Translate (Trial Version)

कायमचे प्रश्न

MSP Foundation / Mazisheti – FAQ (Combined)

MSP Foundation / माझीशेती – FAQ

MSP Foundation ही शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी शेतकरी-केंद्रित संस्था आहे. शेतकरी + बाजार + तंत्रज्ञान यांचा विश्वासार्ह दुवा उभा करणे हे आमचे ध्येय आहे.

Mazisheti Shetkari Pratishthan (MSP Foundation) ही सामाजिक उद्देशाने काम करणारी संस्था आहे. शेतकऱ्यांना योग्य बाजार, योग्य दर, सल्ला, प्रशिक्षण आणि डिजिटल सेवा देऊन शाश्वत उत्पन्नवाढ साधणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
सविस्तर माहिती
• MSP Foundation चे मुख्य उद्दिष्ट काय?
शेतकरी, विद्यार्थी आणि समाज यांना एकत्र जोडून शाश्वत विकास साधणे हे MSP Foundation चे मुख्य उद्दिष्ट आहे.
माझीशेती सोबत गाव, क्लस्टर आणि जिल्हा अशा तीन स्तरांवर काम करता येते. सामाजिक विकास, शेतकरी नोंदणी, कार्यशाळा, अहवाल आणि प्रकल्प अंमलबजावणी या माध्यमातून प्रत्यक्ष योगदान देता येते.
वैयक्तिक स्तरावर: कामाचा अनुभव आवश्यक नाही; मात्र तीव्र इच्छाशक्ती आणि निर्णयक्षमता आवश्यक आहे.
संस्थांसाठी: किमान २ तज्ञ मनुष्यबळ (समाजकार्य + कृषि), संगणक, इंटरनेट आणि कार्यालय व्यवस्था आवश्यक आहे.
सहभागासाठी अर्ज
लाभार्थी हिस्सा: ₹2 प्रतिदिन (₹730 प्रतिवर्ष)
अर्ज प्रक्रिया फी: ₹500 (नोकरी अर्जदारांसाठी)
संस्था सुरक्षा ठेव: ₹50,000 (परतफेडयोग्य)
प्रकल्प निधी, लोकवर्गणी आणि दानातून मिळालेल्या निधीवर आधारित मानधन दिले जाते. 10% ते 65% पर्यंत व्यवस्थापन खर्च / मानधन मिळू शकते.
निधी अहवाल
प्रत्येक महिन्याचा अहवाल सादर केल्यानंतर निधी थेट बँक खात्यात जमा केला जातो. पहिल्या महिन्याचा निधी सहाव्या महिन्यात दिला जातो.
पूर्णवेळ कार्यकर्त्यांसाठी किमान वेतन ₹3000 + प्रवास, फोन, निवास व वैद्यकीय भत्ते दिले जातात. दरवर्षी निधीत 10% वाढ होते.
स्तरकार्यक्षेत्र
गावस्वतःचे गाव
क्लस्टर10–15 गावांचा समूह
जिल्हासंपूर्ण जिल्हा

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान सोबत वेगवेगळ्या स्तरावर काम करून सामाजिक योगदान देता येते. गावस्तरावर कामाची सुरुवात करून जिल्हास्तरापर्यंत ३ टप्प्यावर सहभागी होऊन सामाजिक योगदान देता येते.
सहभागी होणाऱ्या संस्थेकडे स्वतःचे किमान ०२ तज्ञ मनुष्यबळ (०१ समाजकार्य व ०१ कृषि), किमान ०१ संगणक आणि इंटरनेट सुविधा सेट असणारे १० x १० चे स्वतःचे अथवा भाड्याने असणारे कार्यालय आवश्यक आहे.
संस्था नोंदणीसाठी इथे क्लिक करा
१. ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्प आणि सामाजिक कार्याची माहिती देणे व मासिक कार्यशाळा आयोजित करणे. (अंगणवाडी, कॉलेज, ग्रामपंचायत, सोसायटी, बँक इ.)
२. लाभार्थी (शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार, महिला) नोंदणी करणे.
३. मासिक मीटिंग घेणे व दस्तऐवज अद्ययावत ठेवणे.
४. साप्ताहिक, मासिक आणि त्रैमासिक अहवाल पाठवणे.
संस्थेकडे २ तज्ञ मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त अधिक मनुष्यबळाची गरज भासल्यास 'विद्यार्थी विकास उपक्रमातून' विद्यार्थी निवडीची सोय केली जाते.
विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी येथे क्लिक करा
हो. सहभागी कोणत्याही घटकाने (शेतकरी, महिला, तरुण) इतरांना माहिती देऊन "ग्रामीण शाश्वत विकास" प्रकल्पात सहभागी केल्यास, प्राप्त निधीच्या १०% रक्कम प्रचार-प्रसिद्धी निधी म्हणून त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
नोंदणीकृत संस्थांना कार्यालयीन खर्चासाठी प्रतिमाह ७०००/- पर्यंत निधी दिला जातो. याशिवाय व्यवस्थापन खर्चापोटी १ लाखापर्यंत २५%, १० लाखापर्यंत ३५%, ५० लाखापर्यंत ४५% आणि त्यापुढे ६५% निधी दिला जातो.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.