Translate (Trial Version)

Sunday, February 9, 2020

पिकावरील सुत्रकृमीचे एकात्मिक व्यवस्थापन


सुत्रकृमी (Nematode) हा धाग्यासारखा लांबट आकाराचा परजीवी सुक्ष्मजीव आहे. सरासरी १ मिमि. लांब असतो. तो जमिनित झाडावर किंवा झाडाच्या अंतर्गत भागात राहुन बुडाचे नुकसान करतो. तो डोळयांनी दिसत नाही. सुत्रकृमीच्या काही प्रजाती मुळांवर गाठी तयार करतात. तर काहींमुळे मुळांमध्ये तसेच मुळांवर छिद्र पडतात किंवा तयार होतात. त्यामुळे पिकांना मुळाकडून पाणी व अन्नद्रव्यांचा होणारा पुरवठा यावर विपरीत परणिाम होतो. पिकांवर दिसुन येणा-या लक्षणावरुन ब-याच वेळा त्याच्या प्रादुर्भावाची निंश्चिती करता येत नाही. त्यामुळे पिकांच्या होणा-या नुकसानीकडे फारसे लक्ष दिले जात नाही. अलीकडे सुत्रकृमीचा भाजीपाला, द्राक्षे, संत्रावर्गीय पिके इत्यादीवर मोठया प्रमाणात प्रादुर्भाव होताना दिसुन येत आहे. पृथ्वी तलावावर सुत्रकृमीच्या ५ लाखांवर जाती अस्तित्वात असाव्या असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. सुत्रकृमीच्या सर्व जातीमध्ये काही जाती पिकांना तर काही जाती प्राण्यांना उपद्रव पोहोचवतात. एकुण सुत्रकृमीच्या जातीपैकी सुमारे ७०० जाती भारतात आढळतात व त्यातील ७५ सुत्रकृमीच्या जाती महाराष्ट्रात आढळतात. व त्या वेगवेगळया पिकावर उपजिविका करतात. सन १७४३ मध्ये निधम या अमेरिकन शास्त्रज्ञाने सर्वप्रथम गव्हावर उपद्रव करणा-या सुत्रकृमीचा Wheat Seed gall nematode शोध लावलाया सुत्रकृमीच्या प्रादुर्भावामुळे गव्हाची वाढ खुटंते. फुटव्याचे प्रमाण घटते. पीक लवकर फुलो-यात येते व दाणे काळे पडतात किंवा पोकळे राहतात.


सुत्रकृमीचे व्यवस्थापण:- सुत्रकृमी हा उघडया डोळयांना न दिसणारा अतिसुक्ष्म प्राणी असल्यामुळे त्याचे नियंत्रण करणे खुप अवघड जाते परंतु सुनियोजित व्यवस्थापण करुन सुत्रकृमीची संख्या अर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवणे शक्य होते. सुत्रकृमीच्या व्यवस्थापणात खालील नियंत्रण पद्धतीचा समावेश होतो.
पारंपारीक पद्धतीः- हया पद्धती अत्यंत कमी खर्चीक असुन शेतामध्ये राबविण्यास अत्यंत सोप्या असतात. या पारंपारीक पद्धतीचा वापर सतत वर्षानुवर्षे केला तर सुत्रकृमीचे चांगले नियंत्रण मिळु शकते.
पिकांची फेरपालटः- सुत्रकृमी हया काही विशिष्ट पिकांवरच आपली उपजिविका करतात. अशा वेळी त्यांच्या यजमान पिकांची लागवड न करता त्या ठिकाणी दुसरी पिके घेतली जातात. तर सुत्रकृमीच्या वाढीवर आळा बसतो. उदा. पाश्चिमात्य देशात बटाटा पिकावरील कवचधारी सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी बटाटा पीक घेतल्यानंतर त्या शेतामध्ये ५ते ६ वर्षे दुसरी पिके उदा. वाटाणा, फुलकोबी, पानकोबी, गाजर इत्यादी पिके घेतली जातात. यामुळे कवचधारी सुत्रकृमीचे नियंत्रण होण्यास मदत होते.
पेरणीच्या वेळेत बदलः- पेरणीच्या वेळेत बदल करुन सुत्रकृमीचा प्रादुर्भाव टाळता येतो, बहुतांशी सुत्रकृमीच्या  जाती हया उन्हाळी हंगामापेक्षा कमी तापमान असलेल्या हिवाळी हंगामामध्ये प्रजननाच्या दृष्टीने कमी कार्यक्षम असतात। म्हणुन रब्बी हंगामामध्ये पेरणीच्या वेळेत बदल केल्यास सुत्रकृमीच्या प्रादुर्भाव कमी होतो. उदा. हरभरा व जवस पिकांची पेरणी जास्त तापमान असणा-या आùक्टोबर महिन्यात न करता नोव्हेंबरच्या दुस-याआठवडयात केलयास पिकांची  वाढ चांगली होते व सुत्रकृमीचा प्रादुर्भाव कमी होतो.

सापळा पिकेः (Trap Crop):- सापळा पिके म्हणजे सुत्रकृमीस जास्त आकृष्ट करणारी परंतु कमी उपयोगी  असणा-या पिकांना सापळा पिके असे म्हणतात. सुत्रकृमी मुख्य पिकापेक्षा सापळा पिकाकडे जास्त आकर्षित होतात त्यामुळे प्रथम तो सापळा पिकांवर हल्ला करतात. असे प्रादुर्भाव सापळा पीक नष्ट केले जाते. त्यामुळे मुख्य पिकाचे आपोआप रक्षण होते. उदा. पिकांच्या मुळावर गाठी तयार करणा-या सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी चवळी हे पीक सापळा पीक म्हणुन घेतले जाते.
प्रतिशत्रु पिके:-
काही पिकांच्या मुळाद्वारे एक प्रकारचा विषारी द्रव पदार्थ बाहेर पडतो. आणि तो सुत्रकृमी नियंत्रणासाठी उपयोगी पडतो. अशा प्रतिशत्रु पिकांची लागवड मुख्य पिकासोबत केल्यास सुत्रकृमीवर नियंत्रण मिळविता येते.
. मोहरीः मोहरी पिकामधील अलील आयसोसायनेट या रसायनामुळे बटाटा या पिकासोबत मोहरीचे पीक घेतल्यास बटाटयावरील कवचधारी सुत्रकृमीवर नियंत्रण मिळु शकते.
. झेंडुः झेंडु या पिकामधील अल्फा टरथीनाईल या रसायनामुळे पिकांच्या मुळावर गाठी तयार करणा-या सुत्रकृमीवर नियंत्रण मिळु शकते.
. शतावरीः शतावरी या पिकामधील ग्लायकोसाइड व अùस्परùगस अùसिड या रसायनामुळे सुत्रकृमीवर नियंत्रण मिळु शकते.
. तीळः तीळ या पिकामधील सुत्रकृमींना विरोधक रसायनांमुळे भेंडी या पिकासोबत तीळ हे पिक घेतल्यास  भेंडी या पिकांच्या मुळावर गाठी करणा-या सुत्रकृमीचे नियंत्रण होते.
. कडुलिंबः कडुलिंब झाडामधील निम्बीडीन व थिओनिमोन या रसायनामुळे अनेक प्रकारच्या सुत्रकृमीवर नियंत्रण मिळु शकते.
. क्रोटोलारियाः क्रोटोलारिया या वनस्पतीचे इतर पिकांमध्ये आंतरपीक घेतल्यास राùडेफिलस या सुत्रकृमीचे नियंत्रण मिळु शकते.

जमिनीची मशागतः उन्हाळयामध्ये जमिनीची उभी आडवी नांगरणी केली तर जमिनीमध्ये राहणा-या सृत्रकृमीवर नियंत्रण मिळु शकते.
स्वच्छ व निरोगी बियाणांची निवडः स्वच्छ व सुत्रकृमीविरहीत बियाणांची निवड हा घटकदेखील सुत्रकृमीवर चांगले नियंत्रण मिळवु शकतो.
सुत्रकृमी प्रतिबंधक पिकांच्या जातीचा वापरः- पिकांच्या चांगल्या व दर्जेदार सुत्रकृमी प्रतिबंधक जातीचा वापर केल्यास सुत्रकृमीचा प्रादुर्भाव कमी  व्हायला मदत होते। उद। पंजाब पी।बी। एन। आर -७ ही जात मुळावर गाठी करणा-या सुत्रकृमींना प्रतिबंधक आहे.
कायदयाचा वापर करुन सुत्रकृमीचे नियंत्रणः- सुत्रकृमी प्रसार थांबविण्यासाठी कायदयाचा वापर केला जातो. सुत्रकृमीग्रस्त वनस्पतीची एका प्रदेशातुन दुस-या प्रदेशात वाहतुक करण्यास प्रतिबंधित केले जाते. या प्रकारच्या कायदयाला क़ुरनटाईन कायदा असे म्हणतात. हा कायदा भारतात डिस्ट्रीक्टिव इन्सेक्टन्ड पेस्ट क्ट १९१४ म्हणुन ओळखला जातो. या कायदयान्वये सुत्रकृमीच्या देशांतर्गत प्रसारास प्रतिबंध लागु आहे. उदा. बटाटा पिकावरील कचचधारी सुत्रकृमी हा मुळचा भारतातील नसुन १९६१ साली तो परदेशातुन भारतात आला. तो प्रथम तमिळनाडुया राज्यातील निलगिरी टेकडयावर आढळला. सध्या तो तमिळनाडु या राज्यात निलगिरी टेकडयांवरुन कोठेही बाहेर प्रसारासाठी प्रतिबंधीत आहे.
भौतिक पद्धतीने सुत्रकृमीचे नियंत्रणः- भौतिक पद्धतीमध्ये गरम पाणी, गरम हवा, क्ष-किरण, सुत्रकृमी विरहीत बियाणे यांचा वापर करुन सुत्रकृमीचे नियंत्रण केले जाते.
गरम पाण्याचा वापरः- ही पद्धत मोठया प्रमाणात वापरली जाते. जे सुत्रकृमी बियाणे, कंद, मनुवे पिकांच्या मुळयांवर प्रादुर्भाव करतात. त्या सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी ही पद्धत अत्यंत फायदेशीर आहे. उदा. केळीवरील रोडोफिलस सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी केळीचे मनुवे ५५ अंश सेल्सिअस उष्ण पाण्यामध्ये २० मिनीटे बुडविली जातात. तसेच लिंबुवर्गीय पिकावरील सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी लिंबुवर्गीय मुळांच्या काडया ४५ अंश सेल्सिअस उष्ण पाण्यामध्ये २५ मिनीटे ठेवाव्यात.
यजमान पिकेः- टोमाटो, वांगी, मिरची, इत्यादी.
फेरपालटीची पिकेः ज्वारी मका गहु बाजरी ऊस यांसारखी एकदल वर्गातील पिके फेरपालटीचे पिके म्हणुन घ्यावीत. सुत्रकृमी विरोधक जशी मोहरी तीळ कांदा लसुण झेंडु यांसारखी आंतरपिके म्हणुन घ्यावीत.

