Translate (Trial Version)

Wednesday, February 21, 2018

महिला सक्षमीकरण : बचत गटांचे योगदान

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या २५ वर्षे पुर्ण केलेबद्दल
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
कार्यशाळेची सुरुवात सावित्रीबाईफुले यांच्या प्रतिमा पुजनाने
 करताना मा. संरक्षण अधिकारी श्री. रावताळेसो व सहाय्यक
संरक्षण अधिकारी पंचायत समिती, तासगाव.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तासगाव जि.सांगली येथे व्यावसायिक शेतकरी महिला सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. मा. संरक्षण अधिकारी श्री. रावताळे साहेब यांचे हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणामध्ये श्रीमती प्राजक्ता पाटील यांनी सावित्रीबाईनी समाजाशी दिलेला लढा आणि आताच्या जमान्यात महिलांना उपजीविकेसाठी द्यावा लागणारा लढा याचे अलंकारिक भाषेत वर्णन केले.

मा. संरक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनापासून कार्यक्रमाला सुरुवात झाली. महिलांनी सक्षम होण्याकरिता प्रथम महिलांनी एकत्र येणे गरजेचे आहे हे सांगत रावताळे सरांनी एकीचे महत्व पटवून दिले. शासनाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन समजावून सांगताना त्यांनी महिलांचे अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली. 
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या २५ वर्षे पुर्ण केलेबद्दल
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान यांच्यासोबत संयुक्त विद्यमाने
आयोजित कार्यशाळेमध्ये मा. संरक्षण अधिकारी यांचे मार्गदर्शन 
संरक्षण अधिकारी म्हणुन काम करताना असणाऱ्या जबाबदारीचे विश्लेषण करून महिलांच्या पाठीशी भावासारखे खंबीरपणे उभा राहण्याचे आश्वासन दिले. ग्रामीण भागात महिलांनी चिकाटीने आणि जिद्दीने सुरु केलेल्या उद्योगांची यशोगाथा दिल्लीपर्यंत पोहचल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

संस्थेचे अध्यक्ष महेश बोरगे, उपजिविका तज्ञ यांनी ग्रामीण भागाच्या विकासामध्ये शेतकरी विकास प्राधान्याने करणे आणि त्यासाठी उद्योजक महिला बचत गट, इतर सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणा यांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे असे सांगितले. त्यांनी व्यावसायिक स्तरावर शेती व्यवस्थापन करण्यावर महिला शेतकऱ्यांनी भर द्यावा असे सांगितले. शेती व्यवस्थेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करताना हवामान अंदाज, बाजारभाव, पिकसल्ला, शासकीय योजना यांची माहिती घेणे कसे महत्वाचे आहे यावर माहिती दिली. 
महाराष्ट्र राज्य महिला आयोग २५ वर्षे पुर्ण झालेच्या निमित्ताने
कार्यशाळेमध्ये व्यावसायिक शेती व्यवस्थापन व माहिती तंत्रज्ञानाचा
ग्रामीण विकासामध्ये उपयोग याविषयावर मार्गदर्शन करताना
श्री. महेश बोरगे, उपजिविका तज्ञ व माझीशेती प्रमुख 

महिला बचत गटांच्या माध्यमातुन ग्रामीण भागात निर्माण होणारा रोजगार आणि आर्थिक सक्षमता यांचे उदाहरण देत उपस्थित महिलांना बोलते केले. माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या उपजिविका विकास कार्यक्रमाची माहिती देऊन त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी शेती आणि शेती पुरक व्यवसायांची शृंखला तयार करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आम्ही महिलांच्या औद्योगिक सद्गुणांना वाव देण्यासाठी गौरव करण्यासाठी सदैव तत्पर आहे, असे सांगितले.

शासनाने ई- गव्हर्नन्स मध्ये घेतलेला पुढाकार हा ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा चेहरा बदलून देईल हे सांगताना त्यांनी संगणकीय भाषेतील डोमेन आणि वेबसाईट याबाबत माहिती देत शासकीय, खाजगी, शैक्षणिक, व्यावसायिक वेबसाईट कश्या ओळखायच्या हे सांगितले. माहिती तंत्रज्ञान आणि सोशल मिडिया याचे फायदे –तोटे समजावून सांगताना त्यांनी ‘ब्ल्यु व्हेल’ या ऑनलाईन खेळाचे गंभीर परिणाम सांगितले. सोशल मिडिया आणि संकेतस्थळे यांचा व्यवसाय वृद्धीसाठी वापर करणेसाठी संस्थेची बहुआयामी डिजिटल व्यासपीठ उपयोग करण्याबाबत प्रोत्साहन दिले. या योजनेचा विद्यार्थी, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांना होणारा उपयोग आणि त्यातुन रोजगार निर्मिती याकडे लक्ष वेधले. सहभागी महिलांना शंका विचारून त्यांनी भाषणाची सांगता केली.

मा. वकील श्री. राजेंद्र माने, यांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा - १९५६, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधि. - २०१३, भारतीय दंडसंहिता कलमे - ३७६, ४७९, ४९३, ४९४, ४९५, ४९६, ४९८ (अ), ३५४, ३७६, ५०४, ५०६, ५०९ आणि सायबर क्राईम अधि. - २०१५, कौटुंबिक हिंसाचार - २००५, तिहेरी तलाक, हिंदु वारसा हक्क, प्रसूतीपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायदा - १९९४, बाल-लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (POCSO) - २०१२ या कायद्यांचे सविस्तर मार्गदर्शन केले. 
महाराष्ट्र राज्य महिला आयोग २५ वर्षे पुर्ण झालेच्या निमित्ताने
कार्यशाळेमध्ये ग्रामीण विकासामध्ये उपयोग याविषयावर
मार्गदर्शन करताना मा. वकील श्री. राजेंद्र माने

न्यायालयातील विकृत मानसिकतेचे अनुभव सांगताना त्यांनी उपस्थितांना भावनांच्या परमोच्च शिखरावर नेले. कार्यक्रमादरम्यान दुखःद अनुभव सांगताना उपस्थितांचे डोळे पाणावून गेले तसेच काही अनुभवातून सभागृहात हास्यफवारे उडाले. महिलांनी आणि पुरुषांनी सामाजिक ठिकाणी घ्यावयाची काळजी यावरील त्यांचे प्रबोधन मोलाचे ठरले.


कार्यकमाची सांगता बचत गटातील उद्योजक महिला यांनी स्वतः शंका आणि प्रश्नांच्या माध्यमातुन सर्व सहभागी शासकीय, कंत्राटी, निमशासकीय महिला कर्मचाऱ्यांच्या व बचत गटांच्या वतीने आभार प्रदर्शित केले. एकंदरीत संपुर्ण कार्यक्रम नियोजित कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे  पार पडला.


गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि देश पातळीवर स्वतःच्या कर्तुत्वाने दिशादर्शकाचे काम करणाऱ्या माय-माऊलींना प्रशस्तीपत्राने सन्मानित करताना मान्यवर...

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशस्वी महिला उद्योजक आणि सक्षम बचत गटांना सन्मानित करणेत आले.

कार्यक्रमातील क्षणचित्रे - 
 

Wednesday, February 14, 2018

सक्षम पिढी जी महिलांना सक्षम म्हणुनच जन्माला घालेल यासाठी माझीशेतीचा भावी शिक्षक भगिनींना उपदेशाचा डोस...

महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तासगाव जि.सांगली येथे व्यावसायिक शेतकरी महिला सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती प्राजक्ता पाटील यांनी केले.


संस्थेचे अध्यक्ष महेश बोरगे, उपजिविका तज्ञ यांनी ग्रामीण भागाच्या विकासामध्ये शेतकरी विकास प्राधान्याने करणे आणि त्यासाठी विद्यार्थी, उद्योजक, इतर सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणा यांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे असे सांगितले. त्यांनी व्यावसायिक स्तरावर शेती व्यवस्थापन करण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा असे सांगितले. शेती व्यवस्थेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करताना हवामान अंदाज, बाजारभाव, पिकसल्ला, शासकीय योजना यांची माहिती घेणे कसे महत्वाचे आहे यावर माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रत्यक्ष जीवनात होणारा उपयोग आणि ग्रामीण जीवनाकडे ओढा वाढविण्यासाठी संस्थेची ‘विद्यार्थी विकास योजना’ आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे रु. १०००/- प्रतिमाह मानधन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी शेती आणि शेती पुरक व्यवसायांची शृंखला तयार करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी शासन सदैव तत्पर आहे. 

