Showing posts with label agriculture innovations. Show all posts
Showing posts with label agriculture innovations. Show all posts

Saturday, June 17, 2017

Manisha is the leader of rural woman farmers

Everybody knows farmers are very hard worker. Drought area and unpredictable nature is teacher of Mandesh of west maharashtra. how to survive in drought area is the main question in front of farmers. 

Manisha Kharat during cultivation of ancestral farm.
The Manisha Kharat daughter of Bhimrao Kharat from Gatewadi Tal. Man of Satara is widely discussed character for her hard work. usually Bhimrao Kharat goes out of region for grazing goats with his wife. here in home, Manisha living with grandfather, grandmother and other siblings. as a grand daughter manisha has responsibility of entire home in the absence of Bhimrao Kharat.

this year rain start showering good in man regions but Bhimrao Kharat yet not return to home so Manisha decide to cultivate her ancestry farm. Manisha is leader of rural woman farmers. this photo shows that not only Manisha but 90% of rural female force engaged in physical hard work. regular farming activities are done by women's.

Many #CSR activities can run by #NGO #Govt organizations to enhance skills and reduce physical efforts. Many corporates taken initiative by implementing of #CSR activities such as #women's_livelihood, #technology #group_farming to change life of Manisha and other rural women's.

Friday, May 22, 2015

सोयाबीन बीजोत्पादनाची प्रक्रिया: बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यासाठी मूलभूत किंवा पायाभूत बियाणे आवश्यक असते.

सोयाबीन बीजोत्पादनाची प्रक्रिया:

बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यासाठी मूलभूत किंवा पायाभूत बियाणे आवश्यक असते. बियाण्याचे प्रमाणीकरण खालील अवस्थांमधून पार पाडले जाते.
१) क्षेत्राची निवड -
बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यापूर्वी शेतकऱ्यांनी बीजोत्पादन क्षेत्राची मंजुरी घ्यावी. मागील वर्षी सोयाबीन घेतलेल्या क्षेत्रात बीजोत्पादन कार्यक्रम घेऊ नये. निवडलेले क्षेत्र शक्यतो रस्त्यालगत असावे. ओलिताची सोय असावी. जेवढ्या क्षेत्रासाठी बियाणे वाटप केले असेल, तेवढेच क्षेत्र तपासणीकरिता स्वीकारले जाते.
२) विलगीकरण (आयसोलेशन) -
प्रत्येक जातीवर त्याच पिकाच्या वर्गातील इतर वाणांचे परागसिंचन होऊ नये म्हणून बीजोत्पादन क्षेत्राभोवती ठराविक अंतर मोकळे ठेवले जाते. यास विलगीकरण अंतर असे म्हणतात. सोयाबीन हे. १०० टक्के स्वपरागसिंचित असल्यामुळे विलगीकरण अंतर फक्त तीन मीटर ठेवावे लागते.
३) बीजोत्पादन क्षेत्राची तपासणी -
बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून सोयाबीन पिकाच्या दोन तपासण्या कराव्यात. पहिली तपासणी पीक फुलावर येतेवेळी (३५ ते ४० दिवस) व दुसरी तपासणी पिकाची काढणी/ कापणी अगोदर करावी.
भेसळ काढणे -
- मुख्य पिकातील इतर सोयाबीन जातींची झाडे वेळेवर काढणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी बीजोत्पादकांनी पेरणीपूर्वी अथवा पेरणी केल्यानंतर १५ दिवसांत आपले क्षेत्र फी भरून बीज प्रमाणीकरणासाठी नोंद करून घ्यावे. तसेच पीक फुलावर येण्याच्या अगोदर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा म्हणजे भेसळ ओळखणे व ती काढणे याबाबतचे प्रात्यक्षिक ज्ञान संबंधित अधिकारी देऊ शकतील.
- पीक वाढीच्या काळात बीजोत्पादन क्षेत्राची तपासणी करून फुलांचा रंग, खोड व फांद्यांवरील लव, शेंगाचा केसाळपणा वाढीचा प्रकार व फुलोऱ्याचा कालावधी इ. गुणधर्मावर आधारित वेगळी वाटणारी झाडे फुलोऱ्याच्या पूर्वी व फुलोऱ्यावर असताना किमान दोन किंवा तीन वेळा क्षेत्राची तपासणी करावी.
४) प्रक्रिया करणे-
बीजप्रक्रिया केंद्रावर बियाणे पाठवून १० x ६४ (४.०० एम.एम.) या आकाराच्या चाळणीतून प्रक्रिया (ग्रेडिंग) करणे अत्यंत आवश्यक आहे. यापेक्षा छोट्या आकाराची चाळणी वापरू नये. अन्यथा, लहान आकाराचे बियाणेसुद्धा चांगल्या प्रकारच्या बियाण्यामध्ये मिसळले जातील. बीज प्रक्रिया केंद्रावर तयार झालेले उच्च दर्जाच्या बियाण्याचे नमुने बीज परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावे. प्रयोगशाळेत बियाण्याची उगवणशक्ती, बियाण्याची भौतिक व अानुवंशिक शुद्धता, आर्द्रतेचे प्रमाण इ. तपासण्या केल्या जातात. प्रयोग शाळेतील प्राप्त झालेल्या अहवालानुसार ज्या लॉटनंतरची उगवणशक्ती ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशा बियाण्याचे ३० किलोग्रॅम प्रति बॅग प्रमाणात पॅकिंग केले जाते.
५) बीज प्रमाणित होण्यास लागणाऱ्या महत्त्वाच्या बाबी -
