Monday, November 23, 2015

ट्रॅक्टर व्यवस्थित तर शेती व्यवस्थित आणि शेती व्यवस्थित तर शेतकरी व्यवस्थित....

माझीशेती : ट्रॅक्टर काळजी (151123)
(पुढील शृंखला -  मिरची)

ट्रॅक्टर व्यवस्थित तर शेती व्यवस्थित आणि शेती व्यवस्थित तर शेतकरी व्यवस्थित....

प्रा. डी. डी. टेकाळे
स्रोत - ऍग्रोवन

** दैनंदिन वापरातील ट्रॅक्‍टरची निगा घेण्यात होणाऱ्या चुका -
- इंजिन ऑइल, रेडिएटरमधील पाणी, इंजिनाच्या टाकीतील तेल आणि एअर क्‍लिनरमधील तेल यांची पूर्तता न करणे.
- ट्रॅक्‍टरला ग्रीस करताना एखादी जागा हुकने.
- बॅटरीतील पाण्याची लेव्हल न करणे.
- सर्व नट-बोल्ट टाईट न करणे.
- दररोज ट्रॅक्‍टर सुरू करण्याआधी लिकेज तपासणी न करणे.
- टायरमध्ये हवेचा दाब कमी असणे.

** ट्रॅक्‍टर वापरात नसताना निगा घेण्यात होणाऱ्या चुका -
- निगा राखण्यासाठी नेहमीची वंगणाची पूर्तता करून न ठेवणे.
- टायरमध्ये हवा भरून न ठेवणे अगर जॅक किंवा ठोकळे न लावणे.
- रेडिएटरमधील पाणी काढून न ठेवणे.
- बॅटरी ट्रॅक्‍टरला जोडून ठेवणे.

** ट्रॅक्‍टरचा अपघात होण्याची कारणे -
- बेजबाबदारपणे ट्रॅक्‍टरचा वापर केल्यास होणाऱ्या सामान्य चुका अपघातास कारणीभूत ठरतात.
- ड्रायव्हर शिवाय इंजिन चालू करणे.
- ट्रॅक्‍टर सुरू असताना त्यावर चढण्याचा अगर उतरण्याचा प्रयत्न करणे.
- ट्रॅक्‍टरजवळ धूम्रपान करणे.
- मशाल किंवा मेणबत्ती जवळ नेऊन बॅटरीतील पाण्याची पातळी पाहणे.
- ट्रॅक्‍टरचे इंजिन चालू असताना ट्रॅक्‍टरखाली काम करणे.
- इंजिन फारच गरम असताना रेडिएटरचे झाकण उघडणे.
- ट्रॅक्‍टर शेडच्या किंवा गॅरेजच्या बाहेर काढत असताना ट्रॅक्‍टर व ट्रॉलीच्या जवळपास लहान मुले किंवा इतर कोणी नाही याची खात्री न करणे किंवा हॉर्न न देणे.

** अवजारे जोडताना आणि वापरताना होणाऱ्या चुका -
- ट्रॅक्‍टरच्या मागे जोडली जाणारी अवजारे ट्रॅक्टरच्या क्षमतेनुसार योग्य जोडावीत.
- ट्रॅक्‍टरमागचे अवजार उचलून वाहून नेताना त्यावर वजनाला जड वस्तू ठेवून वाहून नेऊ नये त्यामुळे ट्रॅक्‍टरच्या हायड्रॉलिक यंत्रणेवर ताण पडतो व ती निकामी होण्याचा संभव असतो.
- ट्रॅक्‍टरची शेतात वापरली जाणारी औजारे वळण आल्यावर उचलावे ते न उचलता वळण घेऊ नये.
- काही वजनी अवजाराकडून काम करायचे असल्यास पुढच्या चाकावर आवश्‍यक तेवढीच वजने लावावीत.
- मळणी यंत्र, चाफकटर, पंप यासारखी यंत्रे चालवताना ट्रॅक्‍टर समपातळीत उभा करावा. ट्रॅक्‍टरचे दोन्ही ब्रेक लावलेले असावेत.

** ट्रॅक्‍टर चालविताना होणाऱ्या संभाव्य चुका -
- ट्रॅक्‍टरची साधारण माहिती असणे, तो मागे-पुढे चालविणे आणि गिअर बदलता येणे म्हणजे ट्रॅक्‍टर चालविता येतोच असे नाही. हे तज्ञाचे काम आहे.
- कामाचा प्रकार पाहून ट्रॅक्‍टरच्या गिअरचा वापर करावा. तिसऱ्या गिअरमध्ये ट्रॅक्‍टर चालविल्यास ट्रॅक्‍टरचे नुकसान होते. जड कामासाठी किंवा ज्या कामासाठी जास्त शक्तीची आवश्‍यकता असते तेथे ट्रॅक्‍टर कमी वेगात चालवावा.
- रस्त्याच्या चढणीवर किंवा उतरणीवर नेहमी (low) लो गिअर निवडावा. तसे न केल्यास अनुक्रमे ट्रॅक्‍टर शक्ती मर्यादेवर व ट्रॅक्‍टरच्या भागांवर अनिश्‍चित ताण पडतो.
- खाचखळग्यांच्या रस्त्यावर वेगात ट्रॅक्‍टर चालवू नये. अशा वेळी ट्रॅक्‍टर कमी वेगात चालविल्यास यंत्रास कमी धक्के बसतात. ट्रॅक्‍टरचे पार्ट ढिले होत नाहीत. चालकास जास्त त्रास होत नाही.
- मागचे एखादे चाक जागेवरच फिरते त्या वेळी डिफरन्शल लॉकचा वापर केला जातो. पण ही अडचण दूर झाल्यावर त्याचा आपणास उपयोग नसतो. पण बऱ्याच वेळा डिफरन्शल लॉकचे लिव्हर सरकवण्याचे विसरून आपण ट्रॅक्‍टरला वळविण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी ट्रॅक्‍टरमधील गियरचे नुकसान होते.