शासनाने ई- गव्हर्नन्स मध्ये घेतलेला पुढाकार हा जितका चांगला तितकाच वाईट आहे हे सांगताना त्यांनी .com, .org, .in, .edu अश्या संगणकीय भाषेतील डोमेन आणि वेबसाईट यामधील फरक समजावून सांगितला. सोशल मिडिया आणि संकेतस्थळे यांचा व्यवसाय वृद्धीसाठी वापर करणेसाठी संस्थेची बहुआयामी डिजिटल व्यासपीठ उपयोग करण्याबाबत प्रोत्साहन दिले. या योजनेचा विद्यार्थी, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांना होणारा उपयोग आणि रोजगार निर्मिती याकडे लक्ष वेधले. सहभागी मुलींना शंका विचारून त्यांनी भाषणाची सांगता केली.


मा. श्री. प्रमोद गुरव, महिला व बाल विकास तज्ञ यांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा - १९५६, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधि. - २०१३, भारतीय दंडसंहिता कलमे - ३७६, ४७९, ४९३, ४९४, ४९५, ४९६, ४९८ (अ), ३५४, ३७६, ५०४, ५०६, ५०९ आणि सायबर क्राईम अधि. - २०१५, कौटुंबिक हिंसाचार - २००५, तिहेरी तलाक, हिंदु वारसा हक्क, प्रसूतीपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायदा - १९९४, बाल-लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (POCSO) - २०१२ या कायद्यांचे सविस्तर मार्गदर्शन केले.

त्यांना समुपदेशन केंद्रातील अनुभवाच्या सहाय्याने त्यांनी उपस्थितांना भावनांच्या परमोच्च शिखरावर नेले. कार्यक्रमादरम्यान दुखःद अनुभव सांगताना उपस्थितांचे डोळे पाणावून गेले तसेच मनोरुग्णांचे अनुभव सांगताना सभागृहात हास्यफवारे उडाले. मुलींनी सामाजिक ठिकाणी घ्यावयाची काळजी यावरील प्रबोधन मोलाचे ठरेल. 

कार्यकमाची सांगता श्रद्धा पाटील यांनी स्वतः शंका आणि प्रश्नांच्या माध्यमातुन केले. त्यांनी सर्व सहभागी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार प्रदर्शित केले. एकंदरीत संपुर्ण कार्यक्रम नियोजित कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे  पार पडला.

Tuesday, February 13, 2018

Fertilizers - Need to change mindsets of farmers - Mahesh Borge

As usual at early morning farmer get ready to go farm for farming. Much of time they didn't know what he have to do in farm. farmers are doing basic practices in their farm, Prepare land for sowing and planting plants. spraying or spreading fertilizers at twice during season. finally crop is ready for harvesting. no one could resist those practice of farmer. actually it happens only due to lack of knowledge & observation.

overall practices of crop production are very expensive and tough for production. overall season nature plays vital role in production. due to climate change overall practices are resulted in loss. no one can says when weather conditions turns towards harmful for crop. when farmer adopt advanced practices it may results in higher productivity with less expenses. advanced practices are simple, less exertive & it results in increased production. 

Kaine Korzekwa, a science communicator says, during farming farmer needs to take lot of decisions. Fertilize farm is one of most important decision of farming. How much fertilizer to apply & when to apply is the most complicated decision of farmer cause applying more than necessity OR applying at wrong time is waste. it results in polluted soil & environment, also effect on farmers pocket. 

Handy device to check NPK available in plants
Telha Rehman from California University, Davis says, the most wasteful application of nitrogen fertilizer occurs in the middle of season. This is because its hard for farmers to know how much nitrogen (N) is already available to the crops. he is working to find handy device that farmers can use to measure the amount of nitrogen already in their crops.

Nitrogen (N), Phosphorus (P) & Calcium (K) are the basic elements for growing period. as they are necessary elements farmers tends to use these separate or combined form in traditional way. most of dosage used by farmers during plantation or sowing. they didn't notice what is soil requirement? what is crop requirement? How to measure amount of NPK available for crop OR in crop. 

Overall farmers have to change their mindsets to adopt advanced and innovate agricultural practices. utilize existing resources which is available free of cost in nature. Mazisheti Shetakari Pratishthan [farmers foundation] implementing such practices in rural area of Maharashtra region.

Monday, February 12, 2018

व्यावसायिक शेतकरी महिला सक्षमीकरण = रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महिला आयोग आणि माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळा

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त
महिला आयोग आणि माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळा
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तासगाव जि.सांगली येथे व्यावसायिक शेतकरी महिला सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. एस. बी. पाटील यांनी केले. त्यांनी महिला आयोगाची स्थापना आणि आतापर्यंतची वाटचाल यावर प्रकाशझोत टाकला. 


संस्थेचे अध्यक्ष महेश बोरगे, उपजिविका तज्ञ यांनी ग्रामीण भागाच्या विकासामध्ये शेतकरी विकास प्राधान्याने करणे आणि त्यासाठी विद्यार्थी, उद्योजक, इतर सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणा यांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे असे सांगितले. त्यांनी व्यावसायिक स्तरावर शेती व्यवस्थापन करण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा असे सांगितले. शेती व्यवस्थेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करताना हवामान अंदाज, बाजारभाव, पिकसल्ला, शासकीय योजना यांची माहिती घेणे कसे महत्वाचे आहे यावर माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रत्यक्ष जीवनात होणारा उपयोग आणि ग्रामीण जीवनाकडे ओढा वाढविण्यासाठी संस्थेची ‘विद्यार्थी विकास योजना’ आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे रु. १०००/- प्रतिमाह मानधन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी शेती आणि शेती पुरक व्यवसायांची शृंखला तयार करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी शासन सदैव तत्पर आहे.

कार्यशाळेमध्ये व्यावसायिक शेती व्यवस्थापन व
 माहिती तंत्रज्ञानाचा ग्रामीण विकासामध्ये उपयोग 
याविषयावर बोलताना श्री. महेश बोरगे, उपजिविका तज्ञ
शासनाने ई- गव्हर्नन्स मध्ये घेतलेला पुढाकार हा जितका चांगला तितकाच वाईट आहे हे सांगताना त्यांनी .com, .org, .in, .edu अश्या संगणकीय भाषेतील डोमेन आणि वेबसाईट यामधील फरक समजावून सांगितला. सोशल मिडिया आणि संकेतस्थळे यांचा व्यवसाय वृद्धीसाठी वापर करणेसाठी संस्थेची बहुआयामी डिजिटल व्यासपीठ उपयोग करण्याबाबत प्रोत्साहन दिले. या योजनेचा विद्यार्थी, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांना होणारा उपयोग आणि रोजगार निर्मिती याकडे लक्ष वेधले. सहभागी मुलांना शंका विचारून त्यांनी भाषणाची सांगता केली.

मा. श्री. प्रमोद गुरव, महिला व बाल विकास तज्ञ यांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा - १९५६, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधि. - २०१३, भारतीय दंडसंहिता कलमे - ३७६, ४७९, ४९३, ४९४, ४९५, ४९६, ४९८ (अ), ३५४, ३७६, ५०४, ५०६, ५०९ आणि सायबर क्राईम अधि. - २०१५, कौटुंबिक हिंसाचार - २००५, तिहेरी तलाक, हिंदु वारसा हक्क, प्रसूतीपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायदा - १९९४, बाल-लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (POCSO) - २०१२ या कायद्यांचे सविस्तर मार्गदर्शन केले. 

कार्यशाळेमध्ये महिलांसाठी शासनाचे धोरण,
योजना आणि संरक्षण व कायदे याविषयावर बोलताना
श्री. प्रमोद गुरव, महिला व बाल विकास तज्ञ 
त्यांना समुपदेशन केंद्रातील अनुभवाच्या सहाय्याने त्यांनी उपस्थितांना भावनांच्या परमोच्च शिखरावर नेले. कार्यक्रमादरम्यान दुखःद अनुभव सांगताना उपस्थितांचे डोळे पाणावून गेले तसेच मनोरुग्णांचे अनुभव सांगताना सभागृहात हास्यफवारे उडाले. मुलींनी आणि मुलांनी सामाजिक ठिकाणी घ्यावयाची काळजी यावरील प्रबोधन मोलाचे ठरेल.

कार्यकमाची सांगता श्रद्धा पाटील यांनी स्वतः शंका आणि प्रश्नांच्या माध्यमातुन सर्व सहभागी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार प्रदर्शित केले. एकंदरीत संपुर्ण कार्यक्रम नियोजित कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे  पार पडला.

