Wednesday, February 21, 2018

महिला सक्षमीकरण : बचत गटांचे योगदान

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या २५ वर्षे पुर्ण केलेबद्दल
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
कार्यशाळेची सुरुवात सावित्रीबाईफुले यांच्या प्रतिमा पुजनाने
 करताना मा. संरक्षण अधिकारी श्री. रावताळेसो व सहाय्यक
संरक्षण अधिकारी पंचायत समिती, तासगाव.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तासगाव जि.सांगली येथे व्यावसायिक शेतकरी महिला सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. मा. संरक्षण अधिकारी श्री. रावताळे साहेब यांचे हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणामध्ये श्रीमती प्राजक्ता पाटील यांनी सावित्रीबाईनी समाजाशी दिलेला लढा आणि आताच्या जमान्यात महिलांना उपजीविकेसाठी द्यावा लागणारा लढा याचे अलंकारिक भाषेत वर्णन केले.

मा. संरक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनापासून कार्यक्रमाला सुरुवात झाली. महिलांनी सक्षम होण्याकरिता प्रथम महिलांनी एकत्र येणे गरजेचे आहे हे सांगत रावताळे सरांनी एकीचे महत्व पटवून दिले. शासनाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन समजावून सांगताना त्यांनी महिलांचे अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली. 
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या २५ वर्षे पुर्ण केलेबद्दल
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान यांच्यासोबत संयुक्त विद्यमाने
आयोजित कार्यशाळेमध्ये मा. संरक्षण अधिकारी यांचे मार्गदर्शन 
संरक्षण अधिकारी म्हणुन काम करताना असणाऱ्या जबाबदारीचे विश्लेषण करून महिलांच्या पाठीशी भावासारखे खंबीरपणे उभा राहण्याचे आश्वासन दिले. ग्रामीण भागात महिलांनी चिकाटीने आणि जिद्दीने सुरु केलेल्या उद्योगांची यशोगाथा दिल्लीपर्यंत पोहचल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

संस्थेचे अध्यक्ष महेश बोरगे, उपजिविका तज्ञ यांनी ग्रामीण भागाच्या विकासामध्ये शेतकरी विकास प्राधान्याने करणे आणि त्यासाठी उद्योजक महिला बचत गट, इतर सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणा यांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे असे सांगितले. त्यांनी व्यावसायिक स्तरावर शेती व्यवस्थापन करण्यावर महिला शेतकऱ्यांनी भर द्यावा असे सांगितले. शेती व्यवस्थेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करताना हवामान अंदाज, बाजारभाव, पिकसल्ला, शासकीय योजना यांची माहिती घेणे कसे महत्वाचे आहे यावर माहिती दिली. 
महाराष्ट्र राज्य महिला आयोग २५ वर्षे पुर्ण झालेच्या निमित्ताने
कार्यशाळेमध्ये व्यावसायिक शेती व्यवस्थापन व माहिती तंत्रज्ञानाचा
ग्रामीण विकासामध्ये उपयोग याविषयावर मार्गदर्शन करताना
श्री. महेश बोरगे, उपजिविका तज्ञ व माझीशेती प्रमुख 

महिला बचत गटांच्या माध्यमातुन ग्रामीण भागात निर्माण होणारा रोजगार आणि आर्थिक सक्षमता यांचे उदाहरण देत उपस्थित महिलांना बोलते केले. माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या उपजिविका विकास कार्यक्रमाची माहिती देऊन त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी शेती आणि शेती पुरक व्यवसायांची शृंखला तयार करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आम्ही महिलांच्या औद्योगिक सद्गुणांना वाव देण्यासाठी गौरव करण्यासाठी सदैव तत्पर आहे, असे सांगितले.