** अज्ञानामुळे होणाऱ्या चुका -
1) ट्रॅक्‍टरच्या फॅन बेल्टचा ताण, बॅटरीचे कनेक्‍शन, इंजिन ऑइल बदलणे, फिल्टर स्वच्छ करणे, फिल्टर बदलणे, सायलेन्सर साफ करणे वगैरे विषयीचे बेसिक ज्ञान असावे लागते.
2) नोझलच्या दाबाची व इंजेक्‍टरची तपासणी व्हॉल्व्ह स्प्रिंग आणि टायपेटचे अंतर पाहणे, मागील चाकातील बेअरिंग स्वच्छ करणे, मेन बेअरिंग व कनेक्‍टिंग रॉड बेअरिंग बदलणे ही कामे तज्ञ मेकॅनिककडून करून घ्यावीत.
3) ट्रॅक्‍टरव्दारे व्यवस्थीत काम होण्यासाठी वेळच्यावेळी ट्रॅक्‍टर मेकॅनिककडून तपासून घ्यावा.

(जास्तीत जास्त शेतकरी या चळवळीत सामावून घ्या. त्यांच्या मोबाईल वरुन खालील प्रमाणे whats app मेसेज करायला सांगा)

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान :
चळवळ - नाविन्यपुर्ण शेतीची
-----------------------------------
** शेतीच्या बातम्या व इतर अपडेट्स करिता <नाव_गट नं_संपुर्ण पत्ता_जिल्हा_राज्य_मोबाईल नंबर> आम्हाला 09975740444 या नं.वर कळवा.
-----------------------------------
६४७, दसरा चौक, सावळज, जि. सांगली (४१६३११) महाराष्ट्र
www.mazisheti.org
www.fb.com/agriindia
Whatsapp - 9975740444

Thursday, November 19, 2015

कांदा लागवड

जमीन 
मध्यम ते साधारण कसदार व पाण्याचा निचरा होणारी जमीन कांद्याला चांगली मानवते. मध्यम प्रतीच्या रेतीमिश्रित जमिनीत कांदा चांगला पोसतो. मुळाभोवती भरपूर ओलावा राखून कांद्याच्या संपूर्ण वाढीला वाव देणारी भुसभुशीत जमीन कांद्यासाठी उपयोगी असते. जमिनीचा पी.एच. (सामू) 6.5 ते 7.5 असल्यास कांदा चांगला वाढतो. भारी चिकण मातीच्या जमिनीत कांद्याची वाढ होत नाही.


लागवडीची वेळ 
रोपवाटिका तयार करणे 
बियाण्याची उगवणशक्ती चांगली असल्यास हेक्‍टरी आठ किलो बियाणे पुरेसे होते. पेरणीपूर्वी बियाण्याला शिफारशीत ताम्रयुक्त बुरशीनाशक दोन ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे चोळून घ्यावे. रोपवाटिकेत तणांचा आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी रोपवाटिकेची जागा नांगरून, भिजवून, पॉलिथिन कागदाने 10-12 दिवस झाकून निर्जंतुक करून घ्यावी. दर 100 चौ.मी.ला 25 ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हीरीडी बुरशीचे मिश्रण 1250 ग्रॅम कुजलेल्या शेणखतात मिसळून रोपवाटिकेच्या जागेत मिसळावे. जमीन चांगली भुसभुशीत करून त्यात शेणखत व नत्रयुक्त खत चांगल्याप्रकारे मिसळावे. एक हेक्‍टर लागवडीसाठी अंदाजे 10 आर क्षेत्रावर रोपवाटिका करावी. बियाणे पेरणीपूर्वी रोपवाटिकेत पाच गाड्या कुजलेले शेणखत, अडीच किलो नत्र आणि पाच किलो स्फुरद द्यावे. पेरणीसाठी 3 मी. x 1 मी. आकाराचे गादी वाफे करावेत. पेरणी करताना ओळीमध्ये पाच सें.मी. अंतर ठेवून दोन सें.मी. खोलीवर करावी. बियाणे फार दाट पेरू नये म्हणजे रोपांची वाढ सारखी होऊन रोपवाटिकेची देखभाल सुलभतेने करता येते. रोपवाटिकेमध्ये मर आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही याकडे लक्ष द्यावे. तीन आठवड्यांनी 2.5 किलो नत्र द्यावे. पुनर्लागवडीच्या आधी आठ दिवस हळूहळू पाणी तोडावे म्हणजे रोप काटक बनते, पुनर्लागवडीत टिकाव धरते. रोपे उपटताना मुळे तुटणार नाहीत याची काळजी घ्यावी. रोप उपटण्यापूर्वी 24 तास आधी वाफ्यांना चांगले पाणी द्यावे.