कार्यक्रम सहभाग अंमलबजावणी पथक
लेखक         –        रिया चौधरी, मुख्य प्रकल्प समन्वयक [पुणे विभाग]
वक्ते             –        श्री. महेश बोरगे, उपजिविका तज्ञ [अध्यक्ष माझीशेती शेतकरी प्रतिष्ठाण]
वक्ते             –        श्री. प्रमोद गुरव, महिला व बालविकास तज्ञ [व्याख्याते]
समन्वय        –        श्री. रावसाहेब देशमुख, 
फोटोग्राफी   –        श्री. धनंजय उरणे 
सहाय्यक      –        श्री. स्वप्नील गेंड, श्री. सोमनाथ पाटील 
डिजिटल       –        माऊली डिजिटल
स्टेशनरी       –        एस. एफ. नेट कॅफे
आयटी          –        अश्विनी शिंदे
प्रवास           –        मंगलमुर्ती मोटर्स
केटरिंग       –        संगीता मंडप डेकोरेशन
दृकश्राव्य      –        संगीता मंडप डेकोरेशन

Saturday, January 27, 2018

लेखापरीक्षण, कर आणि व्यवस्थापन कार्यशाळा

लेखापरीक्षण, कर आणि व्यवस्थापन कार्यशाळा १. GST कायदा फायदा आणि तोटा २. नोंदणी, ऑनलाईन भरणा आणि लेखापरीक्षण ३. उद्योग / व्यवसाय निहाय घ्यावयाची काळजी ४. 15K डिजिटल platform योजनेचे विश्लेषण ५. प्रश्नोत्तरे व्यवसाय करणे आणि वाढविणे हे आता पाहिल्यासारखे अवघड राहिले नाही. ग्रामीण भागात तंत्रज्ञानाची उणीव भासते परिणामी जागतिक स्तरावर जेंव्हा सिंहावलोकन केले जाते तेंव्हा समजते कि फक्त उत्पादन करणे आताच्या उद्योगांना अभिप्रेत नाही. डिजिटायझेशन करणे हे आता प्रत्येक उद्योगाचा श्वास बनला आहे.
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या "संस्था संसाधन केंद्र"मार्फत ग्रामीण जिज्ञासू व्यावसायिकांना मार्गदर्शन होण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. ग्रामीण तरुणांना जागतिक दर्जाचे उद्योगासाठीचे तंत्रज्ञान मिळावे, उद्योगधंद्यांना सर्व सुविधा एका छताखाली देण्यापाठीमागे रोजगार निर्मिती हे आमचे एकमेव उद्दिष्ट आहे. यासाठी Digital platform या उपक्रमामधुन ४ तारखेला "वस्तु व सेवा कर (GST) कायदा जनजागृती" प्रशिक्षण आयोजित केले आहे. व्यवसाय वृद्धीचा प्रश्न आहे?? आता लगेच खालील लिंकवरून नोंदणी करा. किंवा कॉमेंट मध्ये तुमचा नं.द्या मी कॉल करेन. - महेश बोरगे (MBA, MRD) Livelihood Expert, maheshborge@gmail.com

★ शेतकरी बांधवांसाठी उपक्रम ★
मोफत मार्गदर्शन, प्रशिक्षण, अनुदानित निविष्ठा, कृषि उत्पादन विक्री सहाय्य, शासकीय योजना, अभ्यास दौरा, गौरव पुरस्कार.... अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

 सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी उपक्रम ★
गावातच कायम नोकरी, वार्षिक बढती, सामाजिक सेवेची संधी, 10वी, 12वी पासून उच्च शिक्षित तरूणांना नोकरी आणि बरेच काही... अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

 विद्यार्थी विकास उपक्रम ★
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सोबत स्टायपेंड, इंटर्नशिप, नोकरी व व्यवसाय, निवडक विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी नोकरी.... अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

 व्यावसायिकांसाठी उपक्रम ★
व्यवसाय वृद्धी, डिजिटल तंत्रज्ञान, आधुनिक माहिती कार्यशाळा, अभ्यास दौरा.... अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
★ महिला सबलीकरण करिता कौशल्य विकास उपक्रम ★
मार्गदर्शन, इंटर्नशिप, नोकरी, व्यवसाय.... नोंदणीसाठी इथे क्लिक करा. 

Sunday, January 21, 2018

स्टीयरिंग व्हील जॅम झाल्यामुळे गाडी पलटी, ड्रायव्हर सह इतर दोघेजण किरकोळ जखमी

अपघातानंतर गाडी मधील द्राक्ष मालाचे नुकसान झाले.
विस्ककटलेले क्रेट व द्राक्षे 
हरियाणाच्या व्यापाऱ्याची द्राक्षाची गाडी तासगाव गावच्या हद्दीत पलटी, ड्रायव्हर सह गाडीतील दोन व्यक्ती किरकोळ जखमी सुमारे 45 हजाराच्या द्राक्षमालाचे नुकसान

रस्त्याच्या बाजूला पलटी झालेली गाडी व बाहेर काढलेली द्राक्षे 
ड्रायव्हरच्या कौशल्याने या विचित्र अपघातात मालवाहतूक करणारी गाडी
इलेक्ट्रिक पोलच्या आणि बाभळीच्या मध्ये पलटी झाल्याने मोठा अपघात टळला.
अपघात ठिकाणाहून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित माल वाहतूक करणारी गाडी ही सावलाज परिसरातील शेतकऱ्यांच्या बागेतून द्राक्ष खरेदी करून शिर्डीकडे निघाली होती. गाडीचे स्टीयरिंग व्हील जॅम झाल्यामुळे गाडी वळवता अली नाही. गाडीचे संतुलन बिघडल्यामुळे रस्त्याच्या उजव्या बाजूला पलटी झाली. गाडीत ड्रायव्हर सह इतर दोघेजण होते त्यांना किरकोळ जखमी झालेल्या अवस्थेत सवलाज येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 





★ शेतकरी बांधवांसाठी माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचे उपक्रम ★
मोफत मार्गदर्शन, प्रशिक्षण, अनुदानित निविष्ठा, कृषि उत्पादन विक्री सहाय्य, शासकीय योजना, अभ्यास दौरा, गौरव पुरस्कार.... अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

 सुशिक्षित बेरोजगार ग्रामीण युवकांसाठी माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचे रोजगार निर्मिती उपक्रम ★
गावातच कायम नोकरी, वार्षिक बढती, सामाजिक सेवेची संधी, 10वी, 12वी पासून उच्च शिक्षित तरूणांना नोकरी आणि बरेच काही... अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

 विद्यार्थ्यांना अनुभवांवर मार्गदर्शन व भावी करिअरकरिता विद्यार्थी विकास उपक्रम ★
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सोबत स्टायपेंड, इंटर्नशिप, नोकरी व व्यवसाय, निवडक विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी नोकरी.... अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

★ महिला सबलीकरण करिता कौशल्य विकास उपक्रम ★
मार्गदर्शन, इंटर्नशिप, नोकरी, व्यवसाय.... अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. 

Sunday, December 3, 2017

शासनाने मदत किती करावी आणि कशी करावी....


शासनाने मदत किती करावी आणि कशी करावी....

www.mazisheti.org/p/2017/12/proagro.html


कोणी कितीही जीवाचा आटापिटा केला तरी प्रत्येक सरकार (प्रत्येक सत्ताधारी) निवडणूक आणि भविष्यातील तरतुदिसाठीच काम करत असतात. गेली ५ ते ६ महिने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना खेळवले जात आहे. माझ्या माहितीप्रमाणे दिवाळीपूर्वी रात्रीच्या २ - ३ वाजेपर्यंत बसून शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले. ज्या आशेने शेतकऱ्यांनी हा उपद्व्याप केला त्याचा त्यांना लाभ मिळेलही... एखाद्याकडून काहीतरी मिळेल या आशेने वेळ घालवणे माझ्या बुद्धीला पटत नाही.

शेतकऱ्यांनी स्वताच्या शेतीवर व्यावसाईक नियोजन करणे आणि आवश्यकतेनुसार एकमेकांसोबत व्यावहारिक करार करून जास्तीत जास्त नफा कमविणे क्रमप्राप्त झाले आहे. शहरी भागात येणारा माल वेगवेगळ्या सोसायट्यांना शेतकऱ्यांच्या नावावर खपवला जात आहे. शासनाची थेट ग्राहक देण्याची योजना व्यापार्यांनी बळकावली आहे. सेन्द्रीयाच्या नावावर काय दिले जाते हे देणार्यांनाच माहिती असावे. परवा मला whats app वर गाडीवरून विकणाऱ्या भैय्याचे 'भाजी ताजी ठेवण्यासाठीचा खटाटोप' पाहताना समजले कि हे लोक प्रसंगी गटारीतील पाणी टाकायला कमी करत नाहीत. पण एखादा शेतकरी स्वतः त्याचा माल द्यायला गेला तर मात्र १०० प्रश्न विचारून दर पाडला जातो. शहरी लोकांच्या खोचक बोलण्याला गावातील शेतकरी तग धरू शकत नाही. शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी गटांनी एकत्र येवून निवडक क्षेत्रावर करार करून / नोंदणी करून शेती केल्यास अपेक्षित व्यावसाईक गोष्टी साध्य होतील.