सेंद्रीय खतांचा वापरः-. शेणखत कंपोष्ट खत, गांडुळखत, निंबोळी पेंड, करंज पेंड, इत्यादीपैकी कोणत्याही सेंद्रीय खताचा वापर १ ते २ टन दर हेक्टरी याप्रमाणे जमिनित करावा व जमिनीत खत चांगले मिसळुन घ्यावे.
प्लाष्टीक कागदाचा वापरः- रोपवाटीकेत मे महिन्यामध्ये फळझाडे व भाजीपाला कलमे किंवा रोपे तयारकरण्यापुर्वी जमिनीवर ३ते ४ आठवडे पारदर्शक प्लाष्टीक कागदाचा आच्छादन म्हणुन वापर करावा. त्यामुळे जमिनीचे तापमान वाढेल व सुत्रकृमी मरुन जातील.
जैविक नियंत्रणः- पॅसिलोमायसिस आणि ट्रायकोडर्मा ही परोपजीवी बुरशीजन्य पावडर २.५ किलो प्रति हेक्टर याप्रमाणे १०० किलो ओल्या शेणखतात मिसळुन जमिनीत मिसळावी  किंवा एक किलो बियाण्यास ५ ग्राम पॅसिलोमायसिस आणि ट्रायकोडर्मा परोपजीवी बुरशी जन्य पावडरची बीजप्रक्रीय करावी. पॅसिलोमायसिस आणि ट्रायकोडर्मा ही परोपजीवी बुरशीजन्य पावडर ५ ग्राम प्रति लीटर पाण्यात मिसळुन प्रत्येक झाडाला आळवणी पद्धतीने द्यावी.

हिरवळीचे खतः- हिरवळीचे खत म्हणुन ताग, धैंचा इत्यादींचा लागवड करावी.
बीजप्रक्रीयाः- कारली व भोपळा यांच्या बियाण्यास प्रति किलो १२ ग्राम कार्बोसाल्फुरोन या प्रमाणात बीजप्रक्रीया करुन सावलीत वाळवुन लागवडीसाठी वापर करावा.
सुत्रकृमी प्रतिबंधक जातीचा वापरः- पिकांच्या मुळावर गाठी तयार करणा-या सुत्रकृमीला प्रतिबंध करणा-या पिकांच्या खालील प्रतिबंधक जातींचा वापर करावा। टोमाटो, पंजाब पी.बी. एन.आर. -७ हिसार ललित, मंगला हायब्रीड कर्नाटक हायब्रीड  वांगी-ब्लाक ब्युटी बनारस जाएंट, म्हैसुर ग्रीन पुसा पर्पल लाँग, मिरची- पुसा ज्वाला, ज्वाला,  मुग-एम. एल. ८० तंबाखु-एन. सी. ४५
रसायनांचा वापरः-. भाजीपाला व फळझाडे यांची लागवड झाल्यावर कार्बोल्फुरोन दाणेदार ३ किंवा फोरेट दाणेदार १० हेक्टरी अनुक्रमे ६५ आणि २० किलो प्रति हेक्टर याप्रमाणे जमिनित मिसळावे. द्राक्षे व डाळींब या फळ झाडांचा बहार धरताना ऑक्टोबरमध्ये छाटणीनंतर जमिनीत हेक्टरी १.५ ते २ टन निंबोळी पेंड मिसळावी किंवा कार्बोफयुराùन दाणेदार ३ किटकनाशक १३५ किलो किंवा दाणेदार फोरेट १० कीटकनाशक ४० किलो प्रति हेक्टरी जमिनीत मिसळुन पाणी द्यावे.
लिंबुवर्गीय पिकावरील सुत्रकृमीचे व्यवस्थापनः-
सुत्रकृमी प्रतिबंधक उपायः- लिंबुवर्गीय पिकांची रोपवाटीका तयार करताना ती लिंबुवर्गीय फळझाडाच्या बागेच्या किंवा पुर्वी घेतलेल्या लिंबुवर्गीय बागेशेजारी असु नये.
बीजप्रक्रीयाः रोपवाटीकेमध्ये कार्बोल्फुरोन ३ दोणेदार किटकनाशक प्रति चौरस मीटर जागेसाठी १० ग्राम या प्रमाणात वापरावे. रोपांची मुळे ४५ अंश सेल्सीअस तापमान असलेल्या गरम पाण्यात २५ मिनीटे बुडवुन लागवड करावी.
सेंद्रीय खतांचा वापरः निंबोडी पेंड, करंज पेंड इत्यादीपैकी कोणत्याही सेंद्रीय खताचा वापर १ते २ टन दर हेक्टरी याप्रमाणे जमिनित करावा, व जमिनीत चांगले मिसळुन घ्यावे.
फेरपालटीची पिके:- फेरपालटीची पिके म्हणुन यजमान नसलेली पिके घ्यावीत उदा। गहु, मका, वटाणा, गाजर, फुलकोबी, पत्ताकोबी, इत्यादी.
रसायनांचा वापरः- पिकांची लागवड झाल्यावर किंवा लागवडीपुर्वी सुत्रकृमींचा प्रादुर्भावानुसार कार्बोल्फुरोन ३ दोणेदार ६५ ते १२० किलो प्रति हेक्टरी किंवा फोरेट १० दाणेदार २० ते ४० किलो प्रति हेक्टरी याप्रमाणे जमिनीत मिसळावे.
सुत्रकृमी प्रतिकारक्षम वाणांचा वापरः बटाटा या पिकामध्ये कुफरी सुवर्णा व कुफरी थेनमलाई या जाती कवचधारी सुत्रकृमीसाठी प्रतिकारक्षम आहेत.
सुत्रकृमीचे कायदेशीर नियंत्रणः कवचधारी सुत्रकृमी हा तमिळनाडु या राज्यात निलगिरी टेकडयावर आढळतो सध्या तो तमिळनाडु या राज्यात निलगिरी टेकडयावरुन बाहेरील प्रदेशासाठी प्रतिबंधित आहे.