लागवडीचे तंत्र - 
नांगरणी व कुळवणी करून जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी. शेत तयार करताना चांगले कुजलेले शेणखत हेक्‍टरी 20 टन याप्रमाणे शेतात मिसळावे. कांद्याची लागवड सपाट वाफ्यात किंवा सरी-वरंब्यावर करता येते.

साधारणतः दोन मीटर रुंद व तीन मीटर लांब आकाराचे वाफे सोईस्कर असतात. 
पुनर्लागवडीसाठी रोपवाटिकेतून जोमदार, सारख्या वाढीची निरोगी रोपे निवडून घ्यावीत. रोप लागवडीपूर्वी त्याची मुळे पाच मिनिटे ऍझोटोबॅक्‍टरच्या द्रावणात (पाच लिटर पाणी + 250 ग्रॅम जिवाणू खत) बुडवावीत, त्याचा रोपवाढीवर आणि कांद्याच्या उत्पादनावर चांगला परिणाम दिसून येतो. रब्बी व उन्हाळी हंगामासाठी 12 x 7.5 सें.मी. अंतरावर दोन ते तीन सें.मी. खोलीवर ओळीत प्रत्येक ठिकाणी एक रोप लावावे. पुनर्लागवडीनंतर त्वरित हलके पाणी द्यावे. सरी पद्धतीने लागवड करताना दोन सऱ्यांमधील अंतर 30 ते 45 सें.मी. ठेवून सरीच्या दोन्ही बाजूंस लागवड करावी. वाफ्यांमध्ये पाणी साचून राहिल्यास कांद्याच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. लागवडीपूर्वी रोपांची मुळे कार्बेन्डाझिमच्या द्रावणात बुडवावीत. हे द्रावण तयार करण्यासाठी एक ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाण्यात मिसळावे.


खत व्यवस्थापन 
माती परीक्षणानुसार कांदा पिकाला रासायनिक खते द्यावीत. कांद्याचे पीक सेंद्रिय खते व नत्रयुक्त खते यांना चांगला प्रतिसाद देते. जमिनीच्या पूर्वमशागतीच्या वेळी हेक्‍टरी 20 टन शेणखत, कंपोस्ट द्यावे; तसेच हेक्‍टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश या प्रमाणात रासायनिक खते द्यावीत. संपूर्ण स्फुरद व पालाश आणि निम्मे नत्र लावणीच्या वेळी आणि राहिलेले नत्र दोन समान हप्त्यांत द्यावे. पहिला हप्ता लागवडीनंतर दीड ते दोन महिन्यांच्या आत द्यावा. खतमात्रा उशिरा (पातीच्या वाढीच्या काळात) दिल्यास पातीची जोमदार वाढ होऊन कांदे नीट पोसत नाहीत, जाड मानेचे होतात, तसेच त्यात जोडकांद्याचे प्रमाण अधिक वाढते. हे कांदे साठवणुकीसाठी निरुपयोगी असतात.


सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर - 
1) पिकाच्या निरोगी वाढीसाठी तांबे, झिंक, बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये लागतात, त्यामुळे कांद्याची प्रत सुधारते आणि असे कांदे साठवणीत चांगल्या स्थितीत टिकून राहतात. माती परीक्षणानुसार हेक्‍टरी 125 ते 155 किलो कॉपर सल्फेट लागवडीच्यावेळी मिसळल्यास कांदे घट्ट होतात, त्यांचा रंग आकर्षक व चमकदार दिसतो. उत्पादनवाढीस मदत होते. 
2) बोरॉनच्या कमतरतेमुळे रोपांची वाढ खुंटते व पातीचा रंग करडा- निळसर पडतो, कांद्याची पात कडक आणि ठिसूळ बनते. शिफारशीनुसार बोरॅक्‍सची फवारणी करावी. 
3) झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता पडल्यास पाने जाड होणे, खालच्या अंगाने वाकणे ही लक्षणे दिसतात. दोन मि.लि. झिंक सल्फेट प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास यावर नियंत्रण मिळते. सेंद्रिय खतांचा (शेणखत, लेंडीखत) चांगला पुरवठा असल्यास सर्वसाधारण जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासत नाही.