आम्ही कराड आणि सातारा परिसरात प्रायोगिक स्तरावर केलेल्या चाचपनीला चांगले यश आणि प्रतिसाद मिळाला. अगदी छोट्या आणि सुयोग्य नियोजनाने आम्ही ते साध्य केले. रेठरे कारखाना, भवानीनगर आणि वडगाव येथील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल कराडमधून स्टोअरमध्ये आणला. माझीशेती शेतकरी प्रतिष्ठाण Mazisheti Farmers Foundationच्या कराड मधील स्टोअरवर आलेला शेतमाल बचत गटांच्या प्रशिक्षित सदस्यांच्या सहाय्याने सुयोग्य पद्धतीने निवड, वर्गीकरण आणि वेष्टन लावून पुणे शहराकडे पाठविला गेला. वारजे पुलावरून माल घेवून जवळच असलेल्या शासनाने नेमून दिलेल्या जागेवर होलसेलमध्ये हा माल विकला. माझीशेतीच्या ग्रामीण आणि शहरी भागातील कार्यकर्त्यांनी यामध्ये मोलाचे सहकार्य केले. शेतमाल खरेदी किंमत, वाहतूक खर्च, ग्रामीण व शहरी कार्यकर्त्यांचे मानधन आणि मिळालेली विक्री किंमत यामध्ये संस्थेला प्रति किलो २२ रुपये मिळाले. हाच प्रयोग आम्ही बेदाणे उत्पादक शेतकऱ्यांवर केला. तासगावच्या बेदाणे मार्केटमधून खरेदी केलेला बेदाणा संस्थेच्या पुण्यातील कार्यालयाशेजारी असणार्या दुकानांना दिला. यामध्ये प्रति किलो ७० रुपये अतिरिक्त मिळाले.

स्वतः शेतकऱ्यांनी एकत्र येवून एकमेकांच्या सहाय्याने किंवा कराराने शेती उत्पादन करणे आणि त्याची विक्री केल्या तर त्यांच्या एका मेट्रिक टन पिकणाऱ्या फळभाजीला २२००० रुपये आणि एक टन बेदाण्यामागे रुपये ७०००० अधिकचे मिळू शकतात. शिवाय बचत गट व बेरोजगार तरुणांना मिळणारा / तयार होणारा रोजगार फायदा वेगळाच आहे. शेतकऱ्यांनी व्यावसाईक धोरण ठरवून पुढील नियोजन केले तर त्यांना कोणाकडेच हात पसरावे लागणार नाहीत. येणाऱ्या काळात हा प्रकल्प व्यापक स्वरूपावर राबविला जाणार आहे, आमच्याकडून शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला तर यथोचित सहकार्य केले जाईल. ज्या शेतकऱ्यांचे गट नाहीत त्यांनी आमच्या स्थानिक गटांमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद ....



महेश बोरगे... माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान® --------------- 📬 info@mazisheti.org 📲 8806908444, 8806907444 🖥 www.mazisheti.org 🗣 www.fb.com/agriindia
🐥twitter.com/mazisheti

Wednesday, November 15, 2017

राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत -कांदा चाळ अनुदान योजना

राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत -कांदा चाळ अनुदान योजना

लाभार्थी
वैयक्तिक शेतकरी/खरेदी विक्री सहकारी संघ/कृषि उत्पन्न बाजार समित्या/कांदा उत्पादक सहकारी संस्था/विविध कार्यकारी सहकारी संस्था/पणन व प्रक्रिया सहकारी संस्था

अनुदान
महत्तम मर्यादा रु.6000/- प्रति मे.टन एवढी राहील. त्यांच्या 25 टक्के म्हणजे रु.1500/- प्रति मे.टन एवढे अनुदान देय राहील. अनुदान हे रु.1500/- प्रति मे.टन किंवा बांधकाम खर्चाच्या 25 टक्के जे कमी असेल ते लाभार्थीस देय राहील.

अनुदान मर्यादा
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 100 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी रु.1,50,000/- अनुदान देण्यात येईल तर इतर सहकारी संस्था/कृषि उत्पन्न बाजार समित्या/कांदा उत्पादक सहकारी संस्था यांना जास्तीत जास्त 500 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळींसाठी रु.7,50,000/- एवढे अनुदान देण्यात येईल.




प्रस्ताव सादर करण्याची पद्धत 
(अ) वैयक्तिक शेतकऱ्यासाठी :
1. विहीत नमुन्यातील अर्ज. 
2. अर्जदाराच्या नावे स्वत:च्या मालकीची जमिन असावी. 5 ते 50 मे.टन क्षमतेच्या कांदा चाळासाठी किमान एक हेक्टर पर्यंत क्षेत्र तर 50 ते 100 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी 1 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असावे. तशी कांदा पिकाची नोंद असणारा 7/12 उताऱ्याची प्रत, 8-अ खाते उतारा अर्जासोबत जोडावा. 
3. वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थी देखील अनुदानास पात्र राहील, वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थीच्या बाबतीत कर्ज मंजूरचे आदेशपत्र सहपत्रीत करणे आवश्यक आहे. 
4. कांदाचाळीचा गैरवापर लाभार्थीकडून झाल्यास अनुदान दिलेल्या तारखेपासून व्याजासह वसूली लाभार्थीकडून करण्यात येईल. 
5. लाभार्थींनी कांदाचाळ बांधण्यापुर्वी याबाबत करारनामा सोबत जोडलेल्या प्रपत्रात रु.20 च्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज करुन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना सादर करावा. 
6. अर्जासोबत खर्चाची मुळ बिले व गोषवारा जोडावा. 
7. कृषि विभागाकडून अनुदान न घेतल्याचा दाखला जोडावा. 
8. अर्जदारासह कांदाचाळीचा फोटो जोडावा. 
9. सदर योजनेतुन पती किंवा पत्नी यापैकी एका सदस्याला अनुदानाचा लाभ घेता येईल. 


(ब) सहकारी संस्थानी अनुदानासाठी प्रस्ताव दाखल करण्याची पद्धत :
सहकारी संस्था, कृषि उत्पन्न बाजार समिती यांनी कांदाचाळीचे काम चालू करणेपुर्वी कांदाचाळीबाबतचा प्रस्ताव पणन मंडळाचे मुख्य कार्यालये, पुणे येथे खालील बाबीच्या माहितीसह प्रस्ताव तत्वत: मंजूरीसाठी सादर करावा. 
1. संस्थेने कांदा साठवणूक प्रकल्पाची उभारणी सुरु करणेपूर्वी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाकडे तत्वत: मंजूरीसाठी सादर करावा.
2. संस्थेमार्फत किती मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी उभारणार याबाबत संस्थेच्या संचालक मंडळ सभेत पारीत करण्यात आलेल्या ठरावाची प्रत अर्जासोबत जोडावी. 
3. प्रकल्पासाठी संस्थेच्या नावे जागा असलेबाबत पुरावा (गाव नमुना क्र.7, 7-अ/12) अथवा करीता कमी 30 वर्षे लीजवर घेतलेली असल्यास त्याबाबतची कागदपत्रे. 
4. प्रस्तावीत जागेचा स्थळदर्शक नकशा. 
5. कांदा साठवणूक प्रकल्प उभारणीसाठी निधीचे नियोजन संस्था कशा रितीने उभारणी करणार याबाबत अर्जात स्पष्ट उल्लेख असावा.


कांदा चाळीची उभारणी करताना खालील गोष्टी टाळाव्यात
1 कांदा चाळीसाठी पानथळ/खोलगट ठिकाणीची कच्चे रस्ते असणारी जमीन टाळावी. 
2 हवा नैसर्गिक रित्या खेळती राहण्यास असलेले अडथळे टाळावे अथवा कमी करावे, 
3 कांदा चाळीचे लगत कोणतेही उंच बांधकाम असू नये. 
4 निवाऱ्याच्या बाजूच्या भिंतीची फ्लॅट फॉर्मची खालील झडप बंद असावी, जेथे वादळ आणि वादळी वारे अपेक्षीत आहे, अशा ठिकाणी हवेची/वाऱ्याची बाजू उघडी असेल तर निवाऱ्याची बाजू बंद असु नये. 
5 वादळ आणि जोरदार पावसामध्ये वाऱ्याची बाजू बंद करण्याची व्यवस्था असावी. आवश्यकता असेल तेव्हा उघडता यावी. 
6 कांदाचाळींमध्ये वरच्या बाजूस उष्णता प्रतिबंधक छताचे साहित्याचा वापर करावा. छतासाठी लोखंडी पन्हाळी पत्र्यासारख्या साहित्याचा वापर टाळावा, 
सदर प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था/सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था,/कृषि उत्पन्न बाजार समित्या किंवा पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा.


या योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था किंवा पणन मंडळाचे मुख्य कार्यालय किंवा पणन मंडळाचे विभागीय कार्यालय पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर यांच्याशी संपर्क साधावा.

Friday, September 8, 2017

गोएक्स्पोर्ट (नेदरलंड) आणि सोलापुर अग्रो उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने निर्यातक्षम भेंडी गुणवत्ता नियंत्रण कार्यशाळा संपन्न


"गो एक्सपोर्ट"कंपनीमार्फत संचालक श्री. प्रकाश पाटील उपस्थित होते आणि माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानकडून महेश बोरगे, रावसाहेब देशमुख, संदीप तोडकर यांनी मार्गदर्शन केले. रावसाहेब देशमुख यांनी भेंडी लागवडीपासून काढणीपर्यंत उदा.माती परीक्षण, बियाणे निवड, निविष्ठा व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, काढणी व काढणीपश्चात व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन केले. निर्यातीसाठी आवश्यक असणारे 'ग्लोबल  ग्याप' प्रमाणीकरण व त्यासाठी प्रत्येक स्तरावर घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणारे प्रयोगशील शेतकरी श्री. संदीप तोडकर आणि त्यांच्या कष्टाने उभे केलेल्या 'तन्मय हायटेक' या व्यवसायाची आधी केले मग सांगितले या तत्वावर स्वतःची यशोगाथा उपस्थित शेतकऱ्यांना सांगितली. सन २०११ मध्ये १० गुंठे पडीक जमिनीत सुरु केलेली आधुनिक शेती आणि सध्याचे "तन्मय हायटेक"च्या माध्यमातून घेतेलेले परदेशी फळ भाजीपाल्यांचे उत्पादन घेताना आलेल्या अडचणी, माझीशेती आणि कृषी विभाग यांच्या सहाय्याने घेतलेली गरुडभरारी या सर्व गोष्टी ऐकताना शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन गेल्या.

"माझीशेती" प्रमुख महेश बोरगे यांनी शेतीला हा व्यवसाय म्हणून पहा असा मोलाचा संदेश दिला. पारंपारिक आणि आधुनिकतेचे फायदे याबद्दल मोलाचा संदेश दिला. माझीशेतीच्या शाश्वत ग्रामीण विकास प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करीत माझीशेतीकडून तंत्रज्ञानाची सांगड घालून राबवीत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागातील व्यावसायिकांना जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी संस्थेचा "संस्था संसाधन केंद्र" (ORC - Organization Resources Center) या उपक्रमाचा लाभ घेवून जागतिक स्तरावर शेती व शेतीपूरक तसेच बारा बलुतेदार व्यवसायांना व्यासपीठ उपलब्ध करून घेण्याचे आवाहन केले.

गोएक्स्पोर्टचे संचालक यांनी शेतकऱ्यांना पारंपारिक शेतीपासून दूर राहून आधुनिक शेतीमध्ये व्यावसायिकता आणल्यास भविष्यात शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही असे सांगितले. शेतकऱ्यांनी निर्यातक्षम भाजीपाला, फळे पिकवण्यासाठी पुढाकार घेतल्यास गोएक्स्पोर्टचे नेदरलँड्समधील कार्यालय निर्यातीची हमी घेऊ शकते मात्र शेतकऱ्यांनी स्वतःमध्ये व्यावसायिकता अंगीकारावी असे सुचविले.

या कार्यक्रमामध्ये शेतकर्यांनी चांगला प्रतिसाद देत भेंडी निर्यातीबद्दल सकारात्मक प्रतिसाद नोंदविला. तसेच त्यांना भेडसावणाऱ्या शंकेचे सर्वोतपरी निरसन करून घेतले. माळकवठे ता.दक्षिण सोलापुर येथे सोलापुर अग्रो प्रोडयुसर कंपनी व माझीशेती यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना 'भेंडी' निर्यातीबद्दल सखोल मार्गदर्शन केले. ''गो एक्सपोर्ट''कंपनीचे डिरेक्टर प्रकाश पाटील व मंदार कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम घडवून आणला.

Tuesday, August 29, 2017

गांडुळ संवर्धन आणि गांडूळखत निर्मीती

गांडुळ जीवनक्रम

गांडुळाच्या जीवनामध्ये अंडी, बाल्ल्यावस्था आणि पुर्णावस्था अशा तीन अवस्था असतात. या सर्व अवस्थासाठी ओलसर जमीन आवश्यक असते. गांडुळाचा जीवनक्रम प्रामुख्याने त्याच्या जातीवर अवलंबून असतो. पूर्ण वाढ झालेल्या गांडूळामध्ये स्त्री आणि पुरूष जनन असे दोन्हीही अवयव असतात. गांडुळ प्रत्येक सहा ते सात दिवसांनी अंडी टाकते. या अंड्यामध्ये दोन ते वीस गर्भ असतात. अंडी अवस्था हवामानाचे अनुकुलतेनुसार ७ ते २० दिवसांची असते. गांडुळाची अपुर्णावस्था दोन ते तीन महिन्याची असते. त्यानंतर तो जेव्हा पूर्णावस्थेत येतो तेव्हा तोंडाकडील २ ते ३ सें.मी. अंतरावरील अर्धा सें.मी. आकाराचा भाग जाड होतो. हे वयात आलेल्या गांडूळाचे लक्षण होय. सर्वसाधारणपणे गांडुळाचे आयुष्य दोन ते तीन वर्षाचे असते. इसिनीया फेटीडा या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या गांडुळाची लांबी १२ ते १५ सें.मी. असते. एका किलोमध्ये सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेली एक हजार गांडुळे बसतात. अशी एक हजार गांडूळे घेवून त्यांची अनुकुल वातावरणात वाढ केल्यास एका वर्षात त्यांची संख्या आठ लक्ष त्र्याएंशी हजार होते. पिले व प्रौढ गांडुळे एका किलोमध्ये दोन हजार बसतात. शंभर किलो प्रौढ गांडुळे महिन्याला एक टन गांढूळखत तयार करतात.

१) जागेची निवड व बांधणी - 

गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. तसेच खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत, कारण या झाडाची मुळे गांडुळखतामधील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळखत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असल्याने त्यासाठी खालील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे छप्पर तयार करून घ्यावे. ते तयार करताना रुंदी साडेपाच मिटर, मधील उंची ३ मिटर, बाजूची उंची १ मिटर आणि लांबी गरजेनुसार म्हणजे उपलब्ध होणारे शेणखत व छप्परासाठी लागणारे साहित्य यानुसार ५ ते २५ मिटर पर्यंत असावी. छप्परामध्ये १ मिटर रुंद व २० सें.मी. खोलीचे दोन समांतर चर खोदावेत. चराच्या तळाशी ८ ते ९ सें.मी. उंचीचा किंवा जाडीचा थर काडीकचरा, पालापाचोळा, वाळलेले गवत, उसाचे पाचरट यांनी भरावा. त्यावर पाणी मारावे. याथरावर ८ ते ९ सें.मी. जाडीचा दुसरा थर कुजलेले शेणखत, लेंडीखत, सेंद्रीयखत यांचा द्यावा. त्यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे, त्यानंतर या थरावर गांडुळे सोडावीत. यावर ५ ते ६ से.मी. जाडीचा थर कुजलेले सेंद्रीयखत, शेणखत यांचा थर द्यावा. या थरावर २० ते ३० सें.मी. उंचीपर्यंत शेणखत, लेंडीखत, सेंद्रीयखत टाकावे. यावर ओले होईपर्यंत पाणि शिंपडावे. हा गादीवाफा गोणपाटाने झाकावा. दररोज या गादीवाफ्यावर पाणी शिपडावे म्हणजे गादीवाफ्यात ओलसरपणा टिकून राहील आणि गांडुळाची चांगली वाढ होऊन गांडूळखत तयार होईल. या पध्दतीने १५ ते २० दिवसात गांडूळखत तयार होते.