शासनाने ई- गव्हर्नन्स मध्ये घेतलेला पुढाकार हा ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा चेहरा बदलून देईल हे सांगताना त्यांनी संगणकीय भाषेतील डोमेन आणि वेबसाईट याबाबत माहिती देत शासकीय, खाजगी, शैक्षणिक, व्यावसायिक वेबसाईट कश्या ओळखायच्या हे सांगितले. माहिती तंत्रज्ञान आणि सोशल मिडिया याचे फायदे –तोटे समजावून सांगताना त्यांनी ‘ब्ल्यु व्हेल’ या ऑनलाईन खेळाचे गंभीर परिणाम सांगितले. सोशल मिडिया आणि संकेतस्थळे यांचा व्यवसाय वृद्धीसाठी वापर करणेसाठी संस्थेची बहुआयामी डिजिटल व्यासपीठ उपयोग करण्याबाबत प्रोत्साहन दिले. या योजनेचा विद्यार्थी, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांना होणारा उपयोग आणि त्यातुन रोजगार निर्मिती याकडे लक्ष वेधले. सहभागी महिलांना शंका विचारून त्यांनी भाषणाची सांगता केली.

मा. वकील श्री. राजेंद्र माने, यांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा - १९५६, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधि. - २०१३, भारतीय दंडसंहिता कलमे - ३७६, ४७९, ४९३, ४९४, ४९५, ४९६, ४९८ (अ), ३५४, ३७६, ५०४, ५०६, ५०९ आणि सायबर क्राईम अधि. - २०१५, कौटुंबिक हिंसाचार - २००५, तिहेरी तलाक, हिंदु वारसा हक्क, प्रसूतीपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायदा - १९९४, बाल-लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (POCSO) - २०१२ या कायद्यांचे सविस्तर मार्गदर्शन केले. 
महाराष्ट्र राज्य महिला आयोग २५ वर्षे पुर्ण झालेच्या निमित्ताने
कार्यशाळेमध्ये ग्रामीण विकासामध्ये उपयोग याविषयावर
मार्गदर्शन करताना मा. वकील श्री. राजेंद्र माने

न्यायालयातील विकृत मानसिकतेचे अनुभव सांगताना त्यांनी उपस्थितांना भावनांच्या परमोच्च शिखरावर नेले. कार्यक्रमादरम्यान दुखःद अनुभव सांगताना उपस्थितांचे डोळे पाणावून गेले तसेच काही अनुभवातून सभागृहात हास्यफवारे उडाले. महिलांनी आणि पुरुषांनी सामाजिक ठिकाणी घ्यावयाची काळजी यावरील त्यांचे प्रबोधन मोलाचे ठरले.


कार्यकमाची सांगता बचत गटातील उद्योजक महिला यांनी स्वतः शंका आणि प्रश्नांच्या माध्यमातुन सर्व सहभागी शासकीय, कंत्राटी, निमशासकीय महिला कर्मचाऱ्यांच्या व बचत गटांच्या वतीने आभार प्रदर्शित केले. एकंदरीत संपुर्ण कार्यक्रम नियोजित कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे  पार पडला.


गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि देश पातळीवर स्वतःच्या कर्तुत्वाने दिशादर्शकाचे काम करणाऱ्या माय-माऊलींना प्रशस्तीपत्राने सन्मानित करताना मान्यवर...

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशस्वी महिला उद्योजक आणि सक्षम बचत गटांना सन्मानित करणेत आले.

कार्यक्रमातील क्षणचित्रे - 
 

Wednesday, February 14, 2018

सक्षम पिढी जी महिलांना सक्षम म्हणुनच जन्माला घालेल यासाठी माझीशेतीचा भावी शिक्षक भगिनींना उपदेशाचा डोस...

महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तासगाव जि.सांगली येथे व्यावसायिक शेतकरी महिला सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती प्राजक्ता पाटील यांनी केले.


संस्थेचे अध्यक्ष महेश बोरगे, उपजिविका तज्ञ यांनी ग्रामीण भागाच्या विकासामध्ये शेतकरी विकास प्राधान्याने करणे आणि त्यासाठी विद्यार्थी, उद्योजक, इतर सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणा यांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे असे सांगितले. त्यांनी व्यावसायिक स्तरावर शेती व्यवस्थापन करण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा असे सांगितले. शेती व्यवस्थेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करताना हवामान अंदाज, बाजारभाव, पिकसल्ला, शासकीय योजना यांची माहिती घेणे कसे महत्वाचे आहे यावर माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रत्यक्ष जीवनात होणारा उपयोग आणि ग्रामीण जीवनाकडे ओढा वाढविण्यासाठी संस्थेची ‘विद्यार्थी विकास योजना’ आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे रु. १०००/- प्रतिमाह मानधन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी शेती आणि शेती पुरक व्यवसायांची शृंखला तयार करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी शासन सदैव तत्पर आहे. 

