Saturday, November 29, 2014

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर 1012 हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान:
संकलन - मिलींद पोळ, वार्ताहर

डॉ. रामचंद्र साबळे
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर 1012 हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. मध्य प्रदेशावर 1014, राजस्थान सीमेवर 1016 हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. मात्र वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. त्यामुळे उत्तर भारतातून दक्षिण भारतात थंड वारे वाहतील. वाऱ्याचा वेगही साधारणपणे 10 किलोमीटर राहील. कमाल तापमानात फरक दिसेल. कोकणात 25 ते 32 अंश सेल्सिअस,
उत्तर महाराष्ट्रात 29 ते 32 अंश सेल्सिअस,
मराठवाड्यात 24 ते 27 अंश सेल्सिअस,
विदर्भात 25 ते 30 अंश सेल्सिअस;
पश्चिम महाराष्ट्रात 23 ते 26 अंश सेल्सिअस राहील.

संपूर्ण महाराष्ट्रात किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस राहील. त्यानुसार रात्रीचे तापमान घटेल.
अरबी समुद्राचे आणि बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान 300 ते 301 केलव्हिन्स इतके राहील. हिंदी महासागरावर ढगांचा समूह जमलेला असून, त्या ढगांचे तापमान उणे 40 अंश सेल्सिअस राहील. हवेच्या दाबात फरक
होत असल्याने मोठ्या प्रमणात ढग दक्षिण भारताबरोबरच महाराष्ट्रावरही दिसून येतील. प्रामुख्याने डिसेंबरच्या 1 ते 3 तारखेच्या दरम्यान अशी स्थिती निर्माण होऊन महाराष्ट्रावरही ढग जमतील आणि मेघ गर्जनेसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यांत पावसाची शक्य

उत्तर महाराष्ट्र -
उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस धुळे आणि जळगाव जिल्ह्यांत राहील. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान 29 ते 30 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात 17 अंश, तर धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यांत 19 अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 47 ते 58 टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 19 ते 22 टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग 7 ते 10 किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
मोबाईल - ०९९७५७४०४४४
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444

Thursday, November 27, 2014

अध्यक्ष महेश बोरगे यांच्या महाराष्ट्र दौर्याचा अहवाल

माझीशेती अध्यक्ष महेश बोरगे यांच्या महाराष्ट्र दौर्याचा अहवाल:

ठळक नोंद घेणे योग्य -
१. सर्व शेतकरी बंधुना संस्थेच्या वाटचालीवर विश्वास आहे.
२. कोणत्याही राजकीय विचाराने प्रेरित नसलेली, प्रशासनाच्या सहाय्याने शेतकरी सेवेसाठी वाहुन घेतलेली संस्था पाहुन आश्चर्य वाटले.
३. समाजातील सर्व भेदाभेद बाजुला ठेवुन सर्व शेतकरी समान मानले जातात, हे सर्वांना आवडले.
४. कोणताही स्वार्थ न ठेवता महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातुन जुडलेले शेतकरी पाहुन सर्वांचे मन भरुन आले.
५. महेश बोरगे आणि भेटलेले शेतकरी व प्रतिनीधी यांच्यातील चर्चा व त्यातुन होणारे भविष्यातील वाटचाल यांमुळे सर्वच शेतकर्यांचे भविष्य उज्वल होईल, असे सर्वांना वाटते.
६. सर्वसमावेशक धोरण व निर्णयप्रक्रिया पाहुन सर्व पदाधिकार्यांनी सहकार्य व पाठींब्यावर मर्यादीत न राहता सक्रीय राहण्याचे आश्वासन दिले.
७. भविष्यातील २ ते ३ वर्षांचे नियोजन सांगितले. आतापर्यंत संस्थास्तरावर केलेले कामांची माहिती दिली.
८. नियोजीत शेतकरी विकासाची दिशा कशी असेल, कोणत्या ठिकाणी काय रोख ठेवायचा याबाबत चर्चा झाली.
९. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांनी देखील शेतकर्यांच्या सर्वांगीन विकासासाठी संस्थेस सर्व स्तरावरुन मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले. १०. एकंदरीत चर्चा केली असता समजले की शेतकर्यांमध्ये संस्थेबद्दल प्रेम आणि आस्था आहे. प्रेम, त्याग आणि आस्था असलेशिवाय कोणतेही कार्य तडीस जात नाही.