२) गांडुळ खाद्य - शेणखतामध्ये गांडुळाची वाढ उत्तम होते. त्यांची संख्या जोमाने वाढून गांडूळखत उत्तम प्रतीचे तयार होते. त्याचप्रमाणे लेंडीखत, घोड्याची लिद यापासून सुध्दा गांडूळखत तयार होते. गांडुळासाठी लागणारे खाद्य कमीतकमी अर्धवट कुजलेले असावे. शेणखत आणि सेंद्रीयखत यांचे मिश्रण अर्धे- अर्धे वापरून गांडूळखत करता येते. गांडूळामध्ये शेतातील ओला पाला-पाचोळा, भाजी पाल्याचे अवशेष, अर्धवट कुजलेले पिकांची अवशेष, साखर कारखान्यातील प्रेसमड याचा वापर होऊ शकतो. मात्र हे खाद्य गांडुळासाठी वापरताना काही प्रमाणात (एक तृतीअंश) शेणखत मिसळणे आवश्यक आहे. गांडुळखत नेहमी बारीक करून टाकावे. बायोगँस प्लँन्टमधून निघालेली स्लरीसुध्दा गांडुळखाद्य म्हणून उपयोगात आणता येते. खड्ड्यामध्ये गांडुळे टाकण्या अगोदर गांडुळखाद्यावर चार-पाच दिवस सारखे पाणी मारावे म्हणजे त्यातील गरमपणा नष्ट होईल. सुक्ष्म जीवाणू संवर्धक (बँक्टेरीअल कल्चर) वापरून खत कुजविण्याचा प्रक्रीयेस वापरावे. वरील संवर्धक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय पुणे-५ यांच्याकडे उपलब्ध होऊ शकेल. या व्यतीरीक्त गांडूळ खाद्यात एक किलो युरीया व एक किलो सुपरफॉस्फेट प्रति टन या प्रमाणात मिसळले असता कुजण्याची क्रीया लवकर होवून गांडूळखत लवकर तयार होईल.


३) गांडूळखत वेगळं करणे - गांडुळखत आणि गांडुळे वेगले करताना उन्हामध्ये ताडपत्री अथवा गोणपाट अंथरून त्यावर या गांडूळ खताचे ढिग करावेत, म्हणजे उन्हामुळे गांडुळे ढिगाच्या तळाशी जातील व गांडूळे आणि गांडुळखत वेगळे करता येईल. शक्यतो खत वेगळे करताना टिकाव, खुरपे यांचा वापर करू नये म्हणजे गांडूळांना इजा पोहचणार नाही. या व्यतीरीक्त दुसऱ्या पध्दतीप्रमाणे गादीवाफ्यावर तयार झालेला गांडूळखताचा थर हलक्या हाताने गोळा करून घ्यावा व वाफ्यावर पुन्हा नवीन खाद्य टाकावे. या गांडुळखतामध्ये गांडूळाची अंडी, त्यांची विष्ठा आणि कुजलेले खत यांचे मिश्रण असते. असे गांडुळाचे खत शेतामध्ये वापरता येते. निरनिराळ्या पिकासाठी हे खत हेक्टरी पाच टन प्रती वर्ष या प्रमाणात टाकावे.


गांडुळखताचे फायदे - 
१) जमिनीचा पोत सुधारतो. 
२) मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो. 
३) गांडुळाच्या बिळांमुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते. 
४) जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. 
५) जमिनीची धूप कमी होते. 
६) बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते. 
७) जमिनीचा सामू (पी.एच) योग्य पातळीत राखला जातो. 
८) गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात. 
९) गांडुळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामूळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात. 
१०) जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा संख्येत भरमसाठ वाढ होते.


गांडूळ खतातून मिळणारी सूक्ष्म खनिज द्रव्ये.
कमी खर्चात जमिनीचा पोट सुधारून पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि पिकाचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी गांडूळ खत हा उत्तम पर्याय आहे. गांडूळ खतामुळे सूक्ष्म खनिज द्रव्ये मिळतातच शिवाय फॉस्फेट,सेल्युलोज सारखे एन्झायीम आणि ओक्झीन, जीब्रालिक अॅसिड सारखी संजीवके ही मिळतात ज्यामुळे पिकाची वाढ जोमाने होते.
ओल्या जमिनीत या खतात आलेल्या अंड्यामुळे गांडुळे निर्माण होतात, ती जमीन सच्छिद्र ठेऊन मुळांची वाढ होण्यास मदत करतात.
गांडूळ खतामध्ये खालीलप्रमाणे सूक्ष्म खनिज द्रव्ये असतात.
सेंद्रिय कर्ब - ९.८ ते १३.४ टक्के,
नायट्रोजन - ०.५१ ते १.६१टक्के,
फॉस्फोरस - ०.१९ ते १.०२ टक्के, 
पोटॅशियम - ०.१५ ते ०. ७३ टक्के, 
कॅल्शियम - १.१८ ते ७. ६१ टक्के, 
झिंक - ०.००४२ ते ०.११० टक्के, 
कॉपर - ०.००२६ ते ०.००४८ टक्के, 
मँगनीज - ०.०१०५ ते ०.२०३८ टक्के

Sunday, August 27, 2017

What is apeda?

कृषि आणि प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण हा वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा उपक्रम आहे. 


  1. निर्यातीसाठी सुचित केलेल्या उत्पादनांशी संबंधित उद्योगांचा विकास करण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे किंवा सर्व्हेक्षण करणे, व्यवहार्यता तपासणे, संयुक्तपणे व्यवसाय उभारणी करिता भागभांडवल देणे तसेच इतर सवलतीच्या योजना राबविणे.
  2. अनुसूचित उत्पादनांच्या निर्यातीसाठी फी आकारून निर्यातदारांची नोंदणी करणे. (नोंदणी पद्धत)
  3. निर्यातीच्या उद्देशासाठी शेड्यूल्ड उत्पादनांसाठी मानके आणि विशिष्ट बाबी निश्चित करणे.
  4. कत्तलखाण्यामध्ये मांस आणि मांस उत्पादन, प्रक्रिया केंद्रे, स्टोरेज व आवार, वाहतुक किंवा इतर ठिकाणी उत्पादने ठेवली किंवा हाताळली जातात अशा उत्पादांची गुणवत्ता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने निरिक्षण करणे.
  5. उत्पादनांचे वेष्टन (Packing) विकसित आणि सुधारित करणे.
  6. भारताबाहेर अनुसूचित उत्पादनांचे मार्केटिंग सुधारणे.
  7. अनुसूचित उत्पादनांच्या निर्यातीसहित उत्पादन आणि विकासाला चालना देणे.
  8. कारखान्यांचे मालक किंवा आस्थापना ज्या अनुसूचित उत्पादन किंवा संबंधित कोणत्याही विषयावर उत्पादन, प्रक्रिया, पॅकेजिंग, मार्केटिंग किंवा निर्यात करणाऱ्या किंवा अनुसुचित उत्पादनांशी संबंधित असणाऱ्या इतर व्यक्ती आणि प्रकाशनांवरून किंवा त्याच्या कोणत्याही भागाचे प्रसिद्ध झालेल्या अहवालावरून आकडेवारी काढणे. 
  9. अनुसूचित उत्पादनांशी संबंधित उद्योगांना वेगवेगळ्या मुद्द्यावर प्रशिक्षण देणे.
  10. अश्या इतर बाबी ज्या स्वीकृत असतील. 

 APEDA नियंत्रीत उत्पादने  
  • Fruits, Vegetables and their Products.
  • Meat and Meat Products.
  • Poultry and Poultry Products.
  • Dairy Products.
  • Confectionery, Biscuits and Bakery Products.
  • Honey, Jaggery and Sugar Products.
  • Cocoa and its products, chocolates of all kinds.
  • Alcoholic and Non-Alcoholic Beverages.
  • Cereal and Cereal Products.
  • Groundnuts, Peanuts and Walnuts.
  • Pickles, Papads and Chutneys.
  • Guar Gum.
  • Floriculture and Floriculture Products.
  • Herbal and Medicinal Plants.

यासोबत अपेडाकडून भारतामध्ये आयात केलेल्या साखरेवर देखील नियंत्रण ठेवले जाते. 

 APEDA रचना 

चेअरमन केंद्रशासनाकडून नियुक्त केला जातो. नीती (नियोजन) आयोग मार्फत एक प्रतिनिधी, लोकसभेचे दोन आणि राज्यसभेचा एक प्रतिनिधी, आठ (8) मेंबर्स केंद्र शासनाच्या कृषि व ग्रामीण विकासाशी संबंधित विभागातून निवडले जातात.
(i) Agriculture and Rural Development
(ii) Commerce
(iii) Finance
(iv) Industry
(v) Food
(vi) Civil Supplies
(vii) Civil Aviation
(viii) Shipping and transport

यासोबत  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आद्याक्षर क्रमानुसार ५ सदस्य निवडले जातात. 