भाताच्या मुळावरील सुत्रकृमीचे व्यवस्थापणः-
जमिनीची मशागतः उन्हाळयात जमिनीची आडवी उभी खोलवर नांगरणी करावी.
यजमान पीकः भात
फेरपालटीची पिकेः फेरपालटीची पिके म्हणुन भुईमुग, ज्युट, गहु आणि बटाटा इत्यादी.
सेंद्रीय खतांचा वापर:- लाकडाचा भुसा, गांडुळखत, निंबोळी पेंड, करंज पेंड इत्यादीपैकी कोणत्याही एका सेंद्रीया खताचा वापर करावा.
बीजप्रक्रीयाः- भात रोपांची पुनर्लागवड करत असताना भात रोपाची मुळे १२ तासांपर्यंत फ्हास्पोमीडॉन .२ द्रावणामध्ये बुडवावीत नंतरच ती पुनर्लागवडीसाठी वापरावीत.
रसायनांचा वापरः शेतात भात रोपांच्या लागणीपुर्वी एकदा आणि लागणीनंतर १५ आणि ४५ दिवसांनी २ वेळा कार्बोफयुराùन ३ दाणेदार ६५ किलो किंवा फोरेट १० दाणेदार २० किलो प्रतिहेक्टरी या प्रमाणात जमिनीत मिसळावे.
मुळावर चटटे पाडणा-या सुत्रकृमीचे व्यवस्थापण जमिनीची मशागत उन्हाळयात जमिनीची आडवी-उभी नांगरणी करावी, शेत स्वच्छ ठेवावे रोपवाटीकेत तण वाढु देऊ नये.
यजमान पिकेः कॉफी, लिंबु, केळी इत्यादी।
फेरपालटीची पिकेः फेरपालटीची पिके व मिश्रीत म्हणुन झेंडु या पिकाची निवड करावी.
रसायनांचा वापरः शेतात कार्बोफुरोन ३ दाणेदार ३५ ते ६५ किलो किंवा फोरेट १० दाणेदार १० ते २० किलो प्रतिहेक्टरी या प्रमाणात जमिनीत मिसळावे.
सुत्रकृमी प्रतिकारक्षम वाणांचा वापरः कॉफी या पिकामध्ये रोबुस्टा हा सुत्रकृमी प्रतिकारक्षम वाणांचा अरेबिका जातीच्या खुंटावर कलम करुन वापर केल्यास या सुत्रकृमीचे नियंत्रण मिळु शकते.
गव्हाच्या लोंब्यातील सुत्रकृमीचे व्यवस्थापणः- या सुत्रकृमीच्या प्रसारास गव्हाच्या सुत्रकृमीग्रस्त बियाणे कारणीभुत असते. पेरणीपुर्वी गव्हाचे बी निवडुन घ्यावे  निवडलेले बी १० मिठाच्या द्रावणात प्रक्रीया करुन तरंगणारे बी बाजुला काढावे व जड व चांगले बियाणे लागवडीसाठी वापरावे. मिठाच्या द्रावणात प्रक्रिया केलेले बियाणे ४ ते ६ तास थंड पाण्यात भिजवावे. त्यानंतर त्या बियाणास उष्ण पाण्याची ५४ अंश सेल्सीअस तापमानास १० मिनीटे प्रक्रीया करावी व नंतरच ते बियाणे पेरणीसाठी  वापरावे.
खोड व कंदावरील सुत्रकृमीचे व्यवस्थापणः-
बीजप्रक्रीयाः या सुत्रकृमीच्या प्रसारास गव्हाच्या सुत्रकृमीग्रस्त बियाणे कारणीभुत असते. पेरणीपुर्वी गव्हाचे बी निवडुन घ्यावे. निवडलेले बी १० मिठाच्या द्रावणात प्रक्रीया करुन तरंगणारे बी बाजुला काढावे व जड व चांगले बियाणे लागवडीसाठी वापरावे. मिठाच्या द्रावणात प्रक्रीया केलेले बियाणे  ४ ते ६ तास थंड पाण्यात भिजवावे. त्यानंतर त्या बियाण्यास उष्ण पाण्याची ५४ अंश सेल्सीअस तापमानास १० मिनीटे प्रक्रीया करावी व नंतरच ते बियाणे पेरणीसाठी वापरावे.
खोड व कांदावरील सुत्रकृमीचे व्यसस्थापनः- उन्हाळयामध्ये जमिनीतील पुर्वीच्या भात पिकांचे अवशेष जाळुन नष्ट करावेत. त्यामुळे त्या अवशेषावर असलेल्या सुत्रकृमी मारले जातील।उन्हाळयात जमिनीची आडवी उभी खोलवर नांगरणी केल्यामुळे खोड सुत्रकृमी उन्हामध्ये उघडे पडतील आणि त्यांच्य संख्येत घट होण्यास मदत होईल.
यजमान पिकेः भात, कांदा, लसुण इत्यादी.
आंतरपीकेः- आंतरपीक म्हणुन भात पिकाबरोबर जुट किंवा मोहरीची लागवड करावी.
रसायनांचा वापरः- भात पीक लागणीपुर्वी शेतात कार्बोफयुरान दाणेदार ३ ६० किलो प्रति हेक्टर याप्रमाणे जमिनीत मिसळावी.
पानावरील सुत्रकृमी व्यवस्थापणः- जमिनीची मशागतः उन्हाळयामध्ये पुर्वीच्या पिकांचे अवशेष, तण जाळुण नष्ट करावेत त्यामुळे त्यावर असलेले सुत्रकृमी मारले जातात.
यजमान पिकेः भात, स्ट्राबेरी इत्यादी.
बीजप्रक्रीया:- भात बियाण्यास ५२ ते ५५ अंश सेल्सीअस तापमानास गरम पाण्यामध्ये १५ मिनीटापर्यंत बीजप्रक्रीया करावी.
सुत्रकृमी प्रतिकारक्षम वाणांचा वापरः- सेन्चुरी ५२ सेन्चुरी पटना, चिनुर निरा व गौमात्री हया भाताच्या सुत्रकृमी प्रतिकारक्षम वाणांचा वापर करावा।रसायनांचा वापर स्ट्राबेरी या पिकांवर पेरथिओन ५० प्रवाही ०.०३ तीव्रतेचे कीटकनाशक फवारावे.
सारांश:- सुत्रकृमी ही कीड जमिनीत राहुन मुळावर उपजिविका करते तसेच पिकांच्या जमिनीच्या वरील भागावरदेखील प्रादुर्भाव करते. सुत्रकृमीच्या प्रादुर्भावामुळे दिसणारी लक्षणे आणि विषाणु व जिवाणु या सुक्ष्मजंतुमुळे होणा-या रोगांची लक्षणे तसेच पिकांना दिली जाणारी सुक्ष्म अन्नद्रव्ये यांच्या कमतरतेमुळे दिसणारी लक्षणे यांच्यामध्ये फारसा फरक आढळत नाही. त्यामुळे सुत्रकृमीवर सहजासहजी नियंत्रण मिळवणे फार आवघड जाते. सुत्रकृमी हे प्रत्यक्ष नुकसान करतातच परंतु पिकांवर त्यांनी केलेल्या जखमेतुन इतर विषाणुजन्य, जिवाणुजन्य आणि बुरशीजन्य रोगजंतुचा शिरकाव होतो. आणि हे पिकांसाठी खुपच घातक ठरते. मशागत पद्धत, भौतिक पद्धत, रासायनिक पद्धत जैविक पद्धत व कायदेविषयक पद्धत तसेच सुत्रकृमी प्रतिकारक्षम वाणांचा वापर करुन सध्या सुत्रकृमीचे नियंत्रण करणे शक्य झाले आहे. सुत्रकृमी हा अत्यंत सुक्ष्म प्राणी आहे. तो उघडया डोळयांनी दिसत नाही. यामुळे सुत्रकृमीविषयी शेतक-यामध्ये जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे. सुत्रकृमी नियंत्रणासाठी पिकांच्या सुत्रकृमी प्रतिकारक्षम वाणांची निर्मिती सुत्रकृमीनाशकांचा वापर योग्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर नैसर्गिक घटकांचा पुरेपुर वापर योग्य पीक पद्धतीने नियोजन यांच्यावर जास्त भर देणे गरजेचे आहे.

संकलन
श्री। भागवत म. इंगोले
सहाय्यक प्राध्यापक(वनस्पती वकिृती शास्त्र)
सी. एस. एम. एस. एस. कृषि महावद्यिालय,
काचंनवाडी, औरंगाबाद
मो। न। ८३०८५३८७१

Sunday, October 6, 2019

येत्या काळात द्राक्ष बागेतील डाऊणी व्यवस्थापण

*शेतकरी  माझा :  द्राक्ष   बंधूनो  आजून मोडला  नाही कणा ......*

*प्रिय सन्मानीय सदगृहस्थ,.... सदबंधू* 
नमस्कार  द्राक्ष बागाईतदार बंधुनो सध्या होत असलेला पाऊस फारच मनोबल खच्ची करणारा आहे.
पण शांत पणे आपण सर्व निर्णय घेऊन यातून धीराने मार्ग काढू शकतो.

---------------- -------------श्रीहरी घुमरे  9921314560 ( शेतकरी माझा )

*येत्या  काळात डाऊणी व्यवस्थापण*
 द्राक्ष बागाईत दार बंधुनो  चार, पाच तास सलग पाऊस पडतो आहे. किवा रात्र भर पाऊस पडतो  आहे. फार मनस्ताप करून घेण्यात काही अर्थ नाही ह्या उलट निवांत शांत झोप घेऊन सकाळी ऊन पडण्याच्या आत फावरणी म्ह्तवाची ठरणार आहे. अशा परिस्थितीत सकाळी आपल्या बागेत किवा झाडावर  भरपूर पाणी साचले असेल तर ते पहिले झटकून त्यावरती स्पर्शजन्य बुरशी नाशकाची फवारणी घेणे गरजेचे आहे. ह्यामध्ये तुम्ही वापरत असलेले  सर्वच स्पर्शजन्य बुरशीनाशक चांगले आहे. पण एम ४५, झेड ७८ किवा अन्टराकॉल ह्या बुरशीनाशकाची  सतत पावसाळी वातावरणात काम करण्याची क्षमता कमी आहे आपण ह्या परीस्थितीत रिवस किवा रॅनमन ह्या स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा विचार करावा.