पीक व्यवस्थापन -
कांद्याच्या पिकाला नियमित पाणीपुरवठा महत्त्वाचा असतो. कांद्याची मुळे जमिनीच्या वरच्या थरात म्हणजे बहुतेक आठ सें.मी. खोलीपर्यंत पसरलेली असतात. यामुळे पिकाला पाणी देताना 15 सें.मी.पेक्षा जास्त खोलवर जाईल असे पाणी देण्याची गरज नाही. कांदा पोसायला लागल्यावर पाण्याचा ताण देऊ नये, कारण या काळात पाण्याचा खंड पडल्यास पाणी पुन्हा सुरू केल्यावर वाढीला लागलेल्या कांद्यात जोडकांद्याचे प्रमाण वाढते. तसेच, कांद्याच्या वरच्या पापुद्य्राला तडा जातो. लागवडीनंतर कांद्याला लगेच पाणी द्यावे. त्यानंतर 12 ते 15 दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. नंतर जमिनीचा मगदूर आणि हवामान लक्षात घेऊन 10 ते 12 दिवसांनी पाणी द्यावे. कांद्याला तुषार सिंचन व ठिबक सिंचन पद्धतीनेही पाणी देता येते. 
लागवडीनंतर खुरपणी व निंदणी करून तण काढून टाकावे. पहिली खुरपणी एक ते दीड महिन्याने आणि दुसरी त्यानंतर एक महिन्याने करावी. खुरपणीच्या वेळी वरखताचा हप्ता द्यावा आणि लगेच पाणी द्यावे.


कांदावरील महत्वाचे रोग व त्यांचे नियंत्रण
तपकिरी करपा-
◆ हा बुरशीजन्य रोग असून, प्रादुर्भाव झाल्यानंतर पानांवर पिवळसर, तपकिरी रंगाचे लांबट चट्टे बाहेरच्या बाजूला दिसतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पाने सुकतात.
◆ फुलांचे दांडे मऊ होऊन वाळून    मोडतात.
नियंत्रण-
◆ दर १० ते १५ दिवसांच्या अंतराने ०.२% कार्बेण्डझिमची फवारणी करावी किंवा ३ ग्रॅम मॅकॉझेब प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्रावणात सर्फेक्टटचा वापर करावा.

जांभळा करपा-
◆ हा बुरशीजन्य रोग पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत येतो. पानावर सुरुवातीस खोलगट, लांबट पांढुरके चट्टे पडतात. चट्ट्यांचा मधला भाग सुरुवातीस जांभळट व नंतर काळपट होतो.
◆ चट्टे पान किंवा फुलांच्या दांड्यावर दिसतात. चट्टे वाढून एकमेकात मिसळून पाने करपून वळतात.
नियंत्रण-
◆ ३० ग्रॅम मॅकोझेब किंवा २० ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा २० ग्रॅम क्लोरोथलोनील प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने आलटून-पालटून फवारणी करावी. द्रावणात सर्फेक्टटचा वापर करावा.

Sunday, November 15, 2015

माझीशेती : उत्तम व्यावसायिक शेतकरी व्हायचे आहे???

माझीशेती : उत्तम व्यावसायिक शेतकरी व्हायचे आहे???

मग हे करा.
१)  सर्वांचे ऐकायला शिका.
२)  अनुभवाची शेती करायला शिका.
३)  उत्पादन खर्च कमी करा.
४)  इतरांचे अनुभव वापरताना शास्त्राचा आधार घ्या.
५)  यशस्वी शेतकऱ्यांच्या संपर्कात रहा.
६) चांगले व यशस्वी विचार देवान-घेवाणीसाठी किमान 7 दिवसातून एकदा एकत्र येवून चर्चा करा.
७) जिथे शंका वाटेल तिथे सल्ला मसलत करा.
८) "शेजाऱ्याने केले म्हणून" ही प्रथा बंद करा.
९) उपलब्ध संसाधने ओळखून त्यांचा पुरेपूर वापर करा.
१०) पुढील 8 दिवसांचे आणि हंगामाचे स्वतंत्र नियोजन बनवा.
११) शक्य तिथे आंतरपीके किंवा लाखी बागेचे प्रयोग करा.

यासाठी संस्थेकडून स्वतंत्र कार्यशाळा घेतली जाते. आपले मागणीनुसार आणि गरजेनुसार तुमच्यासाठी कार्यशाळेचे नियोजन केले जाते. अधिक माहितीसाठी ९९७५७४०४४४ (MAHESHJI BORGE) यांचेशी संपर्क करा.

(जास्तीत जास्त शेतकरी या चळवळीत सामावून घ्या. त्यांच्या मोबाईल वरुन खालील प्रमाणे whats app मेसेज करायला सांगा)

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान :
चळवळ - नाविन्यपुर्ण शेतीची
-----------------------------------
** शेतीच्या बातम्या व इतर अपडेट्स करिता <नाव_गट नं_संपुर्ण पत्ता_जिल्हा_राज्य_मोबाईल नंबर> आम्हाला 09975740444 या नं.वर कळवा.
-----------------------------------
६४७, दसरा चौक, सावळज, जि. सांगली (४१६३११) महाराष्ट्र
www.mazisheti.org
www.fb.com/agriindia
Whatsapp - 9975740444

Sunday, October 25, 2015

राज्यात भागिदारी तत्वावर आठ कृषी प्रकल्प होणार...