शासनाने ई- गव्हर्नन्स मध्ये घेतलेला पुढाकार हा जितका चांगला तितकाच वाईट आहे हे सांगताना त्यांनी .com, .org, .in, .edu अश्या संगणकीय भाषेतील डोमेन आणि वेबसाईट यामधील फरक समजावून सांगितला. सोशल मिडिया आणि संकेतस्थळे यांचा व्यवसाय वृद्धीसाठी वापर करणेसाठी संस्थेची बहुआयामी डिजिटल व्यासपीठ उपयोग करण्याबाबत प्रोत्साहन दिले. या योजनेचा विद्यार्थी, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांना होणारा उपयोग आणि रोजगार निर्मिती याकडे लक्ष वेधले. सहभागी मुलींना शंका विचारून त्यांनी भाषणाची सांगता केली.


मा. श्री. प्रमोद गुरव, महिला व बाल विकास तज्ञ यांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा - १९५६, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधि. - २०१३, भारतीय दंडसंहिता कलमे - ३७६, ४७९, ४९३, ४९४, ४९५, ४९६, ४९८ (अ), ३५४, ३७६, ५०४, ५०६, ५०९ आणि सायबर क्राईम अधि. - २०१५, कौटुंबिक हिंसाचार - २००५, तिहेरी तलाक, हिंदु वारसा हक्क, प्रसूतीपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायदा - १९९४, बाल-लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (POCSO) - २०१२ या कायद्यांचे सविस्तर मार्गदर्शन केले.

त्यांना समुपदेशन केंद्रातील अनुभवाच्या सहाय्याने त्यांनी उपस्थितांना भावनांच्या परमोच्च शिखरावर नेले. कार्यक्रमादरम्यान दुखःद अनुभव सांगताना उपस्थितांचे डोळे पाणावून गेले तसेच मनोरुग्णांचे अनुभव सांगताना सभागृहात हास्यफवारे उडाले. मुलींनी सामाजिक ठिकाणी घ्यावयाची काळजी यावरील प्रबोधन मोलाचे ठरेल. 

कार्यकमाची सांगता श्रद्धा पाटील यांनी स्वतः शंका आणि प्रश्नांच्या माध्यमातुन केले. त्यांनी सर्व सहभागी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार प्रदर्शित केले. एकंदरीत संपुर्ण कार्यक्रम नियोजित कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे  पार पडला.

Tuesday, February 13, 2018

Fertilizers - Need to change mindsets of farmers - Mahesh Borge

As usual at early morning farmer get ready to go farm for farming. Much of time they didn't know what he have to do in farm. farmers are doing basic practices in their farm, Prepare land for sowing and planting plants. spraying or spreading fertilizers at twice during season. finally crop is ready for harvesting. no one could resist those practice of farmer. actually it happens only due to lack of knowledge & observation.

overall practices of crop production are very expensive and tough for production. overall season nature plays vital role in production. due to climate change overall practices are resulted in loss. no one can says when weather conditions turns towards harmful for crop. when farmer adopt advanced practices it may results in higher productivity with less expenses. advanced practices are simple, less exertive & it results in increased production. 

Kaine Korzekwa, a science communicator says, during farming farmer needs to take lot of decisions. Fertilize farm is one of most important decision of farming. How much fertilizer to apply & when to apply is the most complicated decision of farmer cause applying more than necessity OR applying at wrong time is waste. it results in polluted soil & environment, also effect on farmers pocket. 

Handy device to check NPK available in plants
Telha Rehman from California University, Davis says, the most wasteful application of nitrogen fertilizer occurs in the middle of season. This is because its hard for farmers to know how much nitrogen (N) is already available to the crops. he is working to find handy device that farmers can use to measure the amount of nitrogen already in their crops.

Nitrogen (N), Phosphorus (P) & Calcium (K) are the basic elements for growing period. as they are necessary elements farmers tends to use these separate or combined form in traditional way. most of dosage used by farmers during plantation or sowing. they didn't notice what is soil requirement? what is crop requirement? How to measure amount of NPK available for crop OR in crop. 