बियाणे पिशवीत भरताना व मोहोरबंद करताना बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण त्यांची उगवणशक्ती, इतर काडीकचरा बियाण्याची शुद्धता, तणांचे प्रमाण हे ठराविक मर्यादेपेक्षा अधिक असल्यास बियाणे स्वीकारले जात नाही. (तक्ता क्र. २) मूलभूत बियाण्यासाठी सोनेरी पिवळे, पायाभूतकरिता पांढरे व प्रमाणित बियाण्यासाठी निळ्या रंगाचे टॅग (लेबल) वापरतात. जेणे करून बियाणे कुठल्या प्रकारे आहे हे तत्काळ लक्षात येते.
आवश्यकता बाबी ---- बियाण्याचा प्रकार
---- मूलभूत ---- पायाभूत ---- प्रमाणित
१) शुद्ध बियाणे (कमीत कमी) ---- १०० टक्के ---- ९८ टक्के ---- ९८ टक्के
२) घाण व इतर काडीकचरा (जास्तीत जास्त) ---- ०.० टक्के ---- २ टक्के ---- २ टक्के
३) इतर पिकांचे बियाणे (जास्तीत जास्त) ---- नाही ---- नाही ---- १० प्र.कि.ला
४) तणांचे बियाणे (जास्तीत जास्त) ---- नाही ---- ५ प्र.कि.ला ---- १० प्र.कि.ला
५) इतर ओळखू शकणाऱ्या जातीचे प्रमाण (जास्तीत जास्त) ---- नाही ---- ५ प्र.कि.ला ---- १० प्र.कि.ला
६) उगवणशक्ती (कमीत कमी) ---- ७० टक्के ---- ७० टक्के ---- ७० टक्के
७) बियाण्यातील ओलावा (जास्तीत जास्त) ---- १२ टक्के ---- १२ टक्के ---- १२ टक्के
सोयाबीन बीजोत्पादनासंबंधी महत्त्वाच्या बाबी -
- पिकाची कापणी करतेवेळी त्यात गवत असता कामा नये. कापणी जमिनीलगत करावी.
- आंतरपिकामध्ये सोयाबीन बीजोत्पादन घेऊ नये.
- पीक तयार होण्याच्या १० दिवस अगोदर, प्रति १० लिटर पाण्यात ३० ग्रॅम मॅन्कोझेब हे बुरशीनाशक ८०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे साठवणीमध्ये बियाण्यावरील बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण होण्यास मदत होते. बियाण्याची उगवणशक्ती वाढण्यास मदत होते. रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.
- बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १५-१७ टक्के असताना मळणी करावी.
- बीजोत्पादन क्षेत्र हे इतर सोयाबीन पीक वाणापासून ३ मीटर अंतरावर असावे.
- स्फुरद विरघळणारे जिवाणू (पी.एस.बी.) संवर्धन कुजलेल्या शेणखतात मिसळून जमिनीत समप्रमाणात देऊन स्फुरद सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून दिल्यास बियाण्याची प्रत सुधारते व दाणे वजनदार होतात.
- पिकाची अनुत्पादक कायिक वाढ रोखण्यासाठी पीक कळी अवस्थेत असताना ---- पोटॅशियम आर्थोफॉस्फेट ५०० ग्रॅम अधिक २० मि.ली. ---- लिव्होसीन १०० लि. पाण्यात मिसळून फवारावे.
- फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा दीर्घकाळ ताण पडल्यास ओलित देण्याची व्यवस्था करावी, तसेच पीक फुलोऱ्यात असताना कोळपणी करू नये.
- सोयाबीनची झाडे मुळासकट उपटून येणार नाहीत याची काळजी घ्यावी, नाहीतर बियाण्यात मातीचे खडे येण्याची शक्यता असते.
- मळणी शेतातच ताडपत्रीवर किंवा मातीच्या खळ्यावर सोयाबीनचा जाड थर पसरून करावी.
- तयार झालेले बियाणे सारखे पसरून उन्हात चांगले वाळवावे. बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत खालील आल्यास वाळवणे थांबवावे.
- पोत्यांची साठवण करताना जास्तीत जास्त ५ पोत्यांची थप्पी मारावी. त्यापेक्षा जास्त थप्पी लावल्यास उगवणशक्ती कमी होण्याची शक्यता असते.

