भरून घ्याव्यात.  कारण एकरी १ ते १| लाख रोपं असणं फार महत्वाचं आहे.  पहिल्या दीड महिन्यात दोन खुरपण्या आणि दोन कोळपण्या करून पीक तणविरहीत ठेवावे. भुईमुगाच्या सर्व प्रकारच्या आंतरमशागतीची कामे आऱ्या सुटण्याच्या अगोदर करावीत. शेवटची कोळपणी खोल आणि पासेला दोरी बांधून करावी. याशिवाय ४० दिवसांनी आणि ५० दिवसांनी २०० लिटर पाण्याचा पत्र्याचा मोकळा ड्रम दोनदा फिरवावा म्हणजे सगळ्या आऱ्या जमिनीत घुसतात आणि त्यांना शेंगा लागतात.

पाणी व्यवस्थापन - वाफशावर भुईमुग पेरल्यानंतर ३-४ दिवसांनी उगवण चांगली होण्यासाठी हलकसं पाणी द्यावे.  नंतर मात्र उन्हाळा असल्याने ८-१० दिवसांनी ६-७ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.  फुलोऱ्यात आऱ्या सुटण्याच्या वेळी शेंगा दुधात असताना आणि भरताना ओलावा असणे फार महत्वाचे आहे. भुइमुगाला तुषार सिंचनाने पाणी देणे उत्पादनाच्या दृष्टीने फायद्याचे ठरते.

कीड व रोग व्यवस्थापन -  
उन्हाळी भुईमुगावर फारशा किडी- रोगाचा प्रादुर्भाव होत नाही तरी पण मावा, तुडतुडे, फूलकडे, पान गुंडाळणारी अळी यांच्या नियंत्रणासाठी फॉस्फामिडान १२० मि. लि., क्वीनालफॉस १ लिटर सायपरमेथ्रीन २०० मि. लि. ५०० लिटर पाण्यातून आलटूनपालटून फवारावीत.

शेंडेमर रोगाच्या नियंत्रणासाठी फूलकिडीचे नियंत्रण केले पाहिजे.  त्यासाठी फॉस्फामिडान फवारावे.  टिक्का तांबेऱ्याच्या नियंत्रणासाठी डायथेन एम. ए. ४५ १२५० ग्रॅम अगर बाविस्टीन २५० ग्रॅम ५०० लिटर पाण्यातून फवारावे.

उत्पादन - अश्या पद्धतीने उन्हाळी भुइमुगाचे व्यवस्थापन केल्यास एकरी सहजपणे वाळलेल्या शेंगाचे १० ते १५ क्विंटल उत्पादन येऊन जमिनीची सुपीकता, बेवड आणि फेरपालट साधते. उन्हाळी हंगामात भुईमुगाचे चांगले उत्पादन मिळते. सर्व प्रकारचे योग्य व्यवस्थापन केले तर उन्हाळी भुईमुगाचे जातीनिहाय उपट्या जातीचे वाळलेल्या शेंगाचे एकरी १० ते १२ क्विंटल आणि पसऱ्या जातीचे एकरी १२ ते १६ क्विंटल उत्पादन मिळते.  शिवाय ढाळ्यांचा हिरवा अगर वाळवून पौष्टिक चारा २ ते ३ टन मिळतो. ऐन उन्हाळ्या जनावरांना पौष्टिक चार मिळतो आणि बेवड तसेच फेरपालट या दोन गोष्टी साध्य होतात.

स्‍त्रोत - प्रल्‍हाद यादव, बावस्कर टेक्नॉलॉजी, डॉ.जीवन कातोरे