Showing posts with label स्वयंसेवी संस्था. Show all posts
Showing posts with label स्वयंसेवी संस्था. Show all posts

Saturday, June 17, 2017

Manisha is the leader of rural woman farmers

Everybody knows farmers are very hard worker. Drought area and unpredictable nature is teacher of Mandesh of west maharashtra. how to survive in drought area is the main question in front of farmers. 

Manisha Kharat during cultivation of ancestral farm.
The Manisha Kharat daughter of Bhimrao Kharat from Gatewadi Tal. Man of Satara is widely discussed character for her hard work. usually Bhimrao Kharat goes out of region for grazing goats with his wife. here in home, Manisha living with grandfather, grandmother and other siblings. as a grand daughter manisha has responsibility of entire home in the absence of Bhimrao Kharat.

this year rain start showering good in man regions but Bhimrao Kharat yet not return to home so Manisha decide to cultivate her ancestry farm. Manisha is leader of rural woman farmers. this photo shows that not only Manisha but 90% of rural female force engaged in physical hard work. regular farming activities are done by women's.

Many #CSR activities can run by #NGO #Govt organizations to enhance skills and reduce physical efforts. Many corporates taken initiative by implementing of #CSR activities such as #women's_livelihood, #technology #group_farming to change life of Manisha and other rural women's.

Wednesday, September 30, 2015

लसुन लागवड

हवामान
  • रब्बी हंगामातील पिक असून लसूण वाढीच्या काळात थंड आणि किंचित दमट हवामान, तर गड्डा परिपक्व होताना काढणीच्या काळात कोरडे हवामान हवे असते. 
  • गड्ड्याची वाढ सुरू होण्यापूर्वी पानांची संख्या भरपूर असली आणि त्यांची वाढ चांगली झाली तरच अधिक उत्पादनाची हमी असते. 
  • ऑक्टोबर मध्ये लागण केल्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या काळात रात्रीचे कमी तापमान झाडांच्या वाढीस पोषक ठरते.
  • फेब्रुवारी, मार्च या काळात रात्री तापमान कमीच राहते; परंतु दिवसाच्या तापमानात वाढ होते. 
  • हवेतील आर्द्रता कमी होते आणि गड्डा पोसू लागतो.
  • एप्रिल महिन्यात तापमान आणखी वाढते. या काळात गड्डे काढणीस येतात. 
जमीन
  • भुसभुशीत आणि कसदार लागते.
  • मध्यम काळ्या जमिनीत सेंद्रिय खतांचा पुरवठा चांगला असल्यास उत्पादन चांगले मिळते.
  • भारी काळ्या किंवा चोपण जमिनीत गड्ड्यांची वाढ चांगली होत नाही.
  • पाण्याचा चांगला निचरा न होणाऱ्या जमिनी टाळाव्यात. 
पूर्व मशागत
  • खोल नांगरट करून दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या द्याव्यात.
  • हरळी, लव्हाळ्याच्या गाठी किंवा पूर्वपिकाची धसकटे वेचून घ्यावीत. 
  • एकरी ४ ते ६ टन शेणखत शेवटच्या कुळवणीद्वारे जमिनीत मिसळून द्यावे.
  • लागवडीसाठी २ x ४ किंवा ३ x ४ मीटर अंतराचे वाफे करावेत.
  • जमीन सपाट असेल तर दीड ते दोन मीटर रुंदीचे आणि १० ते १२ मीटर लांबीचे सरे करता येतात.
  • लसूण पाकळ्या टोकण करून लावाव्या लागतात.
  • निवडलेल्या पाकळ्या सपाट वाफ्यात १५ x १० सें.मी. अंतरावर व दोन सें.मी. खोलीवर लावाव्यात.
  • रुंदीशी समांतर वाफ्यात दर १५ सें.मी. अंतरावर खुरप्याने रेषा पाडून त्यात १० सें.मी. अंतरावर पाकळ्या उभ्या ठेवाव्यात व नंतर मातीने झाकून घ्याव्यात.
बिजप्रक्रिया
लागवडीपूर्वी पाकळ्या कार्बेन्डाझिम व कार्बोसल्फानच्या द्रावणात दोन तास बुडवून लागवड करावी. दहा लिटर पाण्यात २० मि.लि. कार्बोसल्फान व २५ ग्रॅम कार्बेन्डाझिम मिसळून द्रावण तयार करावे.