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान :
नाविन्यपुर्ण शेतीकडे वाटचालीसाठी चळवळ -
-----------------------------------
**** संस्थेच्या न्यूज व इतर अपडेट्स करिता <नाव_गट नं_संपुर्ण पत्ता_जिल्हा_राज्य_मोबाईल नंबर> आम्हाला 09975740444 या नं.वर कळवा.
------------------------------------------
विभागीय कार्यालय - सांगली, रत्नागिरी, औरंगाबाद, अकोला, जळगाव, चंद्रपुर
६४७, दसरा चौक, सावळज, जि. सांगली (४१६३११) महाराष्ट्र
मोबाईल - 07745820077
www.mazisheti.org
www.facebook.com/agriindia
Whatsapp - 9975740444

Sunday, January 18, 2015

Paddy crop chi narsri tyar kraychi aahe khat,pani Vayvsthapan visai mahiti

Paddy crop chi narsri tyar kraychi aahe khat,pani Vayvsthapan visai mahiti deta yeil ka sir?
                                   
                                    R.T.baghade Gondia

Stage 1..
-Preparation of Nursery Area
Prepare 100 m2(10X10 M) nurseries to plant 1 ha. 
-Select a levelled area near the water source.
- Spread a plastic sheet or used polythene gunny bags on the shallow raised bed to prevent roots growing deep into soil.

Stage 2...
-Preparation of Soil Mixture
Four (4) m3 of soil mix is needed for each 100 m2 of nursery.  Mix 70% soil + 20% well-decomposed pressmud / bio-gas slurry / FYM + 10% rice hull.
-Incorporate in the soil mixture 1.5 kg of powdered di -ammonium phosphate(DAP) or 2 kg 17-17-17 NPK fertilizer.

Stage 3..
Blending mixture

-Filling in soil mixture: Place a wooden frame of 0.5 m long, 1 m wide and 4 cm deep divided into 4 equal segments on the plastic sheet or banana leaves.
- Fill the rame almost to the top with the soil mixture.