*खालील परिस्थिती आपण काय कराल  सतत पाऊस  चालू आहे*

*बाग जिरू नये म्हणून काही हमखास फायदेशीर ठरतील अशा काही फवारण्या*
  1. एकरी इसाबियन ( ६०० एम.एल ) + मग्नेशियम सल्फेट १ किलो (घड सशक्त करण्यासाठी
  2. पॉटाशियम शोनाईट १ किलो +  पोटॅशियम मॉलिब्डेनम एकरी २० ग्रॅम + चि. झिंक १०० ग्रॅम (घड बाळी वरती जात असल्यास)


*पाऊस पडल्या नंतर  बाग ओली असताना  स्पर्शजन्य फवारण्या*

*पोगां अवस्था* 
*हिरवा कापसलेला डोळा*
  1. एम ४५ एकरी ९०० ग्रॅम
  2. कॉपर ( ५०० ) + एम ४५ ( ५०० )

*१०% ते ९०% पर्यंत पोगां अवस्था*

*1.* झेड ७८ ( ५०० ) + साल्ट ऑफ फॉसपनिक असिड (५००)
*2.* अन्टराकॉल (५०० ) + साल्ट ऑफ फॉसपनिक असिड (५००)

*तीन पानी ते फेल पर्यंत अवस्था*

*१.* अॅक्रोबॅट ( २०० ) ग्रॅम + एम ४५ ५०० ग्रॅम
 *२.* कर्झेट ६०० ग्रॅम + साल्ट ऑफ फॉसपनिक असिड (५००)

   *३* .*मेलीडयो (५०० ग्रॅम )+ साल्ट ऑफ फॉसपनिक असिड (५००)

 *_आपल्या बागेत  ट्रॅक्टर चालतो आहे असे समजून :-._*

 आपण पाऊस उघडल्यानंतर स्पर्शजन्य बुरशीनाशकाची फवारणी करावी. जर आपण एम ४५, झेड ७८ किवा अन्टराकॉल ह्या बुरशीनाशकाची फवारणी करत असाल आणि पुन्हा पाऊस  येत असेल तर परत फवारणी घेणे  गरजेचे आहे.  पण आपण थोडा अवधी मिळत असेल आणि रिवस किवा रॅनमन ह्या बुरशीनाशकची फवारणी करून ५/६ तास पाऊस आला तरी लगेच भीती मुळे फवारणी करणे गरजचे नाही.

आपल्या बागेत  ट्रॅक्टर चालत नाही असे समजून :- 

आपल्या बागेत पाणी तुंबले आहे किवा ट्रॅक्टर चालत नाही अशा प्रसंगी आपण बुरशी नाशकच्या डस्टिंगचा विचार  करावा पण  भरपूर डस्टिंग होत असेल तर कॉपर आणि एम ४५ सारख्या बुरशी नाशकाचा वापर टाळवा. पण ह्या बागेत फॉस्फरस सारख्या अन्नद्रव्याचा वापर राहू द्यावा. ह्या बागेत पाऊस उघडून गेल्यानंतर वाफसा येई पर्यंत डाऊणी व्यवस्थापण ही एक महत्त्वपूर्ण  गोष्ट असेल.

 _*फेल ला प्लॉट आहे किवा फेल होऊन पाऊस चालू झाला*_ 

फेल ला प्लॉट आहे : बऱ्याच शेतकऱ्याचा प्लॉट फेल काढणी साठी आले असतील अशा शेतकऱ्यांनी अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. बऱ्याच बागात काही जुनपाट फुटी कुठे तरी असतात. ह्या  प्लॉटमध्ये कुठे तरी डाउनी दिसू शकतो. त्यामुळे आपण डस्टिंग असेल किवा फवारणी असेल कोणत्याही परीस्थितीत टाळू नये. फेल नतर अचानक प्लॉट मध्ये मोठ्या प्रमाणात डाऊणी दिसू शकतो फेल काढल्या नतर आपण अशा प्लॉट मध्ये चांगले वातावरण असताना झाप्रो किवा प्रोफाइलर ह्या बुरशी नाशकची फवारणी करावी.जमिनीत जो पर्यंत वापसा येत नाही आणि कोणतेही फॉस्फेट युक्त खताचा वापर झाल्याशिवाय  खराब वातावरणात जिए देऊ नये.

*_फेल काढून पाऊस झाला फवारणी घेता आली नाही_ :*

 जर आपल्या बागेत अशी परीस्थिती असेल. तर आपण पावसाळी वातावरणात रिवस किवा रॅनमन ह्या स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा विचार करावा. आणि पाऊस उघडल्या नंतर झाप्रो किवा प्रोफाइलर ह्या बुरशी नाशकची फवारणी करावी. जमिन लवकर वापसा येण्यासाठी प्रयत्न करावे. फवारणी मध्ये फॉस्फेट किवा मॅग्नेशियम अन्नद्रव्यचा वापर करावा.

*१६/१७ ते ३०  दिवसाच्या बागा :*  

ह्या बागांना  विशेष असे पाउस असे पर्यंत डाऊणीची भीती नाही. पण पाऊस त्यामुळे जसे उघडीप मिळेल तसे पाने ओली असताना किवा बागेवर पाणी असताना स्पर्शजन्य बुरशी नाशकाची फवारणी व बाग कोरडी असतना अंतरप्रवाहि बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी. बागेत  फेल काढल्यानतर फुटलेल्या फुटी काढून घ्याव्या. त्यांना चांगले अंतर प्रवाही गेलेले नसतात  त्यामुळे त्यावर पटकन डाउणी जाणवेल. वेलीवरती साचणारे पाणी मजुराकढून झटकत राहावे.

*सूचना : शक्यतो मेलीडूयो  रिवस आणि अक्रोबॅट ह्या फवारण्या एका मागोमाग घेऊ नये.*


 *_*ज्या बागा फुलोरा अवस्थेत असतील त्या वाचवण्यासाठी_**

शेतकरी बाधावानो फुलोरा अवस्थेत कमीत कमी नुसकान होण्यासाठी आपल्या बागेत मॅग्नेशियम, फॉसपरस, झिंक, बोरान आणि पालाश ह्यांची लेव्हल चागली आहे.

*ब्रिक्स मीटर वापरून पाऊसात वेलीच न्युट्रीशन चेक करा :*

 द्राक्ष घडा शेजारील पान  चुरघळून त्यातील एक थेब रसाचा ब्रिक्स हा १२/ १३ च्या पुढे असेल तर आपली बाग चागली हेल्थ घेऊन आहे असे जमजावे पण हा ब्रीक्स ७/८ पर्यंत आहे असे असल्यास आपल्या बागेत नत्र लेव्हल जास्त आहे. आणि ही बाग नुसकान ग्रस्त होऊ शकते त्यामुळे अशा 

द्राक्ष बागेत खूप गर्दी होत असले तर जास्तीच्या फुटी काढून घ्या  तिसरा घड ठेवला असेल तर परीस्थिती अवघड  होऊन बसते अशा घडाचा शेंडा ५/६  पानाचा असेल तर तो लगेच काढून टाकावा. शेंडा   घडात किवा वेलीवर पाणी साचत असेल तर बाग झटकुन घ्यावी.

*गरज पडल्यास ह्या  गोष्टी फायदा देऊन जातील*

  1. वेलीला विळा किवा खुरपे ने दोन ओलांडे शेजारी जखमा कराव्या
  2. फुलोरा अवस्थेत वातावरण बघून अमिस्टार + स्कोर ची फवारणी जरूर टाकावी
  3. गळ होऊ नये म्हणून पोटॅशियम शोनाईट १ किलो + पोटॅशियम मॉलिब्डेनम २५ ग्राम अशी फवारणी घ्यावी

Sunday, September 22, 2019

महाराष्ट्र शासन - उद्योजकता व कौशल्य विकास अभियान

महाराष्ट्र शासनाच्या विविधांगी योजनांमध्ये छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान अंतर्गत प्रसिद्ध माथाडी कामगार नेते मा. अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ दिनांक २७/११/१९९८ पासुन कार्यान्वित आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्यात दुवा म्हणुन जिल्हास्तरावर कर्मचारी 'जिल्हा समन्वयक' नेमलेले आहेत. तसेच टोल फ्री क्रमांक १८००१२०८०४० उपलब्ध करून देणेत आला आहे. 

उद्देश : 
  • आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकाचा आर्थिक विकास करणे.
  • बेरोजगार युवकांना रोजगार व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. 
  • स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांना स्वयंरोजगाराबाबतची माहिती, मार्गदर्शन, व आर्थिक सहाय्य देणे. 

महामंडळाच्या पोर्टल वर दिनांक २२ सप्टें २०१९ अखेरच्या महत्वाच्या सूचनांची लिंक 
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा (IR-I), गट कर्ज व्याज परतावा (IR-II) या योजनेतून व्याजपरतावा देण्यात येते व गट कर्ज योजना (GL-I) या योजनेअंतर्गत बीन व्याजी कर्ज देण्यात येते.



 वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना


लाभार्थी
पात्रता
 कृषि संलग्न व पारंपारिक उपक्रमांसाठी 
 लघु व मध्यम उद्योगांसाठी 
 उत्पादनसेवा व व्यापार क्षेत्रांसाठी 
  महाराष्ट्राचा रहिवासी असावा
  आधार लिंक असणारा मोबाईल क्रमांक 
  वय - १८ ते ४५ वर्षे 
  वार्षिक कौटुंबिक उत्पन्न - ८ लाख पर्यंत 
  दिव्यांग उमेदवारासाठी सक्षम यंत्रणेचा पुरावा

इतर अटी व शर्ती - 
  1. यापुर्वी लाभ घेतलेला नसावा. 
  2. कर्ज प्रकरण CIBIL धारक बँकेतून करणे आवश्यक आहे. 
  3. एका कुटुंबासाठी एकदाच एका व्यक्तीला लाभ दिला जातो.
गटप्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना
लाभार्थी
पात्रता
 कृषि संलग्न व पारंपारिक उपक्रमांसाठी 
 लघु व मध्यम उद्योगांसाठी 
 उत्पादनसेवा व व्यापार क्षेत्रांसाठी 
  महाराष्ट्राचा रहिवासी असावा
  आधार लिंक असणारा मोबाईल क्रमांक 
  वय - १८ ते ४५ वर्षे 
  वार्षिक कौटुंबिक उत्पन्न - ८ लाख पर्यंत 
  दिव्यांग उमेदवारासाठी सक्षम यंत्रणेचा पुरावा

इतर अटी व शर्ती - 
  1. शासनमान्य बचत गट, भागीदारी संस्था, निबंधक भागीदारी संस्था मुंबई यांनी प्राधिकृत केलेले सहकारी संस्था, कंपनी, LLP, सोसायटी व इतर नोंदणीकृत संस्था 
  2. यापुर्वी लाभ घेतलेला नसावा. 
  3. चालू उद्योग विस्तारासाठी व नवीन उद्योगासाठी 
  4. कर्ज प्रकरण CIBIL धारक बँकेतून करणे आवश्यक आहे. 
  5. एका कुटुंबासाठी एकदाच एका व्यक्तीला लाभ दिला जातो.
नोंदणी व अंमलबजावणी 
वैयक्तिक योजनेच्या उमेदवारांनी व गट योजनेच्या सदस्यांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावे. प्रस्ताव सादर केल्यावर उमेदवारास संगणकीकृत सशर्त पात्रता प्रमाणपत्र प्राप्त होईल. हे LOI बँकेकडे देऊन कर्ज मंजुर करून घ्यावे. बँकेच्या परतावा नियमानुसार वेळेत हप्ते भरल्यास व्याजाचा परतावा हा महामंडळाकडून लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यास जमा होईल. 