Overall farmers have to change their mindsets to adopt advanced and innovate agricultural practices. utilize existing resources which is available free of cost in nature. Mazisheti Shetakari Pratishthan [farmers foundation] implementing such practices in rural area of Maharashtra region.

Monday, February 12, 2018

व्यावसायिक शेतकरी महिला सक्षमीकरण = रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महिला आयोग आणि माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळा

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त
महिला आयोग आणि माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळा
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तासगाव जि.सांगली येथे व्यावसायिक शेतकरी महिला सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. एस. बी. पाटील यांनी केले. त्यांनी महिला आयोगाची स्थापना आणि आतापर्यंतची वाटचाल यावर प्रकाशझोत टाकला. 


संस्थेचे अध्यक्ष महेश बोरगे, उपजिविका तज्ञ यांनी ग्रामीण भागाच्या विकासामध्ये शेतकरी विकास प्राधान्याने करणे आणि त्यासाठी विद्यार्थी, उद्योजक, इतर सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणा यांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे असे सांगितले. त्यांनी व्यावसायिक स्तरावर शेती व्यवस्थापन करण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा असे सांगितले. शेती व्यवस्थेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करताना हवामान अंदाज, बाजारभाव, पिकसल्ला, शासकीय योजना यांची माहिती घेणे कसे महत्वाचे आहे यावर माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रत्यक्ष जीवनात होणारा उपयोग आणि ग्रामीण जीवनाकडे ओढा वाढविण्यासाठी संस्थेची ‘विद्यार्थी विकास योजना’ आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे रु. १०००/- प्रतिमाह मानधन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी शेती आणि शेती पुरक व्यवसायांची शृंखला तयार करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी शासन सदैव तत्पर आहे.

कार्यशाळेमध्ये व्यावसायिक शेती व्यवस्थापन व
 माहिती तंत्रज्ञानाचा ग्रामीण विकासामध्ये उपयोग 
याविषयावर बोलताना श्री. महेश बोरगे, उपजिविका तज्ञ
शासनाने ई- गव्हर्नन्स मध्ये घेतलेला पुढाकार हा जितका चांगला तितकाच वाईट आहे हे सांगताना त्यांनी .com, .org, .in, .edu अश्या संगणकीय भाषेतील डोमेन आणि वेबसाईट यामधील फरक समजावून सांगितला. सोशल मिडिया आणि संकेतस्थळे यांचा व्यवसाय वृद्धीसाठी वापर करणेसाठी संस्थेची बहुआयामी डिजिटल व्यासपीठ उपयोग करण्याबाबत प्रोत्साहन दिले. या योजनेचा विद्यार्थी, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांना होणारा उपयोग आणि रोजगार निर्मिती याकडे लक्ष वेधले. सहभागी मुलांना शंका विचारून त्यांनी भाषणाची सांगता केली.

मा. श्री. प्रमोद गुरव, महिला व बाल विकास तज्ञ यांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा - १९५६, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधि. - २०१३, भारतीय दंडसंहिता कलमे - ३७६, ४७९, ४९३, ४९४, ४९५, ४९६, ४९८ (अ), ३५४, ३७६, ५०४, ५०६, ५०९ आणि सायबर क्राईम अधि. - २०१५, कौटुंबिक हिंसाचार - २००५, तिहेरी तलाक, हिंदु वारसा हक्क, प्रसूतीपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायदा - १९९४, बाल-लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (POCSO) - २०१२ या कायद्यांचे सविस्तर मार्गदर्शन केले. 

कार्यशाळेमध्ये महिलांसाठी शासनाचे धोरण,
योजना आणि संरक्षण व कायदे याविषयावर बोलताना
श्री. प्रमोद गुरव, महिला व बाल विकास तज्ञ 
त्यांना समुपदेशन केंद्रातील अनुभवाच्या सहाय्याने त्यांनी उपस्थितांना भावनांच्या परमोच्च शिखरावर नेले. कार्यक्रमादरम्यान दुखःद अनुभव सांगताना उपस्थितांचे डोळे पाणावून गेले तसेच मनोरुग्णांचे अनुभव सांगताना सभागृहात हास्यफवारे उडाले. मुलींनी आणि मुलांनी सामाजिक ठिकाणी घ्यावयाची काळजी यावरील प्रबोधन मोलाचे ठरेल.