-Pre-germinating the seeds 2 days before sowing: Soak the seeds for 24 h, drain and incubate the soaked seeds for 24 h, sow when the seeds sprout and radical (seed root) grows to 2-3 mm long.

-Sowing: Sow the pre-germinated seeds weighing 90 -100 g / m-2 (100g dry seed may weigh 130g after sprouting) uniformly and cover them with dry soil to a hickness of 5mm. Sprinkle water immediately using rose can to soak the bed and remove the wooden frame and continue the process until the required area is completed.

Stage - 4
- Sowing Sprouted Seeds
-Watering
Water the nursery with rose can as and when needed (twice or thrice a day) to keep the soil moist. Protect the nursery from heavy rains for the first 5 DAS.
- At 6 DAS, maintain thin film of water all around the seedling mats.
-Drain the water 2 days before removing the seedling mats for transplanting.

Stage - 5
-Spraying fertilizer solution
- If seedling growth is slow, sprinkle 0.5% urea + 0.5% zinc sulfate solution at 8-10 days interval

Stage - 6

-Seedlings reach sufficient height for planting at 15 days.  Lift the seedling mats and transport them to main field.

More information please visit www.mazisheti.org, www.facebook.com/agriindia

Thursday, November 27, 2014

बहुचर्चित उस उत्पादक शेतकरी श्री. दत्ताञय पाटील, अंजनी यांच्या ऊस क्षेञास माझीशेतीची सदिच्छा भेट

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान (२७.११.२०१४):

बहुचर्चित उस उत्पादक शेतकरी श्री. दत्ताञय पाटील, अंजनी यांच्या ऊस क्षेञास माझीशेतीची सदिच्छा भेट

मागील बरेच दिवसांपासुन चर्चेत असणार्या श्री. दत्ताञय पाटील यांच्या ऊस क्षेञास भेट देण्याचा योग आज आला. मागील आठवड्यातील संस्थेच्या ‘महाराष्ट्र दौर्याचे’ वेळी २ ते ३ ठिकाणी संबंधीत ऊस आणि बियाण्यांबद्दल चर्चा झाली. त्यामुळे आम्ही भेटीचे नियोजन केले होते.
    श्री. दत्ताञय पाटील यांनी शेतकर्यांना एकाच ठिकाणी सर्व उत्तम प्रतीच्या बियाण्यांची उपलब्धता केलेली आहे. त्यामध्ये सिध्दगीरी १२३४,
नीरा-८६०३२,
कोईमतुर-०३१०२,
कोईमतुर -९८०५,
आधार
अश्या निरोगी ऊस बियाण्यांचे उत्पादन व संगोपन सुरु केले आहे. माझीशेती शिष्टमंडळातील सदस्य अंजनी, ता.तासगांव (सांगली) येथे पोहचुन ऊस पाहेपर्यंत बरेच शिष्टमंडळातील सदस्य नकारार्थी होते कारण मुळात अंजनी, ता.तासगांव (सांगली) हे ठिकाण ‘सेमी क्रिटीकल’ झोनमध्ये येत असल्यामुळे या दुष्काळी भागात उत्पादित केलेला ऊस कसा असेल या विषयावर आमची चर्चा चालुच होती पण वास्तवात जेंव्हा ऊस क्षेञ पाहिले तेंव्हा सदरच्या ऊस बियाण्यांचे उत्पादन व संगोपन चांगल्या पद्धतीने केले गेले आहे हे जाणवले... 
     आम्हास जाणविले
* ऊस पडलेला नव्हता.
* उंची सरासरी सुमारे १५ फुटांपर्यंत होती.
* सरळ व सशक्त वाढ झालेली दिसली.
* पानांवर कुस नव्हती.
* फुटवे १३ ते १४ होते.
* तुरा दिसुन आला नाही.
* व्यवस्थापन संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने केले आहे.
* ऊसाचे साधारण वजन ४ ते ५ किलो आहे.
      श्री. दत्ताञय पाटील, अंजनी, ता.तासगांव (सांगली) यांनी सुरु केलेली शेतकरी सेवा ही वाखाणन्याजोगी आहे. त्यांच्याशी चर्चा करताना ते म्हणाले की ऊसाची उंची जास्त असली तरी ऊस सशक्त असल्यामुळे पडत नाही, विक्रमी उंची व वजन, सरळ व जोमदार वाढ, पानावर कुस नाही, त्यामुळे जनावरांच्या चार्रयासाठी उपयुक्त,शतप्रतिशत जर्रमिनेशन, गुळासाठी उत्तम, फुटवे १० ते १५, लवकर तुरा(झेंडा) येत नाही, यापैकी काही पाण्याचा ताण सहण करणार्या नविन जाती, १००% संपूर्ण शेंद्रिय व्यवस्थापन, १२ ते १३ महीन्यात पाणी लांबवीले की रिकवरी १२/१४ लागते, पुर्ण वाढलेला एक ऊस ४ ते ४.५ किलो भरतो. यातील काही जाती आपल्या भागात नवीन असलेने रोपवाटीकावाले जादा दर आकारून शेतकर्यांना लुबाडत आहेत.
      या ऊसाच्या संगोपनाबद्दल सांगताना श्री.दत्ताञय पाटील म्हणाले, शेतीला उन्हाळ्यात पाणी कमी असलेने कोणत्याही रासायनीक खताचा वापर न करता पूर्ण पणे शेंद्रीय नियोजन केले असून पाणी कमतरतेमुळे 26 जानेवारीला लागवड केलेला ऊस 26 जुनला मोठी बांधनी केलेचे सांगीतले. परंतू ,"ऊसाची लागण ही 5 बाय 2.5 फुटावर दोन कांडी (डोळे) आणि दीड महीण्यात बाळबांधणी व साडे तीन महीण्यात मोठी बांधनी व्हायलाच हवी आणि ऊस हे जास्त कालावधीचे पीक असलेने खतांचा वापर एकवेळच भरमसाठ न करता तीन वेळेस विभागून केलेस व त्याबरोबरच सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावयास हवा," असे नमुद केले.