गट प्रकल्प कर्ज योजना 
महामंडळातर्फे सदर योजनेंतर्गत पात्र शेतकरी उत्पादक गटांना १० लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज रक्कम शेती उद्योगाकरिता देण्यात येईल.



लाभार्थी
पात्रता
१. कृषि संलग्न व पारंपारिक उपक्रमांसाठी 
२. लघु व मध्यम उद्योगांसाठी 
३. उत्पादन, सेवा व व्यापार क्षेत्रांसाठी 
४. गटातील किमान एक सदस्य शैक्षणिक अर्हता १० वी पास असावी.

१. महाराष्ट्राचा रहिवासी असावा
२. आधार लिंक असणारा मोबाईल क्रमांक 
३. वय - १८ ते ४५ वर्षे 
४. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न - ८ लाख पर्यंत 
५. दिव्यांग उमेदवारासाठी सक्षम यंत्रणेचा पुरावा 

इतर अटी व शर्ती - 
  1. शासनमान्य बचत गट, भागीदारी संस्था, निबंधक भागीदारी संस्था मुंबई यांनी प्राधिकृत केलेले सहकारी संस्था, कंपनी, LLP, सोसायटी व इतर नोंदणीकृत संस्था 
  2. यापुर्वी लाभ घेतलेला नसावा. 
  3. चालू उद्योग विस्तारासाठी व नवीन उद्योगासाठी 
  4. कर्ज प्रकरण CIBIL धारक बँकेतून करणे आवश्यक आहे. 
  5. एका कुटुंबासाठी एकदाच एका व्यक्तीला लाभ दिला जातो.
नोंदणी व अंमलबजावणी 
  1. सदरचे कर्ज मुदत कर्ज असते.
  2. गट पात्र ठरलेनंतर ऑनलाईन मंजुरी पत्र दिले जाते. 
  3. वैधानिक कागदपत्रे तारण पत्रे पुर्ण केल्यावर कर्ज रक्कम गट कर्ज खात्यावर जमा होते. 
  4. बिनव्याजी कर्ज रक्कम परतावा वितरणाच्या खात्यात ७ व्या महिन्यापासुन ८४ व्या महिन्यापर्यंत (७ वर्षे) समान हप्ता देणे अनिवार्य आहे. 
Our vision is to develop innovative agriculture system by technology transfer to farmers, jobseekers and consultants. every year more than 1000 beneficiaries participate in our rural sustainable development program. 

Our expert team guide students and adults to sustain in agri business development. Students participate from more than 19 educational institutions to transfer technology in rurban area of Maharashtra. 

We want physically and mentally strong society to fulfill dreams of worlds fastest growing economy. Every individual deserves right of employment. Every year we are trying deploy skill students in more than 14 business units.

"Know and tell others" is our backbone of development work. we promote success stories on social media platforms. 


We are working here for the medical help to rescue team. our priority is to control Contagious diseases by awareness and prevention measures application in flood effected area. 

आमचे कार्यकर्ते आणि टीम लेप्टो पायरेसिस या विषाणुजन्य आजाराबद्दल जाणीव जागृती करणे तसेच या पुरात बचाव कार्य केलेल्या पथक सदस्यांवर प्राथमिक उपचार करत आहोत.

Monday, June 10, 2019

Mazisheti Launches Sustainable Development Program in Vafgaon Village, Pune


Pune, Vafgaon: In an effort to boost agricultural growth and enhance students' career opportunities, the rural village of Vafgaon, District Pune, has officially launched the MIDAS Project for sustainable development. The program, inaugurated by the village Sarpanch and Grampanchayat leaders, saw the active participation of Mazisheti Director and his team, alongside engaged citizens.

The agenda focused on knowledge dissemination about sustainable practices aimed at improving farmers' income by at least 30%. The program includes farmer onboarding, where participants receive crop-specific and stage-wise training. This initiative emphasizes value addition to farm produce through techniques such as sorting, grading, and the production of by-products, helping farmers to secure better prices at Agricultural Produce Market Committees (APMC).

Apart from agricultural development, the MIDAS Project extends its support to local students. Students from the project area receive an annual stipend of ₹12,000, alongside hands-on training in various career fields. The program also focuses on preparing students for both physical and mental competitions, such as athletic events, as well as government exams like MPSC and UPSC. The professional mentorship initiative ensures that students gain self-confidence, self-reliance, and business acumen. Those who complete the program are given placement opportunities within Mazisheti or other partnering companies.

Impact of the Initiative:

By integrating agricultural training with student development, Mazisheti aims to achieve a dual impact: boosting farmer incomes and ensuring holistic career development for students. The value addition through farm produce processing is expected to streamline farmers' market access, resulting in a minimum 30% increase in their income. Simultaneously, students receiving hands-on training and career mentorship will be better equipped to succeed in both business and competitive sectors, fostering the next generation of rural entrepreneurs and professionals.

This initiative aligns with Mazisheti's broader goal of promoting rural sustainable development through education, technology integration, and community support.

Friday, February 22, 2019

दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले आर्थिक स्थैर्य

लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी कुटुंबीय अनेक वर्षांपासून वर्षभर भाजीपाला पिकाची शेती करतात. हंगामनिहाय भाजीपाला पिकाचे नियोजन करून परिसरातील आठवडे बाजारात थेट विक्री करून नफा वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. दुष्काळी परिस्थितीतही माळी कुटुंबीयांनी सुयोग्य नियोजनातून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करीत आर्थिक स्थैर्य जपले आहे.

लातूर जिल्ह्यातील चापोलीपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरगा (यल्लादेवी) येथील गोरख माळी यांची तुकड्यात विभागलेली पाच एकर शेती आहे. माळी कुटुंबातील सर्व सदस्य पीक लागवड व व्यवस्थापन करतात, तर निलावती व त्यांची सून यांनी विक्रीची जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळली आहे. माळी कुटुंबीय परिसरातील आठवडी बाजारातील मागणीचा विचार करून हंगामनिहाय विविध भाजीपाला पिकाची लागवड करतात. त्यामुळे वर्षभर भाजीपाल्याला मार्केट उपलब्ध होते.  
  सिंचन व्यवस्था 
गोरख माळी यांच्या शेतात दोन विहिरी आहेत. २०१५ मध्ये घेतलेल्या विहिरीला सुदैवाने पाणीही लागले. एक विंधन विहीर असून, त्याचे पाणी विहिरीत साठवले जाते. त्यामुळे मुबलक पाणीसाठा आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करून वर्षभर भाजीपाल्याची लागवड केली जाते. पिकाला पाणी देण्यासाठी तुषार आणि ठिबक सिंचनाची सोय केली आहे.  

  थेट विक्रीवर भर 
निलावती माळी भाजीपाल्याची विक्री स्वतः  विविध आठवडी बाजारात करतात. दर सोमवारी अहमदपूर, बुधवारी चापोली, गुरुवारी शिरूर ताजबंद, शुक्रवारी चाकूर व रविवारी हाळी या आठवडे बाजारात भाजीपाल्याची विक्री केली जाते. भाजीपाला ताजा व  योग्य दारात मिळत असल्याने विविध गावांतील  ग्राहक जोडले गेले आहेत. आठवड्यातून पाच  आठवडी बाजार करीत असल्याने वर्षभर ताजा पैसा मिळतो.

शेतीचे नियोजन 
गोरख माळी व निलावती माळी हे पती-पत्नी, तसेच नवनाथ व यशोदा हे मुलगा व सून सर्व जण एकत्र राहतात. शेतातच घर असल्याने पिकांचे व्यवस्थापन करणे सोपे जाते. भाजीपाला लागवडीपासून ते  तोडणीपर्यंतची सर्व कामे घरीच केली जातात. शेतात मजूर किंवा सालगडी नाही. त्यामुळे मजुरीवरचा मोठा खर्च वाचतो.

शेळीपालनाची जोड 
माळी कुटुंबीयांनी शेतीला दहा वर्षांपासून शेळी पालनाची जोड दिली आहे. दोन शेळ्यांपासून सुरुवात केली. सध्या त्यांच्याकडे दहा शेळ्या व एक बोकड आहे. आतापर्यंत त्यांनी १९ बोकडांची विक्री केली, त्यातून अतिरिक्त कमाई झाली.

