Showing posts with label govt scheme. Show all posts
Showing posts with label govt scheme. Show all posts

Sunday, August 27, 2017

सेंद्रिय शेतीला चालना

कृषी विभागातर्फे सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये गांडूळ खत निर्मिती, सीपीपी कल्चर युनिट, सेंद्रिय शेतीशाळा, अभ्यास दौरे, समूह संघटनांसाठी अर्थसाहाय्य यासारख्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी फायदा करून घेतला पाहिजे. - जनार्दन जाधव 

अ) गांडूळ खत उत्पादन व वापर 
1) गांडूळ खत उत्पादन युनिट स्थापन करणे. 2) बायोडायनामिक कंपोस्ट युनिट स्थापन करणे. 3) सीपीपी कल्चर युनिट स्थापन करणे. 4) निंबोळी पावडर व अर्क तयार करण्यासाठी निम पल्वरायझर/ ग्राइंडरचा पुरवठा करणे. 
अ- 1) गांडूळ खत उत्पादन युनिट
1) गांडूळ खत उत्पादन युनिटसाठी 10,000 रुपये खर्च अपेक्षित आहे. उत्पादन प्रक्रिया सुरू करताच लाभार्थ्यास खर्चाच्या 25 टक्के दराने जास्तीत जास्त 2,500 रुपये याप्रमाणे अनुदान देय आहे. 
अ- 2) बायोडायनामिक कंपोस्ट तयार करणे - 
बायोडायनामिक कंपोस्टसाठी शेतातील काडीकचरा, बनगी, पऱ्हाट्या, तुऱ्हाट्या, वाळलेली बोंडे, वाढलेले गवत, शेतातील तण, कडुनिंब, रुचकिण, निरगुडी, मोगली एरंड इत्यादीची पाने, गाजर गवत, बेशरम, गिरिपुष्प इत्यादी साहित्य, सीपीपी कल्चर, ताणे शेण (आठ ते दहा दिवसांचे), जनावरांचे मूत्र व 1500 ते 2000 लिटर पाणी लागते. 
अ- 3) सीपीपी कल्चर युनिट - 
बायोडायनामिक कंपोस्ट तयार करण्यासाठी सीपीपी कल्चर लागते, तसेच सीपीपी हे उत्तम जमीन सुधारक आहे, त्यामुळे बियाण्याची उगवण लवकर होते. जमिनीचा पोत सुधारतो. पिकात कीड व रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते व सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढते. सीपीपी कल्चर युनिट उभारणीसाठी 250 रुपये प्रति युनिट अनुदान देय राहील. 
अ- 4) निंबोळी पावडर/ अर्क तयार करणे - 
शास्त्रीय पद्धतीने व मोठ्या प्रमाणावर निंबोळी पावडर तयार करण्याकरिता पल्वरायझर/ ग्राइंडरची आवश्‍यकता असते. निम पल्वरायझर / ग्राइंडर, इलेक्‍ट्रिक/ डिझेल मोटार चाळण्या, शेड, कच्चा माल, पॅकिंगसाठी लागणाऱ्या गोष्टी इत्यादी यंत्रसामग्रीच्या किमतीवर किमतीच्या 50 टक्के दराने जास्तीत जास्त 15,000 रुपये अनुदान अनुज्ञेय आहे. 

ब) सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसाहाय्य 
1) सेंद्रिय शेती गट स्थापन करणे - 
या घटकांतर्गत प्रत्येकी 20 शेतकऱ्यांचा साधारणतः 10 हेक्‍टरचा एक गट तयार करण्यात येतो. या गटात 10 किलोमीटर त्रिज्येच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांचा समावेश राहील. गटाचे नेतृत्व करण्यासाठी गटातील सेंद्रिय शेतीबाबत अग्रगण्य आणि उत्स्फूर्तपणे काम करणाऱ्या शेतकऱ्यांची गटप्रवर्तक म्हणून निवड करण्यात यावी.

ब- 1) समूह संघटनांसाठी अर्थसाहाय्य - 
स्थापन झालेल्या गटास तांत्रिक मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि समूह संघटनांसाठी रु. 5,000 रुपये प्रति गट याप्रमाणे एका प्रकल्पास 50 हजार रुपये इतके अर्थसाहाय्य देण्यात येईल. समूह संघटनांचे काम शासकीय यंत्रणा, अशासकीय संस्था, स्वयंसेवी आणि मित्र मार्गदर्शक संस्था, कृषी विज्ञान केंद्र इत्यादींमार्फत करावे. गटाकडून उत्पादित झालेल्या मालास योग्य ते ब्रॅंडिंग करून वेगवेगळ्या प्रदर्शनांत, कृषी खात्याचे प्रदर्शन तसेच महोत्सवांत हा सेंद्रिय शेतीमाल ठेवण्यासाठी अशा गटांस प्रोत्साहन देणे, तसेच अशा मालास बाजारपेठ उपलब्धतेची माहिती करून देणे गरजेचे आहे. 

ब- 2) शेतकऱ्यांच्या शेतीशाळा - 
सेंद्रिय शेतीशाळा आयोजित करण्यासाठी खालीलप्रमाणे पिकांची निवड करण्यात आली आहे. 
सेंद्रिय शेतीशाळा ही उपरोक्त यादीमधील ज्या पिकांचा प्रकल्प राबवायचा आहे, त्या पिकांसाठी घेण्यात यावी. यामध्ये 30 शेतकऱ्यांच्या गटाचा समावेश राहील. गटातील प्रत्येक शेतकऱ्याने तेच पीक घेणे अनिवार्य राहील (एका गटासाठी एक पीक). यादीव्यतिरिक्त इतर पिकांची निवड करावयाची असल्यास विभागीय कृषी सहसंचालक स्थानिक परिस्थितीनुसार त्यास मान्यता देतात. शेतीशाळेचे एकूण 15 प्रशिक्षणवर्ग घेणे अपेक्षित आहे. एका सेंद्रिय शाळेकरिता वीस हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. 

ब- 3) प्रवर्तकाचे प्रशिक्षण - 
सेंद्रिय शेतीशाळा आयोजनासाठी तज्ज्ञ प्रवर्तक तयार करणे, सेंद्रिय शेती व प्रमाणीकरणाचे तंत्रज्ञान सर्वदूर एकसारखेच राहील याची काळजी घेणे. 

ब- 4) प्रवर्तकाच्या माध्यमातून प्रमाणीकरणाचे क्षेत्र निश्‍चित करणे -
प्रत्येक विभागीय कृषी सहसंचालक स्तरावर इच्छुक सेंद्रिय शेतीमध्ये कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्था तसेच सेंद्रिय शेतीमध्ये उत्स्फूर्तपणे कार्य करणाऱ्या मातृमार्गदर्शक संस्थेमार्फत प्रवर्तकाचे प्रशिक्षण या कार्यक्रमाची अंमलबजावणी करावयाची आहे. प्रत्येक तालुक्‍यामध्ये सेंद्रिय शेती प्रकल्पामध्ये समाविष्ट गटातील प्रवर्तक/ कृषी सेवक/ कृषी सहायक तसेच सेंद्रिय शाळा घेण्यास उत्सुक असलेल्या संस्थेकडील प्रवर्तक म्हणून नामनिर्देशित केलेला कार्यकर्ता यांची टीओएफ प्रशिक्षणासाठी निवड करावी. एका टीओएफकरिता 40 प्रवर्तक/ कृषी सहायक/ कृषी पर्यवेक्षक यांची निवड करावयाची आहे. मात्र, टीओएफमध्ये प्रशिक्षण झालेल्या प्रवर्तकाने सेंद्रिय शेतीशाळेची अंमलबजावणी करावयाची आहे. जिल्हानिहाय दिलेल्या उद्दिष्टानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी प्रकल्पामध्ये समाविष्ट कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्याची/ प्रवर्तकाची टीओएफकरिता निवड करून ती यादी विभागीय कृषी सहसंचालक यांना सादर करावी. प्रति टीओएफकरिता चार लाख रुपये खर्चमर्यादा आहे. 

ब- 5) हिरवळीचे खत बियाणेपुरवठा - 
1) हिरवळीच्या खताचे पीक प्रत्यक्षात शेतात मुख्य पीक लागवडीपूर्वी पेरून ते 50 ते 60 दिवसांचे झाल्यानंतर अथवा फुलोऱ्यात येण्यापूर्वी नांगराने गाडण्याची पद्धत - यासाठी प्रामुख्याने ताग, धैंचा, चवळी, उडीद, कुळीथ इत्यादी पिकांची शेतात विशेषतः खरीप हंगामात लागवड करतात. 
2) दुसऱ्या पद्धतीत हिरवळीच्या पिकासाठी प्रामुख्याने शेताच्या बांधावर अथवा पडीक डोंगराळ जमिनीतील क्षेत्रावर सुबाभूळ, करंजा, टाकळा, रानमोडी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गिरिपुष्प वनस्पतीची हिरवी पाने आणि कोवळ्या फांद्याचा वापर करणे. 
सन 2012-13 मध्ये कृती आराखड्यांतर्गत सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन योजनेमध्ये हिरवळीच्या खताचा वापर हा घटक समाविष्ट आहे. सदर कार्यक्रमात प्रस्तावित केल्यानुसार हिरवळीच्या खताचा वापर वाढविण्यासाठी सहभागी शेतकऱ्यास कमाल दोन हेक्‍टर क्षेत्र मर्यादेपर्यंत ताग, धैंचा, चवळी, उडीद, कुळीथ इत्यादीचे बियाणे 25 टक्के अनुदानावर कमाल 2000 रुपये प्रति क्विंटल अनुदान देय राहील. कृषी विद्यापीठे/ शासकीय प्रक्षेत्रे/ राज्य बियाणे महामंडळ/ राष्ट्रीय बीज नियम या यंत्रणेच्या माध्यमातून बियाणे पुरविण्यात येणार आहे. हे अनुदान लागवड क्षेत्राच्या 75 टक्के लोकवाटा भरून घेऊन प्रत्यक्ष बियाणे स्वरूपात देय आहे. संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मागणीप्रमाणे राज्य बियाणे महामंडळाने प्रकल्पांतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना बियाणेपुरवठा करावयाचा आहे. या बाबीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहतात.

ब- 6) बांधावर/ सलग गिरिपुष्प/ शेवरी लागवड - 
जमिनीची पाणी धारण क्षमता, सुपीकता सुधारणे व क्षारयुक्त जमिनीची सुधारणा करण्यासाठी हिरवळीच्या खतांचे बियाणे वापरास प्रोत्साहन देण्यात येते. गिरिपुष्पाच्या पानांमध्ये कर्ब 36 टक्के, नत्राचे प्रमाण 1.15 टक्के असते, त्यामुळे शेताच्या बांधावर, कुंपणावर आणि सलग गिरिपुष्प लागवडीस प्रोत्साहन देणे आवश्‍यक आहे. 
छाटकलमांद्वारे लागवड करण्यासाठी 30 सें.मी. लांब व तीन सें.मी. व्यासाची दोन छाट कलमे निवडून पावसाळ्याच्या सुरवातीस 30 x 30 x 30 सें.मी. आकाराचा खड्डा करून बांधावर दोन मीटर अंतरावर आणि सलग 3 x 3 मीटर अंतरावर लागवड करावी. अशाप्रकारे एक हेक्‍टर क्षेत्राच्या बांधावर साधारणतः 250 रोपे लागवड करणे आवश्‍यक आहे, त्यासाठी 500 रुपये इतके अनुदान देय आहे. गिरिपुष्पाची कलमे/ रोपे/ बिया शासकीय नर्सरी/ शासन मान्यताप्राप्त नर्सरीमधूनच खरेदी करावीत. एक हेक्‍टर क्षेत्राच्या बांधावर साधारणतः 250 रोपे लागवड करणे आवश्‍यक आहे, त्यासाठी 500 रुपये इतके अनुदान देय आहे, म्हणजेच प्रति रोप लागवडीसाठी रु. 2.00 प्रमाणे अनुदान देय आहे. 