राज्यात भागिदारी तत्वावर आठ कृषी प्रकल्प  होणार... (20151025)
सौजन्य - आरएमएल

राज्यात शेतकरी, शासन आणि खासगी कंपन्यांच्या भागिदारीतून आठ प्रकल्पांचे आराखडे तयार करण्यात शासनाला यश आले आहे. या प्रकल्पांना एकूण साडे अठरा कोटी रुपयांचे सरकारी अनुदान मिळत आहे.

कृषी विभागाच्या सूत्रांनी ‘आरएमएल’शी बोलतांना ही माहिती दिली. या प्रकल्पांमध्ये शेतक-यांकडून 18 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सार्वजनिक आणि खासगी भागिदारी तत्वावर या प्रकल्पांची उभारणी केली जाईल.

मुख्य म्हणजे राज्यातील एक लाख 40 हजार शेतक-यांचा 3 लाख 28 हजार टन शेतमाल खरेदी करण्यासाठी या प्रकल्पांची आखणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शेतमालाचे उत्पादन ते विक्री व्यवस्था अशी संपूर्ण साखळी या प्रकल्पांमधून हाताळण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. हिरवा वाटाणा, मधुमका,भाजीपाला,गुळ,कापूस,कडधान्य आणि सोयबीन अशा पिकांसाठी सदर प्रकल्प तयार होत आहेत.

या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिका-यांच्या मार्गदर्शनासाठी संबंधित जिल्ह्यांमध्ये समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.

बुलढाणा,अहमदनगरमध्ये हिरवा वाटाणा प्रक्रिया प्रकल्प उभे करण्यासाठी त्रिमूर्ती फुडटेक प्रा.लि आणि एडव्हान्ट लिमिटेड कंपनी पुढे आली आहे. याच कंपन्या अहमदनगर आणि औरंगाबादला मधुमका प्रकल्प उभारणार आहेत.

आकाश एग्रो सोल्युशन प्रा.लि. ही कंपनी जालना,औरंगाबाद, जळगावमध्ये भाजीपाला प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे. श्रीकांत एग्रो इंडस्ट्रिज लिमिटेड कंपनी व ग्लोबल एपेक्स एक्झिम  कंपनी सातारा, सांगलीत गुळ प्रकल्प उभारत आहे.

यवतमाळच्या कापूस प्रकल्पात एफएफपीआरओ व दयाल कॉटन लिमिटेड कंपनी सहभागी होत आहे. अकोल्याच्या कापूस यांत्रिकीकरण प्रकल्पात जॉन डिअर कंपनीने देखील प्रस्ताव दिला आहे. उस्मानाबाद, लातूर, बीडसाठी कडधान्य प्रकल्पाकरीता रॅलीज इंडिया कंपनी पुढे आली आहे. 

सोयबीन प्रकल्पासाठी उस्मानाबाद,लातूर, बीड,बुलढाणा,अकोला, वाशीम,अमरावती तसेच नागपूरची निवड झाली आहे. एडीएम एग्रो इंडस्ट्रिज लिमिटेड कंपनीमार्फत सोयबीन प्रकल्प तयार होतील.

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान :
चळवळ - नाविन्यपुर्ण शेतीची
-----------------------------------
** शेतीच्या बातम्या व इतर अपडेट्स करिता <नाव_गट नं_संपुर्ण पत्ता_जिल्हा_राज्य_मोबाईल नंबर> आम्हाला 09975740444 या नं.वर कळवा.
-----------------------------------
विभागीय कार्यालय - सांगली, रायगड, औरंगाबाद, अकोला, नाशिक, चंद्रपुर
६४७, दसरा चौक, सावळज, जि. सांगली (४१६३११) महाराष्ट्र
www.mazisheti.org
www.fb.com/agriindia
Whatsapp - 9975740444

Monday, October 5, 2015

लसुनघास लागवड

लसुनघास लागवड  (भाग १) (151005)
इरफ़ान शेख,केज,बीड

सध्या व यापुढिल काळात चारा हा शेतीतिल जोड़ व्यवसायची दिशा ठरवनारा घटक आहे. पानी असल्यास किमान थोड़े तरी लसुनघास लागवड अवश्य करा.