कार्यकमाची सांगता श्रद्धा पाटील यांनी स्वतः शंका आणि प्रश्नांच्या माध्यमातुन सर्व सहभागी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार प्रदर्शित केले. एकंदरीत संपुर्ण कार्यक्रम नियोजित कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे  पार पडला.

कार्यक्रम सहभाग अंमलबजावणी पथक
लेखक         –        रिया चौधरी, मुख्य प्रकल्प समन्वयक [पुणे विभाग]
वक्ते             –        श्री. महेश बोरगे, उपजिविका तज्ञ [अध्यक्ष माझीशेती शेतकरी प्रतिष्ठाण]
वक्ते             –        श्री. प्रमोद गुरव, महिला व बालविकास तज्ञ [व्याख्याते]
समन्वय        –        श्री. रावसाहेब देशमुख, 
फोटोग्राफी   –        श्री. धनंजय उरणे 
सहाय्यक      –        श्री. स्वप्नील गेंड, श्री. सोमनाथ पाटील 
डिजिटल       –        माऊली डिजिटल
स्टेशनरी       –        एस. एफ. नेट कॅफे
आयटी          –        अश्विनी शिंदे
प्रवास           –        मंगलमुर्ती मोटर्स
केटरिंग       –        संगीता मंडप डेकोरेशन
दृकश्राव्य      –        संगीता मंडप डेकोरेशन

Saturday, January 27, 2018

लेखापरीक्षण, कर आणि व्यवस्थापन कार्यशाळा

लेखापरीक्षण, कर आणि व्यवस्थापन कार्यशाळा १. GST कायदा फायदा आणि तोटा २. नोंदणी, ऑनलाईन भरणा आणि लेखापरीक्षण ३. उद्योग / व्यवसाय निहाय घ्यावयाची काळजी ४. 15K डिजिटल platform योजनेचे विश्लेषण ५. प्रश्नोत्तरे व्यवसाय करणे आणि वाढविणे हे आता पाहिल्यासारखे अवघड राहिले नाही. ग्रामीण भागात तंत्रज्ञानाची उणीव भासते परिणामी जागतिक स्तरावर जेंव्हा सिंहावलोकन केले जाते तेंव्हा समजते कि फक्त उत्पादन करणे आताच्या उद्योगांना अभिप्रेत नाही. डिजिटायझेशन करणे हे आता प्रत्येक उद्योगाचा श्वास बनला आहे.
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या "संस्था संसाधन केंद्र"मार्फत ग्रामीण जिज्ञासू व्यावसायिकांना मार्गदर्शन होण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. ग्रामीण तरुणांना जागतिक दर्जाचे उद्योगासाठीचे तंत्रज्ञान मिळावे, उद्योगधंद्यांना सर्व सुविधा एका छताखाली देण्यापाठीमागे रोजगार निर्मिती हे आमचे एकमेव उद्दिष्ट आहे. यासाठी Digital platform या उपक्रमामधुन ४ तारखेला "वस्तु व सेवा कर (GST) कायदा जनजागृती" प्रशिक्षण आयोजित केले आहे. व्यवसाय वृद्धीचा प्रश्न आहे?? आता लगेच खालील लिंकवरून नोंदणी करा. किंवा कॉमेंट मध्ये तुमचा नं.द्या मी कॉल करेन. - महेश बोरगे (MBA, MRD) Livelihood Expert, maheshborge@gmail.com

★ शेतकरी बांधवांसाठी उपक्रम ★
मोफत मार्गदर्शन, प्रशिक्षण, अनुदानित निविष्ठा, कृषि उत्पादन विक्री सहाय्य, शासकीय योजना, अभ्यास दौरा, गौरव पुरस्कार.... अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

 सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी उपक्रम ★
गावातच कायम नोकरी, वार्षिक बढती, सामाजिक सेवेची संधी, 10वी, 12वी पासून उच्च शिक्षित तरूणांना नोकरी आणि बरेच काही... अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

 विद्यार्थी विकास उपक्रम ★
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सोबत स्टायपेंड, इंटर्नशिप, नोकरी व व्यवसाय, निवडक विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी नोकरी.... अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

 व्यावसायिकांसाठी उपक्रम ★
व्यवसाय वृद्धी, डिजिटल तंत्रज्ञान, आधुनिक माहिती कार्यशाळा, अभ्यास दौरा.... अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
★ महिला सबलीकरण करिता कौशल्य विकास उपक्रम ★
मार्गदर्शन, इंटर्नशिप, नोकरी, व्यवसाय.... नोंदणीसाठी इथे क्लिक करा. 