~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
वेबसाईट - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444

Monday, April 8, 2013

MaziSheti Karip Visheshank 2013

MaziSheti Kharip Visheshank 2013

This Magazine contents lots of information in agriculture sector. this is a mile stone for Farmers. this magazine includes that subjects which are directly effects on farms. as per our knowledge this is a complete information resources for farmers.
This magazine covers following subjects-
1. Agriculture crop advisory
2. Vegetables
3. Fruits
4. Biotechnology
5. Weather forecast for kharip season 2013
6. Gaurav Maticha - salute to those farmers who innovate agriculture with his efforts
7. Care at field - what to do & what don't
8. Veterinary Guidance
9. Rural Gossips - what is the real facts behind indian culture, occasions
10. Cartoons
11. Recipe - rural recipe

all the above subjects covered in single magazine "MAZISHETI KHARIP VISHESHANK 2013" & the price Rs. 90/- is the negligible for the magazine as compared to information covered.

you can buy it directly from us on 25% discounted price. for more details contact us at 9975740444 or 9665223385

Monday, January 23, 2012

शेतीमधील संवाद क्रांतीचे जनक माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान, सांगली - एक नजर


श्री.पांडुरंग मारुती मोरे, सावळज
'माझीशेतीच्या' माध्यमातून आधुनिक 
शेती करतात..
(सदर फोटो दर्शक आहेत)
जगातील पहिला प्रकल्प, कोणत्याही मोबदल्याशिवाय भारतीय शेतकर्यांना मोबाईल सेवेमार्फत मार्गदर्शन.... प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात प्रारंभ केलेली ही सेवा सध्या प्रचंड प्रमाणात विस्तारली आहे. ही सेवा सर्व शेतकर्यांच्या मोबाईलवर चालु करता येते. यामध्ये शेतकर्यांच्या मोबाईल क्रमांक संदर्भात प्रचंड गोपनीयता बाळगली जाते. याशिवाय शेतकर्यांना त्यांचे मोबाईलवर मोफत स्थानिक हवामान देनेचीही सोय करनेत आली आहे. त्याकरिता शेतकर्यांना त्यांची माहिती माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या
'माझीशेती' शेतकरी संवाद मंडळ, सावळज
९९७, दसरा चौक, सावळज
सांगली, महाराष्ट्र - ४१६३११
या पत्त्यावर कळवावी लागते. सन २००९ पासुन अविरतपणे ही सेवा चालु आहे. कोणत्याही प्रकारचे पाठबळ नसताना ग्रामीण भागातील तरुणांनी केलेला प्रयोग आज संपुर्ण महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कोणत्याही प्रचार -प्रसिद्धी शिवाय चालु आहे.

श्री. अंबिका महिला बचत गट, वज्रचौन्डे
यांचा  'माझीशेती'च्या माध्यमातून
कडधान्ये व्यवसाय ...
(सदर फोटो दर्शक आहेत)

शासकीय योजनांचा सुकाळ, शेतकर्यांची जात्याच संशोधक वृत्ती, वेगवेगली कृषि विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रियन शेतकरी आपल्या शेतातुन उत्पादन काढीत आहेत पण ब्रिटिश कालापासून व्यापारी अणि शेतकरी जनता यांचेत समन्वय नसल्यामुले आजही शेतकर्यांचे नुकसान होत आहे. या करिता माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या शेतकर्यांना त्यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव आणि व्यापारी, करखानदारयांना चांगल्या प्रतिचे, उच्च दर्जाचे शेतमाल देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. याशिवाय शेतकर्यांना वेगवेगळ्या बाजारपेठेतील अद्यावत माहिती उदा. आवक, प्रति क्विंटल दर इ. ही सेवा मोबाईलवर उपलब्ध करुन दिलेली आहे. 



कृषितद्न्य श्री. शंकरराव निंबालकर
यांचे बागेतिल भाजीपाला...
(सदर फोटो दर्शक आहेत)
  
जागतिक बाजारपेठेत पाश्चात्य देशांनी पिकवलेल्या भाजीपाल्याला जास्त मागणी आहे. भारतातील आणि पाश्चात्य देशातील उत्पादनात काहीही फरक नाही. जो फरक आहे तो उत्पादनासाठी अमलात आनल्या जाणार्या पद्धतिमध्ये. भारतीय शेतिला सेवा पुरवठा करणारे बाहेरच्या देशातुन सेंद्रिय खते, औषधे मागवतात आणि त्यामध्ये पूर्वापर चालत आलेल्या सवयींनुसार प्रमाण वाढवुन आकर्षक आवरण वापरून बाजारात विक्रिला पाठवतात, यामध्ये नुकसान फक्त शेतकर्यांचे होते. यावर उपाय म्हणजे शेतकर्यांनी एकत्र येवून शेतीला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या पडतालुन खात्री करुन मगच वापराव्यात. तसेच बाहेरच्या देशातुन काही जैविके मागवायाची झाल्यास स्वत:  मागवावित. याही बाबतीत माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतकर्यांना मदत मार्गदर्शन केले जाते. एकंदरित सर्व शेतकर्यांनी त्यांची वार्षिक मागणीनुसार आणि गरजेनुसार सर्व एकत्र खरेदी करुन त्याचे वाटप केले जाते. यामध्ये मोठ्याप्रमाणात खरेदी झालेमुले बरीच बचत होते आणि शेतकर्यांचा फायदा होतो.

शेतकरी संघटन आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने गेले पाच वर्षांत संस्था महाराष्ट्र राज्यातील तळागाळात पोहचुन भारतीय कृषि व्यवस्थापन क्षेञामध्ये खारीचा वाटा उचलत आहे यात शंका नाही.