माळी कुटुंबीयांचा दिनक्रम 
गोरख माळी यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य पहाटे चार वाजता उठतात. दूध काढणे व साफसफाई करून जनावरांना चारा-पाणी करतात. नंतर विक्रीसाठी ताज्या भाजीपाल्याची तोडणी केली जाते. भाजीपाल्याची प्रतवारी करून सर्व सदस्य भाजीपाला बाजारात घेऊन जातात. निलावती या विक्रीसाठी बाजारात बसतात, तर उर्वरित सदस्य दिवसभर शेतातील इतर कामकाज करतात.

असे आहे पीक नियोजन 
 एकूण क्षेत्र    पाच एकर
 ऊस    एक एकर
 भाजीपाला     साडेतीन एकर
 गलांडा फुले    अर्धा एकर

भाजीपाला लागवड नियोजन 
 जून – वांगे, कांदा, भेंडी, गवार, भोपळा, मिरची, मेथी, शेपू, कोथिंबीर, चवळी, फ्लॉवर.
 ऑक्टोबर – कांदा, गाजर, भोपळा, कोबी, वरणा, वाटाणा, पालक, चुका, कोथिंबीर, मुळा, बीट.
 फेब्रुवारी – पालक, गवार, दोडका, कारले, पडवळ, कोथिंबीर, कोबी, मुळा, चवळी, काकडी.
 गलांडा फुलाची वर्षभर लागवड.

बांधावर फळझाडांची लागवड  
शेतातील बांधावर विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड केली आहे. त्यात आंब्याची ५० झाडे, चिंच २५, बोर ५, पेरू १०, नारळ १०, जांभूळ ५, शेवगा १५, चंदन ५०, सागवान २५; तर रामफळाची १० झाडे लावली आहेत. फळांची हंगामानुसार विक्री करून त्यातून अतिरिक्त नफा मिळतो. आठवडी बाजारातच या फळांची ते स्वतः विक्री करतात.

अर्थकारण 
प्रत्येक आठवडी बाजारातून किमान एक हजार रुपये उत्पन्नाचे उद्दिष्ट असते. काही वेळा किंवा सणासुदीला ते दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत जाते. दरही ग्राहकांना परवडेल असेच असतात. महिन्याला १५ ते २५ हजार रुपये मिळतील, असे नियोजन असते. मागील पाच वर्षांपासून एक एकर क्षेत्रावर ऊस लागवड केली जाते. पाच वर्षांत सरासरी ६० ते ७० टनांचे उत्पादन झाले. यंदा दोन हजार रुपये टनप्रमाणे कारखान्याला ऊस विक्री केली आहे. उसामध्ये गवार, चवळी, कांदा व हरभरा ही आंतरपिके घेतली जातात.

‘ऍग्रोवन’ खरा मार्गदर्शक 
यापूर्वी  ढोबळमानाने भाजीपाल्याची लागवड व विक्री केली जात असे.  गेल्या वर्षापासून माळी अॅग्रोवन वाचतात.  त्यातील भाजीपाला पिकाची माहिती अत्यंत उपयुक्त असते. त्यामुळे भाजीपाला उत्पादनात वाढ झाली आहे.

   पशुधनापासून सेंद्रिय खताची उपलब्धता
माळी यांच्याकडे दोन बैल, दोन म्हैस व दहा शेळ्या आहेत. त्यामुळे शेतीला घरच्याघरी शेणखत उपलब्ध होते. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होत असून, जमिनीची सुपीकता टिकून राहत आहे.

 शेती व्यवस्थापनातील बाबी 
  •  दर वर्षी उन्हाळ्यात शेणखत मिसळले जाते.  
  •  रासायनिक खतांचा कमीत कमी वापर.
  •  उपलब्धतेनुसार गांडूळ खताचा वापर.
  •  शेतातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष.
  •  ताजा व प्रतवारी केलेला भाजीपाला. त्यामुळे मागणी चांगली.
  •  बीजप्रक्रिया करून भाजीपाला बियाण्यांची लागवड 
  •  आठवडी बाजारातील दरांवर लक्ष ठेवून भाजीपाला लागवडीचे नियोजन 

सणांसाठी विशेष नियोजन 
श्रावण महिन्यापासून सणांना सुरुवात होते. याकाळात विशिष्ट भाजीपाल्याला मागणी असते. मुळा, काकडी, गवार, भेंडी आदी भाजीपाल्याला मागणी असते. दर वर्षी बाजारात फारशी आवक न होणाऱ्या, परंतु मागणी असलेल्या भाजीपाल्याचे उत्पादन घेत चांगला नफा ते कमावतात. गौरी-गणपती, नवरात्र महोत्सव व त्यानंतर दसरा-दिवाळी आदी सणांच्या काळात भाजीपाल्याबरोबरच फुलांनाही चांगली मागणी असते. गलांडा फुलांना किलोला ५० ते ६० रुपये प्रमाणे भाव मिळतो. 

Wednesday, December 5, 2018

माझीशेती : माती परीक्षण

पीकांच्या वाढीसाठी वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. 
उदा.-
१) सामू PH २) विधुत वाहकता EC, ३)चुनखड़ी CaCO3 ४) सेंद्रिय कर्ब OC, ५) नत्रN, ६) स्फुरदP, ७) पालाशK, ८) कॉपरCu, ९) फेरस(आयर्न)Fe, १०) झिंकZn, ११) मॅगनीज्Mn, १२) कॅल्शियमCa, १३) मॅग्निशियमMg, १४) सल्फर S, १५) सोडियम Na

पाने पिवळी पडणे ,पान गळणॆ ,शिरा सोडून इतर पानांचा सर्व भाग वाळून जाणॆ इत्यादी लक्षणॆ अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे किवा अभावामुळे वनस्पतीमध्ये दिसून येतात. अश्या अठरा अन्नद्रव्याशिवाय पीकांची वाढ पूर्ण होत नाही.
माती परीक्षणचा उद्देश

१) मुख्य आणि महत्त्वाचा उद्देश म्हण्जे माती परीक्षणावरुन जमीनीत पीक वाढीसाठी कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे व ती कमतरता नाहीशी करण्यासाठी काय करणं आवश्यक आहे हे ठरवता येते.

२) माती परीक्षण व पीक उत्पादन यांच्या संबंधावरून पीकांना जमीनीतून किती प्रमाणात अन्नद्रव्ये मिळतात व कम्पोस्ट ,हिरवळीचे खत ,गाडूळ खत इत्यादी खतापासून किती प्रमाणात अन्नद्र्व्ये द्यावयास पाहिजेत ही माहिती मिळ्ते.
३) मातीच्या नमून्याचे प्रयोगशाळेत सामूPH , विधुत वाहकता EC, चुनखड़ी CaCO3 ,सेंद्रिय कर्ब OC,नत्रN, स्फुरदP, पालाशK, कॉपरCu, फेरस(आयर्न)Fe, झिंकZn, मॅगनीज्Mn, कॅल्शियमCa, मॅग्निशियमMg, सल्फर S, सोडियम Na यासाठी परीक्षण केले जाते .
४) जमीन कोणते पीक वाढीसाठी चांगली आहे किंवा नाही ते समजते .
५) विद्राव्य क्षाराच्या प्रमाणावरून पीकांच्या वाढीवर होणा-या परिणामाचा अंदाज होतो .
मातीचा नमुना घेण्याची पध्दती

१) जमिनीचा रंग ,चढ -उतार ,खोली ,खडकाळ किंवा पाणथळ ठिकाणे निच-याची परिस्थिती तसेच क्षारयुक्त किंवा चोपण जागा इत्यादी बाबीचा विचार करून शेताचे निरनिराळॆ विभाग पाडावेत आणि प्रत्येक विभागातून स्वतंत्रपणॆ प्रतिनिधीक नमूना घ्यावा .

२) मातीचा नमूना हा त्या शेतातील प्रतिनिधीक नमूना असावा .कारण आपण शेतातून फक्त अर्धा ते एक किलो माती परिक्षणासाठी वापरतो .प्रतिनिधीक नमूना शेतातील ८-१० वेगवेगळ्या ठिकाणाहून जमा करावा .
३) नमूना घेताना फक्त लाकडी साहित्य आणि प्लास्टिक घमेले किंवा पोते वापरावे. शेतीचे समान ९ भाग करायचे. प्रत्येक भागातील मध्यावर १x१x१ फुटाचा खड्डा घ्यायचा. नंतर हाताने बाजूची माती खाली पाडून ५०० ग्रॅम पर्यंत नमुना घ्या. (हि पद्धत कटाक्षाने पाळा)
४) शेतक-याचे नाव, सर्वे नंबर बागायती /कोरडवाहू
अ) जमिनीचा प्रकार :(हलकी / मध्यम / भारी )
ब) चूनखडीचे प्रमाण (कमी /मध्यम /जास्त )
क) चिकन मातीचे प्रमाण : (कमी /मध्यम /जास्त )
जमीनीची निचरा शक्ती
जमीनीची खोली
ओलिताचे साधन
नमूना घेतल्याची तारीख

मागील हंगामात घेतलेली पिके, त्यांचे उत्पादन ,वापर्लेली खते ,त्यांचे प्रमाण पुढील हंगामात घ्यावयाची पिके ,त्यांचे वाण व अपेक्षीत उत्पादन.