*सदाहरित चाऱ्याचे पीक म्हणून लसूणघास ओळखला जातो.
*खत तसेच पाण्याचा नियोजनबद्ध वेळच्या वेळी वापर करून बाराही महिने ह्या पिकापासून भरपूर व सतेज हिरवागार चार उपलब्ध होतो. त्यामुळे वर्षभर दुभत्या जनावरांसाठी लसूणघास म्हणजे नेहमीच हिरव्यागार चाऱ्याची मेजवाणीच ठरते.
* लसूण घासामध्ये प्रथिनांचे प्रमाण १७ ते २०% असते. त्याचबरोबर भरपूर क्रूड प्रोटिन्स, मिनरल्स, व्हिटॅमीन 'ए' आणि व्हिटॅमीन 'डी' इ. घटक या चार्‍यामध्ये सामावलेले असतात. (Aamchya pagela like kara www.fb.com/agriindia) म्हणून लसूणघासास 'चारा पिकांचा राजा' असे संबोधले जाते. घासामध्ये डायजेस्टेबल क्रूड प्रोटिनचे प्रमाण . १८.५%, तसेच सी.एक. २५.५%ई. विविध घटकांची टक्केवारी आढळून येते.
*लसूण घासाची उपयुक्तता विविध अंगी पहावयास मिळते. कारण त्याचा हिरवा चारा म्हणून वर्षभर (aamacha whats app no.9975740444)  पुरवठा होऊ शकतो. त्याचप्रमाणे वाळलेल्या अवस्थेतील अवशेषसुद्धा जनावरांना उपयुक्त ठरतात. *लसूणघासाचे पीक हे जमिनीची सुपिकता वाढविण्याचेही काम करते.
*फवारनी
१) लसुन घास वाढीच्या काळात बोरोनच्या कमतरते मुळे पिवळे डाग दिसतात हे कमी करण्यासाठी बोरैक्स ०•२% (२० ग्रॅम प्रति १० लीटर पानी) स्प्रे घ्या.
२) याशिवाय रस्ट व पिवळे डाग हे बुरशिजन्य रोग नुकसान करू शकतात त्यांच्या नियंत्रणासाठी डायथेन M-४५ चा वापर उपयुक्त ठरतो.
* नियमित खतां व्यतिरिक्त सल्फर व झिंक प्रत्येकी ८ किलो आणि मोलिब्डेनम १ किलो प्रति एकर वापरल्यास नत्र स्थिरीकरण अधिक होते.

(क्रमश:)...

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान :
चळवळ - नाविन्यपुर्ण शेतीची
-----------------------------------
** शेतीच्या बातम्या व इतर अपडेट्स करिता <नाव_गट नं_संपुर्ण पत्ता_जिल्हा_राज्य_मोबाईल नंबर> आम्हाला 09975740444 या नं.वर कळवा.
------------------------------------------
विभागीय कार्यालय - सांगली, रायगड, औरंगाबाद, अकोला, नाशिक, चंद्रपुर
६४७, दसरा चौक, सावळज, जि. सांगली (४१६३११) महाराष्ट्र
www.mazisheti.org
www.fb.com/agriindia
Whatsapp - 9975740444

Wednesday, September 30, 2015

लसुन लागवड

हवामान
  • रब्बी हंगामातील पिक असून लसूण वाढीच्या काळात थंड आणि किंचित दमट हवामान, तर गड्डा परिपक्व होताना काढणीच्या काळात कोरडे हवामान हवे असते. 
  • गड्ड्याची वाढ सुरू होण्यापूर्वी पानांची संख्या भरपूर असली आणि त्यांची वाढ चांगली झाली तरच अधिक उत्पादनाची हमी असते. 
  • ऑक्टोबर मध्ये लागण केल्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या काळात रात्रीचे कमी तापमान झाडांच्या वाढीस पोषक ठरते.
  • फेब्रुवारी, मार्च या काळात रात्री तापमान कमीच राहते; परंतु दिवसाच्या तापमानात वाढ होते. 
  • हवेतील आर्द्रता कमी होते आणि गड्डा पोसू लागतो.
  • एप्रिल महिन्यात तापमान आणखी वाढते. या काळात गड्डे काढणीस येतात. 
जमीन
  • भुसभुशीत आणि कसदार लागते.
  • मध्यम काळ्या जमिनीत सेंद्रिय खतांचा पुरवठा चांगला असल्यास उत्पादन चांगले मिळते.
  • भारी काळ्या किंवा चोपण जमिनीत गड्ड्यांची वाढ चांगली होत नाही.
  • पाण्याचा चांगला निचरा न होणाऱ्या जमिनी टाळाव्यात. 
पूर्व मशागत
  • खोल नांगरट करून दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या द्याव्यात.
  • हरळी, लव्हाळ्याच्या गाठी किंवा पूर्वपिकाची धसकटे वेचून घ्यावीत. 
  • एकरी ४ ते ६ टन शेणखत शेवटच्या कुळवणीद्वारे जमिनीत मिसळून द्यावे.
  • लागवडीसाठी २ x ४ किंवा ३ x ४ मीटर अंतराचे वाफे करावेत.
  • जमीन सपाट असेल तर दीड ते दोन मीटर रुंदीचे आणि १० ते १२ मीटर लांबीचे सरे करता येतात.
  • लसूण पाकळ्या टोकण करून लावाव्या लागतात.
  • निवडलेल्या पाकळ्या सपाट वाफ्यात १५ x १० सें.मी. अंतरावर व दोन सें.मी. खोलीवर लावाव्यात.
  • रुंदीशी समांतर वाफ्यात दर १५ सें.मी. अंतरावर खुरप्याने रेषा पाडून त्यात १० सें.मी. अंतरावर पाकळ्या उभ्या ठेवाव्यात व नंतर मातीने झाकून घ्याव्यात.
बिजप्रक्रिया
लागवडीपूर्वी पाकळ्या कार्बेन्डाझिम व कार्बोसल्फानच्या द्रावणात दोन तास बुडवून लागवड करावी. दहा लिटर पाण्यात २० मि.लि. कार्बोसल्फान व २५ ग्रॅम कार्बेन्डाझिम मिसळून द्रावण तयार करावे.