याशिवाय ७ मेंबर केंद्राच्या कृषि संबंधित खालील उपक्रमातून निवडले जातात.
(i) Indian Council of Agricultural Research
(ii) National Horticultural Board 
(iii) National Agricultural Cooperative Marketing Federation 
(iv) Central Food Technological Research Institute
(v) Indian Institute of Packaging 
(vi) Spices Export Promotion Council and 
(vii) Cashew Export Promotion Council. 

व्यावसायिक प्रतीनिधीमधून १२ प्रतिनिधी निवडले जातात.
  • Fruit and Vegetable Products Industries
  • Meat, Poultry and Dairy Products Industries
  • Other Scheduled Products Industries
  • Packaging Industry
दोन मेंबर हे शास्त्रज्ञ किंवा तज्ञ व्यक्ती म्हणुन निवडले जातात. असे एकूण ३८ सदस्यांची apeda प्राधिकरण रचना आहे. 


सेंद्रिय शेतीला चालना

कृषी विभागातर्फे सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये गांडूळ खत निर्मिती, सीपीपी कल्चर युनिट, सेंद्रिय शेतीशाळा, अभ्यास दौरे, समूह संघटनांसाठी अर्थसाहाय्य यासारख्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी फायदा करून घेतला पाहिजे. - जनार्दन जाधव 

अ) गांडूळ खत उत्पादन व वापर 
1) गांडूळ खत उत्पादन युनिट स्थापन करणे. 2) बायोडायनामिक कंपोस्ट युनिट स्थापन करणे. 3) सीपीपी कल्चर युनिट स्थापन करणे. 4) निंबोळी पावडर व अर्क तयार करण्यासाठी निम पल्वरायझर/ ग्राइंडरचा पुरवठा करणे. 
अ- 1) गांडूळ खत उत्पादन युनिट
1) गांडूळ खत उत्पादन युनिटसाठी 10,000 रुपये खर्च अपेक्षित आहे. उत्पादन प्रक्रिया सुरू करताच लाभार्थ्यास खर्चाच्या 25 टक्के दराने जास्तीत जास्त 2,500 रुपये याप्रमाणे अनुदान देय आहे. 
अ- 2) बायोडायनामिक कंपोस्ट तयार करणे - 
बायोडायनामिक कंपोस्टसाठी शेतातील काडीकचरा, बनगी, पऱ्हाट्या, तुऱ्हाट्या, वाळलेली बोंडे, वाढलेले गवत, शेतातील तण, कडुनिंब, रुचकिण, निरगुडी, मोगली एरंड इत्यादीची पाने, गाजर गवत, बेशरम, गिरिपुष्प इत्यादी साहित्य, सीपीपी कल्चर, ताणे शेण (आठ ते दहा दिवसांचे), जनावरांचे मूत्र व 1500 ते 2000 लिटर पाणी लागते. 
अ- 3) सीपीपी कल्चर युनिट - 
बायोडायनामिक कंपोस्ट तयार करण्यासाठी सीपीपी कल्चर लागते, तसेच सीपीपी हे उत्तम जमीन सुधारक आहे, त्यामुळे बियाण्याची उगवण लवकर होते. जमिनीचा पोत सुधारतो. पिकात कीड व रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते व सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढते. सीपीपी कल्चर युनिट उभारणीसाठी 250 रुपये प्रति युनिट अनुदान देय राहील. 
अ- 4) निंबोळी पावडर/ अर्क तयार करणे - 
शास्त्रीय पद्धतीने व मोठ्या प्रमाणावर निंबोळी पावडर तयार करण्याकरिता पल्वरायझर/ ग्राइंडरची आवश्‍यकता असते. निम पल्वरायझर / ग्राइंडर, इलेक्‍ट्रिक/ डिझेल मोटार चाळण्या, शेड, कच्चा माल, पॅकिंगसाठी लागणाऱ्या गोष्टी इत्यादी यंत्रसामग्रीच्या किमतीवर किमतीच्या 50 टक्के दराने जास्तीत जास्त 15,000 रुपये अनुदान अनुज्ञेय आहे. 

ब) सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसाहाय्य 
1) सेंद्रिय शेती गट स्थापन करणे - 
या घटकांतर्गत प्रत्येकी 20 शेतकऱ्यांचा साधारणतः 10 हेक्‍टरचा एक गट तयार करण्यात येतो. या गटात 10 किलोमीटर त्रिज्येच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांचा समावेश राहील. गटाचे नेतृत्व करण्यासाठी गटातील सेंद्रिय शेतीबाबत अग्रगण्य आणि उत्स्फूर्तपणे काम करणाऱ्या शेतकऱ्यांची गटप्रवर्तक म्हणून निवड करण्यात यावी.

ब- 1) समूह संघटनांसाठी अर्थसाहाय्य - 
स्थापन झालेल्या गटास तांत्रिक मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि समूह संघटनांसाठी रु. 5,000 रुपये प्रति गट याप्रमाणे एका प्रकल्पास 50 हजार रुपये इतके अर्थसाहाय्य देण्यात येईल. समूह संघटनांचे काम शासकीय यंत्रणा, अशासकीय संस्था, स्वयंसेवी आणि मित्र मार्गदर्शक संस्था, कृषी विज्ञान केंद्र इत्यादींमार्फत करावे. गटाकडून उत्पादित झालेल्या मालास योग्य ते ब्रॅंडिंग करून वेगवेगळ्या प्रदर्शनांत, कृषी खात्याचे प्रदर्शन तसेच महोत्सवांत हा सेंद्रिय शेतीमाल ठेवण्यासाठी अशा गटांस प्रोत्साहन देणे, तसेच अशा मालास बाजारपेठ उपलब्धतेची माहिती करून देणे गरजेचे आहे. 

ब- 2) शेतकऱ्यांच्या शेतीशाळा - 
सेंद्रिय शेतीशाळा आयोजित करण्यासाठी खालीलप्रमाणे पिकांची निवड करण्यात आली आहे. 
सेंद्रिय शेतीशाळा ही उपरोक्त यादीमधील ज्या पिकांचा प्रकल्प राबवायचा आहे, त्या पिकांसाठी घेण्यात यावी. यामध्ये 30 शेतकऱ्यांच्या गटाचा समावेश राहील. गटातील प्रत्येक शेतकऱ्याने तेच पीक घेणे अनिवार्य राहील (एका गटासाठी एक पीक). यादीव्यतिरिक्त इतर पिकांची निवड करावयाची असल्यास विभागीय कृषी सहसंचालक स्थानिक परिस्थितीनुसार त्यास मान्यता देतात. शेतीशाळेचे एकूण 15 प्रशिक्षणवर्ग घेणे अपेक्षित आहे. एका सेंद्रिय शाळेकरिता वीस हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. 

ब- 3) प्रवर्तकाचे प्रशिक्षण - 
सेंद्रिय शेतीशाळा आयोजनासाठी तज्ज्ञ प्रवर्तक तयार करणे, सेंद्रिय शेती व प्रमाणीकरणाचे तंत्रज्ञान सर्वदूर एकसारखेच राहील याची काळजी घेणे. 

ब- 4) प्रवर्तकाच्या माध्यमातून प्रमाणीकरणाचे क्षेत्र निश्‍चित करणे -
प्रत्येक विभागीय कृषी सहसंचालक स्तरावर इच्छुक सेंद्रिय शेतीमध्ये कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्था तसेच सेंद्रिय शेतीमध्ये उत्स्फूर्तपणे कार्य करणाऱ्या मातृमार्गदर्शक संस्थेमार्फत प्रवर्तकाचे प्रशिक्षण या कार्यक्रमाची अंमलबजावणी करावयाची आहे. प्रत्येक तालुक्‍यामध्ये सेंद्रिय शेती प्रकल्पामध्ये समाविष्ट गटातील प्रवर्तक/ कृषी सेवक/ कृषी सहायक तसेच सेंद्रिय शाळा घेण्यास उत्सुक असलेल्या संस्थेकडील प्रवर्तक म्हणून नामनिर्देशित केलेला कार्यकर्ता यांची टीओएफ प्रशिक्षणासाठी निवड करावी. एका टीओएफकरिता 40 प्रवर्तक/ कृषी सहायक/ कृषी पर्यवेक्षक यांची निवड करावयाची आहे. मात्र, टीओएफमध्ये प्रशिक्षण झालेल्या प्रवर्तकाने सेंद्रिय शेतीशाळेची अंमलबजावणी करावयाची आहे. जिल्हानिहाय दिलेल्या उद्दिष्टानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी प्रकल्पामध्ये समाविष्ट कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्याची/ प्रवर्तकाची टीओएफकरिता निवड करून ती यादी विभागीय कृषी सहसंचालक यांना सादर करावी. प्रति टीओएफकरिता चार लाख रुपये खर्चमर्यादा आहे. 