इतकी माहिती नमुण्यासोबत लिहून जवळच्या कृषि विभागातील कर्मचाऱ्यांकडे किंवा माझीशेती शेतकरी सुविधा केंद्र मध्ये जमा करून तपासणी अहवाल घ्यावा.

Friday, August 31, 2018

बांबू लागवड

बांबूची शेती


शेतीकामासाठी लागणारे मनुष्यबळ तसेच शेतीस अवेळी होणारी पाणीटंचाई यांवर मात करण्यासाठी व शेती फायदेशीर होण्यासाठी एक शाश्वत उपाय म्हणजेच बांबूची शेती होय. शेतक-यांनी बांबूची लागवड थांबते, पर्यायाने जमिनीचा पोत सुधारतो.

फायदे

  1. बांबू हा जलद वाढणारा गवताचा प्रकार असून त्यांच्या लवचीक व दणकट गुणधर्मामुळे त्याला फार महत्व आहे. एकदा बांबू लावल्यानंतर त्याचे जीवनचक्र साधारणपणे ४० वर्षांपर्यंत चालू राहते व ४ ते ५ वर्षांपासून सतत नियमितपणे बांबूचे उत्पादन मिळत राहते.
  2. मानवेल ही बांबूची जात लांब धागा असलेली, जास्त सेल्युलोज असलेली तसेच कोड व रोग प्रतिकारक जात आहे. ही जात गर्द हिरव्या रंगाची असून साधारणपणे ६ ते १८ मीटर उंच वाढते. दोन पेन्यांमधील अंतर २५ ते ४० सेंटिमीटर असून पेच्याजवळचा भाग थोडा फुगीर असतो. या जातीची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दिसून येते. यासाठी बांबू लागवडीची माहिती ही प्रामुख्याने मानवेल जातीविषयी देण्यात येत आहे.
  3. बाबूपासून कागद, चटया, दांडया, टोपल्या, खोकी, पत्रे, फर्निचरआदि उत्पादने  तयार होतात . यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते .

जमीन व हवामान

बांबूला उष्ण व दमट हवामान मानवते आणि जास्त पाऊसमान असलेल्या उष्ण प्रदेशात बांबूची वाढ चांगली होते. तरीही, पाणी देण्याची सोय असल्यास बांबूची लागवड सर्वसाधारणपणे ९ ते ३६ अंश से. तापमान, सरासरी प्रतिवर्षी ७५0 मि.मी. पाऊसमान आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन असणे गरजेचे असते. बांबूची मुळे ही तंतुमय असल्याने ती जमिनीच्या वरच्या भरात वाढतात. त्यामुळे जमीन उथळ असली तरी चांगली निचरा होणारी भुसभुशीत असावी लागते. अशा जमिनीत बांबूच्या कंदाची वाढ चांगली होते. क्षारपड, चिबड अथवा पाणथळ जमिनीत  बांबूची लागवड करू नये. अशा जमिनीत बांबू जरी  होत नाही.

अभिवृद्धी

बांबूची अभिवृद्धी जरी वेगवेगळ्या बियांपासून व कंदापासून करण्यात येते. (Y अ) बियांपासून अभिवृद्धी बियांपासून अभिवृद्धी करताना बांबूची रोपे ही पुढील दोन प्रकारांनी तयार करतात.
  1. गादी वाफ्यात बी पेरूनबांबूची रोपे बियाणे पेरून करताना ती गादी वाफ्यावर दिशेने ठेवावी. वाफ्याची रुंदी साधारणपणे १ मीटर व लांबी सोयीनुसार १० मीटर ठेवावी. गादी वाफ्यातील अंतर ३० सें.मी. ठेवून आडव्या ओळीमध्ये बियाणे पेरावे. बियाण्याची पेरणी साधारणपणे सप्टेंबरऑक्टोबर महिन्यांत करावी. तीन ते चार महिन्यांनी रोपे पॉलिथिन पिशवीत लावावीत. या त-हेने तयार केलेली रोपे जून-जुलै महिन्यांत लागवडीसाठी वापरता येतात.
  2. पॉलिथिन पिशवीत लावून बांबूच्या रोपांची निर्मिती बियाणे पॉलिथिन पिशवितसुद्धा लावून करता येते. यासाठी २५ सें.मी. × १२ सें.मी. आकाराच्या पॉलिथिन पिशवीत माती, वाळू व चांगले कुजलेले बारीक शेणखत यांचे १:१:१ मिश्रण करून पॉलिथिन पिशवित भरून प्रत्येक पिशवित ३ ते ४ बिया टोकून त्यात पाणी द्यावे. पॉलिथिन पिशव्यांत रोपांची चांगली वाढ होते व कमी बियाणे लागते. यामध्ये बियाणे लावलेल्या वाफ्यामध्ये चाळणी एका महिन्याच्या कालावधीने करणे आवश्यक असते.
ब) कंदाद्वारे अभिवृद्धीयासाठी जुन्या बांबूच्या बेटातील कंदमुळयासह पावसाळ्याच्या  सुरुवातीस काढून त्याची लागवड करतात . कंदाद्वारे केलेल्या बांबूच्या लागवडीमध्ये झाडे जगण्याचे प्रमाण चांगले असते व वाहतुकीचा खर्च कमी येतो. लागवडीसाठी कंदाची निवड करताना कंदावर २ ते ३ डोळे असणे आवश्यक असते.

लागवड

बांबूची लागवड साधारणपणे ३ x ३ मीटर ते ७ x ७ मीटर अंतरापर्यंत करण्यात येते. त्याचप्रमाणे त्याचा कालावधी ३५ ते ४० वर्षांपर्यंत असल्याने जास्त अंतरावर बांबूची लागवड करणे फायदेशीर असते. यात बांबूची वाढही चांगली होते आणि बांबूतोडणीस अडचण होत नाही. सर्वसाधारणपणे ५ × ५ मीटर अंतरावर लागवड करणे योग्य ठरते. याप्रमाणे लागवड केल्यास एक हेक्टर अंतरावर ४00 बांबूची रोपे बसतात. बांबूची लागवड करण्यासाठी एप्रिल-मे महिन्यांत '५ मीटर अंतरावर ६ox६ox६० सें.मी. आकाराचे खडे खोदावेत. यामुळे उन्हाळ्यात माती तापून त्यामधील किडी , कृमी मरण्यास मदत होते.  अशा या खोदलेल्या खडुयात पावसाळ्यापूर्वी  माती भरावी. माती भरताना त्यामध्ये एक | घमेले चांगले कुजलेले शेणखत, ५० ग्रॅम | अमोनियम सल्फेट आणि २०० ग्रॅम सुपर फॉस्फेट मिसळावे. नंतर पुरेसा पाऊस होताच त्या ठिकाणी बांबूची लागवड करावी. पेिशव्यांमधील रोपांची लागवड करताना पिशवी फाडून, अलगद मातीच्या गोळ्यासह रोप खडुयात बसवून आजूबाजूची माती चौफेर घट्ट दाबून द्यावी.


घ्यावयाची काळजी


नांगी भरणे

बांबू लावल्यानंतर पुढील कारणांमुळे त्याची मर होऊ शकते.
  1. लागवड करताना रोपाच्या भोवताली माती व्यवस्थित न दाबल्यामुळे
  2. कंद काढताना त्यास झालेली इजा
  3. वाहतूक करताना रोपांना होणारी इजा
  4. रोपाच्या भोवतालची माती निघाल्यामुळे किंवा रोपे उघडी पडल्यामुळे
  5. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास.
बांबू लावताना व वाहतुकीमध्ये योग्य ती काळजी घेतल्यास रोपे मरण्याचे प्रमाण फारच अल्प असते. रोपे मेलेल्या ठिकाणी पुन्हा नवीन रोपे लावावीत.

खुरपणी

बांबू ही गवत प्रकारातील वनस्पती असल्याने त्याची मुळे साधारणतः जमिनीच्या वरच्या थरातच असतात. तसेच इतर गवतझुडपे यांची मुळे वरच्या थरात असल्यामुळे पाणी व अन्न मिळविण्यासाठी दोन्हींची स्पर्धा होते. यासाठी वेळोवेळी रोपाभोवतालचे तण काढणे आवश्यक असते. तसेच रोपाच्या सभोवतालची माती भुसभुशीत राहिल्यास खोडमुळाची वाढ जोमदार होते. बांबू या वृक्षाची वर्षभर सर्व काळात वाढ होत असल्याने जमिनीत योग्य ओलावा राहील, यासाठी काळजी घ्यावी. त्यासाठी रोपांच्या जवळ असलेल्या गवताच्या धसकटांचा  आच्चादन म्हणून सुद्धा उपयोग होतो.

पाणी

साधारणपणे ७५० ते ८00 मि.मी. पाऊस पडत असलेल्या १ ते २ वर्षे विशेषत: उन्हाळ्यामध्ये रोपांना पाणी देण्याची आवश्यकता पडते. हलक्या व मुरमाड जमिनीत एक आठवड्याच्या अंतराने तर मध्यम व भारी जमिनीत १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. १ ते २ वर्षांनंतर बांबूस पाणी देण्याची गरज पडत नाही. तरीही पाणी देण्याची सोय असल्यास पाणी दिल्यास उत्पादनात चांगली वाढ होते.

आंतरपीक

बांबू लागवडीनंतर ३ ते ४ वर्षांनी पक्र होण्यास सुरवात होते. तेव्हा सुरवातीच्या २ ते ३ वर्षांच्या कालावधीमध्ये दोन ओळींच्या पड्यात आंतरपिके घेण्यास हरकत नाही. त्यामुळे अधिक उत्पन्न मिळतेच; शिवाय जमीन तणविरहित राहण्यास मदत होते.