Sunday, January 21, 2018

स्टीयरिंग व्हील जॅम झाल्यामुळे गाडी पलटी, ड्रायव्हर सह इतर दोघेजण किरकोळ जखमी

अपघातानंतर गाडी मधील द्राक्ष मालाचे नुकसान झाले.
विस्ककटलेले क्रेट व द्राक्षे 
हरियाणाच्या व्यापाऱ्याची द्राक्षाची गाडी तासगाव गावच्या हद्दीत पलटी, ड्रायव्हर सह गाडीतील दोन व्यक्ती किरकोळ जखमी सुमारे 45 हजाराच्या द्राक्षमालाचे नुकसान

रस्त्याच्या बाजूला पलटी झालेली गाडी व बाहेर काढलेली द्राक्षे 
ड्रायव्हरच्या कौशल्याने या विचित्र अपघातात मालवाहतूक करणारी गाडी
इलेक्ट्रिक पोलच्या आणि बाभळीच्या मध्ये पलटी झाल्याने मोठा अपघात टळला.
अपघात ठिकाणाहून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित माल वाहतूक करणारी गाडी ही सावलाज परिसरातील शेतकऱ्यांच्या बागेतून द्राक्ष खरेदी करून शिर्डीकडे निघाली होती. गाडीचे स्टीयरिंग व्हील जॅम झाल्यामुळे गाडी वळवता अली नाही. गाडीचे संतुलन बिघडल्यामुळे रस्त्याच्या उजव्या बाजूला पलटी झाली. गाडीत ड्रायव्हर सह इतर दोघेजण होते त्यांना किरकोळ जखमी झालेल्या अवस्थेत सवलाज येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 





★ शेतकरी बांधवांसाठी माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचे उपक्रम ★
मोफत मार्गदर्शन, प्रशिक्षण, अनुदानित निविष्ठा, कृषि उत्पादन विक्री सहाय्य, शासकीय योजना, अभ्यास दौरा, गौरव पुरस्कार.... अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

 सुशिक्षित बेरोजगार ग्रामीण युवकांसाठी माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचे रोजगार निर्मिती उपक्रम ★
गावातच कायम नोकरी, वार्षिक बढती, सामाजिक सेवेची संधी, 10वी, 12वी पासून उच्च शिक्षित तरूणांना नोकरी आणि बरेच काही... अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

 विद्यार्थ्यांना अनुभवांवर मार्गदर्शन व भावी करिअरकरिता विद्यार्थी विकास उपक्रम ★
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सोबत स्टायपेंड, इंटर्नशिप, नोकरी व व्यवसाय, निवडक विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी नोकरी.... अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

★ महिला सबलीकरण करिता कौशल्य विकास उपक्रम ★
मार्गदर्शन, इंटर्नशिप, नोकरी, व्यवसाय.... अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. 

Monday, December 25, 2017

रब्बी ज्वारी लागवड माहिती

जमीन
मध्यम ते भारी, पाण्याचा निचरा होणारी व पाणी साठवून ठेवणारी जमीन आवश्यक आहे. 

बियाणे निवड 
अ.नं.
उपयोग
वाण
कडबा उत्पादन
फुले चित्रामालदांडीफुले यशोदा, CSV-22, परभणी ज्योती CSV-18, फुले वसुधा, RSV-1006
२.
कोरडवाहूकमी पाणी / दुष्काळग्रस्त भागासाठी 
फुले चित्राफुले माऊलीमालदांडीसिलेक्शन-3, फुले अनुराधा 
३.
रोग प्रतिकारशक्ती
फुले चित्राफुले माऊलीमालदांडीफुले यशोदापरभणी ज्योतीफुले वसुधा, RSV-1006, सिलेक्शन-3, फुले अनुराधा 
४.
माझीशेती शिफारस 
फुले चित्रामालदांडी 



बीज प्रक्रिया
गंधक (३०० मेश) ४ ग्रॅम प्रति किलो आणि पेरणी थायोमेथोक्‍झाम (७० टक्के) ३ ग्रॅम प्रतिकिलो अशी बीजप्रक्रिया करावी.