जाती
वाण
विशेषता
वाण
विशेषता
भीमा ओंकार
कंद मध्यम आकाराचे, घट्ट आणि पांढरे 
एका कंदात १८ ते २० पाकळ्या असतात 
लागवडीपासून १२० ते १३५ दिवसांत पीक तयार होते 
५.५ टन प्रति एकर उत्पादन मिळू शकते 
भीमा पर्पल
कंद मध्यम आकाराचे, घट्ट व जांभळे 
एका गड्ड्यात १६ ते २० पाकळ्या 
लागवडीपासून १३५ ते १५० दिवसांत पीक तयार होते 
६.५ टन प्रति एकर पर्यंत उत्पादन मिळू शकते.
साधा लसूण
या लसणाच्या पाकळ्या बारीक असून साल पांढरट असते. निघायला किचकट, अर्क व वास गावराण लसणापेक्षा कमी असून एका गड्ड्याचे वजन १५ ग्रॅमपर्यंत असते. या लसणाच्या पाकळ्या जास्त निघतात.
यमुना सफेद लसूण(जी २८२)
गड्डा घट्ट, पांढरा १ ते ६ पाकळ्यांचा असून ५.६ सेंमी जाड व ५.५ ते ६ सेंमी उंचीचा असतो. १४० ते १५० दिवसात काढणीला येतो. एकरी ७० ते ८० क्विंटल उत्पादन मिळते. 
गुजरात (जुनागढ) लसूण
हा लसूण अतिशय मोठ्या पाकळीचा साधारण १ किलोत १५ ते २० लसूण कांड्या बसतात. या लसणास स्वाद कमी व अर्क कमी असतो. परंतु अधिक उत्पन्न व दिसण्यास आकर्षक असल्याने प्रक्रिया उद्योजक, हॉटेल व्यावसायिक व्यवसायिक, मसाले उत्पादक निर्यातदार हा लसूण अधिक पसंत करतात, हा लसूण निवडायला सोपा असून टरफल मोठे असते.
गावराण लसूण
डेरेदार, आकर्षक व रंग पांढरा मिश्रीत फिक्कट जांभळा असतो. घट्ट असून मर कमी असते. कवच जाड, कुडी मोठी डेरेदार व सोलण्याच्या जागी विशिष्ट प्रकारची ठेवण असलेला व सोलायला सोपा असतो. आतल्या कुडीच्या वरही मध्यम जाड, चमकदार असतो. हा लसूण सोलताना नाकात झिणझिण्या आणणारा वास येतो व यात अर्क जास्त असतो. या लसणास स्वाद चांगल असून आयुर्वेद मुल्य अधिक आहे. हा लसूण खानदेश, मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये प्रसिद्ध आहे.
अॅग्रीफाउंड व्हाईट लसूण (जी ४१)
लागवडीपासून १२० ते १३५ दिवसात काढणीस येतो. गड्डा मध्यम ते मोठा साधारण जाडी ४ ते ४.५ सेंमी व उंची ४.५ सेंमी असते. गड्ड्यामध्ये १३ ते १८ पाकळ्या असून रंग पांढरा असतो. स्वाद मध्यम तिखट असून सरासरी एकरी ५० ते ६० क्विंटल उत्पादन मिळते.
श्वेता लसूण
गड्डा पांढरा शुभ्र, ५.२ सेंमी जाड व ५ सेंमी उंचीचा असतो. गड्ड्यात २२ ते ३३ पाकळ्या असतात. १३० ते १३५ दिवसात काढणीस तयार होऊन एकरी ४० क्विंटल उत्पादन मिळते.
गोदावरी लसूण
गड्डा मध्यम, जांभळट पांढरा असतो. गड्ड्यामध्ये २० -२५ पाकळ्या असतात. गड्डा ४.३५ सेंमी जाड व ४.३ सेंमी उंचीचा असतो. १४० ते १४५ दिवसात काढणीस तयार होऊन एकरी ४० ते ४५ क्विंटल उत्पादन मिळते.



