Saturday, June 10, 2017

व्यक्तिमत्त्व विकासासाठी सामाजिक बांधीलकी गरजेची...

व्यक्तिमत्त्व विकासासाठी सामाजिक बांधीलकी गरजेची...
mazisheti.org/2017/06/blog-post.html


प्रत्येक मानव प्राण्याने किमान दररोज एक अनोळखी व्यक्तीला स्माईल दिली तर मानवातील प्राणी कमी होतील आणि निरोगी, सशक्त आणि सुंदर समाज तयार व्हायला सुरुवात होईल. व्यक्तिमत्वाचा विकास करणे हे काही फार अवघड नाही. अव्यक्त भावना योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य व्यासपीठावर व्यक्त करण्याची कला म्हणजेच व्यक्तिमत्त्व विकास.

सामाजिक बांधिलकी कशाशी खातात हेच आजकाल समाजातील घटकांना समजत नाही. समोरून चाललेल्या व्यक्तीने जर छोटीशी स्माईल दिली तर असे काही पाहिले जाते की 'जसे काही एलियन समोर आहे आणि स्माईल देतोय'. मुलींचे तर विचारूच नका. नाकावरच्या स्कार्फ मधून नाक बाहेर काढून नाक मोडले जाते. मग काय थोडे जास्तच हसू येते. सांगायचं उद्देश हाच की भाऊबंधकी जपावी. त्यातूनच व्यक्तित्व घडायला सुरुवात होते.

आमच्या गावाकडं भाऊबंधकी इतकी जपली जाते की बस्स... एक सरीच्या वादातून एखादा वर्षानुवर्षे बोलत नसला तरी तो समोरून आला की खुन्नस देऊन का होईना काहीतरी भाव चेहऱ्यावर येतात. पण इकडे शहरात अगदी निर्विकार... निर्विकार चेहरे दाखवण्याची स्पर्धा लावली तर पुणे-मुंबईकर (शहरी जनता) जगात आव्वल ठरतील.

सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था जणूकाही सामाजिक उपकार केल्यासारखं काम करतात. त्यांना अजिबात प्रसिद्धीची हाव नाही त्यामुळेच अश्या संस्था ज्या घटकासाठी काम करतात त्यांनाही यातले असले काही माहिती नसते. यातील विनोदाचा भाग सोडला तर लोकांनी परस्पर संबंध निरोगी आणि जिवंत ठेवायला हवेत. सामाजिक संस्थांनी यामध्ये पुढाकार घेतला आणि कॉर्पोरेट कंपन्यांनी दिलेला #CSR_fund काही प्रमाणात मानवी संबंध जोपासण्याची तसदी घेण्यासाठी वापरला तर काही अवघड नाही.

महेश बोरगे, CSR & Business Resilience Advisor
mahesh@mazisheti.org, maheshborge@gmail.com