सर्व विभागातील शेतकर्यांनी उपस्थित राहुन आपल्या समस्या कळवळ्या त्याबद्द्ल संस्थेच्यावतीने मी आपला आभारी आहे.

”शेतकरी आत्महत्येवर” चर्चा केली असता असे कळाले की
१. आत्महत्या केलेले शेतकरी अगोदर खुप निराश होते.
२. आत्महत्येपुर्वी काही काळ (३ ते ४ महिणे) ते खुपच एकलकोंडे झालेले होते.
३. यांना माहितीची कमतरता दिसुन आली.
४. नैसर्गीक आपत्तीपासुन सावरता येत नसल्याने हळुहळु खचत होते.
५. सावकारी कर्ज वाढले होते व संबंधीत सावकर पैश्याचे जोरावर माणसिक ञास देत होते.
६. काही जणांचे तर कौटुंबिक स्तरावरील वाद टोकावर गेलेले जे कोणाशी व्यक्त करता येत नव्हते.
७. ज्यांच्याकडे मदत मागितली त्यांनी वेळीच मदत न करता मजाक उडवला.
८. राजकीय पार्श्वभुमी समाजाला विघातक वळणावर घेवुन जात आहे.
९. शासकीय अधिकारी जाणुनभुजून ठराविक लोकांनाच मदत करतात.

या सर्व प्रवासादरम्यान केलेल्या निरीक्षणावरुन असे वाटते की -

१. शेतकर्यांनी कोणताही टोकाचा निर्णय घेणेपुर्वी किमान एकदा आम्हास लिखीत स्वरुपात कळवावे.
२. बदललेली नैसर्गीक अवस्था पाहता विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली पिक पद्धतीत बदल करावेत.
३. संस्थेचे पदाधिकारी आपल्या आसपास असतात, त्यांचा सल्ला घ्या किंवा आम्हास कळवा. गोपनियता पाळणे हे आमचे परम कर्तव्य आहे.
४. शेतकर्यांना मानधन, पेन्शन, विमा, मेडिकल, मुलांचे शिक्षण, शिष्यवृत्ती व तत्सम सुविधा चालु करणेबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे. याबाबत प्रस्ताव करणे चालु आहे.
५. संघटना मजबुत करणेसाठी जिल्हा, तालुका व गावनिहाय रचना करणे.

आपला विनीत,
महेश बोरगे, सांगली (सावळज)
~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
मोबाईल - ०९९७५७४०४४४
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444

बहुचर्चित उस उत्पादक शेतकरी श्री. दत्ताञय पाटील, अंजनी यांच्या ऊस क्षेञास माझीशेतीची सदिच्छा भेट

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान (२७.११.२०१४):

बहुचर्चित उस उत्पादक शेतकरी श्री. दत्ताञय पाटील, अंजनी यांच्या ऊस क्षेञास माझीशेतीची सदिच्छा भेट

मागील बरेच दिवसांपासुन चर्चेत असणार्या श्री. दत्ताञय पाटील यांच्या ऊस क्षेञास भेट देण्याचा योग आज आला. मागील आठवड्यातील संस्थेच्या ‘महाराष्ट्र दौर्याचे’ वेळी २ ते ३ ठिकाणी संबंधीत ऊस आणि बियाण्यांबद्दल चर्चा झाली. त्यामुळे आम्ही भेटीचे नियोजन केले होते.
    श्री. दत्ताञय पाटील यांनी शेतकर्यांना एकाच ठिकाणी सर्व उत्तम प्रतीच्या बियाण्यांची उपलब्धता केलेली आहे. त्यामध्ये सिध्दगीरी १२३४,
नीरा-८६०३२,
कोईमतुर-०३१०२,
कोईमतुर -९८०५,
आधार
अश्या निरोगी ऊस बियाण्यांचे उत्पादन व संगोपन सुरु केले आहे. माझीशेती शिष्टमंडळातील सदस्य अंजनी, ता.तासगांव (सांगली) येथे पोहचुन ऊस पाहेपर्यंत बरेच शिष्टमंडळातील सदस्य नकारार्थी होते कारण मुळात अंजनी, ता.तासगांव (सांगली) हे ठिकाण ‘सेमी क्रिटीकल’ झोनमध्ये येत असल्यामुळे या दुष्काळी भागात उत्पादित केलेला ऊस कसा असेल या विषयावर आमची चर्चा चालुच होती पण वास्तवात जेंव्हा ऊस क्षेञ पाहिले तेंव्हा सदरच्या ऊस बियाण्यांचे उत्पादन व संगोपन चांगल्या पद्धतीने केले गेले आहे हे जाणवले... 
     आम्हास जाणविले
* ऊस पडलेला नव्हता.
* उंची सरासरी सुमारे १५ फुटांपर्यंत होती.
* सरळ व सशक्त वाढ झालेली दिसली.
* पानांवर कुस नव्हती.
* फुटवे १३ ते १४ होते.
* तुरा दिसुन आला नाही.
* व्यवस्थापन संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने केले आहे.
* ऊसाचे साधारण वजन ४ ते ५ किलो आहे.
      श्री. दत्ताञय पाटील, अंजनी, ता.तासगांव (सांगली) यांनी सुरु केलेली शेतकरी सेवा ही वाखाणन्याजोगी आहे. त्यांच्याशी चर्चा करताना ते म्हणाले की ऊसाची उंची जास्त असली तरी ऊस सशक्त असल्यामुळे पडत नाही, विक्रमी उंची व वजन, सरळ व जोमदार वाढ, पानावर कुस नाही, त्यामुळे जनावरांच्या चार्रयासाठी उपयुक्त,शतप्रतिशत जर्रमिनेशन, गुळासाठी उत्तम, फुटवे १० ते १५, लवकर तुरा(झेंडा) येत नाही, यापैकी काही पाण्याचा ताण सहण करणार्या नविन जाती, १००% संपूर्ण शेंद्रिय व्यवस्थापन, १२ ते १३ महीन्यात पाणी लांबवीले की रिकवरी १२/१४ लागते, पुर्ण वाढलेला एक ऊस ४ ते ४.५ किलो भरतो. यातील काही जाती आपल्या भागात नवीन असलेने रोपवाटीकावाले जादा दर आकारून शेतकर्यांना लुबाडत आहेत.
      या ऊसाच्या संगोपनाबद्दल सांगताना श्री.दत्ताञय पाटील म्हणाले, शेतीला उन्हाळ्यात पाणी कमी असलेने कोणत्याही रासायनीक खताचा वापर न करता पूर्ण पणे शेंद्रीय नियोजन केले असून पाणी कमतरतेमुळे 26 जानेवारीला लागवड केलेला ऊस 26 जुनला मोठी बांधनी केलेचे सांगीतले. परंतू ,"ऊसाची लागण ही 5 बाय 2.5 फुटावर दोन कांडी (डोळे) आणि दीड महीण्यात बाळबांधणी व साडे तीन महीण्यात मोठी बांधनी व्हायलाच हवी आणि ऊस हे जास्त कालावधीचे पीक असलेने खतांचा वापर एकवेळच भरमसाठ न करता तीन वेळेस विभागून केलेस व त्याबरोबरच सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावयास हवा," असे नमुद केले.

~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
वेबसाईट - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444