खत व्यवस्थापन
  • लसुन पिकाला एकरी ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद व २० किलो पालाश लागते. लागवडीपूर्वी ५० टक्के नत्र व संपूर्ण पालाश व स्फुरद द्यावे. नत्राची राहिलेली मात्रा दोन हप्त्यांत विभागून द्यावी.
  • पहिली मात्रा लागवडीनंतर ३० दिवसांनी, तर दुसरी मात्रा ४५ ते ५० दिवसांनी द्यावी.
  • सुपर फॉस्फेट किंवा अमोनिअम सल्फेटचा वापर केल्यास आवश्‍यक गंधकाची मात्रा पिकास मिळू शकते, अन्यथा २५ किलो गंधक देण्यासाठी दाणेदार गंधकाचा वापर करावा.
  • पाकळ्यांची लागवड झाल्यानंतर कोरड्या वाफ्यात, पाटात आणि वरंब्यावर तणनाशक फवारावे, त्यासाठी १५ मि.लि. ऑक्‍सिफ्लोरफेन किंवा २५ मि.लि. पेंडीमिथॅलीन प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून वापर करावा.
  • तणनाशकाच्या वापरानंतर लगेच पाणी द्यावे किंवा लागवड करून पाणी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तणनाशक वापरले तरी चालते.
  • लागवडीसोबत तणनाशकाचा वापर केल्यामुळे जवळपास ३० ते ४० दिवस गवत उगवत नाही, त्यानंतर हलकी खुरपणी करणे आवश्‍यक असते. खोल नांगरट करून हरळीच्या काशा किंवा लव्हाळ्याच्या गाठी वेचणे हाच पर्याय वापरावा.
पाणी व्यवस्थापन
  • प्रकिया युक्त लसुन पाकळ्या कोरड्यात लावल्यानंतर लगेच पाणी द्यावे. उगवण झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. 
  • सूक्ष्म सिंचनासाठी १२० सें.मी. रुंदीचे, ४० ते ६० मीटर लांबीचे व १५ सें.मी. उंचीचे गादी वाफे ट्रॅक्‍टरला जोडता येणाऱ्या सरी यंत्राने तयार करावेत.
  • सरी यंत्राच्या फाळाची दोन टोके १६५ सें.मी. अंतरावर कायम करून ट्रॅक्‍टर चालविला, तर १२० सें.मी. रुंदीचा गादी वाफा तयार होतो.
  • वाफ्याच्या दोन्ही कडेला ४५ सें.मी. रुंदीच्या दोन सऱ्या तयार होतात. या जागेचा उपयोग फवारणी करणे, गवत काढणे, पिकांचे निरीक्षण करणे इत्यादी कामांसाठी होतो. 
रोग व किडींचे नियंत्रण
तपकिरी करपा
जांभळा करपा
पानांवर पिवळसरतपकिरी रंगाचे लांबट चट्टे पडतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात. पिकांच्या बाल्यावस्थेत हा रोग आल्यास झाडांची वाढ खुंटून गड्डा लहान राहतो व प्रसंगी पूर्ण झाड मरते.
पानांवर सुरवातीला खोलगटलांबटपांढुरके चट्टे पडतात. चट्ट्यांच्या मधला भाग जांभळा व नंतर काळपट होतो. असे अनेक चट्टे एकमेकांना लागून पडल्यामुळे पाने काळी पडतात व वाळतात.
नियंत्रन
१० ते १५ दिवसांच्या अंतराने २५-३० ग्रॅम मॅंकोझेब किंवा २० ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति दहा लिटर पाण्यात कीडनाशकांसोबत आलटून पालटून फवारावे. फवारणीच्या द्रावणात स्टिकर जरूर वापरावे.

फुलकिडे
लक्षण
नियंत्रन
पूर्ण वाढलेली कीड व त्यांची पिल्ले पानांतून रस शोषून घेतात, त्यामुळे पानांवर पांढरे चट्टे पडतात. पाने वाकडी होऊन वाळतात. या किडीची पिल्ले व प्रौढ दिवसा पानांच्या बेचक्‍यात लपून राहतात व रात्री पानांतून रस शोषतात. 
पाकळ्या उगवून आल्यानंतर एकरी चार किलो फोरेट वाफ्यात वापरावे व पाणी द्यावे; तसेच दर १२ ते १५ दिवसांनी सायपरमेथ्रीन १० मि.लि. प्रति दहा लिटर पाण्यात स्टिकरसह मिसळून फवारावे.

सूत्रकृमी
लक्षण
नियंत्रन
लसणाच्या खोडालगत पेशींमध्ये शिरतात. पेशींचा भाग पोखरतात व तो भाग भुसभुशीत बनतो, सडतो व त्याला वास येतो. खोडाचा भाग सडल्यामुळे झाड सहज उपटून येते व मुळाचा भाग तसाच जमिनीत राहतो.
पिकाची फेरपालट हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. तसेच पिका भोवताली झेंडू लागवड केल्यास प्रादुर्भाव कमी होतो.

अधिक उतपन्नासाठी 
  • लसणाच्या पाकळ्या उभ्या लावाव्यात, त्यामुळे उगवण एकसमान होते. 
  • लागवडीपूर्वी लसणाच्या पाकळ्या कार्बेन्डाझिम व कार्बोसल्फानच्या द्रावणात दोन तास बुडवून लागवड करावी. 
  • तणनाशक फवारल्यानंतर त्याचा संपर्क पाण्याशी एक ते दोन तासांत आला पाहिजे हे लक्षात ठेवावे. 
  • लव्हाळा किंवा हरळीकरिता ग्लायफोसेट तणनाशक वापरू नये. 
  • ठिबक किंवा तुषार सिंचनावर लसणाची वाढ चांगली होते, उत्पादन अधिक येते, पाण्याची बचत होते, तसेच तणांचा व किडींचा उपद्रव कमी होतो.