ब- 5) हिरवळीचे खत बियाणेपुरवठा - 
1) हिरवळीच्या खताचे पीक प्रत्यक्षात शेतात मुख्य पीक लागवडीपूर्वी पेरून ते 50 ते 60 दिवसांचे झाल्यानंतर अथवा फुलोऱ्यात येण्यापूर्वी नांगराने गाडण्याची पद्धत - यासाठी प्रामुख्याने ताग, धैंचा, चवळी, उडीद, कुळीथ इत्यादी पिकांची शेतात विशेषतः खरीप हंगामात लागवड करतात. 
2) दुसऱ्या पद्धतीत हिरवळीच्या पिकासाठी प्रामुख्याने शेताच्या बांधावर अथवा पडीक डोंगराळ जमिनीतील क्षेत्रावर सुबाभूळ, करंजा, टाकळा, रानमोडी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गिरिपुष्प वनस्पतीची हिरवी पाने आणि कोवळ्या फांद्याचा वापर करणे. 
सन 2012-13 मध्ये कृती आराखड्यांतर्गत सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन योजनेमध्ये हिरवळीच्या खताचा वापर हा घटक समाविष्ट आहे. सदर कार्यक्रमात प्रस्तावित केल्यानुसार हिरवळीच्या खताचा वापर वाढविण्यासाठी सहभागी शेतकऱ्यास कमाल दोन हेक्‍टर क्षेत्र मर्यादेपर्यंत ताग, धैंचा, चवळी, उडीद, कुळीथ इत्यादीचे बियाणे 25 टक्के अनुदानावर कमाल 2000 रुपये प्रति क्विंटल अनुदान देय राहील. कृषी विद्यापीठे/ शासकीय प्रक्षेत्रे/ राज्य बियाणे महामंडळ/ राष्ट्रीय बीज नियम या यंत्रणेच्या माध्यमातून बियाणे पुरविण्यात येणार आहे. हे अनुदान लागवड क्षेत्राच्या 75 टक्के लोकवाटा भरून घेऊन प्रत्यक्ष बियाणे स्वरूपात देय आहे. संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मागणीप्रमाणे राज्य बियाणे महामंडळाने प्रकल्पांतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना बियाणेपुरवठा करावयाचा आहे. या बाबीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहतात.

ब- 6) बांधावर/ सलग गिरिपुष्प/ शेवरी लागवड - 
जमिनीची पाणी धारण क्षमता, सुपीकता सुधारणे व क्षारयुक्त जमिनीची सुधारणा करण्यासाठी हिरवळीच्या खतांचे बियाणे वापरास प्रोत्साहन देण्यात येते. गिरिपुष्पाच्या पानांमध्ये कर्ब 36 टक्के, नत्राचे प्रमाण 1.15 टक्के असते, त्यामुळे शेताच्या बांधावर, कुंपणावर आणि सलग गिरिपुष्प लागवडीस प्रोत्साहन देणे आवश्‍यक आहे. 
छाटकलमांद्वारे लागवड करण्यासाठी 30 सें.मी. लांब व तीन सें.मी. व्यासाची दोन छाट कलमे निवडून पावसाळ्याच्या सुरवातीस 30 x 30 x 30 सें.मी. आकाराचा खड्डा करून बांधावर दोन मीटर अंतरावर आणि सलग 3 x 3 मीटर अंतरावर लागवड करावी. अशाप्रकारे एक हेक्‍टर क्षेत्राच्या बांधावर साधारणतः 250 रोपे लागवड करणे आवश्‍यक आहे, त्यासाठी 500 रुपये इतके अनुदान देय आहे. गिरिपुष्पाची कलमे/ रोपे/ बिया शासकीय नर्सरी/ शासन मान्यताप्राप्त नर्सरीमधूनच खरेदी करावीत. एक हेक्‍टर क्षेत्राच्या बांधावर साधारणतः 250 रोपे लागवड करणे आवश्‍यक आहे, त्यासाठी 500 रुपये इतके अनुदान देय आहे, म्हणजेच प्रति रोप लागवडीसाठी रु. 2.00 प्रमाणे अनुदान देय आहे. 

ब- 7) प्रदर्शन/ महोत्सव/ चर्चासत्र/ कार्यशाळा/ प्रशिक्षण/ आकस्मिक निधी - 
ग्राहकांमध्ये सेंद्रिय पद्धतीने उत्पादित मालासंबंधी जागृती आणण्यासाठी, प्रमाणीकरण उत्पादनास प्रसिद्धी देण्यासाठी, तसेच सेंद्रिय शेतीमालास खुली बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी, त्याचप्रमाणे सेंद्रिय उत्पादन घेऊ इच्छिणाऱ्या उत्पादकांना, ग्राहकांना, सेंद्रिय वाटचालीमध्ये सहभागी घटकांना प्रशिक्षण देणे, उत्पादकांना प्रशिक्षण देऊन सेंद्रिय उत्पादने घेण्यास प्रवृत्त करणे. राज्य/ विभाग/ जिल्हास्तरीय प्रदर्शन/ महोत्सव इत्यादी आयोजित करावयाचे असून, यामध्ये शेतकरी, सेंद्रिय संस्था, कृषी विद्यापीठे, आरसीओएफ नागपूर, प्रमाणीकरण यंत्रणा, सेंद्रिय निविष्ठा उत्पादक, व्यापारी आयात/ निर्यातदार, सेंद्रिय प्रक्रिया उत्पादक, प्रयोगशाळा, इ. व्यक्ती/ संस्थांना सहभागी करून घ्यावयाचे आहे. या घटकांतर्गत असलेली रक्कम प्रदर्शन, महोत्सव, चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण, प्रचार, प्रसार मोहीम व संकीर्ण बाबींसाठी खर्च करावयाची आहे. 

ब- 8) प्रचार व प्रसिद्धी - शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी व ग्राहक व खरेदीदार यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी प्रचार व प्रसिद्धीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. 
ब- 9) अभ्यास दौरे - राज्यातील तसेच राज्याबाहेरील आदर्श सेंद्रिय प्रक्षेत्र, सेंद्रिय तंत्रज्ञान संशोधन केंद्र, तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतावर शेतकऱ्याने जाऊन पाहणी केल्यास सेंद्रिय शेती पद्धतीबद्दल त्यांना माहिती करून घेता येऊ शकते. त्याचप्रमाणे नव्याने सेंद्रिय शेतीमध्ये सहभागी होणाऱ्या उत्पादकांना सेंद्रिय शेतीबाबतचे तंत्रज्ञान अवगत होऊन ते सेंद्रिय शेती करण्यास प्रवृत्त होऊ शकतात. हंगामात समक्ष जाऊन पिकांची व तेथील प्रयोगांची आणि निविष्ठा उत्पादनाची पाहणी करून शेतकऱ्यांना अल्प खर्चात माहिती मिळू शकते. याची खात्री झाल्यावर ते स्वतः या तंत्राप्रमाणे सेंद्रिय शेती सुरू करू शकतात. यासाठी शेतकऱ्यांचे राज्यांतर्गत व राज्याबाहेरील अभ्यास दौरे आयोजित करण्यात यावेत. राज्यांतर्गत अभ्यास दौऱ्यासाठी प्रति शेतकरी 1000 रुपये याप्रमाणे अर्थसाहाय्य प्रस्तावित आहे. प्रत्येक प्रकल्पातून अशा प्रकारे सर्वसाधारणपणे 25 शेतकरी/ उत्पादकांचा दौरा आयोजित करण्यासाठी अनुदान प्रस्तावित आहे. राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी प्रति शेतकरी 2,000 रुपये याप्रमाणे अर्थसाहाय्य प्रस्तावित असून, प्रत्येक कृषी विभागातून 60 ते 65 शेतकरी/ उत्पादकांचा एक अभ्यास दौरा आयोजित करण्यासाठी अनुदान मंजूर आहे. 

ब- 10) कृषिभूषण (सेंद्रिय शेती) - 
राज्यात सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढविण्यासाठी सेंद्रिय शेतीत उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांना/ संस्थांना शासनामार्फत कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. 

(लेखक कृषी आयुक्तालयात कृषी सहसंचालक (फलोद्यान) म्हणून कार्यरत आहेत.) 
ऍग्रोवन चौकट, ता. 4-2-2013 (केपी) फा.नं. - ए74106 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन