Showing posts with label Mazisheti. Show all posts
Showing posts with label Mazisheti. Show all posts

Friday, May 22, 2015

सोयाबीन बीजोत्पादनाची प्रक्रिया: बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यासाठी मूलभूत किंवा पायाभूत बियाणे आवश्यक असते.

सोयाबीन बीजोत्पादनाची प्रक्रिया:

बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यासाठी मूलभूत किंवा पायाभूत बियाणे आवश्यक असते. बियाण्याचे प्रमाणीकरण खालील अवस्थांमधून पार पाडले जाते.
१) क्षेत्राची निवड -
बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यापूर्वी शेतकऱ्यांनी बीजोत्पादन क्षेत्राची मंजुरी घ्यावी. मागील वर्षी सोयाबीन घेतलेल्या क्षेत्रात बीजोत्पादन कार्यक्रम घेऊ नये. निवडलेले क्षेत्र शक्यतो रस्त्यालगत असावे. ओलिताची सोय असावी. जेवढ्या क्षेत्रासाठी बियाणे वाटप केले असेल, तेवढेच क्षेत्र तपासणीकरिता स्वीकारले जाते.
२) विलगीकरण (आयसोलेशन) -
प्रत्येक जातीवर त्याच पिकाच्या वर्गातील इतर वाणांचे परागसिंचन होऊ नये म्हणून बीजोत्पादन क्षेत्राभोवती ठराविक अंतर मोकळे ठेवले जाते. यास विलगीकरण अंतर असे म्हणतात. सोयाबीन हे. १०० टक्के स्वपरागसिंचित असल्यामुळे विलगीकरण अंतर फक्त तीन मीटर ठेवावे लागते.
३) बीजोत्पादन क्षेत्राची तपासणी -
बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून सोयाबीन पिकाच्या दोन तपासण्या कराव्यात. पहिली तपासणी पीक फुलावर येतेवेळी (३५ ते ४० दिवस) व दुसरी तपासणी पिकाची काढणी/ कापणी अगोदर करावी.
भेसळ काढणे -
- मुख्य पिकातील इतर सोयाबीन जातींची झाडे वेळेवर काढणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी बीजोत्पादकांनी पेरणीपूर्वी अथवा पेरणी केल्यानंतर १५ दिवसांत आपले क्षेत्र फी भरून बीज प्रमाणीकरणासाठी नोंद करून घ्यावे. तसेच पीक फुलावर येण्याच्या अगोदर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा म्हणजे भेसळ ओळखणे व ती काढणे याबाबतचे प्रात्यक्षिक ज्ञान संबंधित अधिकारी देऊ शकतील.
- पीक वाढीच्या काळात बीजोत्पादन क्षेत्राची तपासणी करून फुलांचा रंग, खोड व फांद्यांवरील लव, शेंगाचा केसाळपणा वाढीचा प्रकार व फुलोऱ्याचा कालावधी इ. गुणधर्मावर आधारित वेगळी वाटणारी झाडे फुलोऱ्याच्या पूर्वी व फुलोऱ्यावर असताना किमान दोन किंवा तीन वेळा क्षेत्राची तपासणी करावी.
४) प्रक्रिया करणे-
बीजप्रक्रिया केंद्रावर बियाणे पाठवून १० x ६४ (४.०० एम.एम.) या आकाराच्या चाळणीतून प्रक्रिया (ग्रेडिंग) करणे अत्यंत आवश्यक आहे. यापेक्षा छोट्या आकाराची चाळणी वापरू नये. अन्यथा, लहान आकाराचे बियाणेसुद्धा चांगल्या प्रकारच्या बियाण्यामध्ये मिसळले जातील. बीज प्रक्रिया केंद्रावर तयार झालेले उच्च दर्जाच्या बियाण्याचे नमुने बीज परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावे. प्रयोगशाळेत बियाण्याची उगवणशक्ती, बियाण्याची भौतिक व अानुवंशिक शुद्धता, आर्द्रतेचे प्रमाण इ. तपासण्या केल्या जातात. प्रयोग शाळेतील प्राप्त झालेल्या अहवालानुसार ज्या लॉटनंतरची उगवणशक्ती ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशा बियाण्याचे ३० किलोग्रॅम प्रति बॅग प्रमाणात पॅकिंग केले जाते.
५) बीज प्रमाणित होण्यास लागणाऱ्या महत्त्वाच्या बाबी -
बियाणे पिशवीत भरताना व मोहोरबंद करताना बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण त्यांची उगवणशक्ती, इतर काडीकचरा बियाण्याची शुद्धता, तणांचे प्रमाण हे ठराविक मर्यादेपेक्षा अधिक असल्यास बियाणे स्वीकारले जात नाही. (तक्ता क्र. २) मूलभूत बियाण्यासाठी सोनेरी पिवळे, पायाभूतकरिता पांढरे व प्रमाणित बियाण्यासाठी निळ्या रंगाचे टॅग (लेबल) वापरतात. जेणे करून बियाणे कुठल्या प्रकारे आहे हे तत्काळ लक्षात येते.
आवश्यकता बाबी ---- बियाण्याचा प्रकार
---- मूलभूत ---- पायाभूत ---- प्रमाणित
१) शुद्ध बियाणे (कमीत कमी) ---- १०० टक्के ---- ९८ टक्के ---- ९८ टक्के
२) घाण व इतर काडीकचरा (जास्तीत जास्त) ---- ०.० टक्के ---- २ टक्के ---- २ टक्के
३) इतर पिकांचे बियाणे (जास्तीत जास्त) ---- नाही ---- नाही ---- १० प्र.कि.ला
४) तणांचे बियाणे (जास्तीत जास्त) ---- नाही ---- ५ प्र.कि.ला ---- १० प्र.कि.ला
५) इतर ओळखू शकणाऱ्या जातीचे प्रमाण (जास्तीत जास्त) ---- नाही ---- ५ प्र.कि.ला ---- १० प्र.कि.ला
६) उगवणशक्ती (कमीत कमी) ---- ७० टक्के ---- ७० टक्के ---- ७० टक्के
७) बियाण्यातील ओलावा (जास्तीत जास्त) ---- १२ टक्के ---- १२ टक्के ---- १२ टक्के
सोयाबीन बीजोत्पादनासंबंधी महत्त्वाच्या बाबी -
- पिकाची कापणी करतेवेळी त्यात गवत असता कामा नये. कापणी जमिनीलगत करावी.
- आंतरपिकामध्ये सोयाबीन बीजोत्पादन घेऊ नये.
- पीक तयार होण्याच्या १० दिवस अगोदर, प्रति १० लिटर पाण्यात ३० ग्रॅम मॅन्कोझेब हे बुरशीनाशक ८०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे साठवणीमध्ये बियाण्यावरील बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण होण्यास मदत होते. बियाण्याची उगवणशक्ती वाढण्यास मदत होते. रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.
- बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १५-१७ टक्के असताना मळणी करावी.
- बीजोत्पादन क्षेत्र हे इतर सोयाबीन पीक वाणापासून ३ मीटर अंतरावर असावे.
- स्फुरद विरघळणारे जिवाणू (पी.एस.बी.) संवर्धन कुजलेल्या शेणखतात मिसळून जमिनीत समप्रमाणात देऊन स्फुरद सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून दिल्यास बियाण्याची प्रत सुधारते व दाणे वजनदार होतात.
- पिकाची अनुत्पादक कायिक वाढ रोखण्यासाठी पीक कळी अवस्थेत असताना ---- पोटॅशियम आर्थोफॉस्फेट ५०० ग्रॅम अधिक २० मि.ली. ---- लिव्होसीन १०० लि. पाण्यात मिसळून फवारावे.
- फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा दीर्घकाळ ताण पडल्यास ओलित देण्याची व्यवस्था करावी, तसेच पीक फुलोऱ्यात असताना कोळपणी करू नये.
- सोयाबीनची झाडे मुळासकट उपटून येणार नाहीत याची काळजी घ्यावी, नाहीतर बियाण्यात मातीचे खडे येण्याची शक्यता असते.
- मळणी शेतातच ताडपत्रीवर किंवा मातीच्या खळ्यावर सोयाबीनचा जाड थर पसरून करावी.
- तयार झालेले बियाणे सारखे पसरून उन्हात चांगले वाळवावे. बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत खालील आल्यास वाळवणे थांबवावे.
- पोत्यांची साठवण करताना जास्तीत जास्त ५ पोत्यांची थप्पी मारावी. त्यापेक्षा जास्त थप्पी लावल्यास उगवणशक्ती कमी होण्याची शक्यता असते.

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान :
नाविन्यपुर्ण शेतीकडे वाटचालीसाठी चळवळ -
-----------------------------------
**** संस्थेच्या न्यूज व इतर अपडेट्स करिता <नाव_गट नं_संपुर्ण पत्ता_जिल्हा_राज्य_मोबाईल नंबर> आम्हाला 09975740444 या नं.वर कळवा.
------------------------------------------
विभागीय कार्यालय - सांगली, रत्नागिरी, औरंगाबाद, अकोला, जळगाव, चंद्रपुर
६४७, दसरा चौक, सावळज, जि. सांगली (४१६३११) महाराष्ट्र
मोबाईल - 07745820077
www.mazisheti.org
www.facebook.com/agriindia
Whatsapp - 9975740444

Wednesday, January 28, 2015

हिवाळ्यामध्ये तेलकट डाग रोगाचे जिवाणू सुप्तावस्थेत असतात. या काळातच बागेतील स्वच्छता आणि रोगट अवशेष नष्ट करण्याकडे लक्ष दिल्यास रोगाचा प्रसार रोखणे शक्‍य होईल.

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान:
दि. 27/01/2015

तेलकट डाग रोग नियंत्रणासाठी बागेतील स्वच्छतेला द्या महत्त्व
- नेचर अग्री, सोलापुर

हिवाळ्यामध्ये तेलकट डाग रोगाचे जिवाणू सुप्तावस्थेत असतात. या काळातच बागेतील स्वच्छता आणि रोगट अवशेष नष्ट करण्याकडे लक्ष दिल्यास रोगाचा प्रसार रोखणे शक्‍य होईल. 🍊🍎

तेलकट डाग हा रोग झान्थोमोनास ऍक्‍झानोपोडीस पुनिका या जिवाणूमुळे होतो. 

हंगामानुसार प्रादुर्भाव - 
सर्वेक्षणामध्ये तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव मृग बहाराच्या वेळी (म्हणजेच जून ते ऑक्‍टोबर महिन्यामध्ये) सर्वात जास्त असतो. त्या खालोखाल आंबे बहाराच्या वेळी (म्हणजे मार्च ते मे महिन्यापर्यंत) डाळिंबावर तेलकट डागाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. तेलकट डागाचा सर्वांत कमी प्रादुर्भाव हिवाळ्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात म्हणजे सर्वसाधारण हस्त बहारात दिसून येतो. जिवाणूंची संख्या दमट व उष्ण हवामानात व पावसाळी हवामानात खूप मोठ्या प्रमाणात वाढते. थंड हवामानात तेलकट डाग रोगाच्या जिवाणूंची संख्या त्यांच्या नैसर्गिक वेगाने वाढत नाहीत. याचा फायदा घेऊन डाळिंब बागायतदारांनी घेऊन बागेतील तेलकट डाग रोगाचे अवशेष नष्ट करावेत. 

तेलकट डाग रोगास पोषक हवामान - 
- तेलकट डाग रोगाच्या जिवाणूच्या वाढ व प्रसारासाठी 25 ते 32 अंश सें. तापमान आणि 36 ते 88 टक्के आर्द्रता फार पोषक ठरते. 
- वातावरणातील किमान तापमान 18 ते 28 अंश से. आणि कमाल 30 ते 35 अंश से. तापमान या रोगाच्या वाढीस आणि प्रसारास पोषक असल्याचे आढळून आले आहे. (यानुसार 18 अंश सें.पेक्षा कमी तापमान रोगवाढीस पोषक नाही.) 
- तेलकट डाग रोगाच्या वाढीस वातावरणातील किमान आर्द्रता 21 ते 84 टक्के, तर कमाल आर्द्रता 50 ते 92 टक्के ही पोषक ठरते. 
- हिवाळ्यात किमान तापमान 18 अंश से.पेक्षा कमी राहते. या काळात रोगाचे जिवाणू सुप्तावस्थेत जातात. याच काळात बागेत स्वच्छता मोहीम राबविल्यास रोगाच्या उत्पत्तीस आळा बसतो. 

तेलकट डाग रोगाची लक्षणे - 
पानांवरील लक्षणे - 
सर्वप्रथम रेखीव ते अनियमित लहान आकाराचे (2-5 मि.मी.) करड्या काळसर रंगाचे, तेलकट पाणीदार डाग पानावर दिसतात. कालांतराने हे डाग आकाराने मोठे होऊन गर्द तपकिरी ते काळे होतात. डागाभोवती पोकळ पिवळसर पाणीदार कडा दिसते. एक ते अनेक ठिपके एका पानावर आढळून येतात. काही वेळेस हे सर्व ठिपके एकमेकांत मिसळतात. परिणामी पूर्ण पान पिवळे पडून गळून पडते. कधीकधी पानाची मध्यरेषा व शिरांनाही लागण होऊन त्या काळसर पडतात. नंतरच्या अवस्थेत पाने पिवळसर काळपट होऊन गळतात. 

फांद्यांवरील लक्षणे - 
फांदीवर काळपट अथवा काळे खोलगट चट्टे आढळतात. कालांतराने हे चट्टे फांदीवर गोलाकार पसरतात. फांद्या त्या भागात तडकतात आणि थोडासाही दाब दिल्यास तुटतात. 

फूल आणि फळांवरील लक्षणे - 
कळ्या अथवा फुलांवर कदाचित लागण झाल्यास कॅलीक्‍सवर लक्षणे आढळतात. फळांवर लागण जास्त प्रमाणात होते. फळाच्या देठाकडील पृष्ठभागावर रोगाची लागण लवकर व जास्त प्रमाणात होऊन काळे ठिपके पडतात. ते कालांतराने वाढत जाऊन एकमेकांत मिसळतात. इंग्रजी एल (L) अथवा वाय (Y) आकारात फळांचा लागण झालेला भाग तडकतो. लागण वाढल्यास फळे तडकतात, दुभंगतात, आतील दाणे बाहेर पडतात व फळे गळतात. 
- मात्र, अतिरिक्त पाऊस व आर्द्रतेच्या परिस्थितीत मोठ्या डागावरसुद्धा भेगा आढळत नाहीत. हे डाग खोल मध्यभागी दबलेले आढळतात. पावसाळ्यात या डागावर पाणी साचल्यास जिवाणूचा प्रादुर्भाव वाढून द्राव चिकट पांढुरक्‍या रंगाचा बनतो. हाच द्राव त्याच जागी वाळल्याने या डागाला पांढरी चकाकी येते. 
- जिवाणू व सरकोस्पोरा बुरशीच्या प्रादुर्भावाने होणारे ठिपके रोगांची लक्षणे साधारणतः सारखीच असतात. खालील प्रकारे फरक लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात. 

शेतावरच करा तेलकट डाग रोगाचे निदान - 

ही चाचणी अतिशय सोपी असून, शेतावरच करता येते. 
- तेलकट डाग रोगग्रस्त पान किंवा फळ रोगट ठिपके वरच्या बाजूस येतील अशा प्रकारे सपाट जागेवर ठेवा. थेंबभर पाणी टाकल्यास दाट चिकट गढूळ द्रवात रूपांतरित झालेले दिसून येईल. रोगट भागातून पाण्यात होणाऱ्या जिवाणूच्या प्रवेशाने असे झालेले असते. रोगट ठिपके मोठ्या आकाराचे असल्यास जिवाणू जास्त प्रमाणात प्रवेश करतात व निदान अतिशय चांगल्या प्रकारे होते. रोगट ठिपके बुरशी वा इतर कारणाने पडले असल्यास पाणी तसेच राहते. 

- शेतात रोगनिदान करण्याची आणखी दुसरी पद्धत आहे. यामध्ये काचेच्या पात्रावर रोगट भागाचे लहान लहान तुकडे करून त्यावर पाण्याचे 2 ते 3 थेंब टाकावे व ते हाताने कुस्करावे. द्रावण घट्ट व चिकट झाल्यास तो भाग तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव असल्याचे समजावे; अन्यथा द्रावण तसेच राहिल्यास अन्य बुरशीचा प्रादुर्भाव आहे, असे समजावे. 