जाती
वाण
विशेषता
वाण
विशेषता
भीमा ओंकार
कंद मध्यम आकाराचे, घट्ट आणि पांढरे 
एका कंदात १८ ते २० पाकळ्या असतात 
लागवडीपासून १२० ते १३५ दिवसांत पीक तयार होते 
५.५ टन प्रति एकर उत्पादन मिळू शकते 
भीमा पर्पल
कंद मध्यम आकाराचे, घट्ट व जांभळे 
एका गड्ड्यात १६ ते २० पाकळ्या 
लागवडीपासून १३५ ते १५० दिवसांत पीक तयार होते 
६.५ टन प्रति एकर पर्यंत उत्पादन मिळू शकते.
साधा लसूण
या लसणाच्या पाकळ्या बारीक असून साल पांढरट असते. निघायला किचकट, अर्क व वास गावराण लसणापेक्षा कमी असून एका गड्ड्याचे वजन १५ ग्रॅमपर्यंत असते. या लसणाच्या पाकळ्या जास्त निघतात.
यमुना सफेद लसूण(जी २८२)
गड्डा घट्ट, पांढरा १ ते ६ पाकळ्यांचा असून ५.६ सेंमी जाड व ५.५ ते ६ सेंमी उंचीचा असतो. १४० ते १५० दिवसात काढणीला येतो. एकरी ७० ते ८० क्विंटल उत्पादन मिळते. 
गुजरात (जुनागढ) लसूण
हा लसूण अतिशय मोठ्या पाकळीचा साधारण १ किलोत १५ ते २० लसूण कांड्या बसतात. या लसणास स्वाद कमी व अर्क कमी असतो. परंतु अधिक उत्पन्न व दिसण्यास आकर्षक असल्याने प्रक्रिया उद्योजक, हॉटेल व्यावसायिक व्यवसायिक, मसाले उत्पादक निर्यातदार हा लसूण अधिक पसंत करतात, हा लसूण निवडायला सोपा असून टरफल मोठे असते.
गावराण लसूण
डेरेदार, आकर्षक व रंग पांढरा मिश्रीत फिक्कट जांभळा असतो. घट्ट असून मर कमी असते. कवच जाड, कुडी मोठी डेरेदार व सोलण्याच्या जागी विशिष्ट प्रकारची ठेवण असलेला व सोलायला सोपा असतो. आतल्या कुडीच्या वरही मध्यम जाड, चमकदार असतो. हा लसूण सोलताना नाकात झिणझिण्या आणणारा वास येतो व यात अर्क जास्त असतो. या लसणास स्वाद चांगल असून आयुर्वेद मुल्य अधिक आहे. हा लसूण खानदेश, मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये प्रसिद्ध आहे.
अॅग्रीफाउंड व्हाईट लसूण (जी ४१)
लागवडीपासून १२० ते १३५ दिवसात काढणीस येतो. गड्डा मध्यम ते मोठा साधारण जाडी ४ ते ४.५ सेंमी व उंची ४.५ सेंमी असते. गड्ड्यामध्ये १३ ते १८ पाकळ्या असून रंग पांढरा असतो. स्वाद मध्यम तिखट असून सरासरी एकरी ५० ते ६० क्विंटल उत्पादन मिळते.
श्वेता लसूण
गड्डा पांढरा शुभ्र, ५.२ सेंमी जाड व ५ सेंमी उंचीचा असतो. गड्ड्यात २२ ते ३३ पाकळ्या असतात. १३० ते १३५ दिवसात काढणीस तयार होऊन एकरी ४० क्विंटल उत्पादन मिळते.
गोदावरी लसूण
गड्डा मध्यम, जांभळट पांढरा असतो. गड्ड्यामध्ये २० -२५ पाकळ्या असतात. गड्डा ४.३५ सेंमी जाड व ४.३ सेंमी उंचीचा असतो. १४० ते १४५ दिवसात काढणीस तयार होऊन एकरी ४० ते ४५ क्विंटल उत्पादन मिळते.



खत व्यवस्थापन
  • लसुन पिकाला एकरी ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद व २० किलो पालाश लागते. लागवडीपूर्वी ५० टक्के नत्र व संपूर्ण पालाश व स्फुरद द्यावे. नत्राची राहिलेली मात्रा दोन हप्त्यांत विभागून द्यावी.
  • पहिली मात्रा लागवडीनंतर ३० दिवसांनी, तर दुसरी मात्रा ४५ ते ५० दिवसांनी द्यावी.
  • सुपर फॉस्फेट किंवा अमोनिअम सल्फेटचा वापर केल्यास आवश्‍यक गंधकाची मात्रा पिकास मिळू शकते, अन्यथा २५ किलो गंधक देण्यासाठी दाणेदार गंधकाचा वापर करावा.
  • पाकळ्यांची लागवड झाल्यानंतर कोरड्या वाफ्यात, पाटात आणि वरंब्यावर तणनाशक फवारावे, त्यासाठी १५ मि.लि. ऑक्‍सिफ्लोरफेन किंवा २५ मि.लि. पेंडीमिथॅलीन प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून वापर करावा.
  • तणनाशकाच्या वापरानंतर लगेच पाणी द्यावे किंवा लागवड करून पाणी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तणनाशक वापरले तरी चालते.
  • लागवडीसोबत तणनाशकाचा वापर केल्यामुळे जवळपास ३० ते ४० दिवस गवत उगवत नाही, त्यानंतर हलकी खुरपणी करणे आवश्‍यक असते. खोल नांगरट करून हरळीच्या काशा किंवा लव्हाळ्याच्या गाठी वेचणे हाच पर्याय वापरावा.
पाणी व्यवस्थापन
  • प्रकिया युक्त लसुन पाकळ्या कोरड्यात लावल्यानंतर लगेच पाणी द्यावे. उगवण झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. 
  • सूक्ष्म सिंचनासाठी १२० सें.मी. रुंदीचे, ४० ते ६० मीटर लांबीचे व १५ सें.मी. उंचीचे गादी वाफे ट्रॅक्‍टरला जोडता येणाऱ्या सरी यंत्राने तयार करावेत.
  • सरी यंत्राच्या फाळाची दोन टोके १६५ सें.मी. अंतरावर कायम करून ट्रॅक्‍टर चालविला, तर १२० सें.मी. रुंदीचा गादी वाफा तयार होतो.
  • वाफ्याच्या दोन्ही कडेला ४५ सें.मी. रुंदीच्या दोन सऱ्या तयार होतात. या जागेचा उपयोग फवारणी करणे, गवत काढणे, पिकांचे निरीक्षण करणे इत्यादी कामांसाठी होतो. 
रोग व किडींचे नियंत्रण
तपकिरी करपा
जांभळा करपा
पानांवर पिवळसरतपकिरी रंगाचे लांबट चट्टे पडतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात. पिकांच्या बाल्यावस्थेत हा रोग आल्यास झाडांची वाढ खुंटून गड्डा लहान राहतो व प्रसंगी पूर्ण झाड मरते.
पानांवर सुरवातीला खोलगटलांबटपांढुरके चट्टे पडतात. चट्ट्यांच्या मधला भाग जांभळा व नंतर काळपट होतो. असे अनेक चट्टे एकमेकांना लागून पडल्यामुळे पाने काळी पडतात व वाळतात.
नियंत्रन
१० ते १५ दिवसांच्या अंतराने २५-३० ग्रॅम मॅंकोझेब किंवा २० ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति दहा लिटर पाण्यात कीडनाशकांसोबत आलटून पालटून फवारावे. फवारणीच्या द्रावणात स्टिकर जरूर वापरावे.

फुलकिडे
लक्षण
नियंत्रन
पूर्ण वाढलेली कीड व त्यांची पिल्ले पानांतून रस शोषून घेतात, त्यामुळे पानांवर पांढरे चट्टे पडतात. पाने वाकडी होऊन वाळतात. या किडीची पिल्ले व प्रौढ दिवसा पानांच्या बेचक्‍यात लपून राहतात व रात्री पानांतून रस शोषतात. 
पाकळ्या उगवून आल्यानंतर एकरी चार किलो फोरेट वाफ्यात वापरावे व पाणी द्यावे; तसेच दर १२ ते १५ दिवसांनी सायपरमेथ्रीन १० मि.लि. प्रति दहा लिटर पाण्यात स्टिकरसह मिसळून फवारावे.

सूत्रकृमी
लक्षण
नियंत्रन
लसणाच्या खोडालगत पेशींमध्ये शिरतात. पेशींचा भाग पोखरतात व तो भाग भुसभुशीत बनतो, सडतो व त्याला वास येतो. खोडाचा भाग सडल्यामुळे झाड सहज उपटून येते व मुळाचा भाग तसाच जमिनीत राहतो.
पिकाची फेरपालट हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. तसेच पिका भोवताली झेंडू लागवड केल्यास प्रादुर्भाव कमी होतो.

अधिक उतपन्नासाठी 
  • लसणाच्या पाकळ्या उभ्या लावाव्यात, त्यामुळे उगवण एकसमान होते. 
  • लागवडीपूर्वी लसणाच्या पाकळ्या कार्बेन्डाझिम व कार्बोसल्फानच्या द्रावणात दोन तास बुडवून लागवड करावी. 
  • तणनाशक फवारल्यानंतर त्याचा संपर्क पाण्याशी एक ते दोन तासांत आला पाहिजे हे लक्षात ठेवावे. 
  • लव्हाळा किंवा हरळीकरिता ग्लायफोसेट तणनाशक वापरू नये. 
  • ठिबक किंवा तुषार सिंचनावर लसणाची वाढ चांगली होते, उत्पादन अधिक येते, पाण्याची बचत होते, तसेच तणांचा व किडींचा उपद्रव कमी होतो.