ब- 7) प्रदर्शन/ महोत्सव/ चर्चासत्र/ कार्यशाळा/ प्रशिक्षण/ आकस्मिक निधी - 
ग्राहकांमध्ये सेंद्रिय पद्धतीने उत्पादित मालासंबंधी जागृती आणण्यासाठी, प्रमाणीकरण उत्पादनास प्रसिद्धी देण्यासाठी, तसेच सेंद्रिय शेतीमालास खुली बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी, त्याचप्रमाणे सेंद्रिय उत्पादन घेऊ इच्छिणाऱ्या उत्पादकांना, ग्राहकांना, सेंद्रिय वाटचालीमध्ये सहभागी घटकांना प्रशिक्षण देणे, उत्पादकांना प्रशिक्षण देऊन सेंद्रिय उत्पादने घेण्यास प्रवृत्त करणे. राज्य/ विभाग/ जिल्हास्तरीय प्रदर्शन/ महोत्सव इत्यादी आयोजित करावयाचे असून, यामध्ये शेतकरी, सेंद्रिय संस्था, कृषी विद्यापीठे, आरसीओएफ नागपूर, प्रमाणीकरण यंत्रणा, सेंद्रिय निविष्ठा उत्पादक, व्यापारी आयात/ निर्यातदार, सेंद्रिय प्रक्रिया उत्पादक, प्रयोगशाळा, इ. व्यक्ती/ संस्थांना सहभागी करून घ्यावयाचे आहे. या घटकांतर्गत असलेली रक्कम प्रदर्शन, महोत्सव, चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण, प्रचार, प्रसार मोहीम व संकीर्ण बाबींसाठी खर्च करावयाची आहे. 

ब- 8) प्रचार व प्रसिद्धी - शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी व ग्राहक व खरेदीदार यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी प्रचार व प्रसिद्धीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. 
ब- 9) अभ्यास दौरे - राज्यातील तसेच राज्याबाहेरील आदर्श सेंद्रिय प्रक्षेत्र, सेंद्रिय तंत्रज्ञान संशोधन केंद्र, तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतावर शेतकऱ्याने जाऊन पाहणी केल्यास सेंद्रिय शेती पद्धतीबद्दल त्यांना माहिती करून घेता येऊ शकते. त्याचप्रमाणे नव्याने सेंद्रिय शेतीमध्ये सहभागी होणाऱ्या उत्पादकांना सेंद्रिय शेतीबाबतचे तंत्रज्ञान अवगत होऊन ते सेंद्रिय शेती करण्यास प्रवृत्त होऊ शकतात. हंगामात समक्ष जाऊन पिकांची व तेथील प्रयोगांची आणि निविष्ठा उत्पादनाची पाहणी करून शेतकऱ्यांना अल्प खर्चात माहिती मिळू शकते. याची खात्री झाल्यावर ते स्वतः या तंत्राप्रमाणे सेंद्रिय शेती सुरू करू शकतात. यासाठी शेतकऱ्यांचे राज्यांतर्गत व राज्याबाहेरील अभ्यास दौरे आयोजित करण्यात यावेत. राज्यांतर्गत अभ्यास दौऱ्यासाठी प्रति शेतकरी 1000 रुपये याप्रमाणे अर्थसाहाय्य प्रस्तावित आहे. प्रत्येक प्रकल्पातून अशा प्रकारे सर्वसाधारणपणे 25 शेतकरी/ उत्पादकांचा दौरा आयोजित करण्यासाठी अनुदान प्रस्तावित आहे. राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी प्रति शेतकरी 2,000 रुपये याप्रमाणे अर्थसाहाय्य प्रस्तावित असून, प्रत्येक कृषी विभागातून 60 ते 65 शेतकरी/ उत्पादकांचा एक अभ्यास दौरा आयोजित करण्यासाठी अनुदान मंजूर आहे. 

ब- 10) कृषिभूषण (सेंद्रिय शेती) - 
राज्यात सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढविण्यासाठी सेंद्रिय शेतीत उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांना/ संस्थांना शासनामार्फत कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. 

(लेखक कृषी आयुक्तालयात कृषी सहसंचालक (फलोद्यान) म्हणून कार्यरत आहेत.) 
ऍग्रोवन चौकट, ता. 4-2-2013 (केपी) फा.नं. - ए74106 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

Saturday, June 17, 2017

Manisha is the leader of rural woman farmers

Everybody knows farmers are very hard worker. Drought area and unpredictable nature is teacher of Mandesh of west maharashtra. how to survive in drought area is the main question in front of farmers. 

Manisha Kharat during cultivation of ancestral farm.
The Manisha Kharat daughter of Bhimrao Kharat from Gatewadi Tal. Man of Satara is widely discussed character for her hard work. usually Bhimrao Kharat goes out of region for grazing goats with his wife. here in home, Manisha living with grandfather, grandmother and other siblings. as a grand daughter manisha has responsibility of entire home in the absence of Bhimrao Kharat.

this year rain start showering good in man regions but Bhimrao Kharat yet not return to home so Manisha decide to cultivate her ancestry farm. Manisha is leader of rural woman farmers. this photo shows that not only Manisha but 90% of rural female force engaged in physical hard work. regular farming activities are done by women's.

Many #CSR activities can run by #NGO #Govt organizations to enhance skills and reduce physical efforts. Many corporates taken initiative by implementing of #CSR activities such as #women's_livelihood, #technology #group_farming to change life of Manisha and other rural women's.

Friday, May 22, 2015

सोयाबीन बीजोत्पादनाची प्रक्रिया: बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यासाठी मूलभूत किंवा पायाभूत बियाणे आवश्यक असते.

सोयाबीन बीजोत्पादनाची प्रक्रिया:

बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यासाठी मूलभूत किंवा पायाभूत बियाणे आवश्यक असते. बियाण्याचे प्रमाणीकरण खालील अवस्थांमधून पार पाडले जाते.
१) क्षेत्राची निवड -
बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यापूर्वी शेतकऱ्यांनी बीजोत्पादन क्षेत्राची मंजुरी घ्यावी. मागील वर्षी सोयाबीन घेतलेल्या क्षेत्रात बीजोत्पादन कार्यक्रम घेऊ नये. निवडलेले क्षेत्र शक्यतो रस्त्यालगत असावे. ओलिताची सोय असावी. जेवढ्या क्षेत्रासाठी बियाणे वाटप केले असेल, तेवढेच क्षेत्र तपासणीकरिता स्वीकारले जाते.
२) विलगीकरण (आयसोलेशन) -
प्रत्येक जातीवर त्याच पिकाच्या वर्गातील इतर वाणांचे परागसिंचन होऊ नये म्हणून बीजोत्पादन क्षेत्राभोवती ठराविक अंतर मोकळे ठेवले जाते. यास विलगीकरण अंतर असे म्हणतात. सोयाबीन हे. १०० टक्के स्वपरागसिंचित असल्यामुळे विलगीकरण अंतर फक्त तीन मीटर ठेवावे लागते.
३) बीजोत्पादन क्षेत्राची तपासणी -
बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून सोयाबीन पिकाच्या दोन तपासण्या कराव्यात. पहिली तपासणी पीक फुलावर येतेवेळी (३५ ते ४० दिवस) व दुसरी तपासणी पिकाची काढणी/ कापणी अगोदर करावी.
भेसळ काढणे -
- मुख्य पिकातील इतर सोयाबीन जातींची झाडे वेळेवर काढणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी बीजोत्पादकांनी पेरणीपूर्वी अथवा पेरणी केल्यानंतर १५ दिवसांत आपले क्षेत्र फी भरून बीज प्रमाणीकरणासाठी नोंद करून घ्यावे. तसेच पीक फुलावर येण्याच्या अगोदर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा म्हणजे भेसळ ओळखणे व ती काढणे याबाबतचे प्रात्यक्षिक ज्ञान संबंधित अधिकारी देऊ शकतील.
- पीक वाढीच्या काळात बीजोत्पादन क्षेत्राची तपासणी करून फुलांचा रंग, खोड व फांद्यांवरील लव, शेंगाचा केसाळपणा वाढीचा प्रकार व फुलोऱ्याचा कालावधी इ. गुणधर्मावर आधारित वेगळी वाटणारी झाडे फुलोऱ्याच्या पूर्वी व फुलोऱ्यावर असताना किमान दोन किंवा तीन वेळा क्षेत्राची तपासणी करावी.
४) प्रक्रिया करणे-
बीजप्रक्रिया केंद्रावर बियाणे पाठवून १० x ६४ (४.०० एम.एम.) या आकाराच्या चाळणीतून प्रक्रिया (ग्रेडिंग) करणे अत्यंत आवश्यक आहे. यापेक्षा छोट्या आकाराची चाळणी वापरू नये. अन्यथा, लहान आकाराचे बियाणेसुद्धा चांगल्या प्रकारच्या बियाण्यामध्ये मिसळले जातील. बीज प्रक्रिया केंद्रावर तयार झालेले उच्च दर्जाच्या बियाण्याचे नमुने बीज परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावे. प्रयोगशाळेत बियाण्याची उगवणशक्ती, बियाण्याची भौतिक व अानुवंशिक शुद्धता, आर्द्रतेचे प्रमाण इ. तपासण्या केल्या जातात. प्रयोग शाळेतील प्राप्त झालेल्या अहवालानुसार ज्या लॉटनंतरची उगवणशक्ती ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशा बियाण्याचे ३० किलोग्रॅम प्रति बॅग प्रमाणात पॅकिंग केले जाते.
५) बीज प्रमाणित होण्यास लागणाऱ्या महत्त्वाच्या बाबी -
बियाणे पिशवीत भरताना व मोहोरबंद करताना बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण त्यांची उगवणशक्ती, इतर काडीकचरा बियाण्याची शुद्धता, तणांचे प्रमाण हे ठराविक मर्यादेपेक्षा अधिक असल्यास बियाणे स्वीकारले जात नाही. (तक्ता क्र. २) मूलभूत बियाण्यासाठी सोनेरी पिवळे, पायाभूतकरिता पांढरे व प्रमाणित बियाण्यासाठी निळ्या रंगाचे टॅग (लेबल) वापरतात. जेणे करून बियाणे कुठल्या प्रकारे आहे हे तत्काळ लक्षात येते.
आवश्यकता बाबी ---- बियाण्याचा प्रकार
---- मूलभूत ---- पायाभूत ---- प्रमाणित
१) शुद्ध बियाणे (कमीत कमी) ---- १०० टक्के ---- ९८ टक्के ---- ९८ टक्के
२) घाण व इतर काडीकचरा (जास्तीत जास्त) ---- ०.० टक्के ---- २ टक्के ---- २ टक्के
३) इतर पिकांचे बियाणे (जास्तीत जास्त) ---- नाही ---- नाही ---- १० प्र.कि.ला
४) तणांचे बियाणे (जास्तीत जास्त) ---- नाही ---- ५ प्र.कि.ला ---- १० प्र.कि.ला
५) इतर ओळखू शकणाऱ्या जातीचे प्रमाण (जास्तीत जास्त) ---- नाही ---- ५ प्र.कि.ला ---- १० प्र.कि.ला
६) उगवणशक्ती (कमीत कमी) ---- ७० टक्के ---- ७० टक्के ---- ७० टक्के
७) बियाण्यातील ओलावा (जास्तीत जास्त) ---- १२ टक्के ---- १२ टक्के ---- १२ टक्के
सोयाबीन बीजोत्पादनासंबंधी महत्त्वाच्या बाबी -
- पिकाची कापणी करतेवेळी त्यात गवत असता कामा नये. कापणी जमिनीलगत करावी.
- आंतरपिकामध्ये सोयाबीन बीजोत्पादन घेऊ नये.
- पीक तयार होण्याच्या १० दिवस अगोदर, प्रति १० लिटर पाण्यात ३० ग्रॅम मॅन्कोझेब हे बुरशीनाशक ८०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे साठवणीमध्ये बियाण्यावरील बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण होण्यास मदत होते. बियाण्याची उगवणशक्ती वाढण्यास मदत होते. रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.
- बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १५-१७ टक्के असताना मळणी करावी.
- बीजोत्पादन क्षेत्र हे इतर सोयाबीन पीक वाणापासून ३ मीटर अंतरावर असावे.
- स्फुरद विरघळणारे जिवाणू (पी.एस.बी.) संवर्धन कुजलेल्या शेणखतात मिसळून जमिनीत समप्रमाणात देऊन स्फुरद सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून दिल्यास बियाण्याची प्रत सुधारते व दाणे वजनदार होतात.
- पिकाची अनुत्पादक कायिक वाढ रोखण्यासाठी पीक कळी अवस्थेत असताना ---- पोटॅशियम आर्थोफॉस्फेट ५०० ग्रॅम अधिक २० मि.ली. ---- लिव्होसीन १०० लि. पाण्यात मिसळून फवारावे.
- फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा दीर्घकाळ ताण पडल्यास ओलित देण्याची व्यवस्था करावी, तसेच पीक फुलोऱ्यात असताना कोळपणी करू नये.
- सोयाबीनची झाडे मुळासकट उपटून येणार नाहीत याची काळजी घ्यावी, नाहीतर बियाण्यात मातीचे खडे येण्याची शक्यता असते.
- मळणी शेतातच ताडपत्रीवर किंवा मातीच्या खळ्यावर सोयाबीनचा जाड थर पसरून करावी.
- तयार झालेले बियाणे सारखे पसरून उन्हात चांगले वाळवावे. बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत खालील आल्यास वाळवणे थांबवावे.
- पोत्यांची साठवण करताना जास्तीत जास्त ५ पोत्यांची थप्पी मारावी. त्यापेक्षा जास्त थप्पी लावल्यास उगवणशक्ती कमी होण्याची शक्यता असते.

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान :
नाविन्यपुर्ण शेतीकडे वाटचालीसाठी चळवळ -
-----------------------------------
**** संस्थेच्या न्यूज व इतर अपडेट्स करिता <नाव_गट नं_संपुर्ण पत्ता_जिल्हा_राज्य_मोबाईल नंबर> आम्हाला 09975740444 या नं.वर कळवा.
------------------------------------------
विभागीय कार्यालय - सांगली, रत्नागिरी, औरंगाबाद, अकोला, जळगाव, चंद्रपुर
६४७, दसरा चौक, सावळज, जि. सांगली (४१६३११) महाराष्ट्र
मोबाईल - 07745820077
www.mazisheti.org
www.facebook.com/agriindia
Whatsapp - 9975740444

Wednesday, January 28, 2015

हिवाळ्यामध्ये तेलकट डाग रोगाचे जिवाणू सुप्तावस्थेत असतात. या काळातच बागेतील स्वच्छता आणि रोगट अवशेष नष्ट करण्याकडे लक्ष दिल्यास रोगाचा प्रसार रोखणे शक्‍य होईल.

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान:
दि. 27/01/2015

तेलकट डाग रोग नियंत्रणासाठी बागेतील स्वच्छतेला द्या महत्त्व
- नेचर अग्री, सोलापुर

हिवाळ्यामध्ये तेलकट डाग रोगाचे जिवाणू सुप्तावस्थेत असतात. या काळातच बागेतील स्वच्छता आणि रोगट अवशेष नष्ट करण्याकडे लक्ष दिल्यास रोगाचा प्रसार रोखणे शक्‍य होईल. 🍊🍎

तेलकट डाग हा रोग झान्थोमोनास ऍक्‍झानोपोडीस पुनिका या जिवाणूमुळे होतो. 

हंगामानुसार प्रादुर्भाव - 
सर्वेक्षणामध्ये तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव मृग बहाराच्या वेळी (म्हणजेच जून ते ऑक्‍टोबर महिन्यामध्ये) सर्वात जास्त असतो. त्या खालोखाल आंबे बहाराच्या वेळी (म्हणजे मार्च ते मे महिन्यापर्यंत) डाळिंबावर तेलकट डागाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. तेलकट डागाचा सर्वांत कमी प्रादुर्भाव हिवाळ्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात म्हणजे सर्वसाधारण हस्त बहारात दिसून येतो. जिवाणूंची संख्या दमट व उष्ण हवामानात व पावसाळी हवामानात खूप मोठ्या प्रमाणात वाढते. थंड हवामानात तेलकट डाग रोगाच्या जिवाणूंची संख्या त्यांच्या नैसर्गिक वेगाने वाढत नाहीत. याचा फायदा घेऊन डाळिंब बागायतदारांनी घेऊन बागेतील तेलकट डाग रोगाचे अवशेष नष्ट करावेत. 

तेलकट डाग रोगास पोषक हवामान - 
- तेलकट डाग रोगाच्या जिवाणूच्या वाढ व प्रसारासाठी 25 ते 32 अंश सें. तापमान आणि 36 ते 88 टक्के आर्द्रता फार पोषक ठरते. 
- वातावरणातील किमान तापमान 18 ते 28 अंश से. आणि कमाल 30 ते 35 अंश से. तापमान या रोगाच्या वाढीस आणि प्रसारास पोषक असल्याचे आढळून आले आहे. (यानुसार 18 अंश सें.पेक्षा कमी तापमान रोगवाढीस पोषक नाही.) 
- तेलकट डाग रोगाच्या वाढीस वातावरणातील किमान आर्द्रता 21 ते 84 टक्के, तर कमाल आर्द्रता 50 ते 92 टक्के ही पोषक ठरते. 
- हिवाळ्यात किमान तापमान 18 अंश से.पेक्षा कमी राहते. या काळात रोगाचे जिवाणू सुप्तावस्थेत जातात. याच काळात बागेत स्वच्छता मोहीम राबविल्यास रोगाच्या उत्पत्तीस आळा बसतो. 

तेलकट डाग रोगाची लक्षणे - 
पानांवरील लक्षणे - 
सर्वप्रथम रेखीव ते अनियमित लहान आकाराचे (2-5 मि.मी.) करड्या काळसर रंगाचे, तेलकट पाणीदार डाग पानावर दिसतात. कालांतराने हे डाग आकाराने मोठे होऊन गर्द तपकिरी ते काळे होतात. डागाभोवती पोकळ पिवळसर पाणीदार कडा दिसते. एक ते अनेक ठिपके एका पानावर आढळून येतात. काही वेळेस हे सर्व ठिपके एकमेकांत मिसळतात. परिणामी पूर्ण पान पिवळे पडून गळून पडते. कधीकधी पानाची मध्यरेषा व शिरांनाही लागण होऊन त्या काळसर पडतात. नंतरच्या अवस्थेत पाने पिवळसर काळपट होऊन गळतात. 

फांद्यांवरील लक्षणे - 
फांदीवर काळपट अथवा काळे खोलगट चट्टे आढळतात. कालांतराने हे चट्टे फांदीवर गोलाकार पसरतात. फांद्या त्या भागात तडकतात आणि थोडासाही दाब दिल्यास तुटतात. 

फूल आणि फळांवरील लक्षणे - 
कळ्या अथवा फुलांवर कदाचित लागण झाल्यास कॅलीक्‍सवर लक्षणे आढळतात. फळांवर लागण जास्त प्रमाणात होते. फळाच्या देठाकडील पृष्ठभागावर रोगाची लागण लवकर व जास्त प्रमाणात होऊन काळे ठिपके पडतात. ते कालांतराने वाढत जाऊन एकमेकांत मिसळतात. इंग्रजी एल (L) अथवा वाय (Y) आकारात फळांचा लागण झालेला भाग तडकतो. लागण वाढल्यास फळे तडकतात, दुभंगतात, आतील दाणे बाहेर पडतात व फळे गळतात. 
- मात्र, अतिरिक्त पाऊस व आर्द्रतेच्या परिस्थितीत मोठ्या डागावरसुद्धा भेगा आढळत नाहीत. हे डाग खोल मध्यभागी दबलेले आढळतात. पावसाळ्यात या डागावर पाणी साचल्यास जिवाणूचा प्रादुर्भाव वाढून द्राव चिकट पांढुरक्‍या रंगाचा बनतो. हाच द्राव त्याच जागी वाळल्याने या डागाला पांढरी चकाकी येते. 
- जिवाणू व सरकोस्पोरा बुरशीच्या प्रादुर्भावाने होणारे ठिपके रोगांची लक्षणे साधारणतः सारखीच असतात. खालील प्रकारे फरक लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात. 

शेतावरच करा तेलकट डाग रोगाचे निदान - 

ही चाचणी अतिशय सोपी असून, शेतावरच करता येते. 
- तेलकट डाग रोगग्रस्त पान किंवा फळ रोगट ठिपके वरच्या बाजूस येतील अशा प्रकारे सपाट जागेवर ठेवा. थेंबभर पाणी टाकल्यास दाट चिकट गढूळ द्रवात रूपांतरित झालेले दिसून येईल. रोगट भागातून पाण्यात होणाऱ्या जिवाणूच्या प्रवेशाने असे झालेले असते. रोगट ठिपके मोठ्या आकाराचे असल्यास जिवाणू जास्त प्रमाणात प्रवेश करतात व निदान अतिशय चांगल्या प्रकारे होते. रोगट ठिपके बुरशी वा इतर कारणाने पडले असल्यास पाणी तसेच राहते. 

- शेतात रोगनिदान करण्याची आणखी दुसरी पद्धत आहे. यामध्ये काचेच्या पात्रावर रोगट भागाचे लहान लहान तुकडे करून त्यावर पाण्याचे 2 ते 3 थेंब टाकावे व ते हाताने कुस्करावे. द्रावण घट्ट व चिकट झाल्यास तो भाग तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव असल्याचे समजावे; अन्यथा द्रावण तसेच राहिल्यास अन्य बुरशीचा प्रादुर्भाव आहे, असे समजावे. 

पाऊस किंवा पाण्याचा तेलकट डाग रोग व जिवाणूवर होणारा परिणाम ः 
- तेलकट डाग रोगाच्या जिवाणूच्या वाढीस पाण्याची महत्त्वपूर्ण भूमिका असते. पावसामुळे किंवा पाणी साचल्याने तेलकट डाग रोगाचे जिवाणू क्रियाशील होऊन रोग प्रसारास प्रारंभ होतो. अपरिणामकारक बुरशीनाशकांची किंवा कमी तीव्रतेच्या द्रावणांची फवारणी केल्यास त्या पाण्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येते. 
- हिवाळ्यानंतर आलेल्या अवकाळी पावसाने तेलकट डाग रोगाच्या वाढीस पोषक हवामान तयार होते. अशा परिस्थितीत बागेतील तेलकट डागाचे अवशेष व झाडावरील रोगाचे जीवंत डाग प्रसारामध्ये प्रमुख भूमिका पार पाडतात. बागेत स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे आहे. 

रोगाचा प्रसार रोखण्यासाठी स्वच्छता आवश्‍यक - 
- एकदा बागेत या रोगाचा शिरकाव झाल्यास त्याचे जिवाणू झाडाच्या अवशेषांवर जगतात व वर्षानुवर्षे बागेत राहतात आणि पोषक वातावरण मिळताच वाढीस लागतात. यासाठी जिवाणूंचा बागेत शिरकाव रोखणेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी लागवडीसाठी रोगमुक्त रोपांचा वापर आवश्‍यक आहे. 
- तेलकट डाग रोगाचा प्रसार एका हंगामातून दुसऱ्या व पुढील हंगामात प्रामुख्याने बागेत पडलेल्या रोगट अवशेषाद्वारेच होतो. 
- या रोगाचे विषाणू नुसत्या मातीत जिवंत राहत नाहीत. मात्र, बागेतील रोगग्रस्त पाने, फळे, फांद्यांमध्ये हे जिवाणू 240 दिवसांपर्यंत सहजपणे सुप्तावस्थेत जिवंत राहतात. वाढीस पोषक हवामान मिळताक्षणीच वेगाने वाढ होऊन रोग प्रसार होतो, म्हणून बागेत स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. गावपातळीवरच सर्वांनी मिळून स्वच्छतेचा कार्यक्रम राबविल्यास तेलकट डाग रोगाच्या जिवाणूंचे उच्चाटन शक्‍य होईल. 

तातडीने करावयाच्या उपाययोजना - 
1. गावपातळीवर सर्वांच्या बागेत स्वच्छता मोहीम राबवणे. 
2. मागील हंगामातील फळांची संपूर्ण काढणी झाल्यानंतर ब्रोमोपॉल 500 पीपीएम. (2 ब्रोमो, 2 नायट्रोप्रोपेन, 1-3 डायोल) 50 ग्रॅम प्रति 100 लिटर प्रमाणात फवारावे. जर फळ काढणी पावसाळ्यात झाली, तर ब्रोमोपॉल 500 पीपीएम+ कॅप्टन 0.5 टक्के फवारावे. (ब्रोमोपॉल 50 ग्रॅम + कॅप्टन 500 ग्रॅम प्रति 100 लि. पाणी). 
3. संपूर्ण फळे काढणी झाल्यानंतर बागेला 3 ते 4 महिने विश्रांती द्यावी. 
4. बहार घेण्यापूर्वी संपूर्ण पानगळ करून घ्यावी. यासाठी इथेफॉन 1 ते 2 मि.लि. प्रतिलिटर फवारावे. रोगट फांद्याची छाटणी करावी. 
5. झाडाच्या खोडाला निमऑईल + ब्रोमोपॉल (500 पीपीएम) + कॅप्टन (0.5 टक्के)चा मुलामा द्यावा. 
6. बागेतील व बांधावरील गोळा केलेले तेलकट डागग्रस्त व इतर रोगट अवशेष सातत्याने जाळून नष्ट करावेत. 
7. बागेत जमिनीवर ब्लिचिंग पावडर 60 किलो प्रतिहेक्‍टर किंवा कॉपर डस्ट (4 टक्के) (उपलब्ध असल्यास) 20 कि. प्रतिहेक्‍टर धुरळणी करावी. 
8. पानगळ आणि छाटणीनंतर ब्रोमोपॉल 500 पीपीएम + कॅप्टन 0.5 टक्के फवारावे. 
9. नवीन पालवी फुटल्यानंतर ब्रोमोपॉल (250 पीपीएम) किंवा बोर्डोमिश्रण (0.5 ते 1 टक्का) किंवा कॅप्टन (0.25) टक्के 8 ते 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. पानांवर आणि फळांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल, तर फवारणी चालू ठेवावी. रोग दिसत नसल्यास 30 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. 
10. ही फवारणी फळ काढणीपूर्वी 30 दिवस आधी बंद करावी. पावसाळी हंगामात ही फवारणी फळ काढणीच्या 20 दिवसांआधी बंद करावी. 