Monday, January 23, 2012

शेतीमधील संवाद क्रांतीचे जनक माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान, सांगली - एक नजर


श्री.पांडुरंग मारुती मोरे, सावळज
'माझीशेतीच्या' माध्यमातून आधुनिक 
शेती करतात..
(सदर फोटो दर्शक आहेत)
जगातील पहिला प्रकल्प, कोणत्याही मोबदल्याशिवाय भारतीय शेतकर्यांना मोबाईल सेवेमार्फत मार्गदर्शन.... प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात प्रारंभ केलेली ही सेवा सध्या प्रचंड प्रमाणात विस्तारली आहे. ही सेवा सर्व शेतकर्यांच्या मोबाईलवर चालु करता येते. यामध्ये शेतकर्यांच्या मोबाईल क्रमांक संदर्भात प्रचंड गोपनीयता बाळगली जाते. याशिवाय शेतकर्यांना त्यांचे मोबाईलवर मोफत स्थानिक हवामान देनेचीही सोय करनेत आली आहे. त्याकरिता शेतकर्यांना त्यांची माहिती माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या
'माझीशेती' शेतकरी संवाद मंडळ, सावळज
९९७, दसरा चौक, सावळज
सांगली, महाराष्ट्र - ४१६३११
या पत्त्यावर कळवावी लागते. सन २००९ पासुन अविरतपणे ही सेवा चालु आहे. कोणत्याही प्रकारचे पाठबळ नसताना ग्रामीण भागातील तरुणांनी केलेला प्रयोग आज संपुर्ण महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कोणत्याही प्रचार -प्रसिद्धी शिवाय चालु आहे.

श्री. अंबिका महिला बचत गट, वज्रचौन्डे
यांचा  'माझीशेती'च्या माध्यमातून
कडधान्ये व्यवसाय ...
(सदर फोटो दर्शक आहेत)

शासकीय योजनांचा सुकाळ, शेतकर्यांची जात्याच संशोधक वृत्ती, वेगवेगली कृषि विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रियन शेतकरी आपल्या शेतातुन उत्पादन काढीत आहेत पण ब्रिटिश कालापासून व्यापारी अणि शेतकरी जनता यांचेत समन्वय नसल्यामुले आजही शेतकर्यांचे नुकसान होत आहे. या करिता माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या शेतकर्यांना त्यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव आणि व्यापारी, करखानदारयांना चांगल्या प्रतिचे, उच्च दर्जाचे शेतमाल देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. याशिवाय शेतकर्यांना वेगवेगळ्या बाजारपेठेतील अद्यावत माहिती उदा. आवक, प्रति क्विंटल दर इ. ही सेवा मोबाईलवर उपलब्ध करुन दिलेली आहे. 



कृषितद्न्य श्री. शंकरराव निंबालकर
यांचे बागेतिल भाजीपाला...
(सदर फोटो दर्शक आहेत)
  
जागतिक बाजारपेठेत पाश्चात्य देशांनी पिकवलेल्या भाजीपाल्याला जास्त मागणी आहे. भारतातील आणि पाश्चात्य देशातील उत्पादनात काहीही फरक नाही. जो फरक आहे तो उत्पादनासाठी अमलात आनल्या जाणार्या पद्धतिमध्ये. भारतीय शेतिला सेवा पुरवठा करणारे बाहेरच्या देशातुन सेंद्रिय खते, औषधे मागवतात आणि त्यामध्ये पूर्वापर चालत आलेल्या सवयींनुसार प्रमाण वाढवुन आकर्षक आवरण वापरून बाजारात विक्रिला पाठवतात, यामध्ये नुकसान फक्त शेतकर्यांचे होते. यावर उपाय म्हणजे शेतकर्यांनी एकत्र येवून शेतीला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या पडतालुन खात्री करुन मगच वापराव्यात. तसेच बाहेरच्या देशातुन काही जैविके मागवायाची झाल्यास स्वत:  मागवावित. याही बाबतीत माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतकर्यांना मदत मार्गदर्शन केले जाते. एकंदरित सर्व शेतकर्यांनी त्यांची वार्षिक मागणीनुसार आणि गरजेनुसार सर्व एकत्र खरेदी करुन त्याचे वाटप केले जाते. यामध्ये मोठ्याप्रमाणात खरेदी झालेमुले बरीच बचत होते आणि शेतकर्यांचा फायदा होतो.

शेतकरी संघटन आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने गेले पाच वर्षांत संस्था महाराष्ट्र राज्यातील तळागाळात पोहचुन भारतीय कृषि व्यवस्थापन क्षेञामध्ये खारीचा वाटा उचलत आहे यात शंका नाही.