पेरणी 
१ सप्टेंबर ते १५ ऑक्‍टोबरपर्यंत शेवटचा कालावधी (०१ ते १० ऑक्टोबर) सर्व बाजूने फायदेशीर ठरतो. 

खत व्यवस्थापन 
पेरणीपूर्वी ७५० किलो शेणखत अधिक २० किलो नत्र प्रति हेक्‍टरी द्यावे. 
अ.नं.
पिक
खत मात्रा
जिरायती ज्वारी
४० किलो नत्र, २० किलो स्फुरद पेरणी बरोबर
२.
बागायती ज्वारी
८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० पालाश
यापैकी अर्धे नत्र व पूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीवेळेस व अर्धेनत्र ३५ ते ४० दिवसांनी पाण्याच्या पाळीबरोबर द्यावे.

पाणी व्यवस्थापन 
अ.नं.
पाणी
पिक स्थिती
दिवस
पहिले  
जोमदार वाढीच्या अवस्थेत
पेरणी नंतर २५-३० दिवसांनी
२.
दुसरे
ज्वारी पोटरीत असताना  
पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी
३.
तिसरे
ज्वारी फुलोऱ्यात असताना
पेरणीनंतर ७०-७५ दिवसांनी
४.
चौथे
कणसात दाणे भरताना
पेरणीनंतर ९० ते ९५ दिवसांनी
कीड-रोग नियंत्रण 

कणसावरील चिकटा
वातावरणातील थंडीचे प्रमाण वाढल्यास ज्वारीवर चिकट्याचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात मोठी घट होते.
रोगाची लक्षणे-
कणसाच्या फुलाच्या गुच्छांतुन मधासारखा चिकट द्रव स्त्रवून संपूर्ण कणीस काळे पडते. परागीकरण न केलेले मादी वाण संपूर्णपणे या रोगास बळी पडून दाणे भरण्यावर विपरीत परिणाम होतो.

रोगाचे नियंत्रण- 
◆ बांधावरील दुय्यम पोशिंदा वनस्पती (उदा. बहुवार्षिक गवत) नष्ट कराव्यात.
◆ पीक ५०% फुलोरावस्था सुरु झाल्यानंतर पंधरा दिवसांच्या अंतराने थायरम २ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलीटर पाण्यातून फवारावे. वरील फवारणी गरजेनुसार करावी.

आंतर / मिश्रपीक 
अधिक थंडीमुळे करडई चे चांगले उत्पादन होते. वातावरणातील या संतुलणाचा विचार केला तर रब्बी ज्वारी आणि करडई यांचे ४:४ किंवा ६:३ या प्रमाणात मिश्र पीक घ्यावे.

Sunday, December 3, 2017

शासनाने मदत किती करावी आणि कशी करावी....


शासनाने मदत किती करावी आणि कशी करावी....

www.mazisheti.org/p/2017/12/proagro.html


कोणी कितीही जीवाचा आटापिटा केला तरी प्रत्येक सरकार (प्रत्येक सत्ताधारी) निवडणूक आणि भविष्यातील तरतुदिसाठीच काम करत असतात. गेली ५ ते ६ महिने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना खेळवले जात आहे. माझ्या माहितीप्रमाणे दिवाळीपूर्वी रात्रीच्या २ - ३ वाजेपर्यंत बसून शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले. ज्या आशेने शेतकऱ्यांनी हा उपद्व्याप केला त्याचा त्यांना लाभ मिळेलही... एखाद्याकडून काहीतरी मिळेल या आशेने वेळ घालवणे माझ्या बुद्धीला पटत नाही.