शाखा छाटणी

प्रत्येक कळकाच्या पेन्यातून फांद्या फुटत असतात व कधीकधी त्या फार लांबसुद्धा वाढतात. नवीन येणा-या कळकाच्या सरळ वाढीला अडथळा होऊन कळक वेडावाकडा वाढू नये, म्हणून या फांद्यांची छाटणी करणे आवश्यक ठरते. त्यासाठी फांद्यांची छाटणी कळकाच्या अंगालगत धारदार कात्रीने खालपासून जिथपर्यंत करता येईल तिथपर्यत करावी.

काढणी

लागवडीनंतर ४ ते ५ वर्षांनी बांबू काढण्यास सुरवात होते. रोगराईपासून संरक्षण व नवीन फुटीला प्राधान्य यासाठी बांबू दरवर्षी काढणे फायदेशीर ठरते. बांबू तोडताना तो जमिनीलगत न तोडता, दुस-या व तिस-या पेन्याच्या मध्यभागी (३० सें.मी. अंतरावर) धारदार कु-हाडीने घाव घालून तोडावा. असे न केल्यास खोडमुळांच्या आतील पेशींना बाहेरचे पाणी लागून ते सडते व बांबूची खोडमुळेच मरतात. बांबू योग्य ठिकाणी तोडल्यास कुजण्यापासून त्याचे संरक्षण होते. बांबूची काढणी ही नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांत करावी. एप्रिल ते ऑक्टोबर या महिन्यांत बांबूची काढणी करू नये, कारण त्या काळात बांबूची वाढ अत्यंत जलद गतीने होत असते.

रोग व व्यवस्थापन

बांबूच्या रोपांवर विविध प्रकारच्या बुरशीपासून निरनिराळे रोग पडतात. उदा. मुळे सडणे, पानावरील ठिपके, खोड सडणे, विचेस बूम या रोगात रोपांची वेडीवाकडी वाढ होते. यामुळे फुले व कोंबावर त्याचा परिणाम होतो. बुरशीमुळे होणा-या ब्लाईट या रोगामुळे फार नुकसान होते. यासाठी प्रादुर्भाव झालेली रोपे काढून टाकावीत व त्यानंतर बाविस्टिन (०.१५ टक्के), फ्युरॉडॉन (२५ ग्रॅम) ही बुरशीनाशके फवारावीत. रोगाचा प्रादुर्भाव दिसल्याबरोबर ही द्रावणे फवारल्यास रोग आटोक्यात येतो. बियांचे बुरशी व जिवाणूपासून संरक्षण करण्यासाठी सेरेशन या बुरशीनाशकाची (५ ग्रॅम/कि.ग्रॅ.) प्रक्रिया केल्यास बुरशीचा नायनाट करता येतो. तसेच या बियांची उगवणक्षमता वाढविण्यासाठी प्रतिजैविकांचाही आजकाल उपयोग केला जातो.

किटकांचा प्रादुर्भाव

पाने खाणा-या किटकांमुळे पानावर छिद्रे पडतात. तसेच पाने गळतात. यांच्या बंदोबस्तासाठी पानांवर सायपरमेष्धिन (o.o२ टक्के) किंवा मॅलिथिऑन ५o ई.सी. (o.o२ टक्के) पाण्यामध्ये मिसळून फवारावे. बीजकृमीच्या बंदोबस्तासाठी डायमेथोएट ३o ई.सी. या औषधाचा पाण्यात मिसळून फवारा गरजेप्रमाणे मारावा.ज्या वेळेस साठविलेल्या बांबूवर बारीक छिद्रे व पिवळी भुकटी आढळून येते, अशावेळी या मुंग्याच्या बंदोबस्तासाठी सायपरमेश्रीन (०.४ टके) डिझेल/ऑईलमध्ये मिसळून फवारावे.वाळवी/उधईच्या नियंत्रणासाठी लागवडीच्या ठिकाणी थायमेट आणि तोडलेल्या बांबूवर सी.सी.ए. (कॉपर क्रोमियम अरसेनिक) फवारावे. नवीन कोवळे बांबू,पोखरणा-या कीटकांसाठी डायमेथोएट (०.०१ टक्के) किंवा मोनोक्रोटोफॉस (०.२ टक्के) पाण्यात मिसळून फवारावे. बांबू हा पानझडी वृक्ष असल्यामुळे उन्हाळ्यात त्याचे आगीपासून संरक्षण करावे.

उत्पादन

लागवड पद्धती व रोपांची देखभाल यांवर मुख्यत्वे बांबूचे उत्पादन अवलंबून असते. बांबूचे उत्पादन लागवडीनंतर चौथ्या वर्षापासून सुरू होते. ५ × ५ मीटर अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी ४,००० रोपे बसतात व त्यामधून पाचव्या वर्षी २,००० रुपये मिळतात. बाजारात किरकोळ विक्रेत्याकडून प्रतिनग १५ रुपये प्रमाणे एकूण ३० हजार रुपये उत्पन्न हेक्टरी मिळण्यास सुरवात होते.बांबूची लागवड केल्यानंतर सलग ४o वर्षांपर्यंत उत्पादन मिळते. म्हणजेच एकदा लागवड केल्यानंतर पाणी व खते देण्याशिवाय प्रत्येक वर्षी इतर कसलीही मशागत करावी लागत नाही. शिवाय, दरवर्षी बांबूचे उत्पादन १० ते १५ टक्क्यांनी वाढते. हलक्या जमिनीत तसेच प्रतिकूल वातावरणातदेखील सहाव्या वर्षापासून २ इंच व्यासाचे व १८ फूट लांबीचे बांबू मिळतात.

बांबू प्रक्रिया

बांबूवर रासायनिक प्रक्रिया केल्यास त्याचे आयुष्य अर्धे चिरलेले बांबू६ ते ८ टक्के सी.सी.ए. किंवा सी.सी.बी.चे द्रावण असलेल्या हौदात बांबूचा ३० ते ४० सें.मी. भाग बुडेल अशा त-हेने २४ तास ठेवावेत. नंतर पुन्हा उलट्या बाजूने त्याच द्रावणात २४ तास बुडवून ठेवावते. त्यानंतर असे प्रक्रिया केलेले बांबू वापरण्यापूर्वी २ ते ३ आठवडे एकत्र साठवून ठेवावेत. अशा त-हेने प्रक्रिया केलेल्या बांबूचे आयुष्य १० ते १५ वर्षांनी वाढल्याचे आढळून आले आहे व त्यासाठी खर्चसुद्धा फारसा येत नाही.

Wednesday, June 20, 2018

"खरिप शेती व्यवस्थापन २०१८" आणि "आला पावसाळा, आरोग्य सांभाळा" कार्यशाळेबाबत...

खरिप शेती व्यवस्थापन २०१८  
ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्प मार्गदर्शक सूचना आणि खरीप हंगाम २०१८ च्या नियोजनामध्ये सोमवार दि. २५/०६/२०१८ ते शनिवार दि.१४/०७/२०१८ या कालावधीमध्ये माझीशेती कार्यरत असणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रावर खरीप पिक व्यवस्थापन कार्यशाळा राबविण्यात येणार आहेत. या कार्यशाळा शेतकऱ्यांना मोफत आहेत. कार्यशाळा अंमलबजावणी करिता शेतकरी सुविधा केंद्र, स्वयंसेवक यांना प्राधान्य देण्यात आले आहे. 
  • मातीचे प्रकार आणि घ्यावयाची पिके 
  • बियाणे निवड आणि प्रक्रिया, फायदे 
  • सापळा पिके निवड आणि रचना 
  • खत व्यवस्थापन (जैविक, सेंद्रिय व रासायनिक) 
  • आंतरमशागत (विरळणी, निंदणी, कोळपणी, खुरपणी) 
  • काढणीपश्चात व्यवस्थापन (शासकीय सहकार्य, माझीशेती नियोजन)      

आला पावसाळा, आरोग्य सांभाळा
जसे कि आपण जाणता, मानवाचे ६५% आजार दुषित पाण्यामुळे होतात. पावसाळा सुरु झाला कि पिण्याच्या पाण्याचे साठे एनकेनप्रकारे दुषित होतात व परिणामी मानवाला आजारास सामोरे जावे लागते. पावसाळी हंगाम २०१८ च्या आरोग्य, आहार आणि पाणी नियोजनाद्वारे आपण आजारांना दूर ठेवु शकतो. या विषयावर सोमवार दि.२५/०६/२०१८ ते शनिवार दि.१४/०७/२०१८ या कालावधीमध्ये वार्डनिहाय, सोसायटीनिहाय (मागणी असेल तर) “आला पावसाळा, आरोग्य सांभाळा” कार्यशाळा राबविण्यात येणार आहेत. या कार्यशाळा नागरिकांना मोफत आहेत. कार्यशाळा अंमलबजावणी करिता माझीशेती सहयोगी संस्था, स्वयंसेवक, विद्यार्थी यांना प्राधान्य देण्यात आले आहे.
  • पर्जन्यामानाची माहिती (पडणारा पाऊस, पाण्याची दिशा, साठे) 
  • पाणीपुरवठा यंत्रणा माहिती (साठा, सध्याची घेतली जाणारी काळजी) 
  • पाण्यापासुन पसरणारे रोग माहिती (लक्षणे, प्रतिबंध, प्राथमिक उपचार)