पाऊस किंवा पाण्याचा तेलकट डाग रोग व जिवाणूवर होणारा परिणाम ः 
- तेलकट डाग रोगाच्या जिवाणूच्या वाढीस पाण्याची महत्त्वपूर्ण भूमिका असते. पावसामुळे किंवा पाणी साचल्याने तेलकट डाग रोगाचे जिवाणू क्रियाशील होऊन रोग प्रसारास प्रारंभ होतो. अपरिणामकारक बुरशीनाशकांची किंवा कमी तीव्रतेच्या द्रावणांची फवारणी केल्यास त्या पाण्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येते. 
- हिवाळ्यानंतर आलेल्या अवकाळी पावसाने तेलकट डाग रोगाच्या वाढीस पोषक हवामान तयार होते. अशा परिस्थितीत बागेतील तेलकट डागाचे अवशेष व झाडावरील रोगाचे जीवंत डाग प्रसारामध्ये प्रमुख भूमिका पार पाडतात. बागेत स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे आहे. 

रोगाचा प्रसार रोखण्यासाठी स्वच्छता आवश्‍यक - 
- एकदा बागेत या रोगाचा शिरकाव झाल्यास त्याचे जिवाणू झाडाच्या अवशेषांवर जगतात व वर्षानुवर्षे बागेत राहतात आणि पोषक वातावरण मिळताच वाढीस लागतात. यासाठी जिवाणूंचा बागेत शिरकाव रोखणेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी लागवडीसाठी रोगमुक्त रोपांचा वापर आवश्‍यक आहे. 
- तेलकट डाग रोगाचा प्रसार एका हंगामातून दुसऱ्या व पुढील हंगामात प्रामुख्याने बागेत पडलेल्या रोगट अवशेषाद्वारेच होतो. 
- या रोगाचे विषाणू नुसत्या मातीत जिवंत राहत नाहीत. मात्र, बागेतील रोगग्रस्त पाने, फळे, फांद्यांमध्ये हे जिवाणू 240 दिवसांपर्यंत सहजपणे सुप्तावस्थेत जिवंत राहतात. वाढीस पोषक हवामान मिळताक्षणीच वेगाने वाढ होऊन रोग प्रसार होतो, म्हणून बागेत स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. गावपातळीवरच सर्वांनी मिळून स्वच्छतेचा कार्यक्रम राबविल्यास तेलकट डाग रोगाच्या जिवाणूंचे उच्चाटन शक्‍य होईल. 

तातडीने करावयाच्या उपाययोजना - 
1. गावपातळीवर सर्वांच्या बागेत स्वच्छता मोहीम राबवणे. 
2. मागील हंगामातील फळांची संपूर्ण काढणी झाल्यानंतर ब्रोमोपॉल 500 पीपीएम. (2 ब्रोमो, 2 नायट्रोप्रोपेन, 1-3 डायोल) 50 ग्रॅम प्रति 100 लिटर प्रमाणात फवारावे. जर फळ काढणी पावसाळ्यात झाली, तर ब्रोमोपॉल 500 पीपीएम+ कॅप्टन 0.5 टक्के फवारावे. (ब्रोमोपॉल 50 ग्रॅम + कॅप्टन 500 ग्रॅम प्रति 100 लि. पाणी). 
3. संपूर्ण फळे काढणी झाल्यानंतर बागेला 3 ते 4 महिने विश्रांती द्यावी. 
4. बहार घेण्यापूर्वी संपूर्ण पानगळ करून घ्यावी. यासाठी इथेफॉन 1 ते 2 मि.लि. प्रतिलिटर फवारावे. रोगट फांद्याची छाटणी करावी. 
5. झाडाच्या खोडाला निमऑईल + ब्रोमोपॉल (500 पीपीएम) + कॅप्टन (0.5 टक्के)चा मुलामा द्यावा. 
6. बागेतील व बांधावरील गोळा केलेले तेलकट डागग्रस्त व इतर रोगट अवशेष सातत्याने जाळून नष्ट करावेत. 
7. बागेत जमिनीवर ब्लिचिंग पावडर 60 किलो प्रतिहेक्‍टर किंवा कॉपर डस्ट (4 टक्के) (उपलब्ध असल्यास) 20 कि. प्रतिहेक्‍टर धुरळणी करावी. 
8. पानगळ आणि छाटणीनंतर ब्रोमोपॉल 500 पीपीएम + कॅप्टन 0.5 टक्के फवारावे. 
9. नवीन पालवी फुटल्यानंतर ब्रोमोपॉल (250 पीपीएम) किंवा बोर्डोमिश्रण (0.5 ते 1 टक्का) किंवा कॅप्टन (0.25) टक्के 8 ते 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. पानांवर आणि फळांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल, तर फवारणी चालू ठेवावी. रोग दिसत नसल्यास 30 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. 
10. ही फवारणी फळ काढणीपूर्वी 30 दिवस आधी बंद करावी. पावसाळी हंगामात ही फवारणी फळ काढणीच्या 20 दिवसांआधी बंद करावी. 

टीप- निर्यातक्षम डाळिंब बागेत रसायनांचा वापर करण्यापूर्वी कृषी संशोधन केंद्र वा कृषी  शास्त्रज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
~~~~~
* तुमची संस्था नोंदणीकृत असेल आणि तुम्हाला समाजसेवेची आवड असेल तर mazishetifoundation@gmail.com वर संपर्क करा.
~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444

Sunday, January 18, 2015

Paddy crop chi narsri tyar kraychi aahe khat,pani Vayvsthapan visai mahiti

Paddy crop chi narsri tyar kraychi aahe khat,pani Vayvsthapan visai mahiti deta yeil ka sir?
                                   
                                    R.T.baghade Gondia

Stage 1..
-Preparation of Nursery Area
Prepare 100 m2(10X10 M) nurseries to plant 1 ha. 
-Select a levelled area near the water source.
- Spread a plastic sheet or used polythene gunny bags on the shallow raised bed to prevent roots growing deep into soil.

Stage 2...
-Preparation of Soil Mixture
Four (4) m3 of soil mix is needed for each 100 m2 of nursery.  Mix 70% soil + 20% well-decomposed pressmud / bio-gas slurry / FYM + 10% rice hull.
-Incorporate in the soil mixture 1.5 kg of powdered di -ammonium phosphate(DAP) or 2 kg 17-17-17 NPK fertilizer.

Stage 3..
Blending mixture

-Filling in soil mixture: Place a wooden frame of 0.5 m long, 1 m wide and 4 cm deep divided into 4 equal segments on the plastic sheet or banana leaves.
- Fill the rame almost to the top with the soil mixture.

-Pre-germinating the seeds 2 days before sowing: Soak the seeds for 24 h, drain and incubate the soaked seeds for 24 h, sow when the seeds sprout and radical (seed root) grows to 2-3 mm long.

-Sowing: Sow the pre-germinated seeds weighing 90 -100 g / m-2 (100g dry seed may weigh 130g after sprouting) uniformly and cover them with dry soil to a hickness of 5mm. Sprinkle water immediately using rose can to soak the bed and remove the wooden frame and continue the process until the required area is completed.

Stage - 4
- Sowing Sprouted Seeds
-Watering
Water the nursery with rose can as and when needed (twice or thrice a day) to keep the soil moist. Protect the nursery from heavy rains for the first 5 DAS.
- At 6 DAS, maintain thin film of water all around the seedling mats.
-Drain the water 2 days before removing the seedling mats for transplanting.

Stage - 5
-Spraying fertilizer solution
- If seedling growth is slow, sprinkle 0.5% urea + 0.5% zinc sulfate solution at 8-10 days interval

Stage - 6

-Seedlings reach sufficient height for planting at 15 days.  Lift the seedling mats and transport them to main field.

More information please visit www.mazisheti.org, www.facebook.com/agriindia

Thursday, November 27, 2014

अध्यक्ष महेश बोरगे यांच्या महाराष्ट्र दौर्याचा अहवाल

माझीशेती अध्यक्ष महेश बोरगे यांच्या महाराष्ट्र दौर्याचा अहवाल:

ठळक नोंद घेणे योग्य -
१. सर्व शेतकरी बंधुना संस्थेच्या वाटचालीवर विश्वास आहे.
२. कोणत्याही राजकीय विचाराने प्रेरित नसलेली, प्रशासनाच्या सहाय्याने शेतकरी सेवेसाठी वाहुन घेतलेली संस्था पाहुन आश्चर्य वाटले.
३. समाजातील सर्व भेदाभेद बाजुला ठेवुन सर्व शेतकरी समान मानले जातात, हे सर्वांना आवडले.
४. कोणताही स्वार्थ न ठेवता महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातुन जुडलेले शेतकरी पाहुन सर्वांचे मन भरुन आले.
५. महेश बोरगे आणि भेटलेले शेतकरी व प्रतिनीधी यांच्यातील चर्चा व त्यातुन होणारे भविष्यातील वाटचाल यांमुळे सर्वच शेतकर्यांचे भविष्य उज्वल होईल, असे सर्वांना वाटते.
६. सर्वसमावेशक धोरण व निर्णयप्रक्रिया पाहुन सर्व पदाधिकार्यांनी सहकार्य व पाठींब्यावर मर्यादीत न राहता सक्रीय राहण्याचे आश्वासन दिले.
७. भविष्यातील २ ते ३ वर्षांचे नियोजन सांगितले. आतापर्यंत संस्थास्तरावर केलेले कामांची माहिती दिली.
८. नियोजीत शेतकरी विकासाची दिशा कशी असेल, कोणत्या ठिकाणी काय रोख ठेवायचा याबाबत चर्चा झाली.
९. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांनी देखील शेतकर्यांच्या सर्वांगीन विकासासाठी संस्थेस सर्व स्तरावरुन मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले. १०. एकंदरीत चर्चा केली असता समजले की शेतकर्यांमध्ये संस्थेबद्दल प्रेम आणि आस्था आहे. प्रेम, त्याग आणि आस्था असलेशिवाय कोणतेही कार्य तडीस जात नाही.

सर्व विभागातील शेतकर्यांनी उपस्थित राहुन आपल्या समस्या कळवळ्या त्याबद्द्ल संस्थेच्यावतीने मी आपला आभारी आहे.

”शेतकरी आत्महत्येवर” चर्चा केली असता असे कळाले की
१. आत्महत्या केलेले शेतकरी अगोदर खुप निराश होते.
२. आत्महत्येपुर्वी काही काळ (३ ते ४ महिणे) ते खुपच एकलकोंडे झालेले होते.
३. यांना माहितीची कमतरता दिसुन आली.
४. नैसर्गीक आपत्तीपासुन सावरता येत नसल्याने हळुहळु खचत होते.
५. सावकारी कर्ज वाढले होते व संबंधीत सावकर पैश्याचे जोरावर माणसिक ञास देत होते.
६. काही जणांचे तर कौटुंबिक स्तरावरील वाद टोकावर गेलेले जे कोणाशी व्यक्त करता येत नव्हते.
७. ज्यांच्याकडे मदत मागितली त्यांनी वेळीच मदत न करता मजाक उडवला.
८. राजकीय पार्श्वभुमी समाजाला विघातक वळणावर घेवुन जात आहे.
९. शासकीय अधिकारी जाणुनभुजून ठराविक लोकांनाच मदत करतात.

या सर्व प्रवासादरम्यान केलेल्या निरीक्षणावरुन असे वाटते की -

१. शेतकर्यांनी कोणताही टोकाचा निर्णय घेणेपुर्वी किमान एकदा आम्हास लिखीत स्वरुपात कळवावे.
२. बदललेली नैसर्गीक अवस्था पाहता विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली पिक पद्धतीत बदल करावेत.
३. संस्थेचे पदाधिकारी आपल्या आसपास असतात, त्यांचा सल्ला घ्या किंवा आम्हास कळवा. गोपनियता पाळणे हे आमचे परम कर्तव्य आहे.
४. शेतकर्यांना मानधन, पेन्शन, विमा, मेडिकल, मुलांचे शिक्षण, शिष्यवृत्ती व तत्सम सुविधा चालु करणेबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे. याबाबत प्रस्ताव करणे चालु आहे.
५. संघटना मजबुत करणेसाठी जिल्हा, तालुका व गावनिहाय रचना करणे.

आपला विनीत,
महेश बोरगे, सांगली (सावळज)
~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
मोबाईल - ०९९७५७४०४४४
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444