शेतकऱ्यांनी स्वताच्या शेतीवर व्यावसाईक नियोजन करणे आणि आवश्यकतेनुसार एकमेकांसोबत व्यावहारिक करार करून जास्तीत जास्त नफा कमविणे क्रमप्राप्त झाले आहे. शहरी भागात येणारा माल वेगवेगळ्या सोसायट्यांना शेतकऱ्यांच्या नावावर खपवला जात आहे. शासनाची थेट ग्राहक देण्याची योजना व्यापार्यांनी बळकावली आहे. सेन्द्रीयाच्या नावावर काय दिले जाते हे देणार्यांनाच माहिती असावे. परवा मला whats app वर गाडीवरून विकणाऱ्या भैय्याचे 'भाजी ताजी ठेवण्यासाठीचा खटाटोप' पाहताना समजले कि हे लोक प्रसंगी गटारीतील पाणी टाकायला कमी करत नाहीत. पण एखादा शेतकरी स्वतः त्याचा माल द्यायला गेला तर मात्र १०० प्रश्न विचारून दर पाडला जातो. शहरी लोकांच्या खोचक बोलण्याला गावातील शेतकरी तग धरू शकत नाही. शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी गटांनी एकत्र येवून निवडक क्षेत्रावर करार करून / नोंदणी करून शेती केल्यास अपेक्षित व्यावसाईक गोष्टी साध्य होतील.

आम्ही कराड आणि सातारा परिसरात प्रायोगिक स्तरावर केलेल्या चाचपनीला चांगले यश आणि प्रतिसाद मिळाला. अगदी छोट्या आणि सुयोग्य नियोजनाने आम्ही ते साध्य केले. रेठरे कारखाना, भवानीनगर आणि वडगाव येथील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल कराडमधून स्टोअरमध्ये आणला. माझीशेती शेतकरी प्रतिष्ठाण Mazisheti Farmers Foundationच्या कराड मधील स्टोअरवर आलेला शेतमाल बचत गटांच्या प्रशिक्षित सदस्यांच्या सहाय्याने सुयोग्य पद्धतीने निवड, वर्गीकरण आणि वेष्टन लावून पुणे शहराकडे पाठविला गेला. वारजे पुलावरून माल घेवून जवळच असलेल्या शासनाने नेमून दिलेल्या जागेवर होलसेलमध्ये हा माल विकला. माझीशेतीच्या ग्रामीण आणि शहरी भागातील कार्यकर्त्यांनी यामध्ये मोलाचे सहकार्य केले. शेतमाल खरेदी किंमत, वाहतूक खर्च, ग्रामीण व शहरी कार्यकर्त्यांचे मानधन आणि मिळालेली विक्री किंमत यामध्ये संस्थेला प्रति किलो २२ रुपये मिळाले. हाच प्रयोग आम्ही बेदाणे उत्पादक शेतकऱ्यांवर केला. तासगावच्या बेदाणे मार्केटमधून खरेदी केलेला बेदाणा संस्थेच्या पुण्यातील कार्यालयाशेजारी असणार्या दुकानांना दिला. यामध्ये प्रति किलो ७० रुपये अतिरिक्त मिळाले.

स्वतः शेतकऱ्यांनी एकत्र येवून एकमेकांच्या सहाय्याने किंवा कराराने शेती उत्पादन करणे आणि त्याची विक्री केल्या तर त्यांच्या एका मेट्रिक टन पिकणाऱ्या फळभाजीला २२००० रुपये आणि एक टन बेदाण्यामागे रुपये ७०००० अधिकचे मिळू शकतात. शिवाय बचत गट व बेरोजगार तरुणांना मिळणारा / तयार होणारा रोजगार फायदा वेगळाच आहे. शेतकऱ्यांनी व्यावसाईक धोरण ठरवून पुढील नियोजन केले तर त्यांना कोणाकडेच हात पसरावे लागणार नाहीत. येणाऱ्या काळात हा प्रकल्प व्यापक स्वरूपावर राबविला जाणार आहे, आमच्याकडून शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला तर यथोचित सहकार्य केले जाईल. ज्या शेतकऱ्यांचे गट नाहीत त्यांनी आमच्या स्थानिक गटांमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद ....



महेश बोरगे... माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान® --------------- 📬 info@mazisheti.org 📲 8806908444, 8806907444 🖥 www.mazisheti.org 🗣 www.fb.com/agriindia
🐥twitter.com/mazisheti