टीप- निर्यातक्षम डाळिंब बागेत रसायनांचा वापर करण्यापूर्वी कृषी संशोधन केंद्र वा कृषी  शास्त्रज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
~~~~~
* तुमची संस्था नोंदणीकृत असेल आणि तुम्हाला समाजसेवेची आवड असेल तर mazishetifoundation@gmail.com वर संपर्क करा.
~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444

Sunday, January 18, 2015

Paddy crop chi narsri tyar kraychi aahe khat,pani Vayvsthapan visai mahiti

Paddy crop chi narsri tyar kraychi aahe khat,pani Vayvsthapan visai mahiti deta yeil ka sir?
                                   
                                    R.T.baghade Gondia

Stage 1..
-Preparation of Nursery Area
Prepare 100 m2(10X10 M) nurseries to plant 1 ha. 
-Select a levelled area near the water source.
- Spread a plastic sheet or used polythene gunny bags on the shallow raised bed to prevent roots growing deep into soil.

Stage 2...
-Preparation of Soil Mixture
Four (4) m3 of soil mix is needed for each 100 m2 of nursery.  Mix 70% soil + 20% well-decomposed pressmud / bio-gas slurry / FYM + 10% rice hull.
-Incorporate in the soil mixture 1.5 kg of powdered di -ammonium phosphate(DAP) or 2 kg 17-17-17 NPK fertilizer.

Stage 3..
Blending mixture

-Filling in soil mixture: Place a wooden frame of 0.5 m long, 1 m wide and 4 cm deep divided into 4 equal segments on the plastic sheet or banana leaves.
- Fill the rame almost to the top with the soil mixture.

-Pre-germinating the seeds 2 days before sowing: Soak the seeds for 24 h, drain and incubate the soaked seeds for 24 h, sow when the seeds sprout and radical (seed root) grows to 2-3 mm long.

-Sowing: Sow the pre-germinated seeds weighing 90 -100 g / m-2 (100g dry seed may weigh 130g after sprouting) uniformly and cover them with dry soil to a hickness of 5mm. Sprinkle water immediately using rose can to soak the bed and remove the wooden frame and continue the process until the required area is completed.

Stage - 4
- Sowing Sprouted Seeds
-Watering
Water the nursery with rose can as and when needed (twice or thrice a day) to keep the soil moist. Protect the nursery from heavy rains for the first 5 DAS.
- At 6 DAS, maintain thin film of water all around the seedling mats.
-Drain the water 2 days before removing the seedling mats for transplanting.

Stage - 5
-Spraying fertilizer solution
- If seedling growth is slow, sprinkle 0.5% urea + 0.5% zinc sulfate solution at 8-10 days interval

Stage - 6

-Seedlings reach sufficient height for planting at 15 days.  Lift the seedling mats and transport them to main field.

More information please visit www.mazisheti.org, www.facebook.com/agriindia

Friday, December 26, 2014

दररोज तीनशे लिटर दुधापासून तयार होतात प्रक्रिया पदार्थ

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान:

दररोज तीनशे लिटर दुधापासून तयार होतात प्रक्रिया पदार्थ
- संकलन शुभम ठाकरे, नाशिक

कोल्हापूर जिल्ह्यातील नेर्ली (ता. करवीर) येथील सदाशिव चौगुले व त्यांच्या कुटुंबीयांनी विविध दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन व विक्री व्यवसायात प्रगती केली आहे. धडपड, संपूर्ण कुटुंबाची मेहनत, पदार्थांचा दर्जा, योग्य सेवेमुळे हा व्यवसाय चांगला बहरू लागला आहे. दररोज पन्नास लिटर दूध संकलनापासून सुरू झालेला हा उद्योग आता तीनशे लिटरपर्यंत विस्तारला आहे. 
राजकुमार चौगुले 

कोल्हापूर शहरापासून सुमारे दहा किलोमीटवर गोकूळ शिरगाव औद्योगिक वसाहतीनजीक नेर्ली गाव आहे. या गावातील सदाशिव चौगुले यांनी दुग्धजन्य पदार्थनिर्मितीत आपला ठसा तयार केला आहे. त्यांची अडीच एकर शेती आहे. सुरवातीला जनावरांचे संगोपन केले. काही काळ सेंटरिंगचे, तसेच पतसंस्थेत क्‍लार्क म्हणून काम केले. त्यानंतर स्वतःकडील 20 ते 25 लिटर दूध व शेजारील पाच गावांतून दूध संकलित करून ते कोल्हापूर येथे दुग्धप्रक्रिया उद्योजकांना पुरवू लागले. अशा प्रकारे दररोज पाचशे लिटर दूध पुरवण्याचा व्यवसाय दहा वर्षे चालला. त्यात कधी प्रक्रियादारांकडून दुधाची मागणी कमी असायची. त्यामुळे दूध शिल्लक राहायचे. हे दूध संघाकडे दिले तरी दर कमी मिळायचा. ही आर्थिक कोंडी फोडण्यासाठी स्वतःच प्रक्रिया उद्योजक व्हायचे ठरवले. 

सुरवात 50 लिटर दुधापासून 
चौगुले यांनी उद्योगाला पन्नास लिटर दुधापासून सुरवात केली. एक लाख रुपये खर्च करून खवा तयार करणारी यंत्रणा आणली. पण दररोज खव्याची विक्री होत नव्हती. मग हळूहळू दही, लस्सी, चक्का, क्रीम, पनीर, खवा, पेढे श्रीखंड, आम्रखंड बासुंदी तयार करायला सुरवात केली. 

बॅंकांचे अर्थसाह्य 
कमी जागेत व्यवसाय सुरू केला आहे. सुरवातीला बॅंकांनी सहकार्य केले नाही. मात्र सहा महिने पाठपुरावा केल्यानंतर बॅंक ऑफ इंडिया व एनकेजीएसबी बॅंकेमार्फत दहा लाख रुपयांचे अर्थसाह्य झाले. यातून विविध यंत्रे आणणे शक्‍य झाले. सुरवातीला उद्योगातील तांत्रिक माहिती नव्हती. एका तज्ज्ञाला उद्योगस्थळी बोलावून त्याच्यामार्फत दोन-तीन महिने प्रशिक्षण घेतले. घरातील अन्य सदस्यांना याबाबतची माहिती दिली. सध्या चौगुले यांच्यासह पत्नी सौ. वसुंधरा, आई गुणवंती, पृथ्वीराज, ऋतुराज ही मुले, असे सर्व कुटुंब या व्यवसायात गुंतले आहे. याशिवाय तीन कर्मचारी आहेत. सध्या खव्यासह श्रीखंड मशिन, क्रीम सेपरेटर, चिलर, तीन फ्रिज, लस्सी मशिन, पॅकिंग मशिन आदी यंत्रसामग्री आहे. 

असा आहे दिनक्रम 
दररोज नजीकच्या सांगवडे व सुळकूड गावातील दूध संस्थांमधून गरजेनुसार अडीचशे ते तीनशे लिटर दूध घेतले जाते. सहकारी संघापेक्षा या संस्थांना लिटरमागे चार ते साडेचार रुपये जास्त दिले जातात. दूध संकलनासाठी स्वतःची स्वतंत्र गाडी आहे. सकाळी लवकर दूध संकलन केल्यानंतर नऊ ते साडेनऊ वाजता प्रक्रिया सुरू होते. 

दही - दररोज शंभर ते एकशेवीस लिटर दुधाचे दही लावले जाते. संध्याकाळी ते तयार होते. रात्री नऊच्या दरम्यान प्लॅस्टिक कपांत (150 ग्रॅम) पॅकिंग करून ते चिलिंगसाठी ठेवले जाते. 

पनीर - सुमारे ऐंशी लिटर दुधापासून पंधरा ते सोळा किलो पनीर दररोज केले जाते. एक किलोचे भाग विक्रीसाठी तयार केले जातात. 

लस्सी - दररोज साठ लिटर दुधापासून साखर, वेलची, केशर अर्क घालून लस्सी बनविली जाते. यासाठी आठ फॅटचे दूध वापरले जाते. मलईयुक्त दह्याचा वापर त्यासाठी होतो. 

श्रीखंड - यासाठी चाळीस ते पन्नास लिटर दुधाचा वापर केला जातो. मलई दही, मलई चक्का वापरला जातो. वीस किलो चक्‍क्‍यात वीस किलो साखर घालून दररोज सरासरी चाळीस किलो श्रीखंड तयार होते. मागणीनुसार आम्रखंड, पेढे, खवा व बासुंदीही तयार केली जाते. सकाळी नऊ ते रात्री अकरा वाजेपर्यंत अखंडपणे काम सुरू असते. 

तयार केले मार्केट, नियमित ग्राहक 
चौगुले यांनी किरकोळ दुकानदार व हॉटेल असे सुमारे सत्तर ग्राहक तयार केले आहेत. गावाशेजारीच औद्योगिक वसाहत असल्याने त्याचा फायदा दुग्धजन्य पदार्थ विकण्यासाठी झाला आहे. विक्रीसाठी स्वत:ची गाडी आहे. दूध संकलनापासून ते मार्केटिंगपर्यंत सर्व जबाबदाऱ्या ते लीलया सांभाळतात. 
विक्रीसाठी आठवड्याचे काही वार ठरलेले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलांत, कागलसह शेजारील गावांमध्ये पदार्थांची विक्री केली जाते. अशा पदार्थांच्या विक्रीवर मोठ्या दूध संघाचे वर्चस्व असले तरी दर्जा ठेवल्याने आम्ही आमचे खास ग्राहक तयार केले असून, त्यांच्याकडून मागणी होत असल्याचे चौगुले यांनी सांगितले. सर्व व्यवहार रोखीने चालतो. यामुळे थकबाकीचा प्रश्‍न येत नाही. पूर्वी कोल्हापूर शहरात दूध विक्री करीत असताना परतीच्या वेळी अनेक दुकानदारांचे सामान ते बाजारातून घेऊन येत. त्यातून दुकानदारांच्या ओळखी वाढल्या. त्याचा उपयोग पुढे पदार्थ विक्रीसाठी झाला. 

किफायतशीर उद्योग - 

- दररोजचे दूध संकलन - 250 ते 300 लिटर 

दररोजचे उत्पादन 
शंभर लिटर दही प्रति 150 ग्रॅम पॅकिंगला 10 रुपये
पंधरा किलो पनीर 220 रुपये प्रति किलो 
पंधरा किलो श्रीखंड- आम्रखंड - 120 रुपये प्रति किलो 
नव्वद लिटर लस्सी - प्रति 200 ग्रॅमला 10 रुपये 

(मागणी व हंगामानुसार यात बदल होतो. पेढे, बासुंदी किंवा काही पदार्थ दररोज तयार न करता मागणीनुसार बनवले जातात. याशिवाय मोठ्या समारंभासाठी आर्डर्स घेतल्या जातात.) 

- प्रति लिटर दुधावर प्रक्रिया करून त्यातून 15 ते 20 रुपये उत्पन्न मिळते. त्यातून प्रक्रिया, मार्केटिंग व अन्य खर्च वजा जाता नफा शिल्लक राहतो.) 

चौगुले यांच्या व्यवसायाची वैशिष्ट्‌ये 
- दर्जेदार उत्पादन हाच महत्त्वाचा मुद्दा मानून व्यवसाय सुरू केला. 
-वसुंधरा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्‍ट्‌स या फर्मच्या माध्यमातून "पृथ्वी' ब्रॅंडने पदार्थांची विक्री 
- या संस्थेचा परवाना 
* केवळ म्हशींचे दूध वापरून पदार्थ तयार केले जातात. 
* दररोज दूध आणून ताजे पदार्थ तयार केले जातात. यामुळे दर्जा चांगला राहतो. 
* स्वत: विक्री केल्यामुळे पदार्थाच्या दर्जाबाबत ग्राहकांकडून माहिती मिळते. 
* दही व लस्सीला वर्षभर मागणी. औद्योगिक वसाहत नजीक असल्याने अनेक हॉटेलमध्ये दररोज मागणी. 
* प्रतिकूल परिस्थितीतून उभा केला व्यवसाय. 
* व्यवसायात आधुनिकीकरण आणण्यासाठी प्रशिक्षण घेण्याची तयारी. 
* मोठ्या संघांच्या स्पर्धेतही टिकून. 

सदाशिव चौगुले - 9881981154 
~~~~~
* तुमची संस्था नोंदणीकृत असेल आणि तुम्हाला समाजसेवेची आवड असेल तर mazishetifoundation@gmail.com वर संपर्